प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्यात धाडसी चोरी; अज्ञातांनी पळवला कोट्यावधींचा मुद्देमाल

प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्यात धाडसी चोरी; अज्ञातांनी पळवला कोट्यावधींचा मुद्देमाल


Akola Crime News : अकोल्यात (Akola) काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी चांगलाचं धुमाकूळ घातलाय. अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून (Crime News) नेलाय. दरम्यान, प्रतिष्ठीत उद्योगपती ब्रिजमोहन भरतीया यांच्या निवासस्थानी ही चोरी झालीय. भरतीया याचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आता प्रवेश केला. त्यानंतर या अज्ञातांनी सोनं-नाण्यांसह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. 

आज्ञातांनी पळवला कोट्यांवधीचा मुद्देमाल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुरुवारच्या रात्री दोन दिवसांपूर्वीच अकोल्यातील आलेगाव इथं 3 घरात चोरी झाली होती. या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यानंतर आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे. प्रतिष्ठित उद्योगपती भरतीया यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल दीड ते 2 कोटी रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, ही चोरीची घटना गांभीर्याने घेत  स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना करण्यात आले आहे. 

पोलिसांकडून आज्ञात चोरट्यांचा शोध सुरू 

याप्रकरणी खदान पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करताय. तसेच पोलिसांकडून आसपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे. सोबतच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी घरात असलेली सर्व रोख रक्कम चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम जवळ जवळ 2 कोटी़च्या घरात असल्याचे समजते आहे. तरीही अद्याप किती रूपयांची चोरी झाली हे समजू शकले नाहीये. आलीकडे शहरात चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू


Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
अकोल्याच्या पातूर शहराजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. दोन कारचा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चुराडा झालाय. 



Source link

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार, 3 गंभीर

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार, 3 गंभीर


 Akola Car Accident वाशिम : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झालाय. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात असल्याची माहिती पुढे आली आहे. वाशिमवरून अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडी आमने-सामने आल्याने जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

दोन्ही वाहनांचा अक्षरक्ष: चुराडा

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आसटूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जणांसह काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्याघडीला जखमींना अकोला येथे उपचार्थ हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांचा अक्षरक्ष: चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तर पुढील कारवाई पोलीस करत असून या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे. 

दोन चारचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार, तीन जखमी 

असाच एक अपघात वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात साळंबी गावा लगत दिग्रस-अकोला महामार्गावर झाला आहे. यात दोन भरधाव चारचाकी वाहन आमोर-सामोर आल्याने हा अपघात झालाय. या अपघातात दोन जण ठार झालेत. तर एकजण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मेहकरकडून मानोराकडे लग्न समारंभासाठी निघालेल्या एका चार चाकी वाहनाला समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाची धडक लागल्याने दोन्ही गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नासाठी जाणाऱ्या तीन पैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या गाडी मधील दोन जण किरकोळ जखमी झालेत. 

हा अपघात इतका भीषण होता की एक गाडी थेट रस्त्याच्या कडेला जाऊन खालच्या बाजूला जाऊन कोसळली. तर दुसऱ्या गाडीचा अक्षरक्ष: चुराडा झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव मेहकर येथून ही मंडळी मानोराकडे लग्नाकडे जात असल्याची प्राथमिक माहिती हाती आलीय. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं. तर जखमींना तत्काळ रुग्णवाहिका पाचारण करून जखमी उपचारासाठी  हलवण्यात आलंय.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

मुंबई के अस्पताल में फोन की टॉर्च जलाकर डिलीवरी:  मां-बच्चे की मौत; परिवार का आरोप- लाइट जाने पर 3 घंटे तक जनरेटर नहीं चलाया

मुंबई के अस्पताल में फोन की टॉर्च जलाकर डिलीवरी: मां-बच्चे की मौत; परिवार का आरोप- लाइट जाने पर 3 घंटे तक जनरेटर नहीं चलाया


  • Hindi News
  • National
  • Mumbai Hospital Carries Out Delivery Using Phone Torch, Mother And Baby Die

मुंबई10 घंटे पहले

  • कॉपी लिंक

ये तस्वीर ऑपरेशन थिएटर की है। लाइट न रहने पर फोन की टॉर्च जलाकर ऑपरेशन किया गया।

मुंबई के एक अस्पताल में डॉक्टरों ने मोबाइल फोन का टॉर्च जलाकर महिला की सिजेरियन डिलीवरी की, जिसमें मां और बच्चे दोनों की मौत हो गई। घटना सुषमा स्वराज मैटरनिटी होम में हुई, जिसे देश की सबसे अमीर नगरपालिक बृहनमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (BMC) चलाती है। महिला का परिवार बीते कई दिनों से अस्पताल के बाहर प्रदर्शन कर रहा है। अब जाकर BMC ने इन्क्वायरी का आदेश दिया है।

महिला का नाम सहीदुन (26) और उसके पति का नाम खुसरुद्दीन अंसारी है। पति विकलांग है, उसका एक पैर नहीं है। दोनों की शादी को 11 महीने हुए थे। उनके परिवार ने अस्पताल पर आरोप लगाया है कि सोमवार को अस्पताल की लाइट चली जाने के बाद तीन घंटे तक जनरेटर नहीं चलाया गया था। परिवार ने ये भी कहा कि सहीदुन और बच्चे की मौत के बाद डॉक्टरों ने अंधेरे में ही एक और डिलीवरी कराई थी।

परिवार का आरोप- लाइट जाने पर जनरेटर नहीं चलाया गया
अंसारी का मां ने बताया कि मेरी बहू एकदम स्वस्थ थी और प्रेग्नेंसी के दौरान उसकी सभी रिपोर्ट्स सही थीं। हम उसे 29 अप्रैल को सुबह सात बजे डिलीवरी के लिए अस्पताल ले गए। डॉक्टरों ने उसे पूरे दिन एडमिट रखा। 8 बजे हमें बताया गया कि सब ठीक है। डॉक्टरों ने कहा कि डिलीवरी नॉर्मल होगी। लेकिन, जब मैं उससे मिलने गई तो देखा कि वह खून से सनी हुई थी।

डॉक्टरों ने उसके पेट में चीरा लगा था और इसके बाद वे हम लोगों का साइन लेने आए। डॉक्टरों ने कहा कि सहीदुन को दौरा पड़ा था और C सेक्शन करना जरूरी था। तभी लाइट चली गई, लेकिन डॉक्टरों ने हमें दूसरे अस्पताल नहीं भेजा। वे हमें ऑपरेशन थिएटर ले गए और फोन की टॉर्च लाइट की मदद से डिलीवरी की। डिलीवरी में बच्चे की मौत हो गई। डॉक्टरों ने हमसे कहा कि मां बच जाएगी और हमें सायन अस्पताल जाने को कहा। लेकिन तब तक सहीदुल की मौत हो गई थी। उसके लिए ऑक्सीजन तक नहीं था।

परिवार का आरोप है कि हमें ऑपरेशन थिएटर ले गए और फोन की टॉर्च लाइट की मदद से डिलीवरी की।

परिवार का आरोप है कि हमें ऑपरेशन थिएटर ले गए और फोन की टॉर्च लाइट की मदद से डिलीवरी की।

पति बोला- डॉक्टरों को सजा मिले और अस्पताल बंद हो
महिला के पति ने कहा कि डॉक्टरों को सजा मिलनी चाहिए। जैसे मैं दर्द में हूं वैसे ही डॉक्टरों और स्टाफ को सजा मिलनी चाहिए। अस्पताल बंद हाे जाना चाहिए। अंसारी ने कहा कि मुझे न्याय चाहिए। मेरी कमाई बहुत कम है और मैं विकलांग भी हूं। मेरी शादी बहुत मुश्किल से हुई थी और अब मेरी जिंदगी बर्बाद हो गई है।

परिवार ने कुछ फोटोज और वीडियो भी दिखाए जिसमें उसी ऑपरेशन थिएटर में सेलफोन टॉर्च की मदद से दूसरी डिलीवरी की जा रही थी।

भाजपा की पूर्व BMC पार्षद जागृति पाटिल ने कहा कि उन्होंने मुंबई नॉर्थ ईस्ट लोकसभा सीट से उम्मीदवार मिहिर कोटेचा से मुलाकात की है। ये अस्पताल इसी विधानसभा सीट के तहत आता है। BMC ने इन्क्वायरी करने का आदेश दिया है। पाटिल ने बताया कि अस्पताल की हालत खराब है। अस्पताल को लेकर ऐसी शिकायतें पहले भी मिली हैं। कठोर कार्रवाई की जाने की जरूरत है।

ये खबर भी पढ़ें …

शामली में टॉर्च की रोशनी में इलाज हुआ, मारपीट और हादसे में घायलों को अस्पताल लेकर पहुंची थी पुलिस

यूपी के शामली जिले में स्वास्थ्य सुविधाओं की पोल खोलने वाला वीडियो सामने आया है। जहां सरकारी अस्पताल में डॉक्टर टॉर्च की रोशनी में घायल लोगों का इलाज करते नजर आए। पुलिस भी टॉर्च जलाकर पीड़ितों से पूछताछ करती नजर आई। मामला कांधला के सरकारी अस्पताल का है।​​​​​​​ पूरी खबर पढ़ें …

खबरें और भी हैं…



Source link

मुंबई में जहर देकर कॉन्स्टेबल की हत्या:  ट्रेन से मोबाइल छीनकर भाग रहे थे चोर, पीछा करने पर लगाया जहरीला इंजेक्शन – Mumbai News

मुंबई में जहर देकर कॉन्स्टेबल की हत्या: ट्रेन से मोबाइल छीनकर भाग रहे थे चोर, पीछा करने पर लगाया जहरीला इंजेक्शन – Mumbai News


मुंबई5 घंटे पहले

  • कॉपी लिंक

कॉन्स्टेबल विशाल की 3 दिन तक चले इलाज के बाद मौत हो गई।

मुंबई लोकल पुलिस में तैनात एक कॉन्स्टेबल की सिटी अस्पताल में मौत हो गई। कॉन्स्टेबल को 28 अप्रैल को एक चोर गैंग ने माटुंगा रेल्वे स्टेशन के पास जहरीला पदार्थ इंजेक्ट कर दिया। जिसके बाद तीन दिन तक चले इलाज के बाद बुधवार रात उसने दम तोड़ दिया।

दादर रेल्वे पुलिस के मुताबिक 28 साल के ठाणे निवासी विशाल



Source link

प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण; चालती ट्रेन पकडणं आलं असतं अंगलट, पण…

प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण; चालती ट्रेन पकडणं आलं असतं अंगलट, पण…


Akola News : अकोला (Akola) रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं दोन व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं असतं. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती चालत्या कामाख्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल (Accident) गेल्याने प्रवाशी व्यक्ती ट्रेन अन् प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडू लागला. पण रेल्वे स्थानकावर (Akola News) असलेल्या रेल्वे पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत या दुर्घटनेतून या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे क्षणात घडलेल्या या अपघातात सुदैवानं या व्यक्तिचा जिव वाचला आहे.  

प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण

तर अशीच एक दुसरी घटना काल, सोमवारी अकोला रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत एक महिला चालत्या रेल्वेमध्ये चढत असताना महिलेचे संतुलन बिघडलं, आणि महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जात असताना पोलीस कर्मचारी योगेश तांबस्कर यांनी सुखरूपपणे या महिलेला यातून वाचवले आहे. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहिसा प्रकार हा अकोला रेल्वे स्थानकावर घडला आहे. या घटनेनंतर वेळीच रेल्वे थांबवण्यातं आली. तसेच स्थानकावर मोठी गर्दीही झाली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या दोन्ही घटनेत पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होतंय.

लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू, एकाच आठवड्यात घेतला दोघांचा बळी

लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना एका आठवड्यात डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतून मुंबईला कामाला जाणाऱ्या दोघांचा लोकल प्रवासादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला आहे. सकाळी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान  रिया राजगोर या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला तर 23 तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते  मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी  सकाळी आठ ते  साडे आठच्या सुमारास  कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान रिया शामजी  राजगोरे या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला आहे.  तर 23 एप्रिललाअवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  डोंबिवलीत राहणारी  रिया ही  मुंबईमध्ये नोकरीला होती. नेहमी प्रमाणे   सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकलध्ये चढली.मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला.कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती लोकल मधून खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp