अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर; सरकारचा

अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर; सरकारचा


अकोला: अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिराला काल 25 जूनला राज्य शासनाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर केला आहे. मात्र यावरून अकोल्यात आता भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. सरकारचा निर्णयानंतर दोन्ही पक्षांनी मंदिरात जात राजराजेश्वराची महाआरती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष श्रेयासाठी समोरासमोर उभे ठाकले आहेत.
 
अकोल्यात देवाच्या मंदिरात श्रेय्याचा राजकीय घंटानाद सुरू झालाय आणि अकोल्यात भाजप आणि काँग्रेस राजकीय श्रेयासाठी समोरासमोर आले ते शहराचं ग्रामदैवत राजेश्वराच्या मंदिरात…याला निमित्त ठरलंय अकोल्याचा ग्रामदैवत असलेल्या राज राजेश्वर मंदिराला राज्य सरकारने दिलेल्या तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जाचं…राज्याच्या नगर विकास विभागाने काल 25 जुनला हा आदेश जारी केलाय. अन् या आदेशानंतर अकोल्यात सुरू झालाय राजकीय श्रेयाचा आटापिटा…. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनंतर अकोला पश्चिम मतदार संघात भाजपला पराभूत करत काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झालेत. त्यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा देण्याची मागणी केली होतीय.‌ आज सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी मंदिरात जात राजेश्वराचं दर्शन घेतलंय. हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

राज्य शासनाकडून एखाद्या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याठिकाणी सरकारकडून मिळणाऱ्या प्रमुख सुविधा :

– विकास आराखड्यानुसार विशिष्ट निधी मंजूर केला जातो.
– राज्याच्या धार्मिक पर्यटन योजनांतून रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, सौरऊर्जा, डिजिटल सुविधा यासाठी अनुदान.
– मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण / सिमेंटकरण.
– भाविकांसाठी शौचालये, स्नानगृहे, विश्रांतीगृहे (धर्मशाळा).
– पार्किंगची सोय, सुरक्षा बंधोबस्त, CCTV यंत्रणा.
– मंदीर परिसराचा सौंदर्यीकरण, उद्यान व फुलबागांची निर्मिती.
– मंदिरातील जत्रा, यात्रा, कीर्तन, भजन, उरूस यांना शासकीय पाठबळ.
– पर्यटन महोत्सव अथवा तीर्थस्थळ उत्सव आयोजित करण्यासाठी निधी.
– तीर्थस्थळाचा समावेश पर्यटन माहिती पुस्तिका, संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स मध्ये.

‘ब’ वर्ग म्हणजे काय?

‘ब’ वर्ग तीर्थस्थळ म्हणजे राज्यस्तरीय धार्मिक महत्त्व असलेले, भाविकांची मोठी गर्दी होणारे पण अजून ‘अ’ दर्जाच्या स्तरावर न गेलेले मंदिर. यांना विकासासाठी ‘अ’ इतकाच महत्त्वाचा दर्जा दिला जातो. या सुविधा स्थानिक देवस्थान ट्रस्ट, महापालिका/ग्रामपंचायत, आणि पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून अंमलात आणल्या जातात.

राजेश्वर मंदिरात भाजपने मंदिरात मोठा जल्लोष-

काल सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजेश्वर मंदिरात भाजपने मंदिरात मोठा जल्लोष करीत महाआरती केलीय. नुकतेच 11 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येऊन गेले होतेय. त्यावेळी भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी राजराजेश्वर मंदिराला 50 कोटींचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होतीय. नंतर 22 जूलै 2024 ला त्यांनी मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा देण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं होतंय. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचे श्रेय भाजपचंच असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. 

अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने चढाओढीचे राजकारण-

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर अकोल्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये सातत्याने चढाओढीचे राजकारण सुरू आहे. येऊ घातलेली महापालिका निवडणूक लक्षात घेऊन अकोल्यातील राजकारण पुढच्या काळात आणखी पैटणार असल्याचा ‘ट्रेलर’ सध्या यावरून पाहायला मिळतोय. मात्र श्रेयवादाच्या लढाईत गुंतलेली भाजप आणि काँग्रेस अकोलेकरांचं जगणं आणखी सुखकर व्हावं यासाठी एकत्र येतील का?, हाच खरा प्रश्न आहे.

आणखी वाचा



Source link

रुग्णवाहिकेला अडवून ड्रायव्हरला मारहाण, ॲम्बुलन्समधील जखमी रुग्ण दगावला; नातेवाईकांचा संताप

रुग्णवाहिकेला अडवून ड्रायव्हरला मारहाण, ॲम्बुलन्समधील जखमी रुग्ण दगावला; नातेवाईकांचा संताप


अकोला : कुठल्या कारणावरुन वादाला तोंड फुटेल आणि काय आक्रीत घडेल याचा नेम नसतो. अकोल्यातही अशीच एक चित्र-विचित्र घटना घडली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णावाहिकेकडून कुत्र्‍याचा जीव गेला अन् सगळा गोंधळ उडाला. जखमी कामगार मजुराला ॲम्बुलन्सने अकोल्यात (Akola) घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स (Ambulance) चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेच्या चालकास मारहाण करण्यात आल्याने विलंब होऊन रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली असून या घटनेनंतर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून (Police) शोध घेतला जात आहे. मात्र, या कुत्रामालकामुळेच रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याच आरोपी नातेवाईकांनी करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

दहीहंडा फाट्यावरुन अकोल्याकडे निघालेल्या ॲम्बुलन्सने चोहोट्टा बाजार येथे एक कुत्रा मरण पावला. त्यामुळे, जखमी कुत्र्याच्या मालकाने ॲम्बुलन्स चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली. ॲम्बुलन्सचा पाठलाग करून दहीहंडा फाट्यावर ॲम्बुलन्स चालकाला पकडत कुत्रा मालाकाने जबर मारहाण केली. त्यामुळे, बराच वेळ रुग्णावाहिका घटनास्थळी थांबून राहिली, याशिवाय रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला, या दोन्हीमध्ये ॲम्बुलन्स चालकाचा मोठा वेळ गेला आणि रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव केला. जखमी कुत्र्याच्या मालकानेच ॲम्बुलन्स चालकाला ॲम्बुलन्स अकोल्याकडे घेऊन जाण्यासाठी अटकाव केला होता. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण केलेल्या व्यक्तीमुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा ॲम्बुलन्सचालक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. तसेच, कुत्र्याच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी देखील नातेवाईक आणि ॲम्बुलन्स चालकाने केली आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर ॲम्बुलन्सला अटकाव करणारा व्यक्ती जागेवरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. 

बीडमध्ये भरवस्तीत चोरांचा वावर

बीडच्या माजलगाव शहरातील बायपास रोडलगत असलेल्या छत्रपती नगर भागात रात्रीच्या वेळेला चोरांचा मुक्त वावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळेला चार ते पाच जणांचे टोळके गेल्या काही दिवसापासून छत्रपती नगर भागात फिरत असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे छत्रपती नगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार होण्याआधी या भागात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलीय.

हेही वाचा

95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ

आणखी वाचा



Source link

भाजपच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? बच्चू कडूंचा सवाल

भाजपच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? बच्चू कडूंचा सवाल


Bacchu Kadu : एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही? असा सवाल करत ही छुपी आणीबाणीच असल्याचे मत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले. ती आणीबीणीची फिजीकली तारीख होती, तुमची छुपी आणीबाणी असल्याचे कडू म्हणाले. ते आमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आणीबाणीचं (Emergency)  समर्थन आम्ही करत नाही. पण ज्यांनी आणीबीणीवर लेख लिहला त्यांना मला सांगायचं आहे की, सौ चुहे खाके बिल्ली हजको जाती है तो ये गलत है असे म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत

भाजपला आणीबाणीवर बोलायचा कोणताही अधिकार नाही. तो त्यांनी गमावला आहे. भाजपची आणीबाणी छुपी आहे, ती निषेधार्ह असल्याचे कडू म्हणाले. तसेच एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही? असा सवाल करत कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का असेही कडू म्हणाले. 

4 हजाराचं ताट आमदार आणि खासदार समोर मांडताना बजेट दिसत नाही का? 

विधवा महिलांना पैसे नाही, दिव्यांगाने पगार नाही, एमआरजीचे पैसे नाहीत, कर्जमाफी म्हणताना तिजोरी दाखवता असेही कडू म्हणाले. पण 4 हजाराचं ताट आमदार आणि खासदार समोर मांडताना तेव्हा तुम्हाला बजेटचा आकडा दिसत नाही का? असा सवाल देखील बच्चू कडू यांनी केला. भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळीवर ताव मारणारी माणसं ही प्रवृत्ती रावणाची प्रवृत्ती आहे. एकीकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे. रोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आणि आमचे आमदार खासदार तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात चार चार हजाराचं जेवण  खातात असे कडू म्हणाले. सत्ताधाऱ्यांना मतदाराचे भय राहले नाही का? पाच वर्षे नंगानाच केला तरी वेळेवर धर्मावर मत मिळते ही मानसिकता असल्याची टीका बच्चू कडू यांनी अमरावतीत केली. कृषिमंत्र्यावरच 13 कोटी रुपये कर्ज आहे त्यांचीच मूळ त्यांची बँक तोट्यात आहे. कोकाटेंनी शेतकऱ्यांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये. त्यांनी कर्जमाफीसाठी भांडले पाहिजे नाहीतर आम्हाला पुन्हा तुम्हाला घेराव लागेल असा इशाराही कडू यांनी दिला. तसेच कोकाटे हे कर्जमाफीत बसणार नाहीत ते अपात्र आहेत असेही कडू म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

देशात ‘शैक्षणिक आणीबाणी’, एक परीक्षा नीट घेता येईना; घोळावरुन ठाकरे, पाटील, चतुर्वेदींचा संताप

आणखी वाचा



Source link

तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले, खरे रामाचे भक्त असाल तर…; बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’  

तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले, खरे रामाचे भक्त असाल तर…; बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’  


Bacchu Kadu अमरावती: भावना शून्य असलेले लोक सरकारमध्ये आहेत, त्यांना संवेदना नाहीत. आज राज्यात दर दिवशी दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. एमआरइजीएसच्या मजुरांची मजुरी अजून मिळाली नाही. एकीकडे पैसे नाही असं सांगायचं आणि आपल्या प्रदर्शनाची सामान्य माणसांना किती वेदना होत असेल याची कल्पनाही नाही. सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे. अशी बोचरी टीका  प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे. अंदाज समितीचा कार्यक्रम (Andaz Committee Controversy) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीची थाळीतून झाल्याचे समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.यावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.  ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.

दरम्यान, एखाद्या कसयाने रोज गाई-म्हशी कापायच्या आणि एकदा चारा खाऊ घालायचा याला काय अर्थ आहे? तुम्ही काय वेगळं करताय? रामाचे खरे भक्त असाल तर सांगा एकही ईडी चौकशी अजून भाजपच्या माणसावर का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. असेही बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले. 

….कारण माझ्या आडनावामागे कडू लागलंय

अनेकांना वाटत होतं का बच्चू कडूचं मन पदात आहे. पण ते चुकीच आहे. आमदारकी गेली म्हणजे किंवा अध्यक्ष पद गेलं म्हणजे बच्चू कडू थांबनार, अस नाही. एखादी आमची जेल वारी झाली तरी आम्हाला फरक पडत नाही. मात्र तानाशाही किती करावी याची काही हद्द आहे. अपात्र केलं यांची फाईल एक महिना कुठे दाना खात होती? अजूनही मला अपात्रतेची नोटीस मिळाली नाही. बच्चू कडूला बदनाम करण्याचा हा प्रयत्न करत आहे. भाजप मधील काही लोक आम्हाला बदनाम करत आहे. बँक तोट्यात अशी आमची बदनामी विरोधक करत आहे. संचालक यांनी देखील बँकेची बदनामी करू नये. तर मी फडणवीस यांना फोन करेल, कॉम्परमाईज होईल, असं अनेकांना वाटत होतं. पण असं होणार नाही. कारण माझ्या आडनावा मागे कडू लागलेलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

अकोल्यातल्या पातूरजवळ ऑटो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात;दोघांचा जागीच मृत्यू, तर 4 प्रवासी गंभीर 

अकोल्यातल्या पातूरजवळ ऑटो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात;दोघांचा जागीच मृत्यू, तर 4 प्रवासी गंभीर 


Akola Accident News : अकोल्यातल्या पातूरजवळ भीषण अपघाताची घटना घडलीय. यात ऑटो आणि ट्रकमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर 4 प्रवासी गंभीर जखमी (Accident News) असल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातल्या पातुर बाळापूर (Patur-Balapur) रस्त्यावरील बाभूळगावजवळ हा अपघात झालाय. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, ट्रकने ऑटोला जबर धडक दिल्याने या अपघातात ऑटो रिक्षामधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. दरम्यान, ट्रकचालक हा घटनास्थळावरुन फरार झाला असून बाळापूर पोलीस त्याचा शोध घेत अधिक तपास करीत आहे.

दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू, तर 4 प्रवासी गंभीर 

दरम्यान, ट्रकची धडक इतकी भीषण होती की ऑटो पलटी होऊन प्रवासी रस्त्यावर फेकल्या गेलेत. या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमावा लागलाय. प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं गेलंय. ऑटोमधील प्रवासी पियुष रविंद्र चतरकर (वय 13 रा.सिंधी कॅम्प,अकोला) आणि लिलाबाई ढोरे (वय 50 रा.लाखनवाडा) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे. तर सुरेंद्र चतरकर (वय 45), रविंद्र चतरकर (वय 52), रूपंचंद वाकोडे (वय 50), प्रमिलाबाई वाकोडे (वय 65) हे गंभीर जखमी झाले.

पुण्यात बस चालकाने प्रवाशाला केली मारहाण; मारहणीचा वीडियो व्हायरल 

पुण्यातील (Pune News) शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला.पुण्यात पीएमपीएमएलच्या मनपा ते तळेगाव ढमढेरे बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बस चालकाने शिक्रापूर चाकण चौकात बस थांबवून खाली उतरून प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. चालक हा बस चालवताना देखील अस्वस्थ असल्याचे काही प्रवाशांनी सांगितलं. या प्रकारामुळे पीएमपीएमएल चालकांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link

मुंबई-नागपूर लोहमार्गावरील रेल्वे रुळाच्या चाव्या निखळल्या; सिमेंटच्या पट्ट्यांनीही तडे, मोठा अपघात होण्याची भीती

मुंबई-नागपूर लोहमार्गावरील रेल्वे रुळाच्या चाव्या निखळल्या; सिमेंटच्या पट्ट्यांनीही तडे, मोठा अपघात होण्याची भीती



Akola News: मुंबई-नागपूर लोहमार्गावरील रेल्वे रुळाच्या चाव्या निखळल्या; सिमेंटच्या पट्ट्यांनीही तडे, मोठा अपघात होण्याची भीती



Source link