‘गदर-2’ के जीते बोले-सनी देओल स्क्रीन में हाइपर रहते हैं: मुस्कान ने कहा- फिल्म मिलने पर रोई; भास्कर ऑफिस पहुंचे स्टार ने शेयर किए कई किस्से

‘गदर-2’ के जीते बोले-सनी देओल स्क्रीन में हाइपर रहते हैं: मुस्कान ने कहा- फिल्म मिलने पर रोई; भास्कर ऑफिस पहुंचे स्टार ने शेयर किए कई किस्से


लखनऊ3 घंटे पहले

  • कॉपी लिंक

फिल्म गदर-2 बॉक्स ऑफिस पर गदर मचा रही है। सिर्फ 13 दिन में फिल्म ने 400 करोड़ से ज्यादा का कलेक्शन कर लिया। गुरुवार को फिल्म के एक्टर उत्कर्ष शर्मा (जीते) और सिमरत कौर (मुस्कान) दैनिक भास्कर के लखनऊ कार्यालय पहुंचे। यहां दोनों ने गदर-2 की जर्नी को शेयर किया। यही नहीं, दोनों फिल्म का टाइटल सॉन्ग उड़ जा काले कावा और चल तेरे इश्क में पड़ जाते हैं… खुद गाया और डांस भी किया। यही नहीं, उत्कर्ष ने फिल्म का फेमस डायलॉग ‘तेरे इतने चीखड़े करेगा.. को भी सुनाया।

एक्ट्रेस सिमरत कौर ने बताया, ”फिल्म जब मुझे मिली, तो तीन दिन तक केवल यह बात मां को पता थी। बहन को बताया, तो वह खुशी से उछल पड़ी। इसके बाद मुझे भी एहसास हुआ कि कितना बड़ा प्रोजेक्ट मिल गया। आधे घंटे तक खुशी के मारे बस रोती रही। उत्कर्ष शर्मा ने बताया कि गदर-2 हीट होने के बाद मेरे पास झोली भरके प्यार आया।”

सनी देओल की USP है कि वह हाइपर रहते हैं? इस पर उत्कर्ष शर्मा ने कहा कि सनी सर स्क्रीन पर जरूर हाइपर हैं। लेकिन, रियल लाइफ में वह बहुत ज्यादा शांत हैं। वह चाहते हैं कि फिल्म का जूनियर आर्टिस्ट भी छक्का मारे। उनके जैसा प्लेयर अगर टीम में रहे तो हर खिलाड़ी शतक लगाएगा। वह सेट पर बहुत ज्यादा मददगार हैं। वह टीम को साथ लेकर चलने में भरोसा रखते हैं।

चलिए, अब आपको बताते हैं कि एक्टर और एक्ट्रेस ने क्या कुछ कहा…

उत्कर्ष शर्मा ने दैनिक भास्कर से गदर-2 से जुड़ी हुई बहुत सारी बातें साझा कीं।

उत्कर्ष शर्मा ने दैनिक भास्कर से गदर-2 से जुड़ी हुई बहुत सारी बातें साझा कीं।

सवाल : सिंगल स्क्रीन को इस फिल्म ने नया जीवन दिया है?
जवाब :
सिंगल स्क्रीन देश की नब्ज है। देश की जान है। यहां सिनेमा अगर बढ़ा है, तो सिंगल स्क्रीन की वजह से बढ़ा है। हॉल के अंदर जो माहौल क्रिएट होता है। उस जज्बे के लिए हर डायरेक्टर और एक्टर काम करता है।

हालांकि, फिल्म बनाते वक्त कभी भी सिंगल स्क्रीन या मल्टी स्क्रीन दिमाग में नहीं रहता है। हम बस यह सोचते हैं कि हम देश की जनता के लिए काम कर रहे हैं। ऐसे में जब जनता की बात होती है, तो दर्शक वर्ग सिंगल स्क्रीन के पास है। गदर- 2 ने उनके अंदर देश भक्ति की भावना बढ़ा दी है।

सवाल : आपकी फिल्म ने 400 करोड़ कमा लिए हैं, आपको कुछ मिला?

जवाब : (ठहाके लगाकर दोनों हंसते हुए)…मेरे पास लोगों का झोली भरके प्यार आया है। उससे बढ़कर कुछ नहीं है। बारिश पैसे की होगी, अगर फिल्म का तूफान प्यार का होगा। मौसम प्यार का बनेगा, तो पैसे की बारिश होगी।

हालांकि, एक नए कलाकार के तौर पर हमारे लिए जनता का प्यार ज्यादा जरूरी था। दर्शकों की वजह से काफी प्यार मिला। दर्शकों के साथ मिलकर जो इतिहास रचा जाता है। वह सबसे ज्यादा मायने रखता है। एक बड़ी हिट से 10 फिल्मों को जीवन मिलता है।

उत्कर्ष शर्मा और सिमरत कौर ने 'चल फिर से बिखर जाते हैं' गाना गाकर सुनाया।

उत्कर्ष शर्मा और सिमरत कौर ने ‘चल फिर से बिखर जाते हैं’ गाना गाकर सुनाया।

सवाल : आप लोग यूपी में फिल्म इंडस्ट्री बनाने या यहां कुछ करने के बारे में क्यों नहीं सोचते?

जवाब : बिल्कुल सही कहा आपने…हमारे पिता जी का जन्म ही मथुरा में हुआ है। उनके अंदर रामायण, कृष्णा, महाभारत रमी हुई है। जैसे गदर-1 में राम और सीता की कहानी थी। इसमें अभिमन्यु और अर्जुन पर आधारित कहानी थी।

लखनऊ में फिल्म शूट का अनुभव बहुत अच्छा रहा। योगी सरकार ने काफी सहयोग किया। मुंबई में सड़क मिल पाना मुश्किल होता है। यूपी कला का राज्य है। हमने अपने नानी से बहुत कुछ सीखा यहां के कल्चर को लेकर। ऐसा मौका मिला, तो जरूर कुछ करना चाहेंगे।

सवाल : फिल्म का संगीत पुराना वाला ही है। आपको कौन सा गाना अच्छा लगा?

जवाब : उत्कर्ष हंसते हैं और माइक सिमरत को दे देते हैं। लेकिन, उन्होंने भी हंसते हुए उनसे ही गाने की बात की। अरिजीत सिंह का गाना आया है दिल झुम करके वह काफी पसंद किया जा रहा है। जहां हीरोइन के प्यार में मैं नौकर बनता हूं। उसके बाद गाना यह शौक और शराफ़त सुनाते हैं।

चलिए, अब सिमरत कौर से सवाल और जवाब आपको पढ़वाते हैं..

दोनों ने बताया कि फिल्म को दर्शकों का बहुत सारा प्यार मिला। हमें पैसों की ज्यादा उनके प्यार की कदर है।

दोनों ने बताया कि फिल्म को दर्शकों का बहुत सारा प्यार मिला। हमें पैसों की ज्यादा उनके प्यार की कदर है।

सवाल : आपका जब गदर-2 के लिए चुनाव हुआ, तो उस समय आपके भाव क्या थे?

जवाब : (हंसते हुए )…दो महीने तक फिल्म का ऑडिशन चला था। उसके बाद जब ऑफिस पहुंची, तब भी अफवाह फैली थी कि दूसरी लड़की का चयन हो गया है। उसके पास सीधे अनिल शर्मा के पास पहुंच गई। पूछा सर आप अब भी दूसरी लड़कियों से बात कर रहे हैं। निदेशक ने मुझे बुलाया। उसके बाद मिठाई मंगाई और कहा कि घर जाकर चैन से सो जाओ। घर पहुंचने तक मुझे भरोसा नहीं हो रहा था।

मां से कहा कि शायद मेरा चुनाव हो गया। वह बोल पड़ी शायद क्या होता है? या तो हुआ या नहीं हुआ। हमने बताया कि सर ने मिठाई खिलाई है और बताया कि जाकर चैन से सो जाओ। उसके बाद मां ने ऑफिस में फोन किया तो बताया गया कि चयन हो गया। तीन दिन बाद बहन को बताया वह बहुत खुश हुई। तब मुझे भी एहसास हुआ कि बड़ा काम हुआ है। उसके बाद खुशी के मारे करीब 30 मिनट तक रोती रही।

दैनिक भास्कर कार्यालय में दोनों लोग कैमरा मैन को पोज देते हुए।

दैनिक भास्कर कार्यालय में दोनों लोग कैमरा मैन को पोज देते हुए।

सवाल : गदर-1 में सनी पाकिस्तान जाते हैं और अमिषा को लाते हैं। इसमें भी आप वही काम कर रहे है?

जवाब : गदर-1 की कहानी आजादी के दौर की थी। जो सादगी वाला दौर था। ऐसे में सनी सर ने कुछ वैसा किया था, लेकिन इसमें दोनों कैरेक्टर अलग हैं। यह 70 के दशक का दौर है। राजेश खन्ना साहब वाला। ऐसे में क्लेवर है, दोनों कैरेक्टर भी इसमें उतने भोले नहीं हैं। फिल्म देखने के दौरान आपको लगा होगा।

खबरें और भी हैं…



Source link

Amravati  News:  अमरावतीत वाहन खरेदीत मोठी वाढ

Amravati News: अमरावतीत वाहन खरेदीत मोठी वाढ


अमरावती : घर तिथे वाहन ही शहरी भागात नव्याने अस्तित्वात येणारी ओळख तयार झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीमार्फत नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वाहन नोंदणी वरून दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीकर सार्वजनिक वाहतुकीऐवजी खाजगी वाहनांना पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनांच्या संख्येत कोणती वाहने अमरावतीकरांच्या (Amravati News) पसंतीस उतरली आहे जाणून घेऊ या.

वाहनाच्या संख्येत दोन लाखापेक्षा जास्त वाढ

कुटुंबाकडे आवश्यक गरज म्हणून वाहनाकडे पाहिले जात आहे. अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत खाजगी आणि व्यावसायिक वाहनाच्या संख्येत दोन लाखापेक्षा जास्त वाढ झालेली आहे. 2018 मध्ये वाहनाचा आकडा 7 लाख 3 हजार 464 होता तर 2023 च्या जून अखेर पर्यंत तो वाढून तब्बल 9 लाख 33 हजार 962 पर्यंत पोहचला आहे.  2018-19 ते जून 2023 अखेर 2 लाख 30 हजार 458  वाहनाची नव्याने पाच वर्षात भर पडलेली आहे.

पाच वर्षात या वाहनांची पडली भर (2018 ते जून 2023)

  • दुचाकी –   177975
  •  कार,जीप – 22678
  •  ऑटो रिक्षा –  4265
  •  मिनीबस-  96
  • स्कूल बस-  140
  •  ट्रक,लोरी-  2717
  •  तीन चाकी – चार चाकी-  3978
  • ट्रॅक्टर-   7578
  •  ट्रॉली – 1535
  • ॲम्बुलन्स –  103
  •  इ-रिक्षा (पब्लिक अँड गुड्स)-83
  • लक्झरी टुरिस्ट बस-61
  • टॅक्सी-61
  • इतर वाहने – 748

वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ

 2018 मध्ये अमरावती जिल्ह्यात 6 लाख 59 हजार 355 दुचाकी व इतर चार चाकी वाहने होती.2020 ते 2022 या दोन वर्षात वाहन खरेदी सर्वसाधारण असल्याचे दिसून येते. मात्र त्यानंतर वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अमरावती जिल्ह्यात जून 2023 अखेरपर्यंत एकूण 9 लाख 33 हजार 962 वाहने वाढली आहे.

वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत

अमरावतीकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर दिला आहे.  2022-23 या वर्षात दुचाकी 34 हजार 66, चरचाकी वाहने 5202 
वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.अमरावती शहरातील नागरिकांचा वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत आहे. अमरावती शहरातील वाहनांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. मग वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च अमरावतीकर करत आहेत. गेल्‍या काही वर्षात डिझेल, पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या इंधनाच्या दराने शंभरी गाठली आहे.

इतर महत्त्वांच्या बातम्या :                          

Thane News : ना लायसन्स, ना परवानगी; नो पार्किंगच्या गाड्या उचलणाऱ्या चालकांकडूनच नियमांची पायलमल्ली? ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस



Source link

Navneet Rana : खा. नवनीत राणांना धमकी देणारा तरूण गजाआड; अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

Navneet Rana : खा. नवनीत राणांना धमकी देणारा तरूण गजाआड; अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी


अमरावती: खासदार नवनीत  राणा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमरावतीच्या नेरपिंगळाई भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून श्याम तायवाडे असं त्याचं नाव आहे. या व्यक्तीने खासदार नवनीत राणा यांना सोमवारी धमकी देत शिवीगाळ केली होती. 

खासदार नवनीत राणा यांना गेल्या चार दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती आहे. सोमवारी सायंकाळी 4 वाजता श्याम तायवाडे या व्यक्तीने त्यांना कॉल करून अश्लील शिवीगाळ केली होती. आता त्याला राजापेठ पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. श्याम विठ्ठलराव तायवाडे (वय 35) असं या तरुणाचं नाव असून तो अमरावतीतील नेरपिंगळाई या ठिकाणी राहतोय. हा युवक मजुरी करणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

ताब्यात घेण्यात आलेला तरूण हा त्याच्या वडिलांच्या नावाने सिमकार्ड वापरत होता. आता त्याने खासदार नवनीत राणा यांना धमकी का दिली याचा तपास पोलिस करत आहेत. 

काय धमकी दिली होती? 

श्याम तायवाडे या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना कॉल करून धमकी दिली. त्यामध्ये त्याने तिवसामधून बोलत असल्याचं सांगितलं. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही असं त्याने म्हटलं. तसेच या तरूणाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढत शिवीगाळ केली. 

अशा माथेफिरू भामट्याला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला जेरबंद केलं. आता या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना धमकी का दिली याचा तपास पोलिस करत आहेत. 

खासदार नवनीत राणा या राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना 14 दिवस तुरुंगात रहावे लागले होते. त्यानंतरही त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. 

खोट्या जात प्रमाणपत्राचा वाद

खासदार नवनीत राणा यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला होता. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

ही बातमी वाचा: 



Source link

Amravati Talathi Exam : राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू ,  लाखो परिक्षार्थींचा खोळंबा

Amravati Talathi Exam : राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू , लाखो परिक्षार्थींचा खोळंबा



<p>राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला.&nbsp;<br />४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी एकूण १० लाख ४१ हजार अर्ज आलेत. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत व्हायला सुरुवात झालीय. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा होती. मात्र अजूनही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही.&nbsp;&nbsp;</p>



Source link

जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन

जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन


अमरावती : जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा, या मागणीसाठी अमरावती युवक काँग्रेसकडून (Amravati Yuvak Congress) आंदोलन करण्यात आलं. अमरावती विद्यापिठाने (Amravati University) एका जुन्या प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये सुरु केलेली शैक्षणिक वाटचालीमधील ही एक अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीत विशेष बाब म्हणून विद्यापिठाने फुल कॅरीऑनचा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. (Amravati Yuvak Congress Andolan)

अमरावती विद्यापिठासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन

ही वस्तुस्थिती लक्षात घेता, तसेच विद्यापिठाने (Sant Gadge Baba Amravati University) कॅरीऑन देण्याची परंपरा पाहता या वर्षी विशेष बाब म्हणून जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा, अशी अमरावती युवक काँग्रेसची मागणी आहे. यासोबतच, विद्यापिठाच्या या बाबतच्या होणाऱ्या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे यामध्ये काही अघटीत प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार राहील, असा इशारा अमरावतीयुवक काँग्रेसने (Yuvak Congress) दिला आहे. 

‘जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षामध्ये प्रवेश मिळावा’

शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये अंतिम वर्षाला फक्त सी.बी.सी.एस. प्रणालीचे (CBCS) विद्यार्थी प्रवेशित राहणार आहे आणि त्याप्रमाणे महाविद्यालयामध्ये शिक्षण दिले जाणार आहे. जुन्या अभ्यासक्रमाची बॅचला यावर्षी द्वितीय वर्ष पूर्ण करून अंतिम वर्षात प्रवेश मिळाला आहे. यामध्ये द्वितीय अथवा प्रथम वर्षाला अनुत्तीर्ण झालेले तसेच विद्यापिठाच्या नियमाप्रमाणे अंतिम वर्षाच्या प्रवेशाला पात्र न ठरलेले हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. 

विद्यापिठाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

यापैकी जे विद्यार्थी द्वितीय वर्षाची परीक्षा पास करुन पुढील वर्षी अंतिम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये येतील त्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. कारण पुढच्या वर्षी महाविद्यालयामध्ये फक्त सी.बी.सी.एस. प्रणालीचेच वर्ग उपलब्ध असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना या वर्षीच म्हणजे 2022 ते 2024 मध्येच अंतिम वर्षाला प्रवेश देऊन महाविद्यालयीन नियमित विद्यार्थी म्हणून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे. असे न केल्यास पुढील वर्षी महाविद्यालयामध्ये जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वर्ग सुरु ठेवणे विद्यापिठावर बंधनकारक राहणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



Source link

YouTube
Instagram
WhatsApp