Akola News : अकोल्यात उष्णतेचा कहर! जिल्ह्यात कलम 144 लागू, उष्माघाताने एकाचा संशयास्पद मृत्यू

Akola News : अकोल्यात उष्णतेचा कहर! जिल्ह्यात कलम 144 लागू, उष्माघाताने एकाचा संशयास्पद मृत्यू


Vidarbha Weather Update आकोल : विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीनेही नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून अचानक तापमानात (Temperature) मोठी वाढ झाल्याने सारेच हैराण झाले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून एकट्या अकोला (Akola) शहरात उष्णतेची लाट आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. परिणामी, उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे.  

हा आदेश त्यांनी शनिवार 25 मे रोजी निर्गमित केला आहे. दरम्यान आज अकोल्यात 45.06 अंश एवढं तापमान (Summer) नोंदवण्यात आलंय. तर अकोल्यातल्या राणी सती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला आहे. प्रथमिक माहितीनुसार या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.  

अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी?

अकोल्यातल्या राणी सती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला आहे. या मृत व्यक्तीचे वय 50 ते 53 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहन गजानन खाडे असं या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृत्यू उष्माघातानं मृत्यु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण मृत व्यक्तीकडे शासकीय रुग्णालयाची चिट्ठी सापडली आहे. त्यात लूज मोशन, मळमळ होऊनं उलटी होणे, चक्कर येणे, असा मोहनला त्रास असल्याचे नमूद आहे. त्यामुळ त्याचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. विशेष म्हणजे मोहन गेल्या अनेक दिवसापासून घराबाहेर आहे आणि रस्त्यावरच राहून उदरनिर्वाह करायचा. मिळेल त्या जागेवर झोपायचा. मात्र,शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय हा मृत्यू उष्माघाताने झाला, असे म्हणता येणार नाही, असे पोलिसांचं म्हणणे आहे.

दरम्यान अकोला जिल्ह्याचे तापमान सध्या गेल्या 4 दिवसांपासून 45 अंशापार पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं क़लम 144 लागू करण्यात आली आहे. म्हणून नागरिकांनी उन्हापासून बचावाकरिता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.

अकोल्यातील मागील काही दिवसांतील तापमान-

  तारीख       तापमान 

14 मे रोजी     41.08
15 मे रोजी :   40.09
16 मे रोजी :   42.04
17 मे रोजी :   40.02
18 मे रोजी :   42.00
19 मे रोजी :   43.02
20 मे रोजी :   43.08
21 मे रोजी :   43.08
22 मे रोजी :   44.08
23 मे रोजी :   45.05
24 मे रोजी     45.08 (अंश सेल्सियस सर्वाधिक तापमान नोंद)
25 मे रोजी :   45.06 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात उष्णतेचा पारा 45 अंशांच्या पार; तर पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट

अकोल्यात उष्णतेचा पारा 45 अंशांच्या पार; तर पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट


Vidarbha Weather Update नागपूर : विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीनेही नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून सध्या एकट्या अकोला शहरात (Akola) आज 45.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तर हे तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काळात अशीच परिस्थिती कायम असणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.

या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम विदर्भातील अनेक शहरातील जनजीवनावर झाला आहे. तर पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे, असे देखील हमामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे. संभाव्य इशारा लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्या नंतर आता सूर्याचा प्रकोप पहायला मिळतोय. तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यापूर्वी अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola) सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत.  अकोल्यात सलग उष्णतेच्या पाऱ्याने नवनवीन उच्चांक गाठले आहे. तर आज अकोल्याच्या तापमानात 3 अंशाने वाढ होऊन आजचे तापमान हे 45.8 अंश सेल्सिअस वर पोहचले आहे. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला आणि चंद्रपुर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट 

अकोला पाठोपाठ उर्वरित विदर्भातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. नागपूरात देखील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. परिणामी, दुपारच्या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येत आहे. म्हणूनच दुपारच्या वेळी शहरातील काही सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मुख्य सिग्नलवर हिरवी जाळी लावण्यात आली आहे. नागपूर शहराचे आजचे तापमान हे 42.6अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे शक्यतो टाळा, अशा सूचनाही हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.   

यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान

परभणी जिल्ह्यात उष्णेतची लाट कायम असुन आज जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर हे तापमान यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान असुन सर्वत्र उकाड्याने परभणीकरांचे मोठे हाल होत आहेत. वाढत्या गर्मीने शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाली आहे. संभाव्य उन्हाचा प्रकोप लक्षात घेता अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षही स्थापन करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola News : विदर्भात उष्णतेचा कहर! अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

Akola News : विदर्भात उष्णतेचा कहर! अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद


Vidarbha Weather Update नागपूर : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) प्रकोप पहायला मिळतोय. तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola) सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत.

गेल्या पाच दिवसांत अकोल्याचं तापमान सातत्यानं 42 ते 45 अंशांदरम्यान फिरंतय. तर अकोला शहराचा आजचा तापमानाचा पारा 45.5 अंशांवर पोहचला आहे. हे तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद आज करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम अकोला शहरातील जनजीवनावर झाला आहे. तर पुढील काही दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहील, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. 

अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा तपात असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता हवामान विभागाकडून उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला येथे गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचे बघायला मिळाले आहे.

तर पुढील 27 मे पर्यंत हीच परिस्थिती कायम असण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. तर आज एकट्या अकोला शहराचे तापमान 45.5 अंश इतके नोंदवण्यात आले आहे. हे तापमान या हंगामातील विक्रमी तापमान असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट 

अकोला पाठोपाठ उर्वरित विदर्भातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. नागपूरात देखील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. परिणामी, दुपारच्या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येत आहे. म्हणूनच दुपारच्या वेळी शहरातील काही मुख्य सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहराचे आजचे तापमान हे 41.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे शक्यतो टाळा, अशा सूचनाही हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते  44 अंश पार

Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार



<p>राज्यात सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळतायेत. सध्या काही भागात अवकाळी पावसाचा प्रकोप पहायला मिळतोये. काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळ. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झालेयेत. गेल्या पाच दिवसांत अकोल्याचं तापमान सातत्यानं 42 ते 44 अंशांदरम्यान फिरंतये. काल अकोल्याचा पारा 44 अंशांवर होताय. आजही अकोल्यात तशीच परिस्थिती आहेय. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम झालाय तो अकोला शहरातील जनजीवनावर. अकोल्यातील ऊन्हाच्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी&hellip;.&nbsp;</p>
<h1 class="video-article-story-title"><a title="Pravara River SDRF Boat : प्रवरा नदीत मोठी दुर्घटना! SDRF ची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू" href="https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ahemednagar-akole-pravara-river-sdrf-boat-update-3-death-ujani-dam-update-marathi-news-abp-majha-1284268" target="_self">Pravara River SDRF Boat : प्रवरा नदीत मोठी दुर्घटना! SDRF ची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू</a></h1>
<div class="video-article-story-slug">
<div class="video-article-story-slug-wrap" aria-expanded="true">
<p>उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असतानाचा आता अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटल्याची घटना घडली आहे.&nbsp; यात तिघांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या SDRF पथकाची बोट उलटली आहे. यात 5 जण होते. त्यातून तिघांचा मृत्यू झाला आहे.&nbsp;</p>
<p><strong>हे व्हिडिओ देखील पाहा</strong></p>
<p>उजनी धरणात &nbsp;(Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण&nbsp; बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.</p>
</div>
</div>



Source link

विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच; तर पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट  

विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच; तर पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट  


Vidarbha Unseasonal Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा सुरु आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कहर आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने(Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान (Crop Loss) केले आहे.

तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. अवकाळी पावसाचे सावट कायम असताना विदर्भात पुढील काही दिवस अवकाळी ढग कायम असून आता उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलाय.   

पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट  

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा तपात असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता उष्णतेची लाटेचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला येथे दिनांक 23 मे ते 26 मे दरम्यान पुढील चार दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तसेच उद्या 23 मे पासून पूढील 48 तास विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि अमरावती येथे विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 किमी प्रतितास सोसाट्याचा वाऱ्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट  जाहीर करण्यात आला आहे. परिणामी, संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.            

केळी पिकांचेही प्रचंड नुकसान

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज माळकिनी या शेत शिवारात मंगळवरच्या रात्री झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने केळी बागेचे मोठे नुकसान केले आहे. यात केळी पीक हे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना वादळी वाऱ्यामुळे बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे गत दोन महिन्यांमध्ये विविध पिकांच्या नुकसानीची ही पाचवी वेळ असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

शेतमालाच्या नुकसानीचे तातडीने कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अमोल मदने, पांडुरंग चव्हाण, प्रकाश चव्हाण, गजानन काळकर, ज्ञानेश्वर नलगे, लक्ष्मण चव्हाण, शिवाजी मदने, गजानन मदने, अनिल खंदारे,  पांडुरंग पवार, अभिनव जाधव ,रवी भोने, रामदास चव्हाण अरुण भोने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Yavatmal News: खळबळजनक! शिळे मटण खाल्ल्याने 19 जणांना विषबाधा; यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील घटना

अधिक पाहा..



Source link

Unseasonal Rain : विदर्भात परत अवकाळी पावसाचं थैमान! धान्य भिजलं, केळी पिकांचेही प्रचंड नुकसान

Unseasonal Rain : विदर्भात परत अवकाळी पावसाचं थैमान! धान्य भिजलं, केळी पिकांचेही प्रचंड नुकसान


Vidarbha Unseasonal Rain : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान (Crop Loss) केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय.

यात अकोल्यात (Akola News) काल रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिट आणि वादळी वाऱ्यामुळे धामणगाव आणि पणज शेतशिवारात केळी पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे वाशिम शहरात दुपारच्या सुमारास बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम कृषीउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला धान्य भिजल्याच चित्र बघायला मिळालंय. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. 

केळीची पिकांना अक्षरश: झोडपलं 

अकोल्यात काल सोमवारच्या रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपिट झालीये. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या काही गावांना या गारिपिटीसह पावसाचा फटका बसलाय. धामणगाव आणि पणज शेतशिवारात केळी पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळीमूळे अस्मानी संकटाला समोर गेलाय. अनेक शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय. अकोट तालुक्यातल्या धामणगाव शेतशिवारात गारपिटीमूळ तोडणीवर आलेल्या केळी पिकाला जबर मार बसला.

तर पावसासह वादळी वाऱ्यामूळे केळीची झाड़ं अक्षरश: जमिनीवर कोसळले आहे. तर काही भागात केळी पिक भुईसपाट झाले आहे. या भागात गेल्या काही दिवसांत अवकाळीचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाका बसला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पावसाचा बाजार समितीत विक्रीला आणलेल्या धान्याला फटका   

वाशिम शहरात सोमवारच्या दुपारी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम कृषीउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्याच चित्र बघायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झालंय. हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार दुपारच्या वेळी पाऊस झाला. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल ओट्याच्या खाली रस्त्यावर टाकलेला असल्यामुळे हा माल भिजला. यावेळी शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. या पूर्वी सुद्धा अनेकदा असेच प्रकार घडलेले असून कृषी उत्पन्न बाजार समिती यावर लक्ष देत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

झाडे उन्मळून पडली, विद्युत पुरवठा खंडित

वाशिम जिल्ह्यात अनेक भागात वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम, तर कुठे जोरदार अवकाळी पाऊस बरसला. रिसोड तालुक्यात काल संध्याकाळी पाचवाजेच्या सुमारास वाकद परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल असून रिसोड मेहकर मार्गावर वाकद गावाजवळ भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने जवळपास तासभर वाहतूक सेवा ठप्प झाली होती. तर अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp