राणा-ओवेसी वादाला उकळी, 15 सेकेंदाचे वक्तव्य अंगलट; नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचा समन्स


Navneet Rana vs Asaduddin Owaisi : भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana)यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना दिलेल्या चॅलेंज प्रकरणी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हैदराबादला जाऊन नवनीत राणा यांनी खासदार ओवेसीं जाहीर आव्हान देत केलेल्या वक्तव्याप्रकरणी  हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना  समन्स पाठवला आहे. शिवाय येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता माजी खासदार नवनीत राणा न्यायालयात हजर राहणार का याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला होता आणि नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबाद मध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. 8 मे 2024 ला नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारीला हैदराबाद येथील शादनगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता याच 15 सेकंदाच्या वक्तव्य विरोधात नवनीत राणा यांना समन्स आला असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या होत्या.

ओवैसी यांनी तीन तलाकला विरोध दर्शवला. महिलांच्या 33% आरक्षणालाही त्यांनी विरोध केला. आमची बाबरी आहे आणि राहणार या पद्धतीने भाषा करणारे हिंदुस्थानात राहतात आणि पाकिस्तानवर प्रेम करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही. पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहेत, असं ही राणा म्हणाल्या.

हे ही वाचा 

अधिक पाहा..





Source link

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकोल्यात सट्टाबाजारवाल्यांचा हायटेक सेटअप, गोदामात गाद्या टाकून 34 जणांनी खेळ मांडला, पोलिसांनी धाड टाकताच…



Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकोल्यात सट्टाबाजारवाल्यांचा हायटेक सेटअप, गोदामात गाद्या टाकून 34 जणांनी खेळ मांडला, पोलिसांनी धाड टाकताच…



Source link

बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र; अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाई


Amravati News : अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी (Bangladeshi) रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. अमरावती शहरात (Amravati News) सुद्धा बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात खोटे कागदपत्र सादर केल्या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये  सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जन्म दाखल्यासाठी खोटे कागदपत्र देऊन प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी 6 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये 8 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा 6 जणांवर कारवाई केल्याने या प्रकरणात अमरावती जिल्ह्यात आरोपींची संख्या 14 वर गेली आहे. 

अकोल्यात 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

दुसरीकडे अकोल्यात ही बनावट जन्म दाखल्या प्रकरणी आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जन्म दाखल्यासाठीबनावट कागदपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याआधी 3 फेब्रुवारीला बनावट कागदपत्र प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता नव्याने कारवाई केल्यामुळे अकोला पोलिसात आतापर्यंत एकूण 24 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. अकोला जिल्ह्यात बनावट कागदपत्र बनवून जवळपास 80 बांगलादेशी नागरिकांनी नागरिकत्व घेतल्याची शंका ही या निमित्याने व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज पुन्हा एकदा भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या रामदासपेठ पोलीस ठाण्यात भेट देणार आहेत. यावेळी ते पोलिसांना आणखी काही पुरावे देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर किरीट सोमय्या पातुर तहसील कार्यालयाला भेट देणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे.

बांगलादेशी रोहिणग्यांची हकुहळू व्याप्ती वाढतेय- किरीट सोमय्या

बांगलादेशी रोहिणग्यांची हकुहळू व्याप्ती वाढत आहे. आता माझं लक्ष अमरावती शहरावर आहे. याठिकाणी 5 हजार लोकं आहे जे इथले असूच शकत नाही. त्यांनी जे 50-70 वर्ष जुने पुरावे दिले ते आतापर्यंत काय करत होते. ज्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई होईल. फॉरेन्सिक ऑडिटची मागणी मी केलेली आहे. दीड महिन्याच्या मोहिमेत 7 एफआयआर दाखल झालेत. काही दिवसात सरकार ज्यांना जन्म प्रमाणपत्र दिले त्यांचं ही रद्द होईल. तर पुढच्या टप्प्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते सांगतील की जन्म कुठला आहे. अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ते अमरावती येथे बोलत होते.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं



उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं



Source link

Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं


Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं 
अमरावतीत कृषी महोत्सवात शेतकऱ्याचा संताप..  सरकारच्या धोरणावर केली टीका..  शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल..  अमरावती शहराच्या सायन्स्कोर मैदानात पाच दिवसीय कृषी महोत्सव चालू आहे, या ठिकाणी दररोज हजारो शेतकरी उपस्थिती लावत आहे, मात्र या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.. सरकारच्या धोरण, सरकारचं आयात निर्यात धोरण, शेतमालाला हमीभाव, तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विमा बाबत शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केल्याने यावर या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला..  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्यात तुफान वायरल होत आहे, सध्याची शेतकऱ्यांची स्थिती मांडली त्यामुळे अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहे, हा शेतकरी अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे येथील असून या शेतकऱ्याने कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आपल्या अडी अडचणी समस्या सांगून अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधलं होतं… 



Source link