ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल करावेत, प्रकाश आंबेडकरांचं

ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल करावेत, प्रकाश आंबेडकरांचं


अकोला : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ठाकरे आणि पवारांनी स्वतःमध्ये बदल करावेत

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने (Shiv Sena) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीने (NCP Sharad Pawar Group) स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. त्यांनी अकोला येथे एबीपी माझाशी एक्स्लुसिव्ह बातचीत केली आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

प्रकाश आंबेडकरांचा जोरदार निशाणा

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचे सामाजिकरण होणं आवश्यक असल्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल. 

महाविकास आघाडीचा विषय संपला

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. वंचित आणि मविआच्या अनेक बैठका, चर्चासत्रे निष्फळ ठरली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केलं आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर चिन्ह

अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.

Akola Prakash Ambedkar Election Symbol : पाहा व्हिडीओ : अकोला लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांना ‘प्रेशर कुकर’ चिन्ह

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..



Source link

अकोल्यातील बंड शमलं! देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामाला, भाजपच्या बंडखोराचा अर्ज माघार

अकोल्यातील बंड शमलं! देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामाला, भाजपच्या बंडखोराचा अर्ज माघार


अकोला : महायुतीसाठी एक दिलासादायक बातमी असून अकोल्यामधील (Akola Lok Sabha Election)  बंड रोखण्यास भाजप नेत्यांना यश आल्याचं दिसतंय. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचं बंड शांत झालं आहे. नारायण गव्हाणकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी बंड मागे घेतलं असून दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्यासमोरील मोठं आव्हान दूर झालं आहे. 

देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामाला

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गव्हाणकरांची मनधरणी करण्यात यशं आलंय. फडणवीसांनी रविवारी दुपारी पावणे 2 वाजता गव्हाणकरांना फोन केला होता. नंतर गव्हाणकरांनी माघारीचा निर्णय घेतला आहे. आता गव्हाणकर अनुप धोत्रेंचा प्रचार करणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. आमदार गव्हाणकर अकोल्याच्या स्थानिक भाजप नेतृत्वावर नाराज होते. आज माझ्यावर अन्याय झालाय, पण अजूनही स्थानिक भाजप नेत्यांचा फोन नाही आला अशी त्यांनी तक्रार केली आहे. 

दरम्यान, अकोट, तेल्हारा, पातूर, बाळापूर सर्व मतदारसंघ फिरलो होतो. आज देवेंद्रजींनी जरी फोन केला असला तरी याशिवाय माझ्या मार्गदर्शकांनी मला सूचवलं समजावलं आणि मी माघारीचा हा निर्णय घेतला गेला. मला कोणतेही आश्वासन मिळालं नाही, निवडणुकीनंतर निर्णय घेऊ असं आश्वासन मिळालं आहे. परंतु आज लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळावं अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही असेही गव्हाणकर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अनुप धोत्रेचा प्रचार करायचा की नाही हे येणारी वेळच ही येणारी वेळ आणि काळच सांगणार. असे स्पष्टच गव्हाणकर बोलले.

कोण आहेत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर? 

नारायण गव्हाणकर हे जनसंघापासून भाजपात कार्यरत आहे. 1995 आणि 2004 असे दोनदा अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून विजयी झाले आहे. 2000 ते 2003 भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष राहिले आहे. 2004 मध्ये लोकसभेसाठी सक्षम दावेदार होते. मात्र तेव्हा त्यांना डावलून संजय धोत्रेंना उमेदवारी दिली आहे. पुढे सलग चारदा संजय धोत्रे अकोल्यातून भाजपचे खासदार म्हणून विजयी झाले. 1980 ते 1885 बाळापूर निमकर्दा गावचे सरपंच राहिले आहे. 

अकोला जिल्ह्यात कुणबी समाजाचे नेते म्हणून राजकारणावर चांगली पकड आहे. भाजपाच्या अंतर्गत राजकारणात संजय धोत्रे आणि डॉ. रणजीत पाटलांचे दोन गट तयार झाले आहे. गव्हाणकर डॉ. रणजीत पाटील गटात असल्याचे बोललं जातंय. तर मुलगा राम गव्हाणकर सध्या वंचितचा जिल्हा परिषद सदस्य आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

भाजपने स्वत:सह संघाच्या स्वयंसेवकांचीही गोची केली; प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

भाजपने स्वत:सह संघाच्या स्वयंसेवकांचीही गोची केली; प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका


अकोलाभाजपच्या (BJP) सध्याच्या निर्णयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. संघाचा कार्यकर्ता हा त्याच्या वैचारिक मतांशी एकसंघ राहिला आहे. कधीकाळी भाजपनेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते नेतेच आज भाजपमध्ये आल्याने या स्वयंसेवकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे तुम्हाला स्वतःचं असं अस्तित्व असताना तुम्हाला का पक्षाने डावललं याचे उत्तर संघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्यावं लागत आहे.

मात्र, त्याच्याकडे या परिस्थितीचं कुठलेही उत्तर नाहीये. या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते असताना त्यांना कदाचित संख्याबळासाठी भाजपने शामिल केले असले तरी भाजपच्या या निर्णयामुळे संघाच्या स्वयंसेवकांची पूर्णतः कोंडी झाल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपवर टीका केली आहे. सध्याघडीला भाजपच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची मोठी अडचण झाली असून ते या प्रकाराचा निषेधही करू शकत नाही आणि समर्थनही करू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

चंद्रहार पाटलांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चंद्रहार पाटलांनी स्वतः च स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तीन महिन्याआधी ते माझ्याकडे येऊन गेले होते. त्यावेळी त्यांना मी सुचवलं होतं की, पश्चिम महाराष्ट्रात  प्रत्येक तीन गावाच्या मागे एक तालीम आहे. त्यामुळे हे तालीम किंवा आखाडे हा तुमचा बेस बनवा. त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी स्थानिक स्तरावर काम केले. 

शिवसेनेने त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला

मात्र, दरम्यानच्या काळात शिवसेनेने त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूर्वी मी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे बोललो होतो. मात्र आता शिवसेनेने तो प्रयत्न केल्याने कदाचित मी त्यांच्या पाठीशी त्या ताकदीने उभे राहणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे चंद्रहार पाटील सरळ मार्गाने जिंकून येत असताना त्यांना आता संघर्ष करावा लागणार आहे. परिणामी ते संघर्ष करूनही जिंकतात का हा मोठा प्रश्न असल्याची शंकाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Amol Mitkari: तुतारी गटामधील दोन गुंडांना कंटाळून नाथाभाऊंनी कठोर निर्णय घेतला; अमोल मिटकरींची खोचक टीका

Amol Mitkari: तुतारी गटामधील दोन गुंडांना कंटाळून नाथाभाऊंनी कठोर निर्णय घेतला; अमोल मिटकरींची खोचक टीका


Amol Mitkari : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अद्याप भाजपमध्ये (BJP) अधिकृतरित्या पक्षप्रवेश केलेला नसला तरी अशा बातम्या सध्या सुरू आहेत. बऱ्याच दिवसांपासून तुतारी गटामध्ये जे दोन नेते आहेत त्यांच्या गुंडागर्दीला एकनाथ खडसे हे कंटाळले होते. गेल्या काही दिवसांपासून ते दबावामध्ये होते, अस्वस्थ होते, ईडी, सीबीआयचा धाक त्यांना दाखवण्यात आला, असे बातम्यांमध्ये जरी सांगण्यात येत असले तरी मी चॅलेंज देऊन सांगतो की, तुतारी गटातले दोन नेते ज्यांच्या गुंडागर्दीमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटला आणि जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याच्या तयारीत आहे, त्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या त्रासाला कंटाळून नाथाभाऊंनी हा कठोर निर्णय घेतलाय, असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे.

नाथाभाऊ जर आज असा निर्णय घेऊन स्वगृही जात असतील तर ईडी, सीबीआय किंवा तश्या गोष्टीचा धाक आहे, असे म्हणता येणार नाही. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोन गुंडांनी गुंडागर्दी करून एकनाथ खडसे यांना पक्षाबाहेर काढले असल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले. 

हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे महायुतीच्या आदेश पाळतील 

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, अलीकडे त्यांचा हा राग मावळला असून ते आता मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसत आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते  म्हणाले की, महायुती मधील सर्व पक्षानी एक दिलाने काम करण्याचे ठरवले आहे. विजय शिवतारे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जे वक्तव्य केले,  त्या वक्तव्यांच्या तोडीस तोड उत्तर आम्ही देखील दिले आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांची समजूत काढली. मात्र, तरीही त्यांनी वक्तव्य करणे सोडले नाही. अखेर याबाबत जेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली. 

त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील हे देखील मध्यंतरी विरोधाची भूमिका घेताना दिसत होते, माझ्या माहितीप्रमाणे येत्या 11 तारखेला सासवड येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार आहे. या ठिकाणी विजय शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील त्यांना समन्वयाच्या भूमिकेतून महायुतीने आदेश दिले आहेत आणि मला विश्वास आहे की ते या आदेशाचे उल्लंघन करणार नाहीत. प्रामाणिकपणे ते या आदेशाचे पालन करतील. असा विश्वास अमोल मिटकारीं बोलताना व्यक्त केलाय. तसेच बारामती लोकसभा ही आम्ही तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी जिंकून येऊ असेही अमोल मिटकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात गुंडशाही सुरूच! सराईत गुन्हेगाराकडून थेट कारागृह निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी

अकोल्यात गुंडशाही सुरूच! सराईत गुन्हेगाराकडून थेट कारागृह निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी


Akola Crime News : कुख्यात गुंड गजानन कांबळेला (Gajanan Kamble) कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी चक्क कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केलीय. दरम्यान, कारागृह प्रवेशद्वारासमोर गाडी लावल्यावरून त्यांच्यात हा वाद झाला होता. कारागृह निरीक्षकाने कांबळेंच्या साथीदारांना हटकले असता त्यातला एक सराईत गुन्हेगार लाल्या पालकर यानं कारागृह निरीक्षकासोबतच वाद घातला. दरम्यान, त्याने चक्क अधिकाऱ्याची कॉलर पकडून बंदुकीने उडून देण्याची धमकी (Crime News) दिली. याप्रकरणी अकोल्यातल्या (Akola) सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय

ज्ञानेश्वर बाळसिंग पाटील (38, रा. शासकीय निवासस्थान कारागृह, अकोला) हे अकोला जिल्हा कारागृहाचे निरीक्षक असून पदावर आपली ड्यूटी बजावत होते. त्याचवेळी कारागृहात ‘एमपीडीए’ कारवाई कैद असलेला गजानन कांबळेला भेटण्याकरीता काही जण आले होते. त्यामध्ये सराईत गुन्हेगार असलेला स्वप्निल उर्फ़ लाल्या पालकर हा सुद्धा गजानन कांबळेला भेटण्यासाठी आला होता. त्यातील एकानं कारागृहाच्या मूख्य प्रवेशद्वारासमोर समोर दुचाकी उभी केली. कारागृह अधिकाऱ्यांनी लाल्या पालकरल विचारले की दुचाकी कोणाची आहे, तर त्याने गाडी आपलीच आहे. दुचाकी काढणार नाही, तुमच्यानं ‘जे’ होते ‘ते’ करून घ्या. असे म्हणत आणि अश्लिल शिवीगाळ करत तूला बंदूकीने उडवून जिवाने मारून टाकणार, अशी धमकी दिली. तसेच धक्काबुक्की करून थेट कारागृह निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या शर्टची कॉलर पकडून धमकावून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादा दरम्यान कारागृह पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये लाल्या पालकर हा जखमी झालाय. त्यानंतर लाल्या हा घटनास्थळावरून पसार झाला होता. 

कारागृह अधिकाऱ्यांनी या संदर्भात सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवली असून स्थानिक पोलिसांनी पालकरसह अन्य दोघांविरुद्ध 353, 294, 506, 34 नूसार गुन्हा दाखल केलाय. कोतवाली पोलिसांच्या डीपी पथकाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेत लाल्या पालकर याचा शोध घेतला. त्यानंतर त्याला अटक करत त्याच्यावर उपचार करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांचा एमसीआर केला. सद्यस्थितीत पालकर याला वाशिमच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, लाल्या पालकर वर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर या अगोदर एमपीडीएनूसार कारवाई केली होती.

कोण आहे गजानन कांबळे? 

कुख्यात गुन्हेगार गजानन काशिनाथ कांबळे याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीए कारवाई केली होती. त्यानंतर अकोला पोलिसांनी गजाआड करीत कागदोपत्री कारवाई केली. आता एक वर्षासाठी गजानन कांबळे अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध आहे. गजानन कांबळे हे भारतीय रिपब्लिकन पार्टी म्हणजेचं रिपाईचे आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ते निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच अनेक राजकीय आणि अधिकाऱ्यांशी त्यांचे संबध आहे.

दरम्यान बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भिती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, ठकवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

बच्चू कडूंचं ठरलं! अमरावतीनंतर अकोल्यातही भाजपला खिंडीत गाठणार, काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंब्याची शक्यता

बच्चू कडूंचं ठरलं! अमरावतीनंतर अकोल्यातही भाजपला खिंडीत गाठणार, काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंब्याची शक्यता


अमरावती: अनेकदा विरोध करूनही नवनीत राणांना (Navneet Rana) भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते बच्चू कडूंच्या (Bachchu Kadu) चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळेच ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवाराला विरोध करता येईल त्या त्या ठिकाणी तो करण्याची भूमिका बच्चू कडूंनी घेतल्याचं दिसतंय. बच्चू कडू आता अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील (Abhay Patil Akola) यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. 

अमरावती पाठोपाठ आता अकोल्यातही बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष वेगळ्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय. बच्चू कडू हे अकोल्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे. रविवारी अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रहार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडू हे भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातंय.  

अकोल्याची राजकीय गणितं बदलणार

महाविकास आघाडीचे सरकार असताना बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री होते. जिल्ह्यातील अकोट विधानसभेत प्रहारला 25 हजार तर मूर्तिजापूर विधानसभेत 10 हजार मतदान पडलं होतं. अकोला जिल्हा परिषदेत प्रहारचा एक जिल्हा परिषद सदस्य होता. तर अकोट पंचायत समितीतही एक सदस्य आहे. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडूंना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या विधानसभेवेळी प्रहारच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान लक्षात घेतलं तर लोकसभेला बच्चू कडू हे भाजपच्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवू शकतील अशी शक्यता आहे. 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा घ्यायचा निर्णय घेतला तर अकोल्यात राजकीय खळबळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बच्चू कडूंनी जर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर त्याचा परिणाम हा जिल्ह्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.  अकोल्यात 

अशी असेल अकोल्यातील लढत

अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक. वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि भाजपकडून महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे हे अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. वंचित आणि महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp