धक्कादायक! कसारा रेल्वे स्थानकात टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग; आईसमोरच…

धक्कादायक! कसारा रेल्वे स्थानकात टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग; आईसमोरच…


Kasara News : महिलांवरील वाढते अत्याचार आणि तत्सम घटनांमुळे पुन्हा एकदा कायदा आणखी कठोर करण्याची आणि गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी सातत्यानं जोर धरताना दिसत आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेवर सातत्यानं प्रश्नचिन्हं उपस्थित करणारी आणखी एक घटना नुकतीच कसारा रेल्वे स्थानकात घडली आणि अनेकांनाच या वृत्तानं धक्का बसला. 

कसारा स्थानकात उतरलेल्या मायलेकीला टीसीनं तिकीट विचारलं आणि यादरम्यान तिकीट तपासणीच्या बहाण्याने संबंधित टीसीने 7 वर्षीय चिमुरडीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार पिडीत चिमुरडीच्या आईने केली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी रमेशकुमार शर्मा या टीसी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. 

12 जून रोजी घडला मन विचलित करणारा प्रकार…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून 12 जून रोजी कसारा लोकलने एक महिला आपल्या सात वर्षाच्या मुलीसमवेत कसारा स्थानकात उतरली. स्थानकात उतरल्यानंतर रमेशकुमार नावाच्या ‘टी सी’नं या महिलेकडे तिकीटाची मागणी केली. महिला पर्समध्ये तिकीट शोधत असताना रमेशनं आईजवळ उभ्या असलेल्या 7 वर्षाच्या चिमुरडीला जवळ ओढत तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. 

याप्रकरणी आईने उपमुख्यमंत्री कार्यालयात पत्र धाडत आपल्या मुलीबरोबर घडलेल्या घटनेतील आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून या घटनेची तातडीने दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना दिल्या होत्या. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी या महिलेशी संपर्क साधत याप्रकरणी रमेश शर्मा या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या 35 दिवसां शिक्षा

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या 35 दिवसांत दोषी ठरवत 1 वर्ष सक्त कारावासाची आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केला. खडकपाडा पोलीस ठाण्यात 3 जून रोजी एका महिलेने 29 वर्षीय ओंकार निकाळजे याच्याविरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली. जलद तपास पूर्ण करून काही तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. या गुन्ह्यातील साक्ष, पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला बी.एन.एस कलम 74 अंतर्गत 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा आणि बी.एन.एस कलम 329 (3) अंतर्गत 1 महिना साध्या करावासाची शिक्षा आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. 





Source link

आईने जेवायला भेंडी बनवली, नागपूरच्या मुलाने चिडून घरच सोडले; पोलिसांनी लोकेशन तपासताच घरचेही भेदरले…

आईने जेवायला भेंडी बनवली, नागपूरच्या मुलाने चिडून घरच सोडले; पोलिसांनी लोकेशन तपासताच घरचेही भेदरले…


Jul 10, 2025 | LIVE

Anderson-Tendulkar Trophy, 2025

Jul 13, 2025 | LIVE

The Frank Worrell Trophy, 2025

Jul 13, 2025 | Final

Quadrangular T20I Series in Malawi, 2025

Jul 13, 2025 | 3rd Place Play-off

Quadrangular T20I Series in Malawi, 2025

Jul 12, 2025 | Match 12

Quadrangular T20I Series in Malawi, 2025

GER

(18.4 ov) 140

VS

TAN

146/5(16.5 ov)

Tanzania beat Germany by 5 wickets
Full Scorecard →





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सस्पेंस ! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला की नाही?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सस्पेंस ! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला की नाही?



राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी दिलाय की नाही यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं कोणतंही अधिकृत पत्र अजून जाहीर झालेलं नाही. 



Source link

पती चारित्र्यावर संशय घेत सतत करायचा मारहाण; पत्नीने काटा काढला, अंगावर काटा आणणारा घटनाक्रम

पती चारित्र्यावर संशय घेत सतत करायचा मारहाण; पत्नीने काटा काढला, अंगावर काटा आणणारा घटनाक्रम


Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे एका आदिवासी शेतमजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.

जायखेडा पोलीसांच्या हद्दीत कैलास जिभाऊ पवार वय ४५ हे घराच्या पाठीमागील बाजूस मृत अवस्थेत मिळून आल्याने हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा करून मयत कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह नामपूर ग्रामिण रुग्णालय पाठवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखुन जायखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृताची पत्नी मनीषा हिची कसून चौकशी करण्यात आली. कैलास सतत पत्नीच्या चारित्र्यावरुन संशय घेत असे. त्यावरुन तिला मारहाणदेखील करत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

रहाटगाव येथे 55 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

रहाटगाव परिसरातील एका 55 वर्षीय व्यक्तीची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 12 जुलै रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली आहे.राजकुमार सुंदरराणी असे मृतकाचे नाव आहे. ओळखीच्या काही व्यक्तींनी राजकुमारचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदगाव पेठ पोलिसांनी राजकुमार यांच्या भावाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान दोन्ही आरोपी अजूनही पसार असून पुढील तपास पोलीस करत आहे.





Source link

महाराष्ट्रात होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; यानंतर ‘ही’ प्रॅक्टिस…

महाराष्ट्रात होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; यानंतर ‘ही’ प्रॅक्टिस…


महाराष्ट्र सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता. होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक औषधे लिहून देण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता सरकारने हा निर्णय माघार घेतली आहे. सरकारने 7 सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती दोन महिन्यांत या प्रकरणावर निर्णय घेईल.विशेष गोष्ट म्हणजे, या प्रकरणात होमिओपॅथी डॉक्टर किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या डॉक्टरांनी असं म्हटलं नाही की जर निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही तर ते समितीचा निर्णय स्वीकारतील. दोन्ही पक्ष समितीच्या निर्णयाशी सहमत नाहीत. समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी समाविष्ट आहेत. यासोबतच, मॉडर्न मेडिसिन आणि होमिओपॅथी कौन्सिलचे रजिस्ट्रार देखील समितीमध्ये असतील.

मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित सुधारणा

आयएमए (महाराष्ट्र) प्रमुख संतोष कदम म्हणाले की, हे प्रकरण समस्येच्या मुळाशी आव्हान देते. त्यांनी 2014 मध्ये महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स अॅक्ट आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅक्ट 1965 मध्ये केलेल्या सुधारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सुधारणा अजूनही मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

कदम म्हणाले की, समिती या प्रकरणावर विचार करू शकते, पण जर त्यांचा निर्णय सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. आमच्यासाठी न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

होमिओपॅथिक कौन्सिलने काय म्हटलं?

महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलचे प्रशासक बाहुबली शाह म्हणाले की, समितीवर विश्वास नाही कारण त्यात होमिओपॅथी डॉक्टर नाही. त्यांनी समितीमध्ये एक लिपिक ठेवला आहे. शाह म्हणतात की समितीमध्ये होमिओपॅथीचे तज्ज्ञ असायला हवे होते.

गेल्या 10 दिवसांपासून वैद्यकीय समुदायात चिंता होती की होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाच्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक औषधे लिहून देण्याची परवानगी दिली जात आहे. लोकांना भीती होती की यामुळे लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम औषधांबद्दल माहिती देतो. आधुनिक औषधे लिहून देण्यासाठी अधिक ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.





Source link

मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार, शरद पवारांनी 'या' नेत्याकडे सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार, शरद पवारांनी 'या' नेत्याकडे सोपवली जबाबदारी


Jayant Patil Resign: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अखेर जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अखेर जयंत पाटील यांची ही मागणी पूर्ण झाली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

मला प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन सोहळ्यातच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर अखेर आज त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झाले आहेत.

जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत होते. त्यांच्या नेतृत्वात अनेक मोठ्या निवडणुका पक्षाने लढवल्या होत्या. काही ठिकाणी त्यांना यश आलं तर काही ठिकाणी अपयश आलं होतं. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला या पदापासून मुक्त करा, अशी विनंती केली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेतेमाजी आमदारांच्या नावांची चर्चा होती. आमदार रोहित पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र शशिकांतत शिंदे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात हा मोठा बदल केला आहे. पक्षाची पूर्णतः जबाबदारी आणि विधानसभेचे अपयश भरून काढण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर असणार आहे. तसंच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ही मोठी घडामोड असल्याचे पाहायला मिळतेय





Source link