Unseasonal Rain : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. तर एप्रिलचा पहिल्या आठवड्यातील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain) अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. बाळापुर तालुक्यातल्या कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय. बाळापुर तालुक्यातल्या तामशी गावात कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा अक्षरशः अवकाळी पावसाच्या पाण्याने भिजलाय. यात जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झालं आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अकोल्यात अवकाळी पावसानं काल (1 एप्रिलच्या) रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. यात कांदा आणी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. बाळापुर तालुक्यात रात्री अवकाळी पावसाचा कहर होता. याशिवाय सोबत वारा देखील वाहत होता. या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. वाऱ्यामुळं केळीची झाडं पडल्याने केळीचे घड अक्षरश: मातीत भिजल्या गेलेय. यात शेतकऱ्यांच एकरी जवळपास 35 ते 40 टक्के नुकसान झालंय. अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यावर आली होती, मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडं ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवलीय. अमोल काळे यांच्या शेतातील जवळपास साडेचार एकर पैकी दीड एकर केळीचे नुकसान झालं आहे.
कांदा उत्पादक शेतकरीही संकटात
तर अशीच परिस्थिती जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची झालीय. यासोबतच अवकाळी पावसाचा तडाखा आता जनावरांना बसलाय. या पावसात शेतकऱ्यांच्या मेंढ्या भिजल्याने आजारी पडल्या आहेत. त्यामुळे मेंढापालन करणारे शेतकरी चिंतेत पडलेय.
अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका
जालन्यात देखील अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे. यात काढणीस आलेला गहू आणि मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने गहू आणि मका पिकाच नुकसान झालं आहे. तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मक्का आणि गहू पिकाच मोठा नुकसान झालं आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे गहू आणि मक्का पिकाच मोठ नुकसान झालं. यामुळे काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवं झाल्याचं पाहायला मिळाले,
दरम्यान या बेमोसमी अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..