जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी यांची टीका


अमरावती : सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज (22 मार्च) अमरावतीत (Amravati)  केलंय. अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या भाषणात असे वक्तव्य करत जातीय व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. शिवाय नागपुरातील हिंसाचाराची घटना (Nagpur Violance)  घडली असताना त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 

माझं राजकारण माझ्या हिशोबाने चालेल, तुमच्या हिशोबाने नाही- नितीन गडकरी

या कार्यक्रमात पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, माझा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही. त्यांनी त्याच्या कर्तुत्वावर स्थान निर्माण करावे. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. आमदार खासदारांनी म्हणायच्या ऐवजी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जर म्हटलं तर त्यांना अधिकार आहे. जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना हा पूर्ण अधिकार आहे. कुणाचा मुलगा, मुलगी असणे गुन्हा नाही. आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण आहे. विकासकारण आहे. मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरी चालेल. जो मत देईल त्याचे काम करेल, जो नाही देईल त्याचेही काम करेल. त्यामुळे जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असेही नितीन गडकरी म्हणाले.

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024’ने आज (22 मार्च) अमरावतीत सन्मानित करण्यात आले. यावेळी पाच लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होतं. तसेच या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेला ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024’ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार 2024’ असे दोन पुरस्कार अकोला येथील वंदना धोत्रे आणि भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य या दोन उत्कृष्ट शेतकरी महिलांना दिल्या गेलं. 

‘ते’ 25 लाख रुपये विदर्भातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून द्या

सोबतच यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी पुरस्काराची रक्कम परत करत म्हणाले की, मला 5 लाख रुपये पुरस्कारातून मिळाले. त्यात 20 लाख रुपये टाकून मी 25 लाख रुपये देत आहे. ते 25 लाख रुपये विदर्भातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून संस्थेने द्यावं, अशी मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी केली

इतर महत्वाच्या बातम्या 

Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक…; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले

अधिक पाहा..



Source link

नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवलं, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, म्हणाले..


नागपूर: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा गदारोळ सुरु आहे. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आल्याने सध्या मोठी खळबळ उडालीय.याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी दुबईतील प्रशांत कोरटकरचा एक फोटो समोर आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप नागपूर पोलीसांवर केले जातायत. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलंय. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) लपविल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. कोरटकर जर दुबई पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचं मिटकरीं म्हणालेत. दरम्यान, कोरटकर चंद्रपुरात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो? असा सवालही त्यांनी केलाय. (Nagpur Police)

गेल्या 15 दिवसांपासून पोलीस प्रशांत कोरटकर तपास यंत्रणांच्या रडावर आहे. मात्र, कोलकत्यासारख्या प्रमुख विमानतळावरून तो व्हिसा वापरून दुबईला जातो हे अनेकांच्या पचनी पडत नाहीय. त्यामुळे प्रशांत कोरटकरला देशाबाहेर सुरक्षित पळून जाण्यासाठी नागपूर पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची मदत होती का? असा सवाल केला जातोय.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

नागपूरमध्ये हिंसाचार घडल्यानंतर प्रशांत कोरटकर चंद्रपूरात असल्याचं कळतं. चंद्रपूरात तो एका पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचं कळतं. कोरटकरला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. भाजपचे स्थानिक आमदार परिणय फुके यांनी माध्यमांना सांगितलं होतं की दोन दिवसात कोरटकरला अटक होईल. आता असं कळतंय की तो दुबईला पळून गेला. जो फोटो व्हायरल होतोय तो दुबईतलाच दिसतोय पण तो आताचा असेल असं वाटत नाही. नागपूर विमानतळावरून जाणं किंवा कोलकाता विमातळावरून असे जाणे सोपे नाही. गृहमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहे. मात्र, नागपूर पोलिसांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एवढी मोठी दंगल घडवली ज्या लोकांनी ही दंगल घडवली त्यांना ड्रेस करायला इतका वेळ का लागला? तुम्हाला दंगल होताना गाड्यांवर दगडफेक होणार तलवारी चालणार हे माहित असताना हे का लपवले गेले? या दंगली चा फायदा घेऊन कोरटकर याने दंगल भडकवली नसेल कशावरून? असा सवाल ही अमोल मिटकरी यांनी केला. या दंगलीचा फायदा घेऊन कोरटकर मोकाट सुटला का? जोपर्यंत नागपूर पोलीस कोरटकरच्या मुस्क्या आवळून त्याला जेलमध्ये टाकणार नाहीत तोपर्यंत हे प्रश्नचिन्ह कायम राहणार. दुर्दैवाने पोलीस प्रशासनच हलगर्जीपणा करत असेल तर महायुतीचे सरकार जितक्या चांगल्या प्रकारे जनतेच्या हिताचे काम करते आहे, त्यावेळी अशाप्रकारे एखादा आरोपी सापडत नसेल तर कोरटकरला नागपूर पोलिसांचं अभय आहे का? असा प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला वाव मिळतो आहे. नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवला आहे, असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांची पथकं

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथक नागपूरमध्ये ठाण मांडून आहेत.त्यातील एक पथक चंद्रपूरमध्ये काल दाखल झाले. काल दिवसभर या पथकाने चंद्रपूरमध्ये विविध ठिकाणी तपास केला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकर हा चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये राहत होता. मात्र 19 च्या रात्री हॉटेलमधून बाहेर पडला, मात्र तो नागपूरच्या दिशेने आला नाही.कोल्हापूर पोलीस याच हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्यासोबत कोणी आहे का? याचा शोध घेत आहेत. कोल्हापुरातून नागपूरला गेलेल्या पोलिसांच्या पथकाला स्थानिक यंत्रणेची मदत होत नसल्याची खंत कोल्हापूर पोलीस सांगत आहेत.

 

हेही वाचा:

Prashant Koratkar Nagpur Crime: प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?

अधिक पाहा..



Source link

प्रकाश आंबेडकरांवर वादग्रस्त कमेंट! वंचितच्या कार्यकर्त्यांनी तरुणाची धिंड काढत केली मारहाण


Akola News : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi)  प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याबाबत समाजमाध्यमध्ये वादग्रस्त कमेंट करणे तरुणाला चांगलेच भोवले आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. तसेच वंचितच्या कार्यकर्त्यांनी  या तरुणाची धिंड काढली आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात घडली आहे. तरुणाच्या वादग्रस्त कमेंटनंतर तेल्हारा शहरात काही काळ तणावाची परिस्थिती होती. 

पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं

तेल्हारा शहरातील हरिओम नागोलकार या तरुणाने प्रकाश आंबेडकरांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ऐनवेळी तेल्हारा पोलिसांनी मध्यस्थी करत पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. यादरम्यान आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तेल्हारा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. सद्यस्थितीत तेल्हारा शहरात मुख्य चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

 

अधिक पाहा..



Source link

मंगळसूत्र चोरानं तिचं ‘कुंकू’ही हिरावलं; अकोल्यात चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्यासाठी जीवघेणं ठरलं


Akola News अकोला: अकोल्याची कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश: वेशीवर टांगली की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्याला जीवघेणा ठरलाय. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केली. आधी डोक्यात दुखपात केली, नंतर चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. चक्क जीव जाईपर्यंत चोरट्यानं महिलेच्या नवऱ्याला मारलंय. हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे.

नेमके कशी घडली घटना? 

रविवारी रात्री अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून एक दांपत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मंगळसूत्र चोरट्याचा तिच्या नवऱ्यानं पाठलाग केलाय.. जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग सुरुचं होता.. अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला खरा.. मात्र, या चोरट्याने हातात येईल त्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केलीय.. हेमंत गावंडे असे या पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचं नाव.. अखेर उपचारादरम्यान आज हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला.. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची वाढ केली असून तपास सुरू केलाय.. या संपूर्ण घटनेचा थरार हेमंतच्या बायकोने सांगितलाय.. मंगळसूत्र न्यायचं असतं, पण नवऱ्याला कशाला मारलं? असा सवाल तिने केला आहे. 

आरोपीला केली पोलिसांनी अटक-

या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास सुरू केलाय. आरोपीची सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळवले. अवघ्या 24 तासात आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. परमार असं आरोपीचं नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. 

अकोला पोलीस या प्रश्नांचे उत्तरं देणार का?-

1) अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा काय करत होती?
2) घटनेवेळी प्लेटफार्मवर पोलीस हजर होते? तरं कुठं होते?
3) स्थानकावर खुलेआम फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांचं लक्ष नाही का?.
4) अनेकदा प्रवाशांचे सामान चोरी होते? मात्र, तरीही सुरक्षा यंत्रणेत वाढ का नाही?… खरंच चोरट्यांना पोलिसांचा धाक राहला नाही? 
5) महत्वाचं!, सहापैकी ऐकून 3 प्लेटफार्म CCTV.. तर 4, 5 आणि 6 प्लेटफार्मवर CCTV नाही.
6) स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामूळ हेमंत’चा गेला जीव?

घटनेची पालकमंत्री आकाश फुंडकरांकडून दखल-

16 मार्च रोजी रात्री 9 वाजता अकोट येथून हेमंत गावंडे आणि त्यांची पत्नी अकोलाकडे रेल्वेने निघाले.. पावणेदहा वाजता सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म क्रमांक चारवर गाडी पोचली. गावंडे दांपत्य रेल्वेतून खाली उतरत असताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यानं पळ काढला. या चोरट्याचा पाठलाग हेमंत गावंडे यांनी केला.. काही अंतरावर पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यादरम्यान गावंडे यांना बेदम मारहाण झाली, तसेच त्यांच्या डोक्यावर आणि चेहरा देखील ठेचून काढला. घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा अकोला पोलिस गांभीर्याने तपास करतायेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथकही दाखल झाले होते. दरम्यान, पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी या घटनेची माहिती घेत, तात्काळ आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या.. 24 तासात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात मारेकऱ्याला अकोल्याच्या एमआयडीसी भागातून अटक करण्यात आलीय. दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे?-

अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर एकत्रित 6 प्लेटफार्म आहेत.. त्यापैकी 1, 2, आणि 3 या प्लेटफार्म क्रमांकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र, 4, 5 आणि 6 प्लेटफार्मवर अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये. अशी माहिती समोर आली आहे. पहिले तीन प्लेटफार्म ‘मध्य रेल्वे’ अंतर्गत येतात. तर उर्वरित 4, 5 आणि 6 प्लेटफार्म हे ‘दक्षिण मध्य रेल्वे’ विभागाच्या अंतर्गत येतात. चोरीची घटना रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्म घडली असून तिथं सीसीटीव्ही नाही.

अकोल्यात गावगुंडांचा हैदोस-

बीडनंतर आता अकोल्यातही गुंडाराज. अकोल्याची कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवल्या गेली आहे. ऐन रस्त्यात दोन गावगुंडांनी व्यवसायिकाला मारहाण केली आहे.‌ रविवारी रात्री 9 वाजताची ही घटना आहे. शहरातील प्रचंड वर्दळीच्या असलेल्या रतनलाल प्लॉट चौकातील ही घटना आहे. एका व्यावसायिकाला दोन गाव गुंडांनी क्रूरपणे मारहाण केली आहे. मारहाण होत असतांना रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, गर्दीतील कुणीही व्यावसायिकाला वाचवण्यासाठी समोर आलं नाही. विशेष म्हणजे यातील आरोपी अद्याप अटकेत नाही. यामूळे अकोल्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातमी:

Nagpur violence Devendra Fadnavis: … त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!

अधिक पाहा..



Source link

डिप्टी CM साव बोले- औरंगजेब के प्रति श्रद्धा न रखें: उसने हिंदुओं पर जुल्म किए, इसलिए क्रूर मुगल शासक पर सहानुभूति नहीं रखनी चाहिए – Raipur News


देश में औरंगजेब पर राजनीतिक विवाद छिड़ा हुआ है। महाराष्ट्र में यह स्थिति हिंसक झड़प में बदल चुकी है। इस पर छत्तीसगढ़ के उप मुख्यमंत्री ने कहा कि, हिंदुओं पर अत्याचार करने वाले क्रूर औरंगजेब पर सहानुभूति नहीं रखनी चाहिए।

.

पूरी दुनिया जानती है कि औरंगजेब आक्रांता रहे हैं। जिस तरह से जुल्म उन्होंने भारतीयों और हिंदुओं पर किया है, वो सर्वविदित है। इसलिए औरंगजेब के प्रति सहानुभूति और श्रद्धा रखने का कारण नहीं बनता है।

फिल्म और बयान की वजह से बवाल

हाल ही में आई बॉलीवुड फिल्म ‘छावा’ में औरंगजेब का किरदार दिखाए जाने के बाद लोगों ने सोशल मीडिया पर औरंगजेब को लेकर निगेटिव कमेंट किए। इस माहौल में नेता भी कूद पड़े। सपा विधायक अबू आजमी ने औरंगजेब को लेकर कहा कि, हमें गलत इतिहास दिखाया जा रहा है।

औरंगजेब ने कई मंदिर बनवाए। मैं उसे क्रूर शासक नहीं मानता। अबू आजमी के बयान पर शिवसेना के लोकसभा सांसद नरेश म्हस्के ने उनके खिलाफ ठाणे (महाराष्ट्र) में FIR दर्ज कराई।

महाराष्ट्र के विधायक अबू आजमी के बयान के बाद से बवाल बढ़ा।

औरंगजेब ने मंदिरों के साथ मस्जिदों को भी नष्ट किया- सपा विधायक

इस मामले ने तूल पकड़ा तो सपा विधायक आजमी ने कहा कि, औरंगजेब ने मंदिरों के साथ मस्जिदों को भी नष्ट किया। अगर वो हिंदुओं के खिलाफ होता तो 34% हिंदू उसके साथ नहीं होते। उसके शासनकाल में भारत की सीमा अफगानिस्तान और बर्मा (म्यांमार) तक पहुंच गई थी।

हमारा सकल घरेलू उत्पाद (जीडीपी) विश्व सकल घरेलू उत्पाद का 24% था और भारत को (औरंगजेब के समय) सोने की चिड़िया कहा जाता था। अगर वो सच में हिंदुओं को मुसलमान में परिवर्तित करते, तो सोचिए कितने हिंदू परिवर्तित हो जाते।

महाराष्ट्र में ताजा स्थिति क्या है ?

अब औरंगजेब की कब्र हटाने की मांग को लेकर सोमवार को महाराष्ट्र में हिंदू संगठनों ने प्रदर्शन किया। इस दौरान नागपुर में विश्व हिंदू परिषद (VHP) ने गोबर के कंडों से भरा एक हरे रंग का कपड़ा जला दिया।

VHP के मुताबिक, ये औरंगजेब की प्रतीकात्मक कब्र थी। इस घटना का वीडियो वायरल हो गया। देर शाम 7:30 बजे नागपुर के महाल इलाके में हिंसा भड़क गई। इसके बाद पथराव और तोड़फोड़ शुरू हो गई। उपद्रवियों ने घरों पर पथराव किया। सड़क पर खड़े दर्जनों वाहनों में तोड़फोड़ और आगजनी की।

महाराष्ट्र में हालात बेकाबू हैं नागपुर में हिंसा हुई है।

महाराष्ट्र में हालात बेकाबू हैं नागपुर में हिंसा हुई है।

औरंगजेब की कब्र हटाने का मामला तूल पकड़ा

महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर (पहले औरंगाबाद) में स्थित औरंगजेब की कब्र हटाने का मामला तूल पकड़ने लगा है। बजरंग दल और विश्व हिंदू परिषद (VHP) ने महाराष्ट्र सरकार से इसे जल्द हटाने की मांग की है। विवाद के बीच कब्र की सुरक्षा बढ़ा दी गई है।

विश्व हिंदू परिषद (VHP) महाराष्ट्र और गोवा के क्षेत्रीय मंत्री गोविंद शेंडे ने औरंगजेब की कब्र को गुलामी का प्रतीक बताया। उन्होंने सोमवार को कहा कि, औरंगजेब ने छत्रपति संभाजी महाराज को मारने से पहले 40 दिनों तक यातना दी थी। ऐसे क्रूर शासक का निशान क्यों रहना चाहिए।

देवेंद्र फड़नविस ने भी औरंगजेब का विरोध किया है।

देवेंद्र फड़नविस ने भी औरंगजेब का विरोध किया है।

महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक कार्यक्रम में कहा कि, क्रूर औरंगजेब के बर्बर विचारों का महिमामंडन करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। उस विचार को वहीं कुचल दिया जाएगा।

दरअसल, मुगल सम्राट औरंगजेब की कब्र महाराष्ट्र के खुल्दाबाद में है। इतिहासकारों के मुताबिक, 1707 में जब औरंगजेब का निधन हुआ, तो उनकी इच्छा के अनुसार उन्हें खुल्दाबाद में उनके आध्यात्मिक गुरु शेख जैनुद्दीन की दरगाह के पास दफनाया गया। यह स्थान छत्रपति संभाजीनगर से करीब 25 किमी दूर है।

औरंगजेब की कब्र एक साधारण मिट्टी की बनी हुई थी, जिसमें बाद में ब्रिटिश वायसरॉय लॉर्ड कर्जन ने संगमरमर लगवाया था। इस स्थान को ऐतिहासिक और धार्मिक दृष्टि से महत्वपूर्ण माना जाता है, जहां लोग आज भी श्रद्धांजलि देने पहुंचते हैं।



Source link

धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा; अकोल्यातील घटना


Akola Crime: अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येतीये.. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र  चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय.. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे.. (Akola Crime) राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. किरकोळकरणातून मारहाण, दिवसाढवळ्या होणारे खून, दहशत वाजवण्याचा प्रयत्न, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अकोल्यात पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला रविवारी रात्री ( 16 मार्च) चोरट्यांनी फोडून काढले. बेदम मारहाण तर केलीच पण त्याचा चेहरा दगडाने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे. या व्यक्तीची सध्या प्रकृती चिंताजनक आहे.

नक्की घडले काय? 

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता… त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढलाय.. काल रात्री(16मार्च )उशिरा अकोला रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली.. सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली.. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले असून रवाना केले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.

मुंबईत दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून

राजधानी मुंबईत नेहमीच गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरून जातं, कधी भाईगिरी, कधी अंमली पदार्थ तर कधी हत्येच्या घटनांनी मुंबई (Mumbai) महाराष्ट्राचं लक्ष वेधते. आता, येथील मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरात 75 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या वयोवृद्धाचा मृतदेह झाडाझुडुपात आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी (Police) गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणी नायगावमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीसह तिच्या 17 वर्षीय मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  

 

अधिक पाहा..



Source link