Gas Cylinder Crises : देशात सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. विधानभवनात नाना पटोले, आणि विजय वडेट्टीवारांनी आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला. सरेंडर दे सिलिंडर अशाही घोषणा यावेळी दोन्ही नेत्यांनी दिल्या.
इस्त्रायल-इराण युद्धाचा मोठा फटका भारताला बसलाय. भारतात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे सर्वासामान्य जनता गॅसवर आलीय. छोटे-मोठे उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय. हातात सिलिंडरचं पोस्टर घेऊन विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरेंडर दे सिलिंडर अशा घोषणा देत सरकारला धारेवर धरलं, दरम्यान याच वेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वडेट्टीवार आणि पटोले यांना प्रत्युत्तर दिलंय.
केंद्र आणि राज्य सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झालंय – नाना पाटोले
सिलिंडरच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी देखील मोदींना टार्गेट केलं, केंद्र सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झाल्याची टीका त्यांनी केलीय. सरकार सरेंडर झाल्यानं सर्वसामान्य जनतेवर त्यांचा थेट परिणाम झाल्याचं म्हणत नाना पटोले यांनी हल्लाबोल केलाय. केंद्र आणि राज्य सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झालंय, अशी नाना पटोले यांची टीका केली आहे. सरकार सरेंडर झाल्यानं त्याचा परिणाम सर्वासामान्य लोकांवर होतोय असं नाना पटोले म्हणाले.
विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधा-यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय. गॅस मिळत नाही या केवळ अफवा असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. गॅस बुकींग सुरू असून फक्त 25 दिवसांचा कालावधी त्यासाठी ठेवण्यात आल्याचं वाघ यांनी सांगितलं. तर गॅसची टंचाई निर्माण होऊ देणार नसल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितल्याचं हसन मुश्रीफ म्हणालेत.
गॅसची टंचाई, विरोधकांची घोषणाबाजी
विरोधकांनी गॅसच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सरकार अमेरिका आणि इस्त्रायल पुढे सरेंडर झाल्याचा आरोप करण्यात आलाय, सरकारच्या भूमिकेमुळेच जनतेवर ही वेळ आल्याचा आरोपही नाना पटोले, विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आलाय, तर दुसरीकडे विरोधकांच्या आरोपांना सत्ताधा-यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय.