मंत्री संजय शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य, सुषमा अंधारेंनी थेटच सुनावलं; म्हणाल्या, ‘वाह्यात…

मंत्री संजय शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य, सुषमा अंधारेंनी थेटच सुनावलं; म्हणाल्या, ‘वाह्यात…


Sushma Andhare On Sanjay Shirsat: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीतील (Mahayuti) मंत्र्यांना कडक तंबी दिल्यानंतरही सरकारमधल्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आले असता यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, याच मुद्द्यवरून शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीकास्त्र डागत मंत्री संजय शिरसाटांना खडे बोला सुनावले आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार. भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल. आता आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा.. हा बेतालपणा फडणवीसजी, वाह्या शिरसाटचा राजीनामा कधी होणार? अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. एक्स या समाज माध्यमांवर त्यांनी हि प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

मंत्री संजय सिरसाट यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केला– अमोल मिटकरी

दुसरीकडे याच मुद्दयांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया देत भाष्य केलंय. यावेळी ते म्हणाले कि, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या अकोल्यातील वक्तव्याचा माध्यमांनी पराचा कावळा केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय. आपण त्या व्यासपीठावर होतो. मात्र, संजय शिरसाटांच्या शिवसेना स्टाईल वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा संदर्भ दाखविल्यााचा आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय. मात्र, तू जास्त बोलू नकोस नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा





Source link

Video: सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Video: सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य


अकोला : राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारमधील मंत्र्‍यांच्या वक्तव्यावरुन सध्या काही मंत्री अडचणीत सापडले असून कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषि खातंही काढून घेण्यात आलं. कोकाटे यांची क्रीडामंत्री पदावर वर्णी लागली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्‍यांना मोजून मापून बोलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये, विशेषत: अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्‍यांना नाव न घेता सुनावलं होतं. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबताना दिसून येत नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आज शहरात होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. “सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय” असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.

अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय. मात्र, तू जास्त बोलू नकोस नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिला. दरम्यान, राज ठाकरेंनी कुणाच्या व्यासपीठावर जाऊन काय बोलावं यावर आपण काही बोलू शकत नाही, असे म्हणत राज ठाकरेंच्या टीकेवर उत्तर देणं टाळलं. तर, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुरावे देण्यापूर्वी 2029 ची निवडणूक झालेली असेल, असे त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा

अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत

आणखी वाचा



Source link

अकोल्यात स्त्री रूग्णालयातील भ्रष्टाचार उघड, जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन अधिकारी निलंबित

अकोल्यात स्त्री रूग्णालयातील भ्रष्टाचार उघड, जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन अधिकारी निलंबित


अकोला : अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदांच्या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया भ्रष्ट मार्गाने पार पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून, तिघांवर विभागीय चौकशीचा बडगा उगारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून अकोला जिल्हा स्त्री रूग्णालय हे चांगल्या कामाममूळे सातत्याने अव्वल असलेले रूग्णालय आहे.

निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता आणि नियमबाह्य निर्णय

सदर प्रक्रिया 2024-25 या आर्थिक वर्षात पार पडली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदं भरायची होती. ही पद बाह्य स्त्रोतांमार्फत त्रयस्थ संस्थांकडून कंत्राटी पद्धतीने भरायची होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. याची निविदा 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

निविदा भरायची शेवटची मुदत 29 जुलै 2024 होती. ही सर्व प्रक्रिया या विभागाच्या ‘जेम पोर्टल’द्वारे पुर्ण करायची होती. यामध्ये एकूण 72 निविदा प्राप्त झाल्या असताना, त्यातील फक्त 4 निविदांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं. विशेष म्हणजे फक्त दोन निविदांनाच अधिकृत मंजुरी देण्यात आली आणि त्या दोघांनाही ठेका देण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेत अपारदर्शकता, पक्षपातीपणा आणि नियमानुसार तांत्रिक परीक्षण न करता निर्णय घेण्यात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यात या तिघांनी लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार श्याम खोडे यांनी केला होता.

विधानसभेत मुद्दा उपस्थित

या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटलेत. वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत “आपल्या मर्जीतील लोकांना ठेका देण्यासाठी प्रक्रिया हाताळली गेली” असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर शासनस्तरावरून तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

चौकशी अहवालात भ्रष्टाचार सिद्ध

नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालात निविदा प्रक्रिया नियमानुसार न राबवणे, निविदा अपात्र ठरवताना कारणांची स्पष्ट नोंद न ठेवणे, आणि निवडक ठेकेदारांना लाभ मिळेल अशा पद्धतीने निर्णय घेणे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्य विभागात खळबळ

एकाच वेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने अकोल्याच्या आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे आरोग्य खात्यातील अन्य प्रक्रिया कितपत पारदर्शक आहेत, याबाबत देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रकरणाचा अधिक तपास सुरू

निलंबनानंतर तिघांवर विभागीय चौकशी होणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास पुढील कठोर कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

मालेगांव ब्लास्ट केस पर सत्तापक्ष-विपक्ष की प्रतिक्रिया:  फडणवीस बोले- आतंकवाद न भगवा था, न है, न रहेगा; दिग्विजय सिंह ने कहा- आतंकवाद का धर्म नहीं होता

मालेगांव ब्लास्ट केस पर सत्तापक्ष-विपक्ष की प्रतिक्रिया: फडणवीस बोले- आतंकवाद न भगवा था, न है, न रहेगा; दिग्विजय सिंह ने कहा- आतंकवाद का धर्म नहीं होता


नई दिल्ली1 दिन पहले

  • कॉपी लिंक
महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में स्पेशल NIA कोर्ट ने गुरुवार को पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा समेत सातों आरोपियों को बरी कर दिया है। - Dainik Bhaskar

महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में स्पेशल NIA कोर्ट ने गुरुवार को पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा समेत सातों आरोपियों को बरी कर दिया है।

महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में स्पेशल NIA कोर्ट ने पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा समेत सातों आरोपियों को बरी कर दिया है। साल 2008 में महाराष्ट्र के नासिक जिले के मालेगांव में एक बाइक में धमाका हुआ था। इसमें छह लोग मारे गए और 101 घायल हुए थे।

स्पेशल NIA कोर्ट का फैसला गृह मंत्री अमित शाह के राज्यसभा में उस बयान के एक दिन बाद आया है, जिसमें उन्होंने कहा था कि हिंदू कभी आतंकवादी नहीं हो सकता। ब्लास्ट केस में बरी होने के बाद साध्वी प्रज्ञा ने कहा कि पिछले 17 सालों से मेरी जिंदगी बर्बाद हो गई। भगवा का अपमान करने वालों को भगवान सजा देंगे।

महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि आतंकवादी न कभी भगवा था, न है और न कभी होगा। वहीं, कांग्रेस सांसद दिग्विजय सिंह ने कहा कि आतंकवाद को किसी धर्म से नहीं जोड़ना चाहिए। आतंकवाद का कोई धर्म नहीं होता।

कोर्ट के फैसले पर NDA और I.N.D.I.A ब्लॉक के नेताओं की प्रतिक्रिया पढ़िए…

NDA के नेताओं के बयान

1. रविशंकर प्रसाद, भाजपा सांसद- आज का दिन ऐतिहासिक है। कांग्रेस के हिंदू आतंकवाद का षडयंत्र आज धाराशायी हो गया। किसी भी आरोपी के खिलाफ कोई सबूत नहीं था। भाजपा इस फैसले का स्वागत करती है। ये साजिश धाराशायी हुई, इस पर हमें संतोष है और खुशी भी है। सच्चाई बहुत दिन तक झुठलाई नहीं जा सकती। यह वोट बैंक की राजनीति के लिए कांग्रेस की सोची-समझी साजिश थी।

2. हिमंत बिस्वा सरमा, असम CM- केंद्रीय गृह मंत्री ने कल सदन में भी कहा था कि हिंदू आतंकवादी नहीं हो सकते क्योंकि हमारी संस्कृति और हमारी सभ्यता कभी आतंकवाद को बढ़ावा नहीं देती। कांग्रेस के शासन के दौरान, एक विशेष समुदाय को खुश करने के लिए एक शब्दावली गढ़ी गई थी- ‘हिंदू आतंकवाद’। हिंदू और आतंक दो अलग अवधारणाएं हैं। हिंदू कभी आतंक में विश्वास नहीं करते और हिंदू कभी आतंकवादी नहीं हो सकते।

3. बसवराज बोम्मई, भाजपा सांसद- यह सत्य की जीत है। पूरे फैसले ने कांग्रेस की ‘भगवा आतंकवाद’ लाने की साजिश और गंदी राजनीति को उजागर कर दिया है, जबकि ऐसा था ही नहीं। यह उनकी खामियों को छिपाने और इस्लामी आतंकवादी समूहों का समर्थन करने के लिए किया गया था। यह पूरी तरह से उजागर हो गया है। कांग्रेस को देश से माफी मांगनी चाहिए।

I.N.D.I.A ब्लॉक के नेताओं के बयान

1. अखिलेश यादव, समाजवादी पार्टी चीफ- जो बात आप (मीडिया) समझ रहे हो वही मैं समझ रहा हूं। जो आप कहना नहीं चाहते वो मैं नहीं कह रहा। कहीं ऐसा तो नहीं कि खबरें दबाने के लिए खबर आ रही हो?

2. दिग्विजय सिंह, कांग्रेस सांसद- आतंकवाद को किसी भी धर्म से नहीं जोड़ा जाना चाहिए। हिंदू आतंकवाद या इस्लामी आतंकवाद जैसी कोई चीज नहीं है। हर धर्म प्रेम, सद्भाव, सत्य और अहिंसा का प्रतीक है।

3. इमरान प्रतापगढ़ी, कांग्रेस सांसद – कांग्रेस पहले दिन से कह रही है कि धर्म का आतंकवाद से कोई लेना-देना नहीं है। यह शब्द तत्कालीन गृह सचिव आरके सिंह ने गढ़ा था। भाजपा ने उन्हें 10 साल तक मंत्री और सांसद बनाकर अपने साथ बिठाए रखा। यह फैसला है, न्याय नहीं। भाजपा उन्हें आरोपी नहीं मान रही थी।

कोर्ट बोला- बाइक प्रज्ञा की और कर्नल RDX लाए यह दोनों बातें साबित नहीं हुईं महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा ठाकुर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी और सुधाकर धर द्विवेदी आरोपी थे। करीब 17 साल बाद आए फैसले में NIA कोर्ट के जज एके लाहोटी ने कहा कि जांच एजेंसी आरोप साबित नहीं कर पाई है, ऐसे में आरोपियों को संदेह का लाभ मिलना चाहिए।

जज लाहोटी ने कहा कि धमाका हुआ था, लेकिन यह साबित नहीं हुआ कि बम मोटरसाइकिल में रखा था। यह भी साबित नहीं हुआ कि मोटरसाइकिल साध्वी प्रज्ञा के नाम थी और कर्नल प्रसाद पुरोहित ने बम बनाया। कोर्ट के फैसले से जुड़ी की पूरी खबर पढ़ें…

………………………………………..

ये खबर भी पढ़ें…

मोदी राज्यसभा नहीं पहुंचे, खड़गे बोले- ये सदन का अपमान:शाह ने कहा- मैं जवाब दे रहा हूं, उन्हें क्यों बुलाना

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने बुधवार को राज्यसभा में ऑपरेशन सिंदूर पर विशेष चर्चा में करीब डेढ़ घंटे भाषण दिया। उन्होंने शाम 7 बजे सदन में बोलना शुरू किया। विपक्ष ने हंगामा करते हुए PM मोदी को बुलाने की मांग की। इस पर शाह ने कहा- विपक्ष पूछ रहा है कि PM कहा हैं? PM इस वक्त ऑफिस में हैं, उन्हें ज्यादा सुनने का शौक नहीं है। मेरे से निपट रहा है, उन्हें क्यों बुला रहे हो। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

भर रस्त्यात महिलेला तिघांकडून बेदम मारहाण, केस धरून  लाथा बुक्क्यांचा मारा, VIDEO व्हायरल

भर रस्त्यात महिलेला तिघांकडून बेदम मारहाण, केस धरून  लाथा बुक्क्यांचा मारा, VIDEO व्हायरल


Amravati Crime: अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शारदा बाभुळकर या महिलेवर तीन पुरुष आणि एका महिलेने मिळून बेदम हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, संबंधितांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amravati Crime News)

नेमकं काय घडलं?

विर्शी गावात जागेच्या वादातून हा वाद निर्माण झाला. याच वादातून शारदा बाभुळकर यांना आरोपींनी रस्त्यावरच पकडून मारहाण केली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला काठीने शारदा यांना मारहाण करत आहे, तर अन्य तीन पुरुषांनी त्यांच्या केसाला धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काही क्षण शारदा यांना हालचालही करता आली नाही.

व्हिडिओ आला समोर, गुन्हा दाखल

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव निर्माण झाला. वलगाव पोलीस स्टेशनने तत्काळ हालचाली सुरू केल्या. शारदा बाभुळकर यांच्या फिर्यादीवरून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कायदेशीर कारवाई सुरू

वलगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिलेला प्राथमिक उपचार देण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे विर्शी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली

नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी (Nanded Police) तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले.

पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. 

आणखी वाचा



Source link

मेळघाटात आश्रम शाळेची भिंत कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघी गंभीर जखमी

मेळघाटात आश्रम शाळेची भिंत कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघी गंभीर जखमी


Amravati: मेळघाटमधील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत भीषण दुर्घटना घडली असून, भिंत कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या मागणीनंतर अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे. (Amravati News)

ही घटना घडल्यानंतर आदिवासी विभागाने तात्काळ दखल घेतली असून, शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. कथे आणि महिला अधीक्षक एस. पी. रावत यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासणी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथे वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा आहे. या शाळेतील वसतिगृहात पाण्याच्या टाकीची भींत अचानक कोसळली. त्यावेळी काही विद्यार्थिनी तिथे उपस्थित होत्या. भिंत कोसळल्यामुळे चौदा वर्षीय विद्यार्थिनी ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यात शाळेचे मुख्याध्यापक व महिला अधीक्षक एस. पी. रावत निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी आक्रमक होत जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत चिखलदरा तालुक्याचे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी आणि आदिवासी निरीक्षक यांचा समावेश आहे. समिती लवकरच घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शाळेच्या इमारतीची दुरवस्था, देखभाल दुरुस्तीचा अभाव, आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप विद्यार्थिनीचा जीव गेला, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे मेळघाटातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आदिवासी विकास विभागाने दिले आहे.

अंगणवाडीच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने हानी नाही 

नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील जुन्या इमारतीत असेलल्या अंगणवाडीच्या छताचा  काही भाग कोसळला .सुदैवाने यात कोणतीहीहानी झाली नाही . पावसामुळे आंगणवाडीच्या छताचा भाग  कोसळल्यचे सांगण्यात आले … घटनेच्या  वेळी काही लहान मुले अंगणवाडीत उपस्थित होती, मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान सातेगावात जीर्ण झालेल्या इमारतीत आंगणवाडी चालते. त्यामूळे दुर्घटनेची शक्यता आहे . याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या .. मात्र आंगणवाडीसाठी नवीन जागा देण्यात आली नाही .. या घटने नंतर तरी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली .

हेही वाचा

धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील वाशिष्ठी नदीत घेतली उडी; दोघांनी संपवले जीवन

आणखी वाचा



Source link