लक्की पटियाल के 2 गुर्गे मुंबई से गिरफ्तार:  जालंधर काउंटर इंटेलिजेंस ने की कार्रवाई, पोजेवाल मर्डर केस में शामिल, अमेरिका बैठे कन्नू से कनेक्शन – Jalandhar News

लक्की पटियाल के 2 गुर्गे मुंबई से गिरफ्तार: जालंधर काउंटर इंटेलिजेंस ने की कार्रवाई, पोजेवाल मर्डर केस में शामिल, अमेरिका बैठे कन्नू से कनेक्शन – Jalandhar News


पंजाब पुलिस के काउंटर इंटेलिजेंस जालंधर ने एसबीएस नगर पुलिस के साथ संयुक्त अभियान चलाकर मुंबई से खालिस्तान समर्थक गैंगस्टर लक्की पटियाल के दो ऑपरेटिव्स को गिरफ्तार किया है। इस संबंध में पंजाब पुलिस के डीजीपी गौरव यादव ने जानकारी दी।

.

गिरफ्तार आरोपियों की पहचान करण रोर्माजारा और जसकरनदीप सिंह उर्फ कालू के रूप में हुई है। दोनों पर आरोप है कि इन्होंने हाल ही में एसबीएस नगर के पोजेवाल कस्बे में एक व्यक्ति की हत्या की थी।

अमेरिका में बैठे कन्नू से सीधा कनेक्शन जांच में खुलासा हुआ है कि इन दोनों आरोपियों ने यह हत्या अमेरिका में बैठे अपराधी जसकरण कन्नू के इशारे पर की। पुलिस के मुताबिक हाल की दुश्मनी के चलते इस वारदात को अंजाम दिया गया। गौरतलब है कि जसकरण कन्नू पंजाब के कुख्यात गैंगस्टर लक्की पटियाल का करीबी सहयोगी है।

पुलिस ने इस मामले में पोजेवाल नवांशहर थाने में भारतीय दंड संहिता (BNS) और आर्म्स एक्ट की विभिन्न धाराओं के तहत एफआईआर दर्ज कर ली है। गिरफ्तार आरोपियों से पूछताछ की जा रही है।

कौन है लक्की पटियाल, पढ़ें लक्की पटियाल पंजाब के सबसे खतरनाक गैंगस्टरों में गिना जाता है और वह दविंदर बंबीहा गैंग का अहम सदस्य है। इस गैंग का नाम पंजाब में कई हत्याओं, फिरौती और सुपारी किलिंग से जुड़ा रहा है। सूत्रों के मुताबिक, लक्की पटियाल इस समय यूरोप के आर्मेनिया में छिपा हुआ है और वहीं से गैंग की गतिविधियों को ऑपरेट करता है। उस पर पंजाब पुलिस और अन्य जांच एजेंसियों की कड़ी नजर है।



Source link

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकर म्हणाले…

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकर म्हणाले…


अकोला : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चांगलाच समाचार घेतला. पाशा पटेल यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं जानकर म्हणाले. ते अकोला जिल्ह्यातील सांगवामेळ येथे माध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला. सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही असंही पाशा पटेल म्हणाले. त्यावर माजी मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली.

सध्या शेतकरी वाईट परिस्थितीतून जात असताना पाशा पटेल यांच्यासारखे नेते असे बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकतात असा प्रश्न महादेव जानकर यांनी विचारला. प्रजा ज्यावेळी अडचणीत असते त्यावेळी राजाने त्यांना मदत करणे अपेक्षित असते. सरकारी पदावर असलेल्या माणसाने असं वक्तव्य करणे योग्य नाही असं महादेव जानकर म्हणाले.

अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील विविध गावांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर भेट दिली. तालुक्यातील सांगवामेळ, भटोरी, पारध, कौलखेड जहांगीर या गावांना त्यांनी भेटी दिल्यात. यावेळी जानकरांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत यावेळी त्यांनी फोनवरून जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची विनंती केली.

काय म्हणाले होते पाशा पटेल?

वर्षातले 365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले.

सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

अकोल्यात गाढवांचा पोळा! नखशिखांत सजलेल्या गाढवांनी वेधली साऱ्यांची नजर, 57 वर्षांची अनोखी परंपर

अकोल्यात गाढवांचा पोळा! नखशिखांत सजलेल्या गाढवांनी वेधली साऱ्यांची नजर, 57 वर्षांची अनोखी परंपर


Akola: वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या मानाने पोळा हा सण साजरा केला जातो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, महाराष्ट्रात एक आगळावेगळं ठिकाण आहे, जिथे बैल नाही, तर गाढवांचा पोळा साजरा होतो. गाढवांवरचं उपजीविकेचं ओझं वाहणारे लोक या मेहनती प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पोळा साजरा करतात. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात पार पडतो आणि सजलेल्या गाढवांच्या या जल्लोषाला नागरिकांचीही मोठी उपस्थिती लाभते. अकोटमधील कुंभार समाजानं गेल्या 57 वर्षांपासून ही परंपरा सुरू केलीये.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पोळ्यानंतरचा दिवस गाढवांचा असतो. गेल्या 57 वर्षांपासून कुंभार व भोई समाज ही आगळीवेगळी परंपरा जोपासत असून, यंदाही रामटेकपूरा भागात गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला. नखशिखांत नटलेले, सजलेले अन साज-श्रूंगारानं ‘हँडसम’ दिसत असलेले हे प्राणी आहेय तरी कोणते?… प्रश्न पडलाय ना… अहो ही गाढवं आहेयेत… ही सर्व गाढवं एका ठिकाणी जमलीयेत अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये…. पोळ्यासाठी… आज अकोटमधील रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा भरला होता

पोळ्यानंतरचा अनोखा जल्लोष

अकोटमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गाढवांचा पोळा भरतो. गावातील कुंभार समाजाने ही परंपरा सुरू केली असून, काल रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा उत्साहात साजरा झाला. रंगीत कागद, कपडे, फुले, हारांनी सजलेली गाढवं पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. बैलांच्या पोळ्यात जसा साज-श्रृंगार केला जातो, तसाच साज या मेहनती गाढवांनाही चढवण्यात आला. 

गाढवांवर उदरनिर्वाह, 57 वर्षांची परंपरा

अकोट शहरातील जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह या गाढवांवर चालतो. वर्षभर माती, दगड, वाळू आणि लाकूड वाहून नेण्याचं काम ही गाढवं करतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी मालक गाढवांची आरती करतात, त्यांना चांगलं खाऊ घालतात आणि या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. गेल्या 57 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, आजही ती तेवढ्याच श्रद्धेने साजरी होते. मालक आणि गाढवांमधील नातं केवळ श्रमाचं नाही, तर भावनिक आहे. “हे आमचं कुटुंबाचं सदस्य आहे, वर्षभर आमच्यासाठी राबतात, म्हणून आम्ही त्यांना मान देतो,” असं गाढव मालक चांगदेव चौरे यांनी सांगितलं. 

पोळ्यानिमित्त उचलला तब्बल 100 किलो दगड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाडळी येथे साजरा होणारा पोळा यावर्षीही चर्चेत राहिला. कारण इथे दरवर्षी पोळ्यानिमित्त एक आगळीवेगळी परंपरा पाळली जाते.पाडळी गावातील बुरा दिन बाबा दर्ग्याजवळ 100 किलो वजनाचा दगड ठेवलेला आहे. या दगडाला ‘शक्तीची कसोटी’ असे म्हटले जाते. परंपरेनुसार, पोळ्याच्या दिवशी 12 जण हा दगड केवळ बोटांच्या जोरावर उचलतात. प्रत्येक व्यक्ती फक्त एक बोट दगडाखाली लावतो आणि एकाच वेळी सर्वजण जोर देतात. आश्चर्य म्हणजे, नेमके 12 जण असतील तेव्हाच हा दगड जमिनीवरून उचलला जातो. बारापेक्षा एक जरी जास्त व्यक्ती झाली, तर दगड उचलता येत नाही, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये आहे.

आणखी वाचा



Source link

‘बिग बॉस’च्या नव्या सिझनमध्ये सहभागी व्हायला आवडेल; मात्र, आपल्या ‘बिग बॉस’ला विचारूनच निर्णय घ

‘बिग बॉस’च्या नव्या सिझनमध्ये सहभागी व्हायला आवडेल; मात्र, आपल्या ‘बिग बॉस’ला विचारूनच निर्णय घ


Amol Mitkari : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ते बिग बॉसच्या (Bigg Boss) नव्या ‘सीझन’ची. बिग बॉसच्या नव्या घरात कोण असेल?, यावरून आता तर्क वितर्कांना उधाण आलंय. यातच या संदर्भात ‘बिग बॉस’चे होस्ट असलेल्या महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोये. राजकीय नेत्यांमध्ये अमोल मिटकरींना (Amol Mitkari) ‘बिग बॉस’च्या नव्या घरात पाहायला आपल्याला आवडेल, असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं होतं. याच व्हिडिओसंदर्भात ‘एबीपी माझा’ने अमोल मिटकरी यांना बोलतं केलंय. त्यांनी महेश मांजरेकर यांच्या या ऑफर आणि सदिच्छांबद्दल त्यांचं आभार मानले.

आपल्या ‘बिग बॉस’ला विचारूनच निर्णय घेऊ – अमोल मिटकरी

आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ‘बिग बॉस’च्या घरात बोलविण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांनी मांजरेकरांचं आभार मानतांनाच हा आपला सन्मान असल्याचा म्हटलंय. मात्र, राज्यात सध्या निवडणूका आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे दिवस असल्यामुळे यासंदर्भात आपण याला वेळ देऊ शकत नसल्याचं मिटकरी म्हणालेय. मात्र, यासंदर्भात आपले बिग बॉस असलेल्या अजितदादांशी बोलूनच पुढचा कोणताही निर्णय घेणार असल्याचं मिटकरी म्हणालेत.

राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि सरकारचं आभार- अमोल मिटकरी

राज्य साहित्य व संस्कृती मंडळ प्रकाशित करत असलेल्या ‘संपूर्ण गडकरी खंड 1’ मधून राम गणेश गडकरी यांचे ‘राज्यसंन्यास’ नाटक वगळण्यात येणारेय. यासंदर्भात राज्य सरकारने आमदार अमोल मिटकरी यांनी नोंदवलेले आक्षेप राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पाठविले होते. या आक्षेपांवर मंडळाने एकमेताने शिक्कामोर्तब करीत ते खंडातून वगळण्याचा निर्णय घेतलाय. ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. यासंदर्भात विधिमंडळात हा प्रश्न मांडत पुरावे राज्य सरकारकडे सादर केले होते.

लवकरच सरकार आगामी ‘राम गणेश गडकरी 1’ मधून वगळण्याची अधिकृत घोषणा करणारे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि सरकारचं आभार मानले. सर्वात आधी हा विषय समोर आणणाऱ्या ‘एबीपी माझा’चं विशेष आभार यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी मानले. राज्य सरकार कोणत्याही महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार म्हणून मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना दिलाय.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा



Source link

 बैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरावला! अकोल्यात बैलांना नदीवर घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

 बैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरावला! अकोल्यात बैलांना नदीवर घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 


Akola News : अकोल्यातून (Akola) एक दु:खद बातमी समोर येत आहे. बैलपोळ्याचा आनंद क्षणात हिरवल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. बैलपोळ्याच्या अनुषंगाने बैलांना नदीत अंघोळीसाठी घेऊन गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या खोळद गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. शंतनू अविनाश मानकर असं या नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. 

अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोळद गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. घटनास्थळी भाजपचे आमदार हरीश पिंपळे आणि पोलीस दाखल झाले होते.  काटेपूर्णा येथील वीर भगतसिंग आपातकालीन शोध व बचाव पथकाकडून पेढी नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधार्थ शोध कार्य सुरु आहे.

नवनीत राणानी केली बैलजोडीची पूजा…

आज बैलपोळ्याचा सण आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील कष्ट, त्याग आणि निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचं प्रतीक म्हणजे बैलपोळा. हा दिवस बळीराजाच्या जगण्याला बळ देणाऱ्या बैलाच्या उपकारांची आठवण करुन देतो. सर्जा-राजाला सजवून, त्याचा सन्मान करुन शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील आपल्या फार्म हाऊसवर बैलजोडीची पारंपरिक पूजा करुन पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घातला. 

बैलावर लिहले सातबारा कोरा कोरा

बैल पोळ्याच्या सणात बैलावर सातबारा कोरा कोरा असे कर्जमाफीचे संदेश लिहण्यात आले आहेत. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या आवाहनाला अमरावती जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. वलगाव येथील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात साध्या पद्धतीने हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला. बैलांना कुठल्याही प्रकारे सजावट न करता कर्जमाफीचा संदेश बैलाच्या पाठीवर लिहण्यात आला होता. 

यंदा बैल पोळा आज म्हणजेच शनिवारी, 22 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जात आहे.  बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्रावण महिना समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा आणि काही दक्षिणेकडील भागात साजरा होतो. याला “पिठोरी अमावस्या” किंवा “पोल्या” असेही म्हणतात. 

महत्वाच्या बातम्या:

Bail Pola 2025: आज बैलपोळा, पिठोरी अमावस्या! का साजरा करतात? पौराणिक कारण, महत्त्व, उपाय सविस्तर जाणून घ्या

आणखी वाचा



Source link

मिस्टर रोहित पवार, सुनेत्रा पवारांच्या बैठकीवर टीका करताच राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे संताप

मिस्टर रोहित पवार, सुनेत्रा पवारांच्या बैठकीवर टीका करताच राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे संताप


Rupali Patil Thombre on Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar)  यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार रोहित पवारांना राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चांगलं सुनावलं आहे. सुनेत्रा पवार राणौत  यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी गेल्या होत्या. तिथे कुणाची बैठक होती हे त्यांना माहीत नव्हतं. मात्र, राष्ट्रवादीची कावीळ झालेल्या रोहित पवारांना सर्वच पिवळं दिसत असल्याचा टोला ठोंबरे यांनी लगावला. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

अजित पवार सत्तेत गेल्याची त्यांची कारणे वेगळी आहेत. पण तिथं गेल्यावर त्यांनी भाजपचे विचार स्वीकारले नसतील, म्हणून कदाचित त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला, कुठतरी एखादा फोटो येऊ द्या, म्हणजे संदेश जातो की हे सु्द्धा आता आरएसएसचे विचार स्वीकारायला लागले आहेत. एका बाजुला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला जात असाल, तर ही दुटप्पी भूमिका आहे , अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या कंगना रणौत यांच्या घरी भेट दिल्यानंतर टीका केली होती.

खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी 

खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली. महायुतीमध्ये असूनही अजित पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी महायुतीच्या सर्व सांसदांना हेडगेवार स्मारक येथे बौद्धिकाचे आमंत्रण असते. परंतु, अजित पवार आणि त्यांचे आमदार तिथे जात नाहीत. त्याचप्रमाणे दिल्लीतही अधिवेशनाच्या वेळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला अजित पवारांच्या पत्नी उपस्थित राहिल्या. भाजप खासदार कंगना राणौत यांनी या बैठकीचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये सुनेत्रा पवार यांच्या मागे भारतमातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचाही फोटो दिसत आहे. ही उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Sunetra Pawar RSS Meeting | सुनेत्रा पवार यांची राष्ट्रसेविका समिती बैठकीला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण!

 

 

आणखी वाचा



Source link