विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


Vidarbha Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. तर आगामी काळात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) हे ढग आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम कायम असल्याचा इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

हवामान विभागाचा’या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने एकच दाणादान उडवली आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकरी आणि बाजार समितीलाही बसला आहे. तर आज 12 मे ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर आजपासून पुढील 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले

अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. तर पशू पक्षांनाही अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल वादळी वार्यांसह दमदार पाऊस झालाय. जोरदार वाऱ्यामूळे अकोट शहरातील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या परिसरातील एक मोठं झाड उन्मळून पडलयं. यावेळी या झाडावर निवारा असलेल्या शेकडो पोपटांचा दुर्देवी मृत्यू झालाय. पाऊस आणि वारा थांबल्यावर मृत पोपटांवर एकाच ठिकाणी दफन करण्यात आलंय. मात्र या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

अवकाळीनं हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास

गेल्या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अनेकांच्या शेतातील भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांनी धान मळणीसाठी धान कळपा शेतात कापून ठेवलेल्या असताना त्या अवकाळी पावसात सापडल्यानं आता पाण्याखाली आल्या आहेत. यामुळं धानाची नासाडी होण्याची भीती आहे. तर, काही ठिकाणी कापणीला आलेले भात पीक जोरदार वारा आणि पावसात सापडल्यानं जमीनदोस्त झालेलं आहे. अगदी काही दिवसात निघालेल्या भात पिकाची विक्री करून स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्याचं स्वप्न बघत असतानाच आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेराल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

खळबळजनक! पोलीस हवलदाराची तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे महिलेची तक्रार

खळबळजनक! पोलीस हवलदाराची तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे महिलेची तक्रार


Akola News : ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. हाच विश्वास दर्शवत सर्वसामान्य नागरिक प्रथम न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असतात. मात्र, अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी (Akola Police) तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलंय. असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.

तक्रारदार महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी

अकोला जिल्ह्यातल्या चान्नी पोलीस स्टेशनचे हवालदार बाळकृष्ण येवले (ब.नं.1636) यांनी एका गावातील महिलेला शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला आहे, अशी तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलीय. या घटनेनंतर कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्यकडून उपस्थित केला जातोय. इतकेच नव्हे तर हवालदार येवले यांनी महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करुन त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही या महिलेकडून करण्यात आलाय. पोलीस हवालदार येवले आणि महिलेच्या संभाषणाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील ‘माझा’ च्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन पोलीस नेमकं काय कारवाई करतात, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.  

ऑडिओ क्लिप’मधील संभाषण नेमकं काय? 

तक्रार दार महिला- हॅलो
पोलिस हवालदार – पोचली का?
महिला – हो पोचली.
पोलिस – अरे.. ते वाट पाहत आहे तुझी, नंबर लाव.
महिला- हा.. लावला सर, प्रोसिजर सुरू आहे. 
पोलिस – चालू आहे ना. 
महिला – चालू आहे. 
पोलिस – मी तर 2 ते 3 फोन लावले तुला. 
महिला – फोन सायलेंटवर होता.
पोलिस – काय हेंबा… आहे तू. 
महिला – सायलेंट होता.
पोलिस – तू भीत कोणाला, चोर आहेस का? तू. 
महिला – चोर नाही, फोन सायलेंट करून ठेव. 
पोलिस – तू भीत असणार तर मला सांग, मी तर नाही भीत. 
महिला- नाही … भीत नाही सर. भ्यायचं कशाला.
पोलिस – तू माझे शब्द लक्षात ठेव, भीत का?
महिला – नाही भीत नाही.
पोलिस – ठीक आहे ते आटोपूनं ये, उद्या मी तुझ्या घरी येतो. 
महिला – बर.. 
पोलिस – जेवण काय बनवते. 
महिला – तुम्ही सांगा ते करतो. 
पोलिस – मटन, दारु, मच्छी, अंडे हे काहीच चालत नाहीये. 
महिला – साध जेवण. 
पोलिस- नाही.. उडीद दाळ आणि भाकर. 
महिला- ओके.
पोलिस – उद्या येतो मी.. 
महिला – हो 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अवकाळीचा झटका, बळीराजाला फटका, पपईसह केळीच्या बागा भुईसपाट

अवकाळीचा झटका, बळीराजाला फटका, पपईसह केळीच्या बागा भुईसपाट


Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain)  जोरदार हजेरी लावलीय. याचा मोठा फटका शेती पिकांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील भंडारा (bhandara) आणि अकोला (akola) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठे नुकसान झालंय. पपईसह केळीच्या बागा (Damage to papaya and banana) भुईसपाट झाल्या आहेत.   

फळबागांसह भात आणि पालेभाज्या पिकांनाही फटका

भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे. यासोबतचं जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या मिरची या बागायती शेतीलाही याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. तर, अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.

अकोल्यात शेकडो एकरावरील पपई आणि केळीच्या फळबागा भुईसपाट

अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसलाय. ज्यामध्ये शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. तर संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळे, भाजीपाला धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. 16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. काही ठिकाणी या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, ‘या’ तारखेपर्यंत बरसणार पाऊस; पंजाबराव डखांचा अंदाज काय?

अधिक पाहा..



Source link

ओवैसी म्हणाले, माझा लहान भाऊ तोफ; नवनीत राणा म्हणाल्या असल्या तोफा आम्ही घरात सजावटीला ठेवतो

ओवैसी म्हणाले, माझा लहान भाऊ तोफ; नवनीत राणा म्हणाल्या असल्या तोफा आम्ही घरात सजावटीला ठेवतो


अमरावती : लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आता भाजपाच्या इतर उमेदवारांसाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये असदुद्दीन औवेसींविरुद्ध (Asaduddin owaisi) भाजपच्या माधवी लता यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी, औवेसी बंधुवर जोरदार हल्लाबोल केला. नवनीत राणांनी अकबरुद्दीन औवेसींच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत केवळ 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग दोन्ही भावांना कुठून कुठे पळावं हे समजणार नाही, असे म्हणत निशाणा साधला होता. त्यानंतर, असदुद्दीन ओवैसी यांनी एक व्हिडिओ शेअर करत नवनीत राणांचे नाव न घेता, पलटवार केला. माझा लहान भाऊ तोफ आहे, असे ओवैसींनी म्हटलं होत. त्यानंतर, पुन्हा नवनीत राणा यांनी व्हिडिओ शेअर  करत असदुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. असल्या तोफा आम्ही सजावटीसाठी वापरतो, असे नवनीत राणांनी म्हटले आहे. 

नवनीत राणांच्या हैदराबादमधील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हिंदू शेरणी म्हणत नवनीत राणांच्या भाषणाचं भाजपा समर्थकांकडून समर्थन होत आहे. राणा यांच्या भाषणावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही राणांना प्रतिआव्हान दिलं. ओवैसींनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ओवैसी म्हणाले की, “छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) तोफ आहे, तोफ… तो कोणाच्या बापाचं ऐकणारा नाही. त्याला समजावू शकणाऱ्याचं नाव असदुद्दीन ओवैसी आहे. ज्या दिवशी मी लहान भावाला सांगितलं, मी आराम करतो, आता तू सांभाळ. मग त्यावेळी तुम्हीच सांभाळा. तुम्हाला छोटा माहितीय ना? तोफ आहे तो…”, असे असदुद्दीन औवेसींनी म्हटलं होतं. त्यावर, आता नवनीता राणांनी पलटवार केला आहे.  

ओवैसीनी सांगितले की माझा लहान भाऊ तोफ आहे. औवेसी अशा तोफांना आम्ही घरासमोर सजावटीत ठेवतो. मोठा सांगतोय की लहान खूप खुंकार आहे, अरे असे खुंकार आम्ही घरी पाळतो, अशा शब्दात नवनीत राणा यांनी औवेसींवर हल्लाबोल केला. तसेच, मी पण पाहते मुर्गी ओर मुर्गी का बच्चा कबतक खैर मनाता हे. मोठा सांगतोय की मी लहान भावाला समजावून ठेवलं आहे. अरे समजावून ठेवलं म्हणून नजरेसमोर आहे, नाहीतर देशात गल्लोगल्लीत शेर रामभक्त राहतात, असा इशाराही नवनीत राणा यांनी औवेसींना दिला. तसेच, आता लवकरच मी हैदराबादला येणार आहे, पाहते कोण अडवते मला, असेही राणांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. 

नवनीत राणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. आता या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणालेल्या. राणांच्या याच वक्तव्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा

VIDEO : आम्हाला 15 सेकंद पुरे, नवनीत राणांचा ओवैसींना पुन्हा इशारा

अधिक पाहा..



Source link

हळूहळू घसरली… धरण पाहण्यासाठी सातपुडा पायथ्याशी गेलेल्या तरुणांची कार पाण्यात बुडाली

हळूहळू घसरली… धरण पाहण्यासाठी सातपुडा पायथ्याशी गेलेल्या तरुणांची कार पाण्यात बुडाली



<p><strong>अकोला :</strong> धरण पाहण्यासाठी आलेल्या हौशी तरुणांची कार थेट धरणात बुडाली आहे. धरणाच्या आवार भींतींवर <a href="https://marathi.abplive.com/topic/car">कार (Car)</a> उभी करुन तरुण धरण पाहण्यासाठी गेले असता, अचानक कार हळूहळू धरणाच्या उताराच्या दिशेने खाली जाऊन पाण्यात बुडाली. सुदैवाने कार धरणात बुडाली तेव्हा कारमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. <a href="https://marathi.abplive.com/topic/akola">अकोला (Akola)</a> जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या सातपुडा पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरणात हा प्रकार घडला. धरणात कार कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. &nbsp;</p>
<p><a title="अकोला" href="https://marathi.abplive.com/news/akola" data-type="interlinkingkeywords">अकोला</a> जिल्ह्याच्या अकोट शहरातील काही तरुण (एमएच 05-एएस 3730)क्रमांकाची कार घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी गेले होते. कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर आवार भिंतीवर उभी असलेली कार अचानक धरणातील पाण्कडे सरकत गेली, काही वेळातच ही कार पाण्यात पडली. त्यानंतर, कारमधील युवकांनी स्थानिकांकडे मदतीसाठी याचना केली. यावेळी, वीर एकलव्य बचाव पथकानं आपल्या चमूसह धरणात बुडालेली कार ओढून बाहेर काढली. सुदैवाने कारमधील युवक धरण पर्यटन करत असल्याने कारमध्ये नव्हते. या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले असून कार बाहेर काढल्यानंतर तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला.&nbsp;</p>
<p>दरम्यान, अकोट तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेलं पोपटखेड धरण आहे. येथील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने धरण पाहण्यासाठी येत असतात. मात्र, या धरणावर कोणीही सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे पर्यटक त्यांची वाहने थेट भिंतीवर घेऊन जातात. यापूर्वी या ठिकाणी अनेक दुचाकी भिंतीवरून धरणात घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. म्हणून आता या ठिकाणी सुरक्षेचा उपाय करण्याची मागणी होतेय. दरम्यान, आजच्या घटनेतून बोध घेऊन प्रशासनाकडून येथील धरण पर्यटनाला काही नियम व बंधन घातली जातील. त्यामुळे, भविष्यातील दुर्घटना टाळल्या जातील. कारण, पावसाळ सुरू झाल्यानंतर धरणाचे पाणी वाढते, तसेच धरण पर्यटनही वाढताना दिसून येते. &nbsp;</p>
<h2>हेही वाचा</h2>
<h1 class="abp-article-title"><a href="https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/salman-khan-house-firing-case-update-not-only-salman-khan-but-another-two-actors-from-bollywood-on-radar-of-shooter-mumbai-police-crime-branch-1280509">Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, फक्त सलमानच नव्हे तर आणखी दोन कलाकार होते रडारवर!</a></h1>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp