मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; भीषण अपघातात 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर

मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ खाजगी बस दरीत कोसळली; भीषण अपघातात 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर


Melghat Bus Accident : अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ एका खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात (Accident) झालाय. यात सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील हाय पॉइंट जवळ बस दरीत कोसळली आहे. या बसमधील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर बस मधील सर्व लहान मुलं सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले असून प्रवाश्यांना दारितून काढण्याचे काम करण्यात येत आहे. तर त्यातील जखमी लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं, अन् बस थेट दरीत कोसळली  

मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉइंट जवळ आज सकाळच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस अकोटवरून धारणी येथे येत असताना ट्रॅव्हल आकोट धारणी घाटात आली असता बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळलीय. या बसमध्ये 25-30 प्रवासी असून त्यातील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एकलव्य बचाव पथकासह वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी जखमी लोकांना सुखरूप दरीतुन काढण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आले असून जखमींना टेम्ब्रूसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहे. तर या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

रस्त्यावर पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं

अशीच एक अपघाताची (Accident) खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडलं आहे. संशयास्पद रित्या हा अपघात घडला असून नेमका हा अपघात आहे की घातपात? असा संशय आता घेण्यात येत आहे. तर घटणेनंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मात्र, या संपूर्ण अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून भारतीय न्याय संहितेनुसार जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..



Source link

दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था अमरावतीमध्ये स्थापन होणार

दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था अमरावतीमध्ये स्थापन होणार


अमरावती : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) एअर इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. MADC द्वारे तयार केलेल्या जागतिक दर्जाच्या फ्लाइंग इन्फ्रास्ट्रक्चरने सुसज्ज अमरावती विमानतळावर एअर इंडिया एप्रिल-मे 2025 पर्यंत उड्डाण ऑपरेशनसह प्रकल्प  पूर्णतः कार्यान्वित करण्याची आकांक्षा बाळगते. यामुळे वैमानिकांच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या भारताच्या विमान वाहतूक उद्योगात मोठे परिवर्तन घडून येईल. हे DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालक) द्वारा परवानाकृत FTO, (Flight Training Organisation) देखील भारतातील कोणत्याही विमान कंपनीने स्थापन केलेले पहिले FTO असेल.

या सहयोगी उपक्रमासाठी एअर इंडिया आणि एमएडीसी यांच्यात एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर एअर इंडियाचे संचालक सुनील भास्करन, एअर इंडियाच्या एव्हिएशन अकादमी यांच्या नेतृत्वाखालील एक चमू अमरावतीमध्ये या प्रकल्पाच्या भूस्तरीय योजनांचे रेखाटन करत आहे. हा प्रकल्प MADC आणि एअर इंडियाच्या सामूहिक पुढाकाराने साकारतो आहे. 

विद्यार्थ्यांसाठी 10 एकरांवर अमरावती येथे अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था विकसित करण्याच्या मार्गावर आहे, ज्यामध्ये डिजिटल-सक्षम वर्ग, जागतिक शैक्षणिक मानकांसह सुसज्ज वसतिगृहे, एक डिजिटल ऑपरेशन सेंटर आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वतःची देखभाल सुविधा आहे. हा प्रकल्प इच्छुक वैमानिकांना कुशल वैमानिक बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्यास सक्षम करेल.. यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात 3000 हून अधिक नोकऱ्या निर्माण होऊन या प्रदेशाची एकूण समृद्धी होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एक दोन वर्षांत अनेक लोक अमरावतीमध्ये प्रशिक्षित वैमानिकांनी उडवलेल्या विमानांनी उड्डाण करतील.

उड्डाण प्रशिक्षण संस्थेसाठी अमरावतीची निवड का? 

1. भारताच्या बहुतांश भागापेक्षा उड्डाण प्रशिक्षण अकादमीची दृश्यमानता चांगली आहे. अमरावती विमानतळावर उड्डाण करण्यासाठी 300 दिवसांपेक्षा जास्त स्वच्छ दृश्यमानता. 

2. इष्टतम हवाई जागेची उपलब्धता. 

3. एम. ए. डी. सी. ने बांधलेली जागतिक दर्जाची धावपट्टी. 

4. प्रशिक्षण मानके सुधारण्यास मदत होईल अशा उपकरणांच्या लँडिंगसह विमानतळ सक्षम आहे. 

5. विमानतळ रात्रीच्या वेळी उतरण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे, त्यामुळे अमरावतीतील एम. ए. डी. सी. ने पुरवलेली महाराष्ट्र हवाई वाहतूक पायाभूत सुविधा युवा महत्वाकांक्षी वैमानिकांसाठी सर्वोत्तम आहे. 

6. अमरावती विमानतळ हे महाराष्ट्रातील उडान-आर. सी. एस. योजनेत समाविष्ट असलेल्या विमानतळांपैकी एक आहे, जे एम. ए. डी. सी. द्वारे विकसित केले जात आहे आणि अमरावतीला राजधानी मुंबईशी जोडणाऱ्या अलायन्स हवाई मार्गाने लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. 

ही बातमी वाचा : 

 

अधिक पाहा..



Source link

ऐन पावसाळ्यात जलसंकट अधिक गडद; 1 जुलैपासून ‘या’ शहराला आठवड्यातून केवळ एक दिवस पाणीपुरवठा

ऐन पावसाळ्यात जलसंकट अधिक गडद; 1 जुलैपासून ‘या’ शहराला आठवड्यातून केवळ एक दिवस पाणीपुरवठा


Akola News अकोला : राज्यात जवळ जवळ सर्व जिल्ह्यात पावसाने  (Rain) दमदार हजेरी लावली आहे. असे असले तरी जून महिना उलटून देखील अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस (Vidarbha Weather Update) पडला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच ऐन पावसाळ्यात अकोला शहरात जलसंकट उभं राहीलंय. उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून शहराला केवळ आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होणार आहे. त्यामागील कारण म्हणजे मान्सून सुरू होऊन महिना उलटलाय. परंतू, अकोल्याला (Akola News) पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस पडला नाहीये. त्यामुळ धरणामध्ये पाण्याची पातळी वाढलेली नाहीये.
 
सद्य:स्थितीत काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 11.34 दलघमी म्हणजे 12.77 टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे असल्याचे चित्र आहे. त्यामुळ अकोला पाटबंधारे विभागानं महान धरणांवरील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी कपातीचे धोरण लागू केलेय. त्याचाच एक भाग अकोला शहराला (Akola News) आता पाच दिवसांनंतर होणार पाणीपुरवठा आता थेट तीन दिवसांनी वाढून आठवड्याभरावर करण्याचा निर्णय अकोला महापालिकेने घेतलाय. 

अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती 










 प्रकल्प   जलसाठा (दलघमी) टक्केवारी(%)
महान 11.34 12.77
वान 12.86 27.89
मोर्णा   9.77 23.57
निर्गुणा   3.05 10.57
उमा 1.90    16.26
दगडपारवा 3.70 36.31

भंडाऱ्याच्या 45 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या बजेटमधील घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 2023-2024 या वर्षात झालेल्या अवकाळी पावसामुळं 44,926 शेतकरी बाधित झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडं आहे. या शेतकऱ्यांच्या वर्षभातील एकूण नुकसानीपोटी 38 कोटी 10 लाख 4 हजार 237 रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला होता. यामुळे भातपीकासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

शुक्रवारी जाहीर झालेल्या बजेटमध्ये राज्य सरकारनं नोव्हेंबर, डिसेंबर,2023 मधील अवकाळी पावसामुळं राज्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. जिल्हा प्रशासनानं मागील तीन वर्षापासून बाधित असलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी आणि बाधित क्षेत्राची माहिती राज्य सरकारकडं पाठविकेली आहे. त्यामुळं सरकारकडून आता प्रत्यक्ष किती मदत मिळये याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

लोकसभेतील पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडवर! 288 विधानसभा मतदारसंघात चाचपणी

लोकसभेतील पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडवर! 288 विधानसभा मतदारसंघात चाचपणी


Akola News अकोला : राज्यात लोकसभेतील (Lok Sabha Elections 2024) दारूण पराभव झटकून वंचित (Vanchit Bahujan Aghadi) पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या स्वबळाच्यादृष्टीने चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय (Maharashtra Assembly Election 2024)इच्छुकांकडून पक्षाने अर्ज मागवले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यात वंचितने निरिक्षकाची नेमणूक केली आहे.

आज राज्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुकांची माहिती पक्षाकडे दिली जाणार. परिणामी, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) राज्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकला चलो रे ची तयारी असल्याचे यातून दिसून आले आहे. प्रकाश आंबेडकर  गेल्या 15 दिवसांपासून कुटूंबियांसह सुट्टीसाठी महाराष्ट्राबाहेर गेल्याचीही माहिती पुढे आली आहे.  त्यामुळे ते राज्यात परत आल्यावर विधानसभानिहाय आढावा घेणार असून त्यावरुन अंतिम निर्णय पुढे घेतला जाणार आहे.

पराभव झटकून वंचित पुन्हा नव्या जोमाने अ‍ॅक्शन मोडवर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितने लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला 16 लाखांच्या आत मते मिळाली आहेत. तर 2019 च्या तुलनेत पक्षाचा जनाधार घसरला असल्याचेही यातून दिसून आले आहे. पक्षाचे हक्काचे मतदार असलेले दलित, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी आणि मुस्लिम मतदार मविआकडे गेल्याने वंचितला मोठा फटका बसल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे वंचितला मविआजवळ करण्याची शक्यता आता धुसर असल्याचे चित्र आहे. म्हणूनच वंचितने आतापासूनच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच गमावलेला जनाधार परत मिळवण्यासाठी वंचितने आतापासून  चाचपणी सुरू केली आहे.

वंचित पुन्हा एकदा महायुती, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावं लागल्याचे बघायला मिळाले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील मंथन केल्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असल्याचा विश्वास दर्शवला. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांना कामाला जागण्याचे आदेश दिले आहे. परिणामी, त्या अनुषंगाने वंचित कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविणार असल्याची स्थिती आहे. कारण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यासाठी वंचितने राज्यभरात  हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती वंचित घेत आहे. दरम्यान, अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदिने लढवणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलीय.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?

विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?


Amravati News अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पराभवाला सामोरे जावं लागल्याचे बघायला मिळाले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील मंथन केल्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असल्याचा विश्वास दर्शवला. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांना कामाला जागण्याचे आदेश दिले आहे. परिणामी, त्या अनुषंगाने वंचित कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.  

विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार

विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविणार असल्याची स्थिती आहे. कारण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यासाठी वंचितने राज्यभरात हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती वंचित घेत आहे. दरम्यान, अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदिने लढवणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलीय.

महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा आज युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हाभरातून अनेक उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या आणि वंचितकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली. राज्यभरात वंचितला चांगला प्रतिसाद मिळत असून उमेदवारी संदर्भात ऍड. बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहितीही वंचित तर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने पुन्हा स्थानिक स्तरावर महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेले एक बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील क्रांती चौकात लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध करण्यात आला आहे. आर.बी. फाऊंडेशनकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छूक असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. 

फलकावर नेमकं काय लिहिलंय?

शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची (वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या ) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम ‘सगेसोयरें’ (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे. आरक्षण कायदा व नियमावली मधे चुकीची ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाची आरक्षण निती आणि आरक्षणा मागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करत आहेत. त्यामुळेच समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समुहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात बार मालकांचा आक्रमक पवित्रा; बारच्या चाव्या केल्या सुपूर्द

उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात बार मालकांचा आक्रमक पवित्रा; बारच्या चाव्या केल्या सुपूर्द


Akola News अकोला : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात वाढती गुन्हेगारी, अपघातांचे सत्र, आणि नव्याने पुन्हा चर्चेत आलेले ड्रग्ज प्रकरण (Pune Drugs Case) राज्यासह देशात गाजत आहे. अशातच पुण्यातील (Pune News) सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज (Drugs News) घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच या प्रकरणामुळे राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून इतर शहरात देखील असे प्रकार तर सुरू नाही ना? याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र अकोल्यात (Akola News) एक वेगळी बातमी समोर आली आहे. यात जिल्ह्यातील सर्व बार चालक मालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक पवित्रा घेत अकोला शहरातील सर्व बार आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत

अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज बार मालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं कालपासून शहरातील बारवर काही कारण नसताना  हेतुपुरस्सर कारवाई सुरू केल्याचा आरोप बार मालकांनी केलाय. यासोबतच अकोल्यातील खाजगी हॉटेल आणि धाब्यांवर सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागानं जाणीवपूर्क दुर्लक्ष केल्याचा आरोपही अकोल्यातील बार मालकांनी केलाय. उत्पादन शुल्क विभागाच्या या धोरणाविरोधात अकोला शहरातील सर्व बार  आज बंद असणार आहेत. तर बारमालकांनी बारच्या चाव्या उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केल्या आहेत. आता उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत, असा पवित्रा मालकांनी घेतलाय. 

संतप्त बार मालकांचे कार्यालयातच ठिय्या आंदोलन

अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज संतप्त बार मालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या प्रमाणात बार मालक उपस्थित होते. त्यामुळे या कार्यालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळ गाठत बार मालकांची समजूत काढली. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात बार मालकांनी आपला रोष व्यक्त करत प्रशासनाने या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणीही आकोल्यातील बार मालक असोसिएशनने केलीय.

इतर महत्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp