Sambhajiraje On jalana voilence : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना जालनामध्ये (Jalana News) घडली आहे. आंदोलक आणि पोलिसात झालेल्या बाचाबाचीनंतर तणाव वाढला आणि पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे. तर संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाला संभाजीराजे?

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला आणि शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. 

मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात ‘शांतता राखा’

जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आणखी वाचा – जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवार म्हणतात ‘गृहमंत्र्यांची सूचना असावी’

जालन्यात एवढा राडा झाला तेव्हा गृहमंत्रालय झोपलं होतं का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. गरज पडल्यास शरद पवार जालन्याला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp