राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या, पण कोणत्या विभागात किती नोंदी; पाहा संपूर्ण आकडेवारी

राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या, पण कोणत्या विभागात किती नोंदी; पाहा संपूर्ण आकडेवारी


छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनानंतर सरकारने शिंदे समितीची नियुक्ती केली. त्यामुळे राज्यात तब्बल 57 लाख मराठा कुणबी नोंदी (Maratha Kunbi Records) आढळून आल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, आता कोणत्या विभागात किती नोंदी मिळाल्या याची देखील आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कुणबी नोंदी विदर्भात सापडल्या असून, अमरावती (Amravati) आणि नागपुरात (Nagpur) एकूण 35 लाख 57 हजार 435 नोंदी सापडल्या आहेत. ‘लोकमत’ने ही आकडेवारी दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी सापडल्या असून, 38 लाख 97 हजार 391 प्रमाणपत्र वाटण्यात आली आहे. विशेष म्हणजे कमी नोंदी मराठवाड्यात सापडल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत एकूण 32 हजार 91 नोंदी सापडल्या असून, 23 हजार 290 प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही गावांमध्ये एकही नोंद सापडलेली नाही. दुसरीकडे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात मात्र मराठा कुणबी नोंदी सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. 

कुठे किती नोंदी सापडल्या…

कोकण : 7 लाख 53 हजार 56 नोंदी सापडल्या. 
पुणे : 6 लाख 7 हजार 619 नोंदी सापडल्या.
नाशिक : 7 लाख 91 हजार 40 नोंदी सापडल्या.
छत्रपती संभाजीनगर : 32 हजार 91 नोंदी सापडल्या.
अमरावती : 26 लाख 15 हजार 227 नोंदी सापडल्या.
नागपूर : 9 लाख 42 208 नोंदी सापडल्या.

मराठवाड्यात किती नोंदी सापडल्या? 

छत्रपती संभाजीनगर : 3 हजार 482
जालना : 2 हजार 802
परभणी : 2 हजार 477
हिंगोली : 316
धाराशिव : 3 हजार 309
लातूर : 310
बीड : 9 हजार 752
नांदेड :  1 हजार 728

नांदेड जिल्ह्यातील 600 लोकांना प्रमाणपत्र वाटप…

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मराठा समाजाला कुणबी नोंदीचा फायदा होतांना पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये सहाशे जणांना याचा लाभ झालाय. शासनाच्या सुधारित आदेशानंतर सहाशे जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात कुणबी जातीच्या 1 हजार 728 नोंदी सापडल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितलय. सोबतच मागसवर्ग आयोगाच्या वतीने सुरु असलेलं सर्वेक्षण पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

धक्कादायक! मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी चक्क खाजगी व्यक्तींची नियुक्ती; ऑडिओ क्लिप व्हायरल

अधिक पाहा..



Source link

गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा बाबा निघाला बलात्कारी; गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गुरुदास बाबा फरार

गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणारा बाबा निघाला बलात्कारी; गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू गुरुदास बाबा फरार


Crime News :  भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून लैंगिक शोषण करणाऱ्या अध्यात्मिक गुरुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतील जिल्ह्यातील (Amravati) तिवसा (Tivsa) तालुक्यात ही घटना घडली. मार्डी येथील आश्रमातील भोंदु गुरुदास बाबा (Gurudas Baba) उर्फ सुनील कावलकर (Sunil Kavalkar) विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू बाबा फरार झाला आहे. तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा प्रसिद्ध झाला होता.

नेमकं काय झालं?

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील गुरुदासबाबा म्हणून ओळख असलेला भोंदूबाबा सुनील जानराव कावलकर याचा आश्रम आहे. आपल्या समस्या सोडूवून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदासबाबांच्या आश्रमात येते. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा या अपेक्षेने समाधान शोधत होती. हा गुरुदासबाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो हेच तीला सांगण्यात आले होते. मार्च 2023 दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी येथे गुरुदासबाबाच्या आश्रमात आली.तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली.

दरम्यान गुरुदासबाबा ने तीच्या भावनांचा फायदा घेऊन तुझा पती सुधारला तर ठीक अन्यथा मीच तुझ्याही लग्न करणार असे सांगून खाण्यात अंगारा सारखे देऊन जवळपास तीन महिन्यापर्यंत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान एक दिवस या दुराचारी बाबाचा मोबाईल फोन तिच्या हाती लागला. आता त्या फोनमध्ये तिच्यावरील अत्याचारची चित्रफीत त्याने बनवलेली असल्याचे तिचे म्हणणे आहे. घडलेला प्रकार लक्षात आल्याने भीतीपोटी काहीही न बोलत तीने मी आश्रमात राहणार नाही असे सांगीतल्या नंतर गुरुदासबाबाने 2 जानेवारीला पिडीतीला नागपूरपर्यंत नेऊन सोडले. मे 2023 पासून 2 जानेवारी 2024 पर्यंत ती आश्रमात होती.या दरम्यान तिचे कुटुंबात काहीच चांगले झाले नाही. त्यामुळे तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गुरुदासबाबा याला फोन केला आणि विचारणा केली असता गुरुदासबाबाने तिलाच धमकावले. यावरून पीडित महिलेने कुन्हा पोलिस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या बाबीची जबानी दिल्यावरून कुन्हा पोलिस स्टेशनमध्ये भोंदू गुरुदासबाब उर्फ सुनील जानराव कावलकर (वय 47) यावर अत्याचार, धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुदासबाब हा फरार असून त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडितेने भोंदू बाबा विरोधात अमरावतीतील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी भोंदू बाबा आश्रमातून फरार झाला आहे. फरार भोंदू बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. 

तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीत एका महाराजाला अटक 

वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत (Devachi Alandi Pune) घडली आहे. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं वारकरी सांप्रदयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या महाराजावर आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (52 वर्षे) असं या नराधम महाराजाचे नाव आहे. 

दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो. साधारण सत्तर विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचं धडे घेतात. पण दिवाळीनंतर दासोपंत बिथरले, सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. मग त्यानंतर दासोपंत महाराजांमधील हैवान जागा झाला. तीन विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिले. कोणाला सांगितल्यास बरं वाईट होईल असं त्यानं धमकावले होते. 

अधिक पाहा..



Source link

ज्याचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजारच्यांनी नाही, नवनीत राणा यांचा टोला, तर लोकसभेच इलेक्शन आहे म्हणून… यशोमती ठाकूरांचा घणाघात

ज्याचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजारच्यांनी नाही, नवनीत राणा यांचा टोला, तर लोकसभेच इलेक्शन आहे म्हणून… यशोमती ठाकूरांचा घणाघात


 अमरावती : ‘ज्याचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजारच्यांनी नाही’, अशी टीका नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली. तर लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून हिरॉईन मटकून राहिली, असा घणाघात यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नवनीत राणांवर केलाय.  विकास कामाच्या मुद्द्यावरुन अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुकलेश्वर ते म्हेसपुर रस्त्याचे भूमिपूजन दोन दिवस अगोदर रात्रीच्या वेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. मात्र याच रस्त्याचे भूमिपूजन  खासदार नवनीत राणा  यांनी देखील केले. 

 अर्थसंकल्प 2022 -23 अंतर्गत या रस्त्याचे काम करत असल्याचा आशय खासदार नवनीत राणा यांच्या भूमिपूजनेच्या फलकावर आहे. तसेच  2023 -24 अर्थ संकल्पाअंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा उल्लेख यशोमती ठाकूर यांच्या भूमिपूजनाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. तसेच यावेळी या दोघींनी भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या वेळी एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. 

नवनीत राणांनी काय म्हटलं?

नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधत टीका केली. त्यांनी म्हटलं की, ज्याचं लेकरु त्यांनीच बारसं करावं,  करावं शेजारच्यांनी नाही. नणंदबाई आहे त्यांना झेलावच लागतं, असा टोला देखील नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला. यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यामध्ये अनेकदा अनेक मुद्द्यांवर घमासान होत असल्याचं पाहायला मिळातं. यावेळी देखील रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरुन ही लढाई झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीमधील दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळाला. 

यशोमती ठाकूरांचा पलटवार

खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी देखील प्रत्यु्त्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुका आल्या आहेत, त्यामुळे हिरोइन मटकून राहिली, गोरी आहे चांगला डान्स करते पण काम नाही असा जोरदार टोला यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा लगावला.

अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Lok Sabha Constituency) सध्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांचा बोलबाला आहे. खासदार नवनीत राणा ह्या 2019 मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. पण त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय चित्र पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही बातमी वाचा : 

Bacchu Kadu : आमची पार्टी जरी दोन आमदारांची, तरी मी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा; बच्चू कडूंची तुफान फटकेबाजी

अधिक पाहा..



Source link

देवनानी ने दिया सदन की बैठकें बढ़ाने पर जोर: 84वें पीठासीन अधिकारी सम्मेलन में बोले-समितियों का गठन योग्यता के आधार पर हो

देवनानी ने दिया सदन की बैठकें बढ़ाने पर जोर: 84वें पीठासीन अधिकारी सम्मेलन में बोले-समितियों का गठन योग्यता के आधार पर हो


जयपुर16 घंटे पहले

  • कॉपी लिंक

राजस्थान विधानसभा के अध्यक्ष वासुदेव देवनानी ने सदन की बैठकें बढ़ाने पर जोर दिया। देवनानी आज मुम्बई में महाराष्ट्र विधानभवन में चल रहे 84 वें पीठासीन अधिकारी सम्मेलन को संबोधित कर रहे थे। उन्होंने कहा कि सदन की घटती बैठकों के कारण सदन में सभी विषयों पर विस्तृत चर्चा नहीं हो पाती है।

अतः संविधान की भावना के अनुसार कार्यपालिका के विधायिका के



Source link

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताने आंदोलन मंडपातच उचललं टोकाचं पाऊल, शासनाला ठरवलं जबाबदार

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्ताने आंदोलन मंडपातच उचललं टोकाचं पाऊल, शासनाला ठरवलं जबाबदार


Amravati News अमरावती : अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांची दखल न घेतल्याने एका आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. अमरावतीच्या(Amravati) मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मंडपातच एका प्रकल्पग्रस्ताने आत्महत्या केली आहे.

गोपाल दहिवडे असे या आत्महत्या करणाऱ्या आंदोलक प्रकल्पग्रस्ताचे नाव असून ते मूळचे टाकरखेड येथील रहिवासी आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोर्शी तहसील कार्यालयासमोर 252 दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखल देखील न घेतल्याने गोपाल दहिवडे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. यावेळी त्यांनी चिठ्ठी लिहून आपल्या मृत्यूमागे शासन जवाबदार असल्याचे म्हटले आहे. 

मागण्यांची पूर्तता न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल 

अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत. त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे. या सर्व शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्याची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात 252 दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

मात्र या आंदोलनाची साधी दखल देखील न घेतल्याच्या कारणातून टाकरखेड येथील रहिवासी असलेल्या गोपाल दहिवडे यांनी आंदोलनाच्या मंडपात पंख्यावर दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आंदोलनकर्त्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

माझ्या आत्महत्येला शासन जबाबदार

मृत आंदोलक गोपाल दहिवडे यांनी चिठ्ठी लिहून आपल्या मृत्यू मागे शासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठी मध्ये लिहलं की, माझ्या मरणाला शासन, प्रशासन जबाबदार आहे. परंतु उमेशभाऊ चळवळ बंद करायची नाही.  माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेवू देऊ नये. सरकार बेकार आहे,  न्याय मागा, असे मजकूर असलेल्या चिठ्ठ्या मृत आंदोलक गोपाल दहिवडे यांच्या गळ्यात आढळून आल्या आहे. या घटनेनंतर अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर रास्तारोको करत आंदोलन सुरू केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

कला शिक्षकाने खडूने रेखाटले अप्रतिम चित्र; प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या कलेतून शुभेच्छा

कला शिक्षकाने खडूने रेखाटले अप्रतिम चित्र; प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या कलेतून शुभेच्छा



Amravati News: कला शिक्षकाने खडूने रेखाटले अप्रतिम चित्र; प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या कलेतून शुभेच्छा



Source link

YouTube
Instagram
WhatsApp