Unseasonal Rain : विदर्भात पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा; मतमोजणीवरही पावसाचे सावट

Unseasonal Rain : विदर्भात पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा; मतमोजणीवरही पावसाचे सावट


Vidarbha Weather Update नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भात  उष्णतेचा पाऱ्याने (Temperature) उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असताना दुसरीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून भारतात दाखल झाला आहे. तर मान्सूनचं (Monsoon Latest Updates) केरळ (Kerala News) आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

मात्र, त्यापूर्वीच विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा (Rain)  इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून या पावसाचे सावट उद्या पार पडणाऱ्या मतमोजणीवरही असल्याचा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर  आज पासून पुढील 5 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर 5 जून नंतर अमरावती, बुलढाणा आणि अकोला वगळता विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काल 2 जून रोजी दुपारनंतर विदर्भात सर्वत्र तुरळक ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर प्रचंड उकाडा आणि दमट वातावरणामुळे वैदर्भीयांचे पुरते हालेहाल झाल्याचे बघायला मिळाले.   

वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा

बुलढाणा जिल्ह्यात उकाड्या ने हैरान झालेल्या नागरिकांना आज दुपारी अचानक आलेल्या पावसाने दिलासा दिलाय. जिल्ह्यातील वाढते तापमान आणि गरम झालेलं राजकीय वातावरण आणि  त्यात आलेल्या मान्सून पूर्व पावसाच्या सरी यामुळे बुलढाण्यात वातावरण आल्हाददायक झाल्याचं चित्र आहे. उद्या मतमोजणी होत असताना ठिकठिकाणी चर्चा रंगताना ही दिसत आहे. सकाळपासुन कडक उन्हामुळे आणि  उकाड्यामुळे हैरान झालेल्या नागरिकांना मात्र अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे आज अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यालाही पावसानं झोडपलं. तालुक्यातील माना, कुरूम भागात आज जोरदार पाऊस झालाय. गेल्या तासभरापासून सुरू असलेल्या  मान्सुनपुर्व पावसाने सर्वसामान्य मात्र काहिसे सुखावले आहे. आज जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर होता. मात्र संध्याकाळच्या सुमारास झालेले पावसाने काही अंशी दिलासा दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Exit Poll 2024 : विदर्भात कुणाचा झेंडा फडकणार? नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा निकाल काय?

Exit Poll 2024 : विदर्भात कुणाचा झेंडा फडकणार? नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा निकाल काय?


Exit Poll Result 2024 नागपूर : देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) मतदानाची रणधुमाळी आज संपुष्टात येत आहे. देशात शनिवारी लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडत आहे. त्यानंतर येत्या  4 जून रोजी देशात सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी हे मतदान संपत असताना सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Exit Poll 2024) आकडेवारी जाहीर झाली आहे. यापैकी एबीपी-सी व्होटर (ABP-CVoter या देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह एक्झिट पोलकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एबीपी-सी व्होटरच्या आजच्या एक्झिट पोलमध्ये टप्याटप्प्याने प्रत्येक राज्याचा निकाल जाहीर झाला. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोल्सचे सर्वेक्षण देशातील सर्वात अचूक मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये गणले जाते. त्यातच महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी वरचढ ठरणार, याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट

एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला 9 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. याशिवाय शिंदे गटाला सहा जागा आणि अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते. शरद पवार गटाला सहा जागा आणि काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळू शकतात, असं एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे.

एबीपी सी वोटर एक्झिट पोल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात आहे. तर, महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मविआ आणि महायुतीत 50-50 संधी असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला 17 जागा, शिंदे गटाला 6 जागा आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा निकाल काय?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला विदर्भापासून सुरवात झाली. यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला  मतदान प्रक्रिया पार पडली. तर दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील उर्वरित पाच मतदारसंघात मतदान झाले. विदर्भातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा सलाग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री आणि भाजपेचे दिग्गज नेते नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात होते. नितीन गडकरी आपल्या विकासकामांच्या जोरावर बहुमताने विजयी होतील, असा दावा भाजपने केला होता. तर दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध महविकास आघाडीने देखील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना मैदानात उतरवत ही निवडणूक अधिक रंगत केली.

मात्र कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपूर मतदारसंघात विकास ठाकरे विजयी पताका फडकवतील, की महायुतीचे नेते नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करतील? याबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र, टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशातच पूर्व विदर्भात मात्र भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Election 2024) भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे पिछाडी वर असल्याचा अंदाज टिव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस – मायनस 3 ते प्लस – मायनस 5 टक्के इतके आहे.

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी: मेधा कुलकर्णींचं वक्तव्य म्हणजे संविधान बदलाच्या चर्चेला बळ देणारं: अमोल मिटकरी

मोठी बातमी: मेधा कुलकर्णींचं वक्तव्य म्हणजे संविधान बदलाच्या चर्चेला बळ देणारं: अमोल मिटकरी


अकोला: खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतला आहे. सांगलीच्या एका कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपण मिटकरींच्या (Amol Mitkari) व्यासपीठावर कधीच जाणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, मेधा कुलकर्णींची ही माहिती खोटी असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. उलट मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाविषयी (Brahmin community)  केलेले वक्तव्य संविधान बदलाच्या चर्चेला अधिकृत दुजोरा देणारे ठरु शकते, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. 

लोकसभेदरम्यान बारामतीच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर मेधा कुलकर्णी असल्याने आपणच त्या व्यासपीठावर गेलो नसल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात खोटं बोलणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी, असेही मिटकरी म्हणाले. 

अमोल मिटकरींनी मेधा कुलकर्णींना नेमकं काय प्रत्युत्तर दिलं?

लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्यावेळेस एखादी व्यक्ती या दोनपैकी एखाद्या सभागृहाची सदस्य होते, त्यावेळी त्याला शपथ दिली जाते. ती शपथ महत्त्वाची असते. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती एखाद्या समाजाची राहत नाही तर संपूर्ण देशाची होते. पण ही शपथ घेतल्यानंतरही कोणी एखाद्या समाजापुरतं वागत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या विचारधारेला छेद देण्यासारखं ते आहे. असाच काहीसा प्रकार काल सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला. 

आपल्या भाषणात राज्यसभेच्या खासदारांनी बारामतीमधील एक किस्सा सांगितला. मी अमोल मिटकरींसोबत स्टेज शेअर करणार नाही, असे त्यांनी सांगितले. बारामतीच्या प्रचारावेळी योगायोगाने एक युवक मेळावा होता. त्या मेळाव्याला सुरज चव्हाणही उपस्थित होते. ते आणि मी एका गाडीने गेलो. त्यावेळी अगोदरच या सन्माननीय सदस्या स्टेजवर बसल्या होत्या. जेव्हा आयोजकांकडून मला कळालं तेव्हा मी सांगितलं की, जे लोक स्वत:ला एका समाजापुरतं मानतात, अशा लोकांसोबत मला स्टेजवर बसायचे नाही. त्यामुळे मीच तेथून निघून गेलो. इतक्या दिवसानंतर त्या आठवणींना उजाळा देताना लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी त्यांनी सांगलीत ते वक्तव्य केले. मात्र, एका पदावर असताना त्या एका समाजाच्या ध्येयधोरणांसाठी काम करत असतील तर हे भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वांना छेद देणारी आहे. असंच जर चालू राहिलं तर लोकांच्या मनात राज्यघटनेविषयी  जी शंका आहे, त्याला अधिकृत दुजोरा मिळेल. त्यामुळे खासदारांनी केलेले वक्तव्य साफ चूक आहे. स्टेजवर त्या आल्या नाहीत, हे चूक आहे. मीच स्टेजवर गेलो नाही, हे निर्विवाद सत्य आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

आणखी वाचा

ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या,पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही, मेधा कुलकर्णी कडाडल्या

अधिक पाहा..



Source link

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अकोल्यात अटक; एक देशी कट्टा आणि 7 जिवंत काडतूस जप्त

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अकोल्यात अटक; एक देशी कट्टा आणि 7 जिवंत काडतूस जप्त


अकोला : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सात जणांना अकोला पोलिसांनी गजाआड केलं आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील सर्व आरोपी हे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार आहे. अकोला पोलिसांनी या आरोपींकडून एक बनावट देशी पिस्टल आणि सात जिवंत काडतूस, दरोडा साहित्यसह 7.85 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

संबंधित आरोपी हे एका ठिकाणी दरोडा टाकणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी प्लॅन करून सर्व आरोपींना पकडण्याचा प्लॅन केला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात खामगावकडून येत असताना या टोळीला नाकाबंदीदरम्यान पकडण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनात देशी पिस्टल आणि काही इतर साहित्य आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

राहुल भगवान खिल्लारे (वय 26, रा. शाहूनगर हिंगोली), ऋतिक कल्यानसव वाढवे (वय 21, पिंपळखेड जि. हिंगोली), सुर्यकिरण बळीराम चोरमल (वय 23, इसापूर स्मना, हिंगोली), अंकुश रगेश कंकाल (वय 22, सावरगाव (बडी) वाशिम), नितेश मधुकर रहनचय (वय 33, वाशिम), सुमित शेषसय पुंडगे (वय 22, पिंपळखेड जि. हिंगोली) आणि देवानंद अमृता इंगोले (वय 26, रा. सावळी, वाशिम) असे ताब्यात घेतलेल्या सात लोकांची नावे आहेत.

या प्रकरणाचा तपास अकोला पोलिस करत आहेत. आरोपींच्या या टोळीत इतरही गुन्हेगारांचा समावेश आहे का याचा तपास करण्यात येणार आहे. 

अकोल्यात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

सावकाराला शेतीचाताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केल्याची घटना अकोल्यातील मनब्दा गावात घडली आहे. 17 मे रोजीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद (Farm Land Dispute) सुरु आहेत. हा वाद सध्या न्यायालयात असताना शेळके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने (Sandeep Gatmane) याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.  याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सावकारखसह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..



Source link

शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, घरावरील पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं विदर्भात धुमशान

शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, घरावरील पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं विदर्भात धुमशान


Vidarbha Weather Update नागपूर : राज्यात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील  उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. असे असतानाच मे महिन्याच्या अखेरीस विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे.

यात पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) धारा बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक गावात मोठे झाडे उन्मळून पडली असल्याने विजपुरवठाही खंडित झाला आहे. परिणामी नारिकांना रात्र अंधाऱ्यात काढावी लागली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

घरावरील पत्रे अन् सौर पॅनलही उडाले 

काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वादळी वारा आणि पावसाचा तडाखा नवेगावबांध परिसराला बसला आहे. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्र्याचे छत उडाले. तर काहींच्या घरावर लावलेले सौर पॅनलही उडाले आहेत. तसेच झाडांची आणि विद्युत खांबांचीही पडझड झाली. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

वादळी वारा आणि पावसाचा धानाच्या मळणीला फटका

सध्या या परिसरात रब्बीतील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसाचा फटका धानाच्या मळणीला बसल्याने धान पिकाचे नुकसान झाले. तर कापणी केलेल्या धानाच्या कडपा सुद्धा पावसामुळे भिजलाय. जोरदार वादळामुळे या परिसरातील अनेक मोठी झाडे उन्मळून पडले आहे. तसेच विद्युत खांबांची पडझड झाली. काहींच्या घरावरील टीन पत्र्याचे छत उडाले, तर काहींनी लावलेले सौर पॅनल उडाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

वादळी वाऱ्यानं शेतातील उभं भातपीक जमीनदोस्त 

काल सायंकाळी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं शेतातील कापणीला आलेलं उभं भातपीक अक्षरश: जमीनदोस्त झालं. या वर्षाच्या हंगामातील भंडारा जिल्ह्यात आलेला हा अवकाळीचा सहावा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतबांध्यांमध्ये आत पाणी असल्यानं हे भातपीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. अनेक ठिकाणचे मोठे वृक्ष उन्मळून पडल्यानं वाहतूक प्रभावित झाली होती. तर, काही ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यानं रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता.

72 तासांपासून विज पुरवठा खंडित

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा करणारी अनेक खांब तुटले आहेत. परिणामी, मलकापूर परिसरात गेल्या 72 तासापासून विद्युत पुरवठा खंडित आहे. मात्र अद्यापही हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीला यश आलेले नाही. अशातच मलकापूर आणि परिसरात तापमान वाढीमुळे व उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. तर अद्यापही वीज पुरवठा सुरळीत न केल्यामुळे रात्री आक्रमक नागरिकांनी थेट मलकापूर वीज वितरण कंपनी समोर ठिय्या आंदोलन सुरू केल. अद्यापही हे आंदोलन सुरूच आहे. मात्र याबाबत वीज वितरण कंपनीचे कुणीही अधिकारी या आंदोलनकर्त्याशी बोलण्यास आलेलं नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola : खरीप हंगामाच्या तोंडावर अव्वाच्या सव्वा दराने बियाणांची विक्री; भरारी पथकाची कारवाई

Akola : खरीप हंगामाच्या तोंडावर अव्वाच्या सव्वा दराने बियाणांची विक्री; भरारी पथकाची कारवाई


Akola News अकोला : कापसाचे बियाणं बाजारात मिळत नसल्यानं शेतकरी (Farmers) चांगलेच आक्रमक होत आहे. एकीकडे कापसाच्या बियाण्यामूळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. मात्र, याचवेळी अकोल्यात (Akola News) बी-बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर येतोय. अकोल्यात जादा दरानं बियाणे विक्री करणाऱ्या एका कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केलीय. प्रति बियाणे पॅकेटामागे 1400 रुपये जादा दरानं ही विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ येथील मेसर्स अश्विनी ऍग्रो एजन्सी इथल्या केंद्रावर हा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर अव्वाच्या सव्वा दराने बियाणांची विक्री

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे या बियाणे विक्री केंद्रातून मेसर्स अजित सीड्स उत्पादित (अजित-155, बीजी 2) या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालखे आणि कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सदर बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला. मेसर्स अजित सीड्स उत्पादित संकलीत कापूस बियाणे वाण (अजित -155, बीजी 2) प्रति पाकीट 1400 रुपये याप्रमाणे म्हणजच जादा दराने विक्री होत असल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी मेसर्स आश्वनी ऍग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामराव पोहरे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, कापुस बियाणे किंमत (नियंत्रण) आदेश-2015, महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा-2009, महाराष्ट्र कापुस बियाणे नियम-2010, इत्यादी कलमान्वयेनूसार तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून यापूर्वीच झाला होता आरोप

काल बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. परिणामी, वैतागून त्यांनी रास्ता रोका आंदोलन केलं होतं. यात अनेक गावातील शेतकऱ्यांनी हा रस्त्यावर चक्का जाम केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली अन् आंदोलन मागे घेतले. जिल्ह्यात बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून झाला होता. सद्यस्थित शेतकऱ्यांना सकाळपासून रांगेत बसावं लागत आहे. कूपन मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात रांगेत उभे रहावे लागते. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नाही, केवळ दोन किंवा तीन बियाण्याचे पॅकेट हातात मिळतात. असा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp