मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल


Mumbai bomb blast case : 11 जुलै 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील 3 कैदी नागपूर तुरुंगात होते. त्यापैकी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयानंतर त्यांना दोषमुक्त केलं आहे. तर नावेद हुसेन रशीद हुसेन खान याची जुन्या प्रकरणामुळे सुटका होणे बाकी आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून 4 कैद्यांची सुटका 

शिक्षा भोगत असताना या कैद्यांनी कारागृहात कायद्याचे शिक्षण घेतले होते. आज दोन कैद्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला कारागृहात आले होते.  दरम्यान, 11 पैकी 4 आरोपी हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, महद मजीद महद शफी, सुहिल मोहम्मद शेख, जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख हे कैदी अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अमरावती मध्यवर्ती करागृहातून देखील या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे. सर्व चारही आपले सामान घेऊन कारागृहा बाहेर आले आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते. अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत गुप्तता पाळली होती. 

मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्तता झालेला मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून  बाहेर आला आहे. निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सोडले आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन आरोपी शिक्षा भोगत होते, त्यापैकी मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी हा पॅरोल वर सध्या बाहेर आहे. 

नेमकं प्रकरण काय?

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वेत सात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 827 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या स्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने एकूण 13 आरोपींना अटक केली, तर 15 जणांना फरार घोषित करण्यात आले, ज्यांपैकी बरेच जण पाकिस्तानमध्ये असल्याचा संशय होता. तपास यंत्रणेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर 2006 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर, 2015 मध्ये, ट्रायल कोर्टाने 12 आरोपींना दोषी ठरवले. यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, ‘त्या’ संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?

आणखी वाचा



Source link

मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री? अकोला जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई

मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री? अकोला जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई


Akola News : अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू होतं. आधीच अडचणीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने होणारी फसवणूक हि गंभीर बाब असून यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होते आहे.

21 लाख 95 हजार रुपयांचा मुदतबाह्य कीटकनाशके साठा जप्त

पुढे आलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कीटकनाशके कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मुदतबाह्य ज्याची किंमत 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा कृषी विभागाने जप्त केलाय. या उत्पादनस्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आली असून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र ऐन शेतातील मशागतीची महत्वाच्या काळात असा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी वर्गासह प्रशानातं खळबळ उडाली आहे.

पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर चालवल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर, 14 ट्रॅक्टरसह 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळूची होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून गंभीर जखमी केलं. यानंतर आता भंडारा पोलीस वाळू माफियांच्या विरोधात चांगलीचं ॲक्शन मोडवर आली आहे. कारधा पोलिसांनी बेलगाव येथील नहारातून वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या तब्बल १४ ट्रॅक्टरला सापळा रचून ताब्यात घेतलं.  या कारवाईत १३ ब्रास रेती आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह असा एकूण ८२ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, कारधा पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केली, यात महिला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

हेही वाचा

 

आणखी वाचा



Source link

मी गेलो की अजितदादा तिजोरीत पैसे आहेत की नाही पाहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला  

मी गेलो की अजितदादा तिजोरीत पैसे आहेत की नाही पाहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला  


Chandrashekhar Bawankule :  मी या सरकारमधून जेवढे पैसे आणू शकत नाही तेवढे पैसे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke)  आणू शकतात. मी गेलो की अजितदादा (dcm Ajit Pawar)  तिजोरीत पैसे आहे की नाही? पाहतील, पण खोडके गेले की ते लगेच देतील असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)  यांनी केलं आहे. ते अमरावतीत (Amravati ) आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  संजय खोडके अजितदादांचे उजवे हात आहेत असे बावनकुळे म्हणाले. 

कर्ज फक्त मोठे लोकं बुडवतात

प्रत्येक आमदारांनी 100 बचत गट द्यावे, त्यांना उद्योगासाठी आपण एक लाख रुपये द्यावे. त्या एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतील असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  म्हणाले. लाडक्या बहिणी (ladaki bahin) आयुष्यभर तुमच्या  पाठीशी राहतील असे बावनकुळे म्हणाले. जपर्यंत एकही महिला बचत गटांनी कर्ज बुडवलं नाहीय. कर्ज फक्त मोठे लोकं बुडवतात असेही बावनकुळे म्हणाले. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्येक विधानसभेला 100 बचत गट द्यावे, अशा सूचना बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना बावनकुळे यांनी गावातील सरपंचाने पाण्याच्या व्यवस्थापनावर पाण्याची वॉटर लेवल वाढवण्यावर काम करा, जमिनीच्या पुनर्भरणावर भर द्या असे बावनकुळे म्हणाले. पुढच्या काळात खरा संघर्ष हा पिण्याच्या पाण्याचा असल्याचे बावनकुळे म्हणाले.

अमरावती शहर सुंदर करा! पोलिसांना सोबत घेऊन संपूर्ण अतिक्रमण काढा

मी मनपा आयुक्तांच अभिनंदन करतो. लोकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सएप चॅट सुरु केला आहे. तातडीने त्याची दखल घेऊन त्याचा निपटारा होईल असे बावनकुळे म्हणाले. आयुक्तांना माझी सूचना आहे की अमरावती शहर सुंदर करा आणि पोलिसांना सोबत घ्या संपूर्ण अतिक्रमण काढा. मी मध्ये येणार नाही आणि आमदारही येणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले. सिंधी समाज पट्टावाटप साठी 70 वर्षांपासून वाट पाहत होते, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 50 हजार पट्टे वाटप आम्ही करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. फेस अॅप डाउनलोड करुन घ्या. आता तुमचा पगार यातूनच होईल. फेस अॅपवर पगार होणार हे लक्षात घ्या. जुलैचा पगार होईल पण ऑगस्टचा पगार होणार नाही जर फेस अॅपवर आले नाहीतर असे बावनकुळे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Land Fragmentation : जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन, GR जारी, 15 दिवसात अहवाल येणार

आणखी वाचा



Source link

पंजाबपासून तेलंगणापर्यंत देशातील 9 राज्यांत ‘अकोला पॅटर्न’; सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?

पंजाबपासून तेलंगणापर्यंत देशातील 9 राज्यांत ‘अकोला पॅटर्न’; सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?


अकोला : कापूस उत्पादनात (Cotton Cultivation) भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतोये. सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव आहे. अनेक शेतकरी आता संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा ‘अकोला पॅटर्न’ आकाराला आणतायेत. 11 जुलैला कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी 2030 पर्यंत 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’ ने (Akola Pattern In Cotton Cultivation) कापूस लागवड राबवण्याची मोठी घोषणा केलीये. आता कपाशीचं भविष्य अकोल्याच्या मातीत लिहिलं जातंय, पाहूयात हाच ‘अकोला पॅटर्न’ नेमका काय आहे. 

जगात सर्वाधिक कापूस पिकवणारा देश म्हणजे भारत. पण उत्पादकतेच्या शर्यतीत मात्र आपण मागे आहोत. या संघर्षातूनच अकोल्यातल्या एका शेतकऱ्यानं एक नवा प्रयोग सुरू केला. ‘सघन कापूस लागवड पद्धत’ जिथं पारंपरिक एका एकरात 6 ते 7 हजार झाडं लावली जातात, तिथं अकोल्यातील दिलीप ठाकरे एकाच एकरात 30 ते 35 हजार झाडं लावून चक्क एकरी 18 क्विंटलपर्यंत कापूस घेताय. कपाशीला भरपूर जागा न देता, योग्य वाण आणि मोजक्या अंतरावर लागवड केली तर उत्पादनात मोठी वाढ होते. मी हे केलं, आणि देशभरात शेतकऱ्यांनी ते स्वीकारलं! असे मत दिलीप ठाकरे यांनी व्यक्त केलंय. 

देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न 

दरम्यान, दिलीप ठाकरे यांच्या या ‘सघन पद्धती’नं शेतकऱ्यांच्या उत्पादनात चमत्कारिक वाढ झाली. आज देशातील 9 राज्यांत, पंजाबपासून तेलंगणापर्यंत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हेच मॉडेल राबवतायत. याच यशामुळे त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या समितीवर झालीय. कापूस लागवडीच्या या अकोला पॅटर्नला  केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराजसिंग  यांनी मोठं बळ दिलंय. यावर्षी अकोला जिल्ह्यात 3 हजार हेक्टर क्षेत्रावर हा प्रयोग होतोय. पुढच्या हंगामात या पद्धतीने 50 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणारेय. तर अकोला पॅटर्नने  कापूस लागवडीचं क्षेत्र देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 

2030 पर्यंत देशभर 25 लाख हेक्टरवर अकोला पॅटर्ननं कापूस लागवड करणार आहोत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा मार्ग इथून सुरू होतो. अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे. 

सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?

20cm x 20cm अंतराने झाडं
एकरी 29 ते 40 हजार झाडं
योग्य वाण निवड (उभट वाढ, बुटके, कमी अंतरात बोंडं)
एकरी 15-18 क्विंटल उत्पादन

पारंपरिक पद्धत:

6-7 हजार झाडं एकरी
4-5 क्विंटल सरासरी उत्पादन
पावसावर आधारित, अनिश्चितता

या पॅटर्नचा पुढचा टप्पा आता शास्त्रशुद्ध संशोधनाच्या आधारावर राबवला जातोय. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला – जे स्वतः या संशोधनाचा भाग बनून पुढील वर्षभरात 50 हजार हेक्टरवर सघन पद्धतीनं लागवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. शास्त्र, अनुभव आणि आधुनिक शेतीतंत्र या तिन्हीचा संगम ‘अकोला पॅटर्न’ आहे. विद्यापीठ स्तरावर याचं प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बीजोत्पादन या सर्वांवर भर दिला जातोय. अशी प्रतिक्रिया अकोला पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली आहे. 

शेतीतूनच समृद्धीची वाट जाते.दिलीप ठाकरेसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून, अकोल्यासारख्या जिल्ह्यांतूनच शाश्वत शेतीचं भविष्य आकार घेतंय. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणातील ‘अकोला पॅटर्न’नंतर आता हा शेतीतला नवा ‘अकोला पॅटर्न’ येतोये. शेतीतील हा ‘अकोला पॅटर्न’ आता देशासाठी कापूस उत्पादनासाठी आशेचा एक नवा किरण ठरलाय. उत्पादन, उत्पन्न आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या आयुष्यात परत आणण्याची क्रांती सुरू झालीय.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबतच्या राजकीय युतीचे आंबेडकर कुटुंबियात पडसाद; वंचितचीही नाराजी

रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबतच्या राजकीय युतीचे आंबेडकर कुटुंबियात पडसाद; वंचितचीही नाराजी


Akola News : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसोबत केलेल्या राजकीय युतीचे पडसाद आता आंबेडकर कुटुंबियात देखील उमटत असल्याचे पुढे आले आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे त्यांचे बंधू आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) प्रचंड नाराज असल्याचे पुढे आले आहे. युतीची घोषणा करताना झालेल्या पत्रकार परिषदेतील आनंदराज आंबेडकरांच्या ‘संविधान कभी खतरे मे नही था’ आणि लाडकी बहीण योजनेची स्तुती करणाऱ्या वक्तव्यांवरून प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी नाराजी असल्याची माहिती पुढे आली आहे. 

दरम्यान, 17 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत आनंदराज आंबेडकरांच्या (Anandraj Ambedkar) नव्या भूमिकेवर प्रचंड टीका होत असल्याचे ही पुढे आले आहे. वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीने या परिस्थितीत एकमुखाने प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी असल्याचा ठराव संमत केलाय. आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना वंचितमध्ये (Vanchit Bahujan Aaghadi) येण्याची ऑफर देखील आता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिंदेसोबतच्या आघाडीच्या घोषणेनंतर आनंदराज आंबेडकरांना (Anandraj Ambedkar) विधान परिषदेचे आमदारकी आणि मुंबई महापालिकेत पाच ते सात जागा देण्यात येणार असल्याची माहिती ही आता सूत्रांनी दिली आहे. 

प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी आंबेडकर आणि शिंदेंची शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाबतच्या सर्व चर्चा आता थांबवण्यात आल्यात. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांसह विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांची एकत्र निवडणुका लढवण्यासाठी चाचपणी  सुरू होती. यासंदर्भात वंचितचे नेते माजी आमदार नातिकोद्दीन खतीब आणि शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यात प्रत्यक्ष भेटून चर्चा ही झाली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांसोबत केलेल्या आघाडीच्या घोषणेमुळे प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत. परिणामी, पुढील काळात प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका राहणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

अकोल्यात दोन गटात गॅंगवॉर; ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड 

अकोल्यात दोन गटात गॅंगवॉर; ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड 


Akola Crime News : अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढलीये. अर्थातच खाकीने गुन्हेगाराची मस्ती उतरवलीये. काल(18 जुलै) अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद होत गॅंगवॉर (Crime News) झाला होता. वर्चस्वाच्या लढाईतून हा गॅंगवॉर झाला होता. यात तलवारीसह बंदुकीचा या वादात वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडले. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास 8 जण जखमी झाले होते. घटना स्थळावर गोळीबार देखील झाला होता. घटनास्थळावरून 2 जिवंत काडतूस आणि एक हवेत गोळी फायर केली होती. दरम्यान, काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या (Akola Crime News) शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 

वर्चस्वाची लढाईतून वाद, सात आरोपींसह पिस्टल आणि तलवारी जप्त 

पुढे आलेल्या माहितीनुसार, आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. अशातच यातील दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची आता कृषी नगर परिसरात धिंड काढण्यात आली.  सद्यस्थित या प्रकरणात सात आरोपींसह देशी बनावट पिस्टल आणि तलवारी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी आरोपींनी कान पकडून माफी मागितली. तसेच यापुढे आपण गुन्हेगारी मार्गावर जाणार नसल्याचे आरोपींनी कान पकडून पोलिसांना सांगितले.

ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड 

दरम्यान, अकोल्यात झालेल्या दोन गटातील गॅंगवॉरचा हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीच वातावरण पसरल होत. तर अटक करण्यात आलेल्या सतीश वानखडेसह आकाश गवई आणि काही प्रमुख गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली असून त्यांना चांगलाच धडा पोलिसांनी शिकवला आहे.

….अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला

जन्मठेपेतील फरार आरोपी पत्नीला भेटण्यासाठी घरी आला असता बीड पोलिसांनी बड्या शिताफीनं त्याला अटक केली आहे. बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेप झालेला आरोपी पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. मात्र, पत्नीला भेटण्यासाठी बीडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आलं आहे.

विठ्ठल उर्फ सोनू कळवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र जन्मठेप झाल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला. आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते दोघांना लग्न करायचे होते. मात्र, विठ्ठलचा याला विरोध होता. यातून त्याच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने 2014 मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना विठ्ठलने रुग्णालयात जाऊन बहीण आणि तिच्या प्रियकरावर प्राण घातक हल्ला केला. यात बहिणीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी होता.या प्रकरणात सत्र न्यायालयाने विठ्ठल कळवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link