सुरतला असताना मलाही इंजेक्शन देऊन संपवण्याचा फडणवीसांचा डाव होता; नितीन देशमुखांचे जरांगेंच्या आरोपांना समर्थन

सुरतला असताना मलाही इंजेक्शन देऊन संपवण्याचा फडणवीसांचा डाव होता; नितीन देशमुखांचे जरांगेंच्या आरोपांना समर्थन


Nitin Deshmukh on Devendra Fadnavis :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)केलेल्या आरोपांना बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी समर्थन दिले आहे. आपण सुरतला असतांना फडणवीसांनी असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नितीन देशमुखांनी केलाय. त्यामूळे जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केलीय. नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा अकोट तालूक्यातील कुटासामध्ये आली होती. यावेळी ते बोलत होते. 

आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी घेतलेल्या कॉर्नर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केलीय. प्रभू श्रीरामाच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपने श्रीरामाची तत्व पायदळी तुडविल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पुजेला एकटे कसे बसलेय?, असा सवाल त्यांनी भाजपला केलाय. 

सत्तेचा दुरुपयोग करणे, अत्याचार करणे, हा एकमेव धंदा देवेंद्रजींचा

जरांगेंच्या आरोपांना समर्थन देताना अनिल देशमुख म्हणाले, निश्चितपणे देवेंद्र फडणवीस तसे करू शकतात मला त्यांचा अनुभव आहे. मागे मी तुम्हाला सांगितले होते की, मला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. या आरोपांची चौकशी व्हावी,अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे. फडणवीस काही करू शकतात. सत्तेचा दुरुपयोग करणे, अत्याचार करणे, हा एकमेव धंदा देवेंद्रजींचा महाराष्ट्रात सुरू आहे. मग तिच्या माध्यमातून इतर पक्षातील लोक फ़ोडत आहेत, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. 

मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पुजेला एकटे कसे बसले? 

प्रभू श्रीरामाच्या नावावर मत मागणाऱ्यांनी श्रीरामाचा आदर्श घ्यावा. प्रभू श्रीरामांनी सीता वनात असतांना केलेल्या पुजेत बसण्यासाठी  सीतामातेची सोन्याची मूर्ती बनवली होती. मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पुजेला एकटे कसे बसले? असा सवालही अनिल देशमुख यांनी यावेळी केला आहे. 

जरांगे पाटील यांनी कोणते आरोप केले होते?

देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा विचार करत आहेत. माझं एन्काऊंटर करण्याचा त्यांचा विचार आहे. मला सलाईनमध्ये विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे मी परवापासून सलाईन घेणे बंद केले आहे, असे जरांगे म्हणाले होते. जरांगे यांनी रविवारी दि.25 अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांशी बोलताना हे आरोप केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Ambedkar: सहा महिन्यांपूर्वी कोणालाही माहिती नसणारा जरांगे पाटील आता शरद पवारांचा बाप झालाय: प्रकाश आंबेडकर

 

अधिक पाहा..



Source link

Amravati : कृषी उत्पन्न बाजारसमित्यांचा एक दिवसीय बंद, अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत शुकशुकाट

Amravati : कृषी उत्पन्न बाजारसमित्यांचा एक दिवसीय बंद, अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत शुकशुकाट


Amravati : राज्यातील कृषी उत्पन्न बाजारसमित्यांचा एक दिवसीय बंद, अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज शुकशुकाट 



Source link

 टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये; आमदार बच्चू कडूंचा जरांगे पाटलांना सल्ला 

 टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये; आमदार बच्चू कडूंचा जरांगे पाटलांना सल्ला 


Bacchu Kadu on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  मराठा आरक्षणाच्या  (Maratha Reservation) मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एकेरी उल्लेख करत आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून उपोषण थांबवत तडक आता मुंबईतील फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची दिशा बदलवत टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला दिला आहे. जरांगे पाटील यांनी प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणे ही लढाई सुरू केली. याला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं, यासाठी एक शक्ति काम करत आहे. त्याला जरांगे पाटील यांनी बळी पडू नये एवढी आमची अपेक्षा असल्याचे देखील ते म्हणाले.

 टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बादलू नये

मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनातून प्रचंड मोठी उंची तयार केली आहे. ते आता केवळ एका गावापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांच्या मागे करोडो लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी अचानक असे हतबल होऊन उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे निघावं आणि अशी अतिशय टोकाची भूमिका घ्यावी, हे चुकीचे असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले. त्यांनी घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा. हा निर्णय समाजासाठी देखील चांगला नाही. शिवाय त्यातून चुकीचा संदेश समाजात जाईल. त्यांनी आतापर्यंत या प्रामाणिकपणे आंदोलनाच्या माध्यमातून जे मिळवलं, त्याला कुठे डाग लागता कामा नये. त्यामुळे माझा त्यांना सल्ला राहील की त्यांनी या पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊ नये. असे देखील बच्चू कडू म्हणाले.   

…. तर तो त्याचे परिणाम भोगेल

मनोज जरांगे पाटील असू देत किंवा देवेंद्र फडणवीस असू दे, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. आपण कुणाचाही जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही. मला असं वाटतं, या आंदोलनातून काय चांगला मार्ग काढता येईल, त्यासाठी शक्य ते प्रयत्न आपण करू. मात्र जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलू नये, असे देखील बच्चू कडू म्हणाले. जरांगे पाटील यांच्यावर सलाईन मधून विषबाधा करत घातपाताचा डाव आखण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यावर बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, मला व्यक्तिगत तरी असे कोणी केले असेल असे वाटत नाही. मात्र असं जर कोणी केले असल्यास तो त्याचे परिणाम भोगेल. असे देखील बच्चू कडू म्हणाले.

अजय बारस्कर आणि प्रहारचा संबंध संपला आहे. मात्र बारस्कर यांना देखील माझे आवाहन राहील की, व्यक्तिगत आयुष्यातील वक्तव्य करून हे आंदोलन कुठेतरी चिघळेल, असे वक्तव्य त्यांनी करू नये. एखादी आंदोलक हा आंदोलन करत असतो त्यावेळी त्याच्या भावना या तीव्र असतात. त्यावेळी जर का कोणी जाणूनबुजून त्यांना डीवचण्याच्या प्रयत्न करत असेल तर त्यांनी तो प्रयत्न थांबवला पाहिजे. अशी मी त्यांना देखील  विनंती करतो. असे देखील बच्चू कडू म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

रिकाम्या ट्रोलर्सना काही कामधंदा राहिला नाही, चुकीच्या धनादेशावरून ट्रोल करणाऱ्यांना अमोल मिटकरींनी सुनावलं; म्हणाले..

रिकाम्या ट्रोलर्सना काही कामधंदा राहिला नाही, चुकीच्या धनादेशावरून ट्रोल करणाऱ्यांना अमोल मिटकरींनी सुनावलं; म्हणाले..


Akola News अकोलाराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar) नव्या तुतारी चिन्हाचं लोकार्पण करण्यात आलं. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावरच्या सदरेवर हा सोहळा संपन्न झाला. मात्र, या तुतारीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. आमदार मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना थेट चॅलेंज देत, त्यांनी तुतारी वाजवून दाखवावी आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जावं, असे मिटकरी म्हणाले होते. मिटकरींनी दिलेले चॅलेंज आव्हाडांना स्वीकारले आणि ते चॅलेंज पूर्ण देखील केले. मात्र त्यातही मिटकरींनी चूक दाखवली आणि ही चूक दाखवताना ते स्वत:च चुकले असल्याचे समोर आले.

जितेंद्र आव्हाडांसाठी लिहिलेल्या धनादेशावर मिटकरी यांनी चेकवरील नावाच्या रकाण्यात नाव, तर नावाच्या रकाण्यात रक्कम लिहिल्याची चूक घडली होती. यावरून ट्रोलर्सनी अमोल मिटकरी यांना चांगलेच ट्रोल केल्याचे बघायला मिळाले. यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी अशा ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहे. सोबतच त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

मी आव्हांडासारखे रोज चेक घेत नाही – अमोल मिटकरी

यावेळी ते म्हणाले,  मी गरीब कुटुंबातील माणूस आहे. मला चेक लिहण्याची फार सवय नाही. शिवाय आपण आव्हांडासारखे रोज चेक घेत नसल्याने आपल्याला ती सवय नाही.आता रिकाम्या ट्रोलर्सना काही कामधंदा राहिलेला नसल्याचे देखील मिटकरी म्हणालेय. पुढे बोलतांना ते म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना दिलेले चॅलेंज त्यांनी पूर्ण केलेले नाही. ते फक्त तुतारी वाजविण्याचं नाटक करत होते. तुतारी वाजवितांना पोट आतमध्ये जात असतं, मात्र आव्हाडांचे पोट बाहेर होतं. तो आवाज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुतारीचा नसून मागच्या तुतारी वादकांचा असल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी हा दावा फेटाळून लावत परत एक नवे आव्हान दिले आहे.  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 तारखेपासून मुंबईत विधान भवनात पार पडत आहे. त्यांनी पहिल्या दिवशी स्वतः तुतारी आणावी. पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांकडून, ज्याला अजित पवार यांनी 50 हजार रुपये महिन्यावर ठेवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा”, असं अमोल मिटकरी यांनी परत जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले आहे.

जेवढं तुमचे आयुष्य, तेवढा पवार साहेबांचा राजकीय अनुभव

दरम्यान, तुतारी चिन्हावरून शरद पवारांवर अश्लाघ्य शब्दात टीका करणाऱ्या सदाभाऊ खोतांनाही मिटकरींनी सुनावलंय. खोतांनी तोंडाला आवर घालावा, असा सल्ला त्यांनी दिलाय.  सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य माणुसकीला शोभणारे नाही. पवार साहेब हे देशाचे आणि राज्याचे फार मोठे नेते आहेत. जरी साहेबांसोबत आज आम्ही नाही, पण साहेब आमच्या हृदयात आजही आहे. तुमचे आयुष्य जेवढं आहे तेवढा  पवार साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे बोलतांना जरा मर्यादा राखली पाहिजेल, असा सल्ला देखील अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडूनी वाजवला ढोल… गावकऱ्यांचा आणि ढोल पथकाचा आनंद केला द्विगुणीत

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडूनी वाजवला ढोल… गावकऱ्यांचा आणि ढोल पथकाचा आनंद केला द्विगुणीत



<div class="short-video-container style-scope ytd-reel-video-renderer">
<div class="player-wrapper style-scope ytd-reel-video-renderer">
<div id="player-container" class="player-container style-scope ytd-reel-video-renderer">
<div id="container" class="style-scope ytd-player">
<div id="shorts-player" class="html5-video-player ytp-hide-controls ytp-exp-bottom-control-flexbox ytp-modern-caption ytp-exp-ppp-update ytp-bigboards ytp-hide-info-bar ytp-small-mode ytp-fit-cover-video paused-mode" tabindex="-1" data-version="/s/player/3ffefd71/player_ias.vflset/en_US/base.js" aria-label="YouTube Video Player">
<div id="ytp-caption-window-container" class="ytp-caption-window-container" data-layer="4">आमदार बच्चू कडूनी वाजवला ढोल… गावकऱ्यांचा आणि ढोल पथकाचा आनंद केला द्विगुणीत.</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>



Source link

भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले, बच्चू कडूंनी खदखद बोलून दाखवली

भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले, बच्चू कडूंनी खदखद बोलून दाखवली


Bachchu Kadu on BJP : भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) यवतमाळ येथे केलं होतं. दरम्यान, आता जानकर (Mahadev Jankar) यांच्या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही समर्थन केलंय. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन् काम झालं की सोडून द्यायचं, अशी असल्याचा टोला कडूंनी लगावलाय. शिवाय, भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरेंपेक्षा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे चांगले असल्याचेही बच्चू कडू (Bachchu Kadu ) म्हणाले. ते अकोला (Akola) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम 

बच्चू कडू म्हणाले, अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम आहे. पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय आहे. नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्तेचं निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे,आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन काम झालं की सोडून द्यायचं अशी आहे.  

महादेव जानकर काय म्हणाले होते?

भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा वापर करून फेकून देतो, असा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. त्यानंतर असाच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला होता. भाजप (BJP) छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचं जानकर म्हणाले होते. दरम्यान, असेच आरोप आमदार बच्चू कडू यांनी केले आहेत. दरम्यान, भाजपवर आरोप केले असले तरी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.  

शिवरायांच्या पुतळ्यावरुन राणा आणि बच्चू कडूंमध्ये वाद 

शिवरायांचा पुतळा बसवताना आमदार रवी राणा यांनी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरुन अमरावातीत राजकारण चांगलंच तापलं होतं.  या प्रकरणी बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. आपण मंदिर तयार करताना कुणाची परवानगी न घेता बांधतो, तर मग शिवरायांचा पुतळा विना परवानगी बसविणे त्यात काय नवल आहे. मात्र हे करत असताना शिवरायांच्या नावाने कुणी राजकारण करू नये, असा टोला आमदार बच्चू कडू यांनी राणा यांना लगावला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp