Ladaki Bahin become Lakhpati Didi: महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणी’ 1500 रुपयाचा हफ्ता 2100 रुपये कधी होणार? याची वाट पाहतायत. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिलीय. लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्हत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पूर्ण न झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर महत्वाचे विधान केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ध्यात बोलत असताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे भाष्य केले. सुरुवातीला त्यांनी 25 टक्के अपघाताच प्रमाण कमी झाल्याने वर्धावासियांचे आभार मानले. परिवहन मंत्र्याची वर्धा जन्मभूमी आहे. तुम्ही त्यांना 50 बसेस मांगीतल्या. तुम्ही 100 बस मांगीतल्या असत्या तरी त्यांनी दिल्या असत्या. कारण जन्मभूमीपेक्षा काहीच महत्वाचं नसत. तुमच्या आमदारांनी कंजूसी केलीय, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन ठेवायचं नाहीय. तर त्यांना लखपती दीदी बनवायच आहे, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
लाडक्या बहिणी खूष- झिरवळ
लाडक्या बहिणी नाराज असल्याचे आपण किंवा विरोधक सांगतात. पण सर्व लाडक्या बहिणीला खुश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही, असं विधान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय. हे पंधराशे रुपयेदेखील देण्याची यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार विरोधकांनी सुरू केला होता. मात्र 1500 रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपयावर जास्त जोर धरला आहे. मला वाटतं पंधराशे रुपये ही रक्कमदेखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत, असे झिरवळ म्हणाले.