HSC Result 2024 : बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी! नागपूरसह विदर्भ विभागाचा निकाल काय?

HSC Result 2024 : बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी! नागपूरसह विदर्भ विभागाचा निकाल काय?


Maharashtra HSC Class 12 Results नागपूर : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा (Maharashtra board result 2024) वेबसाईटवर हा निकाल आज मंगळवार, 21 मे 2024 च्या दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. विदर्भात एकूण 1 लाख 63 हजार 017 विद्यार्थ्यांनी बारवीची परीक्षा दिली होती. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचे देखील लक्ष लागले आहे. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली.

नागपूरसह विदर्भ विभागाचा निकाल काय?

या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असून यात यंदाही मुलींने बाजी मारली आहे, तर कोकण विभाग सर्वात अव्वल ठरला आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. 

राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे. यात पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्के निकाल लागला आहे. राज्यात नऊ विभागात तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभागाचा निकाल लागला आहे. तर नागपूरात 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 निकाल लागला आहे.

154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के

यात एकूण 154 विषयासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात एकूण 14 लाख 23 हजार 970 परीक्षार्थी  होते तर त्यातील 13 लाख 29 हजार 684 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोबतच 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान विभाग निकाल हा 97.82 टक्के, कला शाखा निकाल 85.88 टक्के, वाणिज्य विभाग निकाल 92.18 टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 2.12 ने जास्त लागला आहे.

विभागनिहाय निकाल

जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या

       एकूण : १,६३,०१७

कसा पाहाल निकाल? 

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
  • निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
  • संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.
  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला
  • रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..



Source link

Akola News : अकोल्याच्या मोर्णा नदीपात्रात आढळला चिमुकल्याचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ 

Akola News : अकोल्याच्या मोर्णा नदीपात्रात आढळला चिमुकल्याचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ 


Akola Crime News अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. अकोल्यातल्या मोर्णा नदीपात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय. वय वर्ष अवघ्या एक वयोगटाच्या आतील हा चिमुकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. यात नदीपात्रातील चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप या चिमूकल्याची ओळख पटली नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.  

 मोर्णा नदीपात्रात आढळला चिमुकल्याचा मृतदेह

दरम्यान, या चिमुकल्याचा मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून नदीच्या पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अद्यापपर्यंत या चिमुकल्याची ओळख समोर आली नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या चिमुकल्याच्या मृत्युबद्दल घातपाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  मात्र, वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील मोर्णा नदीपात्रात आज या चिमुकल्याचा मृतदेह दिसून आला आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक कृतीची नोंद केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.

पातुरमध्ये ट्रक व कारचा अपघात

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले होते. त्यानंतर, पोलिसांनीही (Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. 

तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पुलावर कोसळला

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना भीषण अपघात झाला, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते.

मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवानं या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाचे पोते पुलाखाली पडले आहेत. तर, ट्रक शेजारुन जाणारी कार ट्रकच्या ओझ्याखाली दबल्याने तिचे मोठे नुकसान झालं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ

दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ


अकोला : जिल्ह्यात गेल्या 24 तांसात अपघाताच्या (Accident) तीन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने पहिल्या दोन अपघाताच्या घटनांमध्ये जिवीतहानी झाली नव्हती. मात्र, आज दुपारी झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत तीन जणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दोन दुचाकीवरुन चारजण प्रवास करत होते, मात्र तेल्हारा-बेलखेड मार्गवर आल्यानंतर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एका दुचाकीचा भुगा झाल्याचं रस्त्यावर पडलेल्या वस्तूंवरुन दिसून येत आहे. अपघातील मृतांमध्ये दोन तरुणी आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, जखमीला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेतील मृत दोन्ही तरूणी एकाच कुटूंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. 

पातुरमध्ये ट्रक व कारचा अपघात

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले होते. त्यानंतर, पोलिसांनीही (Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. 

तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पुलावर कोसळला

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना भीषण अपघात झाला, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवानं या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाचे पोते पुलाखाली पडले आहेत. तर, ट्रक शेजारुन जाणारी कार ट्रकच्या ओझ्याखाली दबल्याने तिचे मोठे नुकसान झालं आहे. 

अधिक पाहा..



Source link

धक्कादायक! पोलीस निरीक्षकाकडून तरुणीचा विनयभंग; नागपुरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

धक्कादायक! पोलीस निरीक्षकाकडून तरुणीचा विनयभंग; नागपुरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


Nagpur News नागपूर :  अकोल्यातील (Akola News) खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे (Dhananjay Sayre) यांच्यावर नागपुरात (Nagpur News) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणामुळे अकोला पोलीस (Akola Police) प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकाराने पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या तरुणीचा विनयभंग

अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी (Akola Police) तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलं, असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला होता.

तर त्या आधी जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या त्यानंतर ठाणेदारासह पाच कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. अशातच आता अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोला पोलिसांचे नाव चर्चेत आले आहे. 

विनयभंगाचा गुन्हा दाखल

हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ही युवती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे यांनी या युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिल्यावर छेड काढत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप


अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काही भागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरु असल्याने थरकाप उडाला आहे. अकोट हिवरखेड रस्त्यावरील बंद पडलेल्या सूतगिरणीमागे आठवड्याभरापासून बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. शुक्रवारी पहाटे अकोला मार्गावरील गोकुळ कॉलनी परिसरात बिबट्या दिसून आल्याची चर्चा होती. दोन्ही ठिकाणी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते. 

अकोटच्या बंद पडलेल्या सुतगिरणीत बिबट्याचा मुक्काम

विशेष म्हणजे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांकडून वनविभागावर आरोप केला जात आहे. दरम्यान अकोटच्या बंद पडलेल्या सुतगिरणीत बिबट्याचा मुक्काम मशीन हॉलमध्ये आहे. शुक्रवारी सायंकाळी हा बिबट्या पुन्हा दिसून आला. त्यानंतर गोकुळ काँलनीमधील एका निवासस्थानी CCTV कॅमेऱ्यात बिबट्या ऐटीत चालताना कैद झाला. याठिकाणी कुत्रे भुंकत असल्याचे दिसते, पण तो बिबट्याच आहे का? यामध्ये शंका उपस्थित होते. 

दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी त्या सुतगिरणीत पाहणी करुन गेले. पंरतु कुठल्याही विभाग उपाययोजना करीत नसल्याने याठिकाणी सुतगिरणी ताबाधारकाने स्वतः सीसीटीव्ही तैनात केले आहेत. त्यामुळे सांयकाळी हा बिबट्या मशीन हाॅलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला. दोन्ही ठिकाणी आढळलेला बिबट्या हा वेगवेगळा असल्याचा अंदाज कॅमेऱ्यामधील अँगलने लावण्यात येत आहे. 

हिवरखेड व अकोला मार्गाचे सुध्दा बरेच अंतर आहे. त्यामुळे दोन बिबट्या असल्याची शंका वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली खहे. मात्र, अद्यापही उपाययोजना करताना वन विभाग गंभीर दिसत नाही. त्यामुळे शहरात वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार बघता भितीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या भाग सहा महिन्यातच उखडला; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या भाग सहा महिन्यातच उखडला; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा


Akola News अकोला : अकोला शहरातल्या डाबकी रेल्वे गेटजवळील काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलाची अवस्था अत्यंत वाईट झालीय. नव्यानेच तयार करण्यात आलेला उड्डाणपूलाच्या सुरुवातीचा म्हणजेच एन्ट्रीचा भाग मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होऊन रस्ता खचला आहे. त्यामुळ उड्डाण पुलावर वाहने चढत असताना धोकादायक ठरत आहे. यामुळ अनेक छोट्या वाहनांचा अपघात होत आहे.

येत्या 8 दिवसात या पुलाच्या एंट्रीचा भाग दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी दिला आहे. दरम्यान, हा उड्डाणपूल अकोला शहर आणि गायगाव, भौरद आणि यासह अनेक गावांना जोडणारा पुल आहे. मात्र अवघ्या सहा महिन्यात या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. 

संतप्त नागरिकांचा थेट आंदोलनाचा इशारा

अकोला शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील पुलाचे काम नुकतेच काही महिन्यांपूर्वी झालं. शहरातील वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल महत्वपूर्ण ठरत आहे. शिवाय हा उड्डाण पुल अकोला शहर आणि गायगाव, भौरदसह इतर अनेक गावांना जोडतो. मात्र अवघ्या सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या या पुलाच्या सुरवातीलाच रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. या रस्त्याला तडे गेले असून सुरवातीलाच रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

परिणामी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याची वेळीच दुरुस्ती करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा आक्रमक पवित्रा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी घेतला आहे. अवघ्या सहा महिन्याआधी तयार करण्यात आलेल्या रस्त्याची जर अशा पद्धतीने दुरावस्था होत असेल तर या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणीही योगेश ढोरे यांनी केली आहे. 

राजराजेश्वर मंदिर परिसरात आढळले भुयार सादृश्य बांधकाम

अकोला जिल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीला पडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी या ठिकाणी खोदकाम सुरू असताना एक जून भुयार सादृश्य बांधकाम आढळून आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे भुयार सादृश्य बांधकाम दोनशे ते अडीचशे वर्ष जुने  असावं असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  भुयार सारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. 

दोनशे ते अडीचशे वर्ष जुने बांधकाम असल्याचा अंदाज 

या भुयार सादृश्य बांधकाममध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खुप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेले सुद्धा आढळून आले आहे. या भुयाराच्या आतमध्ये 2 छोटे खोल्या बनल्या असून या मध्ये एका भिंतीवर महादेवची प्रतिमा कोरल्याचे दिसून आले आहे. तसेच आत मध्ये अंधार झाल्यास कंदील लावण्यासाठी छोटे कोरीव काम केलेली भगदाड सुद्धा दिसून आले आहे. मात्र, हे बांधकाम नेमकं कशासाठी तयार करण्यात आले असावे, याचा शोध सध्या घेतला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp