अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु; तर अलिबाग येथे दोन मुले बुडाली

अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु; तर अलिबाग येथे दोन मुले बुडाली


Akola News अकोला : अकोला (Akola News) आणि अलिबाग (Alibaug) जिल्ह्यातील मूनवली शहरातून दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. यात अकोल्यात कूलरचा  (Cooler) शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु झालाय. तर अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अकोल्यात मागील दीड महिन्यात आतापर्यंत कुलरचा शॉक लागून 5 लोकांचा मृत्यु झाला आहे.

अशातच आता अकोला (Akola News) जिल्ह्यातील काळेगाव येथे अशीच घटना घडली आहे. यात 4 वर्षीय ईशानी प्रवीण ढोले आणि 5 वर्षीय प्रियांशी सोपान मेतकर असं कुलरचा शॉक लागून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  

कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु

अकोला जिल्ह्यातील काळेगाव येथे या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही मुली आपल्या मामाकडे राहायला आल्या होत्या. दरम्यान आज दुपारी घरात खेळत असतांना अचानक त्यांचा कूलरला हात लागला. दरम्यान, त्यांना जोरदार शॉक लागला अन् यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या अकोला जिल्ह्यात कूलरचा शॉक लागून 5 लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे कूलरमधील तांत्रिक बिघाड जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच महावितरण कडून देखील याबाबत माहिती दिली जात आहे. मात्र या घटनेमुळे परत एकदा कूलर विषयी सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे ठरते आहे.

अलिबाग तालुक्यातील मुनवली तलाव येथे दोन मुले बुडाली

दरम्यान अशीच एक दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे घडली आहे. यात मूनवली येथील तलावात दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर आणखी एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सध्या घेतला जात आहे. मूनवली येथील अथर्व शंकर हाके (वय अंदाजे 16 वर्षे) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून दुसरा तुडाळ भागातील मुलगा असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola Farmer : अकोल्यात विनाचालक ट्रॅक्टरची कमाल ! ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी

Akola Farmer : अकोल्यात विनाचालक ट्रॅक्टरची कमाल ! ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी


Akola Farmer : अकोल्यात विनाचालक ट्रॅक्टरची कमाल ! ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी
भारतीय शेती नवतंत्रज्ञानामूळे कात टाकून पाहतीये. अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केलाये. अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी ‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केलीये. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा  वरोकार कुटूंबियांनी केलाये. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणालेय. पाहूयात, कसं आहेय विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं ‘ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी’… 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



Source link

Amol Mitkari : प्रकाश आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा घुमजाव; म्हणाले….

Amol Mitkari : प्रकाश आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा घुमजाव; म्हणाले….


Akola News अकोला : अजित पवारांनी (Ajit Pawar) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadhi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलं होतं. अकोला येथे ‘एबीपी माझा’ शी साधलेल्या ‘एक्सक्लुझिव्ह’ संवादादरम्यान त्यांनी आज सकाळी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मात्र, सकाळी केलेल्या या वक्तव्यावरून मिटकरींनी आता घुमजाव केले आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावर आता अमोल मिटकरींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांसोबत महायुतीत यावं, असं आपल्या बोलण्याचा अर्थ असल्याचं म्हणत त्यांनी आता आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. तर राष्ट्रवादी आजही महायुतीचाच घटक असल्याचेही अमोल मिटकरी म्हणालेय.

मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला

सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्यांवर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी बोललेले वाक्य मोडून-तोडून प्रसारित करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने काही पत्रकार बांधव मला विचारणा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मी उत्तर दिले. मध्यंतरी महायुतीमध्ये आमचे काही मत मतांतर झाले होते. मात्र आजही आम्ही महायुतीमध्ये भक्कमपणे एकसोबत आहोत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप पक्षाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मानाचे स्थान दिले आहे. त्याच प्रमाणे केंद्रात देखील त्यांना मानाचे स्थान आहे. राज्यसभा, विधानसभा आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आम्हाला योग्य ती वागणूक मिळत असून आम्ही भक्कमपणे महायुतीत सामील आहोत. असे म्हणत अमोल मिटकरींनी सकाळी केलेल्या आपल्या वक्तव्यावरून आता घुमजाव केले आहे.

तर महायुती आधिक भक्कम होईल

विधानसभेच्या अनुषंगाने एका पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला. यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही आगामी निवडणुकांसाठी सोबत आल्यास आपली भूमिका काय, अशी विचारणा केली. यावेळी मी त्यांना उत्तर दिलं की, काँग्रेस पक्षाने वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. तसेच वंचितचे सर्वेसर्वा असलेले प्रकाश आंबेडकर यांना देखील महाविकास आघाडीने अपमानाचे स्थान दिले आहे.  प्रकाश आंबेडकर  हे फार मोठं नाव या महाराष्ट्रातला आहे.  त्यामुळे ते जर महायुतीमध्ये आले तर महायुती आधिक भक्कम होईल आणि मागासवर्गीय लोकांना देखील त्यांचे न्याय या माध्यमातून मिळेल. या भावनेतून मी ते वक्तव्य केले असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

राज्यभरात काँग्रेस आक्रमक; नागपूर, पुणे, अकोला, अमरावतीसह इतरत्र काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

राज्यभरात काँग्रेस आक्रमक; नागपूर, पुणे, अकोला, अमरावतीसह इतरत्र काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन


Maharashtra Congress : राज्यभरात आज काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसने आज राज्यभरात  भाजप आणि महायुतीच्या सरकारचा विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. नागपूर, पुणे अकोला, अमरावती इत्यादीसह राज्यातील विविध शहरांमध्ये आज काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदवत आहे. या आंदोलनाला काँग्रेसने चिखल फेक आंदोलन असे नाव दिले आहे. नीटच्या परीक्षेसंदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्याची  चौकशी व्हायला पाहिजे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.  तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपने देखील रस्त्यावर उतरून नाना पटोले यांचा निषेधार्थ मोर्चा काढला होता. त्यावेळी नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावत त्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले, असा आरोप करत  त्या कृत्याचा भाजपने निषेध केला होता. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस देखील भाजप विरोधात आक्रमक झाली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी  चिखल फेकावे असेच काम केलं आहे- विकास ठाकरे

नागपुरातील व्हेरायटी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून तीव्र निषेध नोंदवला. यावेळी मोठ्याप्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. काँग्रेसचे नेते विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या नेतृत्वात नागपुरातील व्हेरायटी चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाजपचा निषेध करत आहेत.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी  चिखल फेकावे असेच काम केलं आहे. अशा शब्दात काँग्रेसचे नेते  विकास ठाकरे यांनी टीका केली आहे. राज्यात शेतकरी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. सध्याचे सरकार हे जनता विरोधी आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने या आंदोलनाला चिखलफेक आंदोलन असे नाव दिले असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केलंय 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज राज्यात चिखलफेक आंदोलन सुरु आहे. नाना पटोलेला, काँग्रेसला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपचे आंदोलन माझ्या विरोधात होते. भाजप शेतकऱ्याचा अपमान जाणूनबुजून करत आहे. एमएसपी सरकारने जाहीर केलीय. आज माझा मोदीजींना सवाल आहे, तुम्ही जी महागाई वाढवली त्यानुसार शेतकऱ्याने 1 रुपये खर्च केला तर त्याला चाराने पण वाचत नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसले. तर दुसरीकडे 2016 ला शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली आम्हाला त्याचा अभिमान आहे. परंतु अद्याप त्यावर काय झाले नाही. फुलेंच्या नावाने योजना काढली, पण अद्याप त्याचे 50 हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांना मदत करा आम्ही नेहमी म्हणालो. मात्र त्यावर काहीही झाले नाही. आमचे सरकार करणार होते पण करोना  काळ आला आणि नंतर हे खोके सरकार आले.  त्यामुळे 50 हजार मिळाले नाही. अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर  घणाघात केला आहे. 

अकोल्यात काँग्रेसचे ‘चिकल फेको’ आंदोलन

‘राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. असा आरोप काँग्रेसनं अकोल्यात चिखल फेको आंदोलनदरम्यान केलाय. सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आलाय. अकोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ‘चिकल फेको’ आंदोलन केलं आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप काँग्रेसनं यावेळी केलाय.

आंदोलनाचे यवतमाळातही पडसाद 

महायुती सरकार विरोधात काँग्रेसकडून आज यवतमाळच्या बस स्थानक चौकात चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी, दलीत, अल्पसंख्याक, महिला, युवक तसेच गरीब व सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे.  तसेच महाभ्रस्ट महायुती सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकत्मक पोस्टरला चिखल फासून निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

”मराठवाड्यात जरांगे फॅक्टर नक्कीच चालला”, भाजपची पहिल्यांदाच कबुली; माजी मत्र्यांचं वक्तव्य

”मराठवाड्यात जरांगे फॅक्टर नक्कीच चालला”, भाजपची पहिल्यांदाच कबुली; माजी मत्र्यांचं वक्तव्य


मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यात मराठवाड्यात भाजपचा मोठा पराभव झाला. मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1 जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला असून मराठवाड्यातील (Marathwada) भाजपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे, राज्यातील भाजपच्या पराभवाचा विश्लेषण करताना भाजपकडून (BJP) विविध कारणे देण्यात आली. त्यात, खोटा नेरेटीव्ह हे सर्वात महत्वाचं कारण सांगण्यात आलं. तर, मराठवाड्यातील पराभवावर अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाचा फटका बसल्याचेही काही नेत्यांनी म्हटले. मात्र, माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी थेट कबुलीच दिली. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला, असे म्हणत कराड यांनी मनोज जरांगेंमुळे मराठवाड्यात भाजपचा पराभव झाल्याचं म्हटलं. 

मराठवाड्यातील बहुतांश विजयी उमेदवारांनी विजयानंतर मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला आपलं समर्थन दिलं. तर, बीडचे बजरंग सोनवणे आणि परभणीचे संजय (बंडू) जाधव यांनी आपल्या विजयात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले. तर, दादा, तुम्ही मला खासदार केला, तुमच्यामुळेच मी खासदार झालो, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंचे आभारही मानले होते. आता, भाजप नेते आणि माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनीही स्पष्ट कबुली दिली आहे. बाकीच्या विभागात माहिती नाही, पण मराठवाड्यात महायुतीच्या पिछेहाटीसाठी जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची स्पष्टोक्ती माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी डॉ. कराड अकोल्यात आले होते. विधानसभा निवडणुकीआधी जरांगे आणि मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय करणार असल्याचंही यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले.

मराठवाड्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा पराभव

मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी, सर्वात महत्वाची आणि काँटे की टक्कर ठरली ती बीडमधील निवडणूक. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट सामना झाला. त्यामध्ये, शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मतमोजणीत बजरंग सोनवणे 6 हजार मतांनी विजयी झाले. तर, बाजूलाच परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या महादेव जानकर यांचाही मोठा पराभव झाला. जालन्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पराभूत झाले. तर, लातूरमध्ये सुधार शृंगारे तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांचा पराभव करत ओमराजे निंबाळकर विजयी झाले. हिंगोलीत  बाबूराव कदम हेही पराभूत झाले. मराठवाड्यात केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकण्यात महायुतीला यश मिळाले. संभाजीनगरमधून शिवसेना महायुतीचे संदीपान भुमरे विजयी झाले आहेत. त्यामुळे, भाजपने  लढवेलल्या चारही जागांवर भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आहे. 

अधिक पाहा..



Source link

एका कारवाईने अकोला महापालिका होणार ‘मालामाल!’.. महापालिकेचा एकाच मालमत्तेवर 502 कोटींचा कर थकीत

एका कारवाईने अकोला महापालिका होणार ‘मालामाल!’.. महापालिकेचा एकाच मालमत्तेवर 502 कोटींचा कर थकीत


अकोला :  अकोला महापालिका (Akola News)   …. राज्यात आपल्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभारामुळे कुख्यात झालेली महानगरपालिका. अकोला महापालिकेचा कारभार पाहिला तर येथील नेतृत्व आणि नोकरशाही ही या गावाला लुटायलाच बसली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. अकोला महापालिकेतील अनेक प्रकरणं पाहिली तर ऐकणाऱ्याला या महापालिकेविषयी निश्चितच चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्वात गरीब महापालिकांपैकी एक असणाऱ्या अकोला महापालिकेला येथील भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट नोकरशाही सर्वार्थाने लुटत असल्याचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. 2001 मध्ये स्थापन झालेल्या अकोला महापालिकेला आजही अकोलेकरांना त्यांच्या मूलभूत सुविधा पुरवणे शक्य झालं नाही. याला कारण आहे अकोला महापालिकेत फोफावलेला अनियंत्रित भ्रष्टाचार. 

अकोला महापालिकेसंदर्भात अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अकोला महापालिकेच्या मालकीचा असलेला भूखंडावर अकोल्यातील एका कुटुंबाने गेल्या 62 वर्षांपासून अनधिकृतपणे ताबा बसवला आहे. एव्हढेच नव्हे तर शहरातील मध्यवर्ती भागात असलेला भूखंड या कुटुंबीयांनी भाडेपट्ट्यावर देत त्यातून गेल्या सहा दशकात कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. आधी अकोला नगरपालिका असताना आणि त्यानंतर महापालिका झाल्यानंतरही या भूखंडाच्या या घोटाळ्याकडे शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे काही नेते आणि नोकरशहांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

    अखेर दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त कविता द्विवेदी यांनी महापालिकेच्या या भूखंडाबाबत पहिल्यांदा कठोर भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेतूनच भूखंड बळकावणाऱ्या व्यक्तीला 502 कोटींचा कर भरण्याची नोटीस महापालिकेने बजावली. मात्र, कविता द्विवेदी यांची बदली झाल्यानंतर आता परत ही फाईल थंडबस्त्यात पडल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट नोकरशाही यांच्या ‘अभद्र’ युतीमूळे अकोलेकरांच्या नशिबी मात्र कायम नरक यातनाच असल्याचं दुर्दैवी चित्रं समोर आलं आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोल्यातील रायली जीन परिसरात नझूल शिट क्रमांक 26 ब मधील नझूल प्लॉट क्रमांक सात ही महापालिकेच्या मालकीची मालमत्ता आहे. या जागेचे क्षेत्रफळ 83059 चौरसफुट म्हणजेच 7719.23 चौरस मीटर इतके आहे. कधीकाळी शहराच्या एका बाजूला असलेली ही जागा आता अतिशय मोक्याच्या ठिकाणी आली आहे. 1962 सालापासून अकोला महापालिकेच्या या जागेवर अकोल्यातील तोष्णीवाल कुटू़बियांनी अवैधपणे ताबा केला आहे. सध्या या ठिकाणी खुल्या जागेचे दर हे 25 हजार 300 रूपये प्रति चौरस मीटर इतके आहेत. त्यामूळे या जागेची किंमत सध्या कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. सध्या या जागेवर तोष्णीवाल कुटुंबियांमधील विनोद श्रीविष्णू तोष्णीवाल, श्रीकांत श्रीविष्णू तोष्णीवाल, विजय श्रीविष्णू तोष्णीवाल आणि इतरांचा ताबा आहे. गेल्या 62 वर्षांपासून या जागेवर अवैधपणे ताबा मिळवलेल्या तोष्णीवाल बंधूंनी ही जागा बेकायदेशीरपणे भाड्याने देत त्यातून कोट्यावधींची कमाई केली आहे. आता महापालिकेने थकीत कराची नोटीस बजावल्यानंतरही तोष्णीवाल बंधू यातून वाचण्यासाठी पळवाटा शोधतांना दिसत आहेत. 

अशी बजावली 502 कोटींच्या थकीत करासंबंधी वसुली नोटीस 

  याप्रकरणी 12 डिसेंबर 2022 रोजी महापालिकेच्या तत्कालिन आयुक्त कविता द्विवेदी यांनी विजयकुमार तोष्णीवाल आणि इतर भावंडांच्या नावाने 502 कोटींच्या वसुलीची नोटीस दिली होती. या नोटीसनुसार दोन वर्षांपूर्वीच्या बाजारभावानुसार या 7719.23 चौरस मीटर जागेची किंमत 19 कोटी 52 लाख 96 हजार 519 एव्हढी काढण्यात आली आहे. या जागेच्या वार्षिक भाड्यानुसार एका वर्षासाठी 1 कोटी 56 लाख 23 हजार 721 आकारण्यात आलेत. भाड्याच्या वार्षिक रकमेवर 61 वर्षाच्या थकबाकीनुसार 95 कोटी 30 लाख 46 हजार 981 रूपये इतकी निव्वळ थकबाकी झाली. या थकबाकीवर प्रतिवर्ष 7 टक्के दराने 61 वर्षांच्या व्याज आकारणीची रक्कम 406 कोटी 95 लाख 10 हजार 568 इतकी होते आहे. त्यामूळे मुळ रक्कम आणि 61 वर्षांचे व्याज धरून ही थकबाकी 502 कोटी 25 लाख 57 हजार 549 एव्हढी होत आहे. वर्ष 2023-24 चा अकोला महापालिकेचा एकुण अर्थसंकल्प 1150 कोटी रुपयांचा होता. त्यामूळे ही थकबाकी वसुल झाली तर अकोला शहराचा चेहरा-मोहरा अकोला महापालिका निश्चितच बदलू शकणार आहे. 

तत्कालीन आयुक्त कविता द्विवेदींनी दाखवलेली हिंमत आताचे आयुक्त दाखवणार का? 

    अकोला महापालिकेची कोट्यावधींची ही जागा गेल्या 62 वर्षांपासून दाबण्यात आली आहे. यावर कारवाई करण्याची हिंमत आतापर्यंतच्या कोणत्याच महापालिका आयुक्तांना दाखवता आली नव्हती. मात्र, 2021 पासून महापालिकेचा आयुक्त म्हणून कारभार कविता द्विवेदी यांनी हाती घेतला. द्विवेदी यांनी अगदी पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर देत उपाययोजना राबविल्यात. त्यातूनच त्यांनी महापालिकेनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या या भुखंडाची फाईल उघडली अन त्यांना संपुर्ण प्रकरण पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्यातून त्यांनी कर विभागाला सोबत घेत तोष्णीवाल बंधूंना 502 कोटींच्या वसुलीसाठी नोटीस बजावली. 12 डिसेंबर 2022 रोजी ही नोटीस बजावण्यत आली होती. त्यांनी 30 दिवसांच्या आत या रकमेचा भरणा करण्याचे आदेश तोष्णीवाल बंधूंना या नोटीशीत दिले होते. मात्र, अकोलेकरांच्या मालकीच्या भूखंडाचे श्रीखंड खाललेल्या तोष्णीवाल बंधु़नी ही थकबाकी न भरता इतर पळवाटांचा वापर सुरू केला आहे. यावर्षी आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. सुनिल लहाने रूजू झाले आहेत. मात्र, ते कविता द्विवेदी यांच्यासारखी खमकी भूमिका घेणार का?, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. 

महापालिका तोष्णीवाल बंधूंच्या इतर मालमत्ता आणि संपत्तीवर थकीत कराचा ‘बोजा’ चढवणार का? 

     अकोला महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे. कविता द्विवेदी आयुक्त म्हणून येण्याआधी महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर करण्याची पालिकेची आर्थिक स्थिती नव्हती. मात्र, त्यांनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची घडी नीट बसविल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हायला लागलेत. अकोला महापालिका 2012 मध्ये आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे तेव्हाच्या काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण सरकारने बरखास्त केली होती. तेंव्हा महापालिकेत काँग्रेस सत्तेत असतांना राज्य सरकारने हे पाऊल उचललं होतं. आताही पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतांना तोष्णीवाल कुटुंबियांवरची 502 कोटींची वसुली करण्यासाठी महापालिका पुढाकार का घेत नाही?, हाच प्रश्न आहे. महापालिकेने या कुटुंबियांची संपत्ती जप्त करून त्यावर थकबाकीचा बोजा चढवणं आवश्यक आहे. यासोबतच महापालिकेनं त्यांच्या इतर मालमत्ता जप्त करत त्यातून वसुलीची भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेतील काही राजकारण्यांच्या माध्यमातून महापालिकेतील काही भ्रष्ट प्रवृत्तींना ‘ लक्ष्मीदर्शन’ झाले असल्याने ही सर्व कारवाई वेग घेत नसल्याची मोठी चर्चा अकोल्यात आहे. त्यामुळे महापालिका तोष्णीवाल बंधूंच्या इतर मालमत्तांवर हा 502 कोटींचा बोजा कधी चढवणार? हा महत्वाचा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.

अकोल्यातील ‘भूमाफियां’ना भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ!

    अकोला शहरात शासन महापालिका आणि इतर सहकारी विभागाचे भूखंड मोठ्या प्रमाणात अनेकांनी घशात घातले आहेत. शहरातील भूखंड घशात घालणारी एक ‘गोल्डन गॅंग’ अकोला महापालिका आणि सरकारच्या इतर विभागात कार्यरत आहेत. या ‘गोल्डन गॅंग’मध्ये काही राजकारणी बिल्डर भूमाफिया आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या आशीर्वादाने अकोल्यात भूखंडाचे श्रीखंड खाण्याचं प्रमाण राजरोसपणे सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षातील लोक यात असल्याने कोणताच राजकीय पक्ष याविरोधात अवाक्षरही काढतांना दिसत नाही. 

अकोला महापालिकेतून झाली होती एका मोठ्या भूखंड घोटाळ्याची फाईल गहाळ! 

  दोन वर्षांपूर्वी अकोला महापालिकेतून एका भूखंड घोटाळ्याची फाईलच गहाळ झाली होती. अकोला शहरातील महापालिकेचे 52 खुले भूखंड बड्या धनाढ्य व्यावसायिक आणि राजकीय लोकांनी बळकावल्याचा अहवाल महापालिकोच्या एका चौकशी समितीनं दिला होता. या खुल्या जागांवर अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केल्याची बाब एका चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आली होती. महापालिकेच्या शहरातील खुल्या भूखंडांचे श्रीखंड खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अन हे करणारे आहेत शहरातील बडे धनदांडगे अन सर्वपक्षीय राजकारणी आहेत. महापालिकेच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 52 खुल्या भूखंडांचा या लोकांनी खाजगी वापर सुरू केला. हे करतांना महापालिकेच्या अटी-शर्थी पार धाब्यावर बसवण्यात आल्यात.

महापालिकेनं वापरायला दिलेल्या या भूखंडांवर अकोला महापालिकेच्या मार्च 2018 मधील सभेत चर्चा झाली होतीय. यात एक पाच सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होतीय. या समितीनं 2019 मध्ये महापालिकेला सादर केलेला अहवाल मात्र महापालिकेतूनच गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. अकोला महापालिकेच्या मालकीचे शहरात 150 च्या जवळपास खुले भूखंड आहेत. नव्या लेआऊटला परवानगी देतांना एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के जागा खुली ठेवण्याचा नियम आहेय. नगररचना विभागाच्या मान्यतेनं या खुल्या भूखंडांना मान्यता दिली जाते. मात्र अकोला महापालिकेत असे बरेचसे भूखंड सध्या अनेकांनी आपल्या घशात घातल्याची बाब समोर आली आहे. 

  अकोला शहराचा कारभार अक्षरश: रामभरोसे सुरू आहे. ना शहराच्या प्रश्नावर महापालिकेतील राजकारण्यांना देणंघेणं आहेय… ना अकोला महापालिका प्रशासनाला… त्यामुळे अकोलेकरांच्या हक्काच्या भूखंडाचे श्रीखंड लाटणा-यांवर खरंच कारवाई होईल का?, हाच खरा प्रश्न आहे…

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp