महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा 'VIP' घोटाळा! थेट भक्तांनाच लुबाडले

महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा 'VIP' घोटाळा! थेट भक्तांनाच लुबाडले


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

'विरोधकांनी महिला विधेयकाची भ्रृणहत्या केली, ज्योतिबा फुलेंच्या…'; फडणवीसांचा हल्लाबोल! BJP चा पुढचा प्लॅनही सांगितला

'विरोधकांनी महिला विधेयकाची भ्रृणहत्या केली, ज्योतिबा फुलेंच्या…'; फडणवीसांचा हल्लाबोल! BJP चा पुढचा प्लॅनही सांगितला


Fadnavis Slams Opposition Over Women Reservation Bill 2026 Rejected: लोकसभेत नामंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. या विधेयकाच्या अनुषंगाने फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून महिला आरक्षण विधेयकाला करण्यात आलेल्या विरोधावर कठोर शब्दांमध्ये भाष्य करत विरोधकांनी देशातील महिलांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम

“17 एप्रिलला अपेक्षा होती की देशातील सामाजिक आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचा देश ठरेल. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होतं. सर्वजण मदत करतील याला अपेक्षा होती. डीएमके, एनसीपी शरद पवार पक्ष, समाजवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना , कांग्रेस यांनी कोत्या मानसिकतेचे प्रदर्शन केलं. महिला विधेयकाची भ्रृणहत्या करण्यात आली. विरोधकांनी त्यानंतर आनंदोत्सव देखील साजरा केला. हे समाजसुधारकांच्या विचारांवर केलेले तांडव होते. ज्योतिबा फुले यांची 200 वी जन्मशताब्दी चालली आहे. फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले. हे सगळे पक्ष एक्सपोज झाले आहेत,” असं फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटलंय. 

सगळी आकडेवारी येईपर्यंत 2028 उजाडेल

“तीन विधेयकं मांडण्यात आली होती. 1976 ला देशात डिलिमिटेशन झालं. संविधान संशोधन करत 1971 ची लोकसंख्या फ्रीज ठेवत 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही. 2002 साली कमिशन तयार झालं तेव्हा दक्षिणेवर अन्याय होऊ नये म्हणून 20 वर्षांची वाढ दिली. 71 सालच्या लोकसंख्येवर डिलिमिटेशन झालं. 2023 साली महिला आरक्षणासाठी संशोधन झालं तेव्हा सेन्सस आणि डिलिमिटेशन लागू करत संशोधन झालं. 2023 च्या संविधान संशोधनानुसार ही विधेयकं आली आहेत.  सेन्सक्स पूर्ण होईल असं तेव्हा वाटलं होतं, मात्र केव्हिडमुळे पुढे गेलं आणि 2027 साली ते काम पूर्ण होईल. सगळी आकडेवारी येईपर्यंत 2028 उजाडेल. 2023 ला निर्णय घेतला होता, त्यानुसार डिलिमिटेशन करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत 2029 ला महिला आरक्षण लागू होईल आणि महिला निवडून येतील. संविधानाने जी जबाबदारी टाकली होती,” असंही फडणवीस म्हणाले. 

उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न

2002 आणि 23 सालानुसार परिसीमन करणं गरजेचं होतं. प्रत्येकवेळी दक्षिणेतील राज्य आॅक्बेक्शन घ्यायची आम्ही लोकसंख्या कंट्रोल केली. अशात, लोकसभा आणि विधानसभेच्या जागा आहेत त्यात 50 टक्के वाढ होईल असा विचार पुढे आला. 23.46 टक्के आता खासदार येतात तर पुढे ते 23.86 टक्के झाले असते. लोकसभेत 543 जागा ज्यावेळी भारताच्या संसदेत असतील असं 1971 साली ठरलं. तेव्हा लोकसंख्या 45 कोटी होती आणि आता 140 कोटी लोकसंख्या आहे. पिपल्स रिप्रेशेन्टेशन ॲक्टसोबत प्रतारणा होईल.  उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न या विधेयकात केले होते,” असंही फडणवीस म्हणाले.

त्यांची बोलती बंद झाली

“डिलिमिटेशन सेन्सेस प्रमाणे लागू होईल असं बोलणारे, एनडीएकडे 2/3 मेजाॅरिटी नाही. त्यांनी सरड्यासारखा रंग बदलला. 352 मतांची आवश्यकता होती आणि विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. जगातील अनेक लोकशाही महिला सहभाग वाढतो आहे आणि तो वाढू नये असा प्रयत्न करणे चुकीचे आहे. जागा वाढल्या असत्या तेव्हा एससी, एसटी यांच्या जागा वाढल्या असत्या. विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता त्यावर देखील कुऱ्हाड घातली आहे. संसदेचा विचार केला तर 73 महिला आहे, 273 महिला विधेयक मंजूर झाल्या असत्या तेव्हा गेल्या असत्या. नेहमीच कांग्रेस आणि साथीदारांची प्रवृत्ती राहिली आहे. सातत्याने महिला विरोधी धोरणं घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा विचार होता मग ते शाहबानो प्रकरण असो, विरोधकांनी काही मुद्दे उपस्थित केलेत. गृहमंत्र्यांनी सांगितलं आम्ही बदल करतो तुम्ही पाठिंबा द्या. मात्र त्यांची बोलती बंद झाली,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

पुढे काय करणार?

“भाजपवर आरोप केलेत. भाजपाने राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी महिला मुख्यमंत्री दिल्यात. महिलांना यांनी कधीही याठिकाणी मुख्यमंत्री बनू दिले नाही. माझ्या स्तरावरील नेत्याने कोणीही माझ्याबरोबर ओपन डिबेट करावी. माझं चॅलेंज आहे, हे करणार नाही.  हे पळून जातात. आम्ही आता महिलांचे एकत्रीकरण करणार आहोत. लोकशाहीत जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल. तेव्हा हे मान्यता महिला आरक्षणाला पाठिंबा देतील. महिलांना संघटित करण्याचे काम करु. राज्यातून एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत.  आम्ही मेळावा बोलावला आहे, तिथे देखील आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित करु. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेसचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघड करु,” असं फडणवीसांनी पुढील नियोजनाबद्दल माहिती देताना सांगितलं.  “महिला आरक्षणाला यांना समर्थन द्यावे लागेल आणि त्याचा निर्धार करु. महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार फडणवीसांनी बोलून दाखवला. 

कांग्रेसला सगळं माहिती आहे

“2023 ला संविधान संशोधन धरलं ते 2021 चं सेन्सस धरलं होतं.  2029 ला ते लागू शकत नव्हतं कारण सेन्सस पूर्ण झालं नाही. जाणीवपूर्वक महिलांचे आरक्षण थांबवणं योग्य नाही, कांग्रेसला सगळं माहिती आहे. 2/3 मेजाॅरिटी असती तर कोणीही विरोध केला नसता. त्यांनी चुकीच्या गोष्टींवर अपाॅर्च्युनिटी शोधली,” असं म्हणत फडणवीसांनी खंत व्यक्त केली. 

खोटं बोलण्यात ऑलम्पिकमध्ये राहुल गांधी मेडल घेतील

राहुल गांधींनी ट्विट करुन केलेल्या आरोपवरुन फडणवीसांनी, “खोटं बोलण्यात ऑलम्पिकमध्ये राहुल गांधी मेडल घेतील/ संविधान तयार झालं तेव्हा डिबेट झाल्या तेव्हा महिला रिप्रेशेन्टेशन संदर्भात बाबासाहेब आंबेडकर चिंतेत होते. आता तेच विचार अनुरुप आल्यानंतर कायदा पाडायचा आणि संविधान जिंकले म्हणायचे यातून त्यांनी महिलांच्या हक्कांवर घाला घातला आहे. महिलांचा अपमान आणि इतर घटकांचा अपमान करणं हा राहुल गांधींचा छंद आहे,” असा टोला लगावला. 





Source link

महिला आरक्षणाच्या मुद्दावरुन नाना पटोले कडाडले! 2023च्या नारीशक्ती विधेयकावरून उपस्थित केले सवाल

महिला आरक्षणाच्या मुद्दावरुन नाना पटोले कडाडले! 2023च्या नारीशक्ती विधेयकावरून उपस्थित केले सवाल


नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर हल्लाबोल केल्यानंतर विरोधकांनी 2023च्या महिला आरक्षण विधेयकाचा धागा पकडला आहे. 2023 मध्ये मंजूर झालेला कायदा अंमलात का आणला नाही? असा सवाल आता विरोधकांनी केला आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षण कायदा म्हणजेच ‘नारी शक्ती वंदन विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले होते, दरम्यान या विधेयकाला विरोधकांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र याच विधेयकावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आता कोंडीत पडकलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सध्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. राजकारणामध्ये महिला आरक्षणाच्या विधेयक नामंजूर केल्यानंतर आता याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 18 एप्रिल रोजी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरुन देशवासियांना संबोधित केले होते. त्यानंतर आता विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणे साधले आहेत. 

हेही वाचा – महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकारण तापलं! विरोधकांचा मोदींवर निशाणा

2023च्या नारीशक्ती विधेयकावरून सवाल – नाना पटोले

2023च्या नारीशक्ती विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता, मात्र यावेळी महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सत्ताधा-यांचा दुसराच डाव होता… 2023 ला मंजूर झालेलं आरक्षण 2024च्या आधी लागू करणार होते, त्याचं काय झाल? असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केला आहे. महिला आरक्षण विधेयकावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपला काही सवाल केले आहेत, तामिळनाडू, पश्चिम बंगलाच्या निवडणुकीआधी भाजपनं महिला आरक्षणाचा ड्रामा केल्याची टीका दमानियांनी केलीय.

महिला आरक्षणाच्या विधेयकावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केल्यानंतर विरोधकांनी 2023च्या नारीशक्ती विधेयकाचा मुद्दा पुढे आणला, आणि याच मुद्यावरून विरोधक आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नाना पटोले हे असेही म्हणाले की जेव्हा मोदी बोलत होते तेव्हा मी मोबाईलवर पाहत होतो. अनेक लोक त्यांना फेकू आणि मी बोलू शकत नाही असे म्हणत आहेत पण ते त्यांच्यावर टीका केली जात आहे. 

नाना पटोले यांचा दावा 

भाषण करताना नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 10 टक्के महिलांना तिकीट दिलं तर काँग्रेसने 13% महिलांना तिकीट दिले होते. पुढे ते म्हणाले की आम्ही महिलांचा सन्मान करतो आणि भाजपाला महिला नको आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला.





Source link

काळी बाहुली-लिंबू, सुया अन्…; सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार

काळी बाहुली-लिंबू, सुया अन्…; सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार



Sangli News : सांगलीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार घडल्यामुळे परिसरात भीतीदायक वातावरण आहे. 



Source link

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका?, निनावी पत्राने खळबळ; बीड कनेक्शनची का होतेय चर्चा?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका?, निनावी पत्राने खळबळ; बीड कनेक्शनची का होतेय चर्चा?


DCM Sunetra Pawar: बीडमध्ये निनावी पत्राचा भडका अजूनही शांत झालेला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करणाऱ्या त्या पत्राने राज्यभरात खळबळ उडवली. पण पत्र पाठवणारा अद्याप अज्ञातच आहे. कायद्यात ठोस तरतूद नसल्यामुळे तपास मर्यादित असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. याच मुद्द्यावर आता बीड कृती समिती आक्रमक झालीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

काय नेमकं प्रकरण?

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर बीडमधून समोर आलेल्या एका निनावी पत्राने नव्या वादाला तोंड फोडलं. एसआयटीकडे दिल्याची माहिती असलेलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काही नेत्यांनी सखोल चौकशीची मागणी केली, मात्र पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी निनावी पत्रांवर कारवाईसाठी कायद्यात ठोस तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं. या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दरम्यान, बीड कृती समिती आक्रमक झाली असून, जिल्ह्याची बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची जोरदार मागणी केली आहे.

कडक कारवाईची मागणी 

राज्यात कुठलीही घटना घडली की आधी “बीड कनेक्शन” शोधलं जातं, असा संताप आता उफाळून आला आहे. बीडची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत कृती समिती आक्रमक झाली आहे. नाशिकच्या खरात प्रकरणातही बीडचा संबंध जोडत एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. “हे पत्र नेमकं कोणी लिहिलं, कोण पसरवतंय?” याचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी ठाम मागणी करण्यात आली. पोलिस अधीक्षक आणि आयजी यांना निवेदन देत बीडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केलीय.

पोलीस काय दखल घेणार?

जिल्ह्यात खून दरोडा मारहाण या घटना ताज्या असतानाच आता एका नव्या प्रकरणात देखील बीड कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. यामुळे या नाही त्या कारणाने चर्चेत असलेलं बीड पुन्हा एकदा राज्याच्या पटलावरती चर्च स्थानी आलंय. मात्र यांनी निनावी पत्रामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडालीय. आता बीड कृती समितीने दिलेल्या निवेदनाची पोलीस अधीक्षक काय दखल घेतात आणि कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

 निष्पक्ष तपास होणं अत्यावश्यक

एकूणच निनावी पत्रामुळे निर्माण झालेलं हे वादळ अजूनही शांत झालेलं नाही. पत्राचा उगम, त्यामागील हेतू आणि त्यातून उभ्या राहिलेल्या शंका, या सगळ्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. बीडची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत असताना, सत्य बाहेर आणण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष तपास होणं अत्यावश्यक आहे. आता पोलिस यंत्रणा या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते आणि पुढील कारवाई काय करते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.





Source link

पाऊण तासाचा प्रवास 10 मिनिटांवर… घरांच्या किंमती वाढणार, ₹1020700000000 चा मेगा प्रोजेक्ट नवी मुंबईसाठी ठरणार वरदान

पाऊण तासाचा प्रवास 10 मिनिटांवर… घरांच्या किंमती वाढणार, ₹1020700000000 चा मेगा प्रोजेक्ट नवी मुंबईसाठी ठरणार वरदान


Infrastructure News Navi Mumbai Coastal Road: नवी मुंबईमध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झाल्यापासून मुख्य शहराशी नवी मुंबई एअरपोर्ट अत्यंत वेगाने जोडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांसंदर्भात कामाला जोर आल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत कमी वेळात पोहचण्यासाठी दोन कोस्टल रोडचे प्रकल्प विचाराधीन असून यापैकी एक मार्ग खारघर कोस्टल रोड (Kharghar Coastal Road Project) नावाने ओळखला जातो. या रस्त्याचा कोडनेम केसीआर असं आहे. भविष्यात नवी मुंबईमध्ये या विमानतळाच्या माध्यमातून वाढणारी खासगी आणि मोठ्या वाहनांची वाहतूक लक्षात घेत केसीआर फारच महत्त्वाचा ठरणार आहे. नवी मुंबईची कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रोजेक्ट नेमका कसा आहे त्यासाठी किती खर्च येणार? हा रोड कोण बांधणार आहे? यासंदर्भातील ए टू झेड माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Add Zee News as a Preferred Source

खर्च किती? काम कोणाला सोपवलंय?

खारघर कोस्टल रोड प्रकल्प हा नवी मुंबईतील एक महत्त्वकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प सिडकोच्या (CIDCO) माध्यमातून बांधला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोड देण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. साधारण 9.7 किलोमीटरचा आणि अगदी तंतोतंत सांगायचं झालं तर 9.678 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. 30 मीटर रुंदीचा हा रस्ता सहा लेनचा असेल. जीएसटी वगळता 1020.70 कोटी रुपये खर्च करुन हा रस्ता बांधला जाणार आहे. म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर 1020700000000 रुपये इतका खर्च या रोडसाठी येणार आहे. या प्रकल्पाचं कंत्राट संयुक्तरित्या जे. कुमार आणि जे. एम. म्हात्रे यांना देण्यात आलं आहे. प्रकल्पाचा काही भाग 2028 मध्ये वापरासाठी खुला होईल. मात्र संपूर्ण प्रकल्प पूर्णपणे वापरासाठी उपलब्ध होण्यास 2029 उजाडेल.

कुठून कुठे जाणार हा मार्ग?

हा मार्ग पनवेल खाडी किनाऱ्यावरून जाणार आहे. या मार्गाची सुरुवात जलमार्ग सेक्टर 16 पासून होईल आणि तो पुढे सीबीडी बेलापूर आणि नेरूळमधील वॉटर ट्रान्सपोर्ट जेट्टीपर्यंत जाईल. संपूर्ण मार्ग दोन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागण्यात आला असून पाहिला टप्पा खारघर ते सीबीडी बेलापूर असा असून दुसरा टप्पा सीबीडी बेलापूर ते नेरूळ असा असेल.

लांबी, रुंदी कशी?

या मार्गाच्या एकूण लांबीपैकी सुमारे 6.96 किलोमीटरचं बांधकाम हे नवीन असेल. तर 2.99 किलोमीटरचा रस्ता हा विद्यमान मार्गाची दुरुस्ती करुन नव्या बांधकामाशी जोडला जाणार आहे. काही भागात खाडीवर ब्रिज किंवा रिअक्लेमेशनचा वापर केला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, विद्युत उपकरणे शिफ्टिंगसारखे प्राथमिक काम सुरू झाले आहे. वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर काम पूर्ण वेगाने लवकर सुरू होणार आहे

या मार्गामुळे नेमकं काय होणार?

नवी मुंबई विमानतळाला थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळण्याबरोबरच या मार्गामुळे प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. खारघर ते बेलापूर/नेरूळ दरम्यानचा सध्याचा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होईल. सायन-पनवेल महामार्ग आणि पाम बीच रोडशी कनेक्टीव्हिटी प्राप्त होईल. हा मार्ग सुरु झाल्यावर खारघर, नेरूळ, बेलापूर भागात वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल. रिअल इस्टेट, कॉर्पोरेट पार्क, रोजगार या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांच्या माध्यमातून या मार्गामुळे नवी मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच भविष्यातील वॉटर ट्रान्सपोर्ट टर्मिनल आणि इतर प्रकल्पांसाठी कनेक्टीव्हिटी म्हणून हा मार्ग फार उपयुक्त ठरणार आहे. या मार्गामुळे खारघर भागात मोठा विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसरा कोस्टल मार्ग कोणता?

दुसरा कोस्टल रोड हा उलवे कोस्टल रोड नावाने ओळखला जातो. हा मार्ग 7 किलोमीटरचा असणार आहे. मुख्य मार्ग 5.8 किलोमीटर आणि विमानतळाशी असलेली लिंक 0.9 ते 1.2 किलोमीटर असेल. हा मार्ग एकूण 6 लेनचा असेल. या मार्गासाठी एकूण 1600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातून पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा मार्ग सीबीडी बेलापूरमधून सुरु होऊन सीवुड्स-दरावे, उलवे, बामनोंडगरी, तरघर, शिवाजी नगर जंक्शन इथे संपेल. मुंबई ट्रान्स हार्बरशी हा प्रकल्प लिंक्ड असेल. या मार्गामुळे अटल सेतूवरुन विमानतळापर्यंत सिग्नल फ्री आणि वेगवान प्रवास करता येईल. यामुळे प्रवासाची 25 मिनिटं वाचतील. या मार्गाचं 60 टक्के काम पूर्ण झालं आहे.
 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp