तहसीलदार राहुल पाटील यांचे निलंबन; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 


अमरावती: अमरावतीच्या (Amravati News) मोर्शीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. तर या संदर्भात भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.  

खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राहुल पाटील विरुद्ध जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. यात आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाज, गौण खनिजाच्या कामात अनियमितता केल्याची पाटील यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरुन राहुल पाटील यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार राहुल पाटील यांची आता विभागीय चौकशीही होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अमरावतीच्या मोर्शीचे तहसिलदार राहूल पाटील आपल्या पदावर कार्यरत असताना निवडणूक विषयक कामकाज करताना, नैसर्गीक आपत्ती, गौणखनिज उत्खनन-वाहतूक व शासनाच्या प्राधान्य क्रमातील विषयात अक्षम्य दिरंगाई केल्याचं राज्यपाल यांच्या आदेशात म्हटले आहे. तसेच कार्यालयीन शिस्त पाळत नसल्याचे, तसेच बेजबाबदार कारभारामुळे महसूल विभागाची व शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने राहुल पाटील यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने राहूल पाटील यांना निलंबित करणे आवश्यक असल्याचे ही त्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आदेश अंमलात असेपर्यंत राहूल पाटील यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. तसेच  निलंबनाच्या कालावधीत तहसिलदार राहूल पाटील यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल. शिवाय निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील. असेही या शासन आदेशात म्हटले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

राज्यातील उर्दू शाळांमध्ये चार ते पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार, प्यारे खान यांचा आरोप


अकोला : राज्य सरकारकडून अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. दरम्यान, प्यारे खान यांनी केलेल्या आरोपानंतर अकोला पोलिसांनी उर्दू शाळेचा संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत असल्याचाही गंभीर आरोप प्यारे खान यांनी केला. पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. उर्दू शाळेत होत असलेल्या या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

संस्थाचालकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या अकोला दौऱ्यानंतर अकोला पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं. पातुर येथील काँग्रेस नेते आणि संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन सय्यद इस्माईल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 75, 308 (2) आणि 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद कमरोद्दिन अध्यक्ष असलेल्या पातूरच्या किल्ला भाग प्राथमिक शाळेतील शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याने शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार आहे. 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळेला भेट दिली. खान यांच्या भेटीत शाळेतील अनेक महिला शिक्षकांनी कमरोद्दिन याच्या अत्याचाराचा पाढा वाचला. महिला शिक्षिकांचा मानसिक शारीरिक आणि लैंगिक छळ करण्याच्या अनेक तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी  कारवाई करत गुन्हा दाखल केला. 

कमरोद्दीन याच्या संस्थेच्या जिल्ह्यात एकूण 22 उर्दू शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कमरोद्दीन शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांवर विविध अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

प्यारे खान यांचा आरोप काय? 

– राज्यातील सरकारचे अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार.
– या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत आहे.
– राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत आहेत.
– पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार.
– निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरण्यात आला.
– या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नाही.
– राज्यात बटेंगे तो कटेंगे, व्होट जिहादसारख्या मुद्दांपेक्षा इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत.‌ अशी भूमिका मांडणाऱ्यांची तक्रार करू.
– नितेश राणेंच्या विषयावर आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. 
– मुस्लिमांविरुद्ध भूमिका सरकारची नाही आणि ते‌ कुणीही सहन करणार नाही.

 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

मुलाचा सिबिल स्कोअर कमी आल्यानं अकोल्यात लग्नं मोडल्याचं प्रकरण, समोर आलं खरं कारण, ‘ABP माझा’च


Akola: ‘सिबिल’ खराब असल्यामुळे अनेकांचं घराचं स्वप्नं तुटल्याचं तुम्ही अनेकांनी पाहिलं आणि ऐकलं असेल. मात्र, ‘सिबिल’मुळे लग्न तुटल्याची एक बातमी सध्या समाज माध्यमांवर अक्षरशः धुमाकूळ घालतेय.‌अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण? खरंच ‘सिबिल’मुळे एका तरुणाचं लग्न तुटलं आहे का? पाहूयात, ‘एबीपी माझा’चा रियालिटी चेक. (Akola)

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरच्या एका बातमीचा सध्या सर्वच प्रकारच्या सोशल माध्यमांवर धुमाकूळ सुरू आहेय. ही बातमी आहे ‘सिबिल’मुळे लग्न तुटल्याची खरंच ही बातमी सत्य आहे का? नेमकं काय घडलं मुर्तीजापुरमध्ये? याचा आढावा ‘माझा’ने घेतला. यात मुर्तिजापूरमध्ये एक नव्हे तर दोन तरुणांचा विवाह ‘सिबील’ कमी असल्याने मोडल्याचं समोर आलंय. मात्र, दोन्ही कुटूंब समोर यायला तयार नाहीये. स्थानिकांनी सिबिल खराब असल्यानं लग्न तुटल्याची घटना खरी असल्याचं सांगितलंय. (Cibil Score)

“हो, घटना खरी आहे!” स्थानिकांचा दावा

‘ABP माझा’ने स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांशी तसेच  दोन्ही तरुणांच्या घरच्यांशी याप्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी  संवाद साधला. यावेळी वकील राधिका काळे यांनी अशा घटनांचा उल्लेख केला. तसेच, नागरिक विष्णू लोडम आणि माधव पाटील यांनीही ही घटना खरी असल्याचे सांगितले.मात्र, समाजात बदनामी होईल, या भीतीने दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर काहीही बोलायला नकार दिलाय. मात्र, मूर्तीजापुरकर ही घटना झाल्याचं सत्य असल्याचं सांगतायेत.

विवाह इच्छुक तरुणांसाठी धोक्याची घंटा?

मुर्तीजापुरची घटना ही विवाह इच्छुक तरुणांसाठी धोक्याची घंटा असल्याचे समाजात काम करणाऱ्या लोकांना वाटतंय. आतापर्यंत घराच्या किंवा गाडीच्या कर्जासाठी ‘सिबिल’ महत्त्वाचा मानला जायचा. मात्र, आता विवाह जुळवतानासुद्धा ‘सिबिल स्कोअर’ तपासला जातोय का? हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. विवाह जुळवताना आता “घर आहे का?”, “नोकरी आहे का?” यासोबत “सिबिल स्कोअर चांगला आहे का?” हेही पाहिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे “लग्न करायचं असेल तर आधी सिबिल सुधरवा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे!

सध्या अनेक सामाजिक समस्यांमुळे अनेक तरुणांची लग्न होत नाहीयेत. घराच्या स्वप्नाच्या मार्गात अडसर बनत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला ‘सिबिल’ आता विवाह इच्छुक तरुणांच्याही मानगुटीवर बसतो की काय?, अशी परिस्थिती यामुळे निर्माण झालीये. त्यामुळे “लग्न करायचं असेल तर सिबिल सुधरव”, असं म्हणण्याची वेळ आता आलीये.

हेही पहा:

हेही वाचा:

स्क्वॉड आला रे… इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात

 

अधिक पाहा..



Source link

अलाहबादिया, समय रैना पर मुंबई में FIR, इंदौर में शिकायत: ऑल इंडियन सिने वर्कर्स एसोसिएशन ने कहा- ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो बैन हो, अमित शाह को लेटर लिखा


मुंबई2 दिन पहले

  • कॉपी लिंक

‘इंडियाज गॉट लेटेंट’ के समय रैना और यूट्यूबर रणवीर अलाहबादिया।- फाइल फोटो

‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो में पेरेंट्स पर भद्दे कमेंट्स के मामले में यूट्यूबर रणवीर अलाहबादिया और समय रैना के खिलाफ मुंबई में 2 दिन में दूसरी FIR दर्ज हुई। यह कार्रवाई महाराष्ट्र पुलिस की साइबर ब्रांच ने की है।

रणवीर और समय के अलावा इस शो के उन 30 गेस्ट के खिलाफ भी केस दर्ज हुआ है, जिन्होंने पहले एपिसोड से अब तक के शो में हिस्सा लिया था।

वहीं, ऑल इंडियन सिने वर्कर्स एसोसिएशन ने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो पर बैन के लिए गृहमंत्री अमित शाह को पत्र लिखा है। एसोसिएशन का कहना है कि इस तरह के शो देश के युवाओं को भ्रमित कर रहे हैं।

महिला आयोग ने भी अलाहबादिया, समय रैना और अन्य को समन भेजा है। सभी को 17 फरवरी को एनसीडब्ल्यू कार्यालय बुलाया गया है। इंदौर में भी रणवीर अलाहबादिया के खिलाफ शिकायत की गई है।

इस बीच, मुंबई के वर्सोवा में मंगलवार सुबह यूट्यूबर रणवीर अलाहबादिया के घर 5 पुलिस अफसरों की टीम पहुंची। मुंबई पुलिस ने 10 फरवरी को शो के होस्ट समय रैना, रणवीर अलाहबादिया और अपूर्वा मखीजा समेत शो के आयोजकों पर केस दर्ज किया था।

नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन (NHRC) की मांग पर यूट्यूब ने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ के विवादित एपिसोड को हटा लिया है।

मुंबई के वर्सोवा में मंगलवार सुबह यूट्यूबर रणवीर अलाहबादिया के घर 5 पुलिस अफसरों की टीम पहुंची।

मुंबई के वर्सोवा में मंगलवार सुबह यूट्यूबर रणवीर अलाहबादिया के घर 5 पुलिस अफसरों की टीम पहुंची।

पार्लियामेंट की IT कमेटी नोटिस भेज सकती है

समय रैना के यूट्यूब शो इंडियाज गॉट लेटेंट में पेरेंट्स पर भद्दे कमेंट करने का मामला संसद तक पहुंच गया है। मंगलवार को शिवसेना (UBT) सांसद प्रियंका चतुर्वेदी ने संसद की IT समिति से शिकायत करके एक्शन लेने और गाइडलाइन जारी करने की मांग की है।

प्रियंका चतुर्वेदी ने कहा कि कॉमेडी के नाम पर अपशब्दों का इस्तेमाल बर्दाश्त नहीं किया जा सकता। अलाहबादिया के प्लेटफॉर्म पर बड़े राजनेता तक आए हैं, पीएम ने उन्हें अवॉर्ड दिया है। एक जिम्मेदार व्यक्ति से यह उम्मीद नहीं की जाती।

सोर्सेज के मुताबिक, पार्लियामेंट की आईटी कमेटी इस मामले में रणवीर अलाहबादिया को नोटिस भेजने पर विचार कर रही है। प्रियंका चतुर्वेदी इस समिति की सदस्य हैं। जानकारी के मुताबिक, कई और सांसदों ने इसके खिलाफ अपनी नाराजगी जाहिर की है। ठाणे से शिवसेना सांसद नरेश गणपत म्हस्के ने संसद में इस मुद्दे को उठाया और ऐसे कंटेंट की रोकथाम के लिए कानून बनाने की मांग की है।

8 फरवरी को रिलीज हुआ था एपिसोड ‘इंडियाज गॉट लेटेंट’ स्टैंड-अप कॉमेडियन समय रैना का शो है, जिस पर विवाद हो रहा है। यह एपिसोड 8 फरवरी को यूट्यूब पर रिलीज किया गया था। इस शो में बोल्ड कॉमेडी कंटेंट होता है। इस शो के दुनियाभर में 73 लाख से ज्यादा सब्सक्राइबर हैं। इस शो में पेरेंट्स और महिलाओं को लेकर ऐसी बातें कही गईं, जिनका जिक्र दैनिक भास्कर यहां नहीं कर सकता है।

समय रैना के इस शो के हर एपिसोड को यूट्यूब पर औसतन 20 मिलियन से ज्यादा व्यूज मिलते हैं। समय को छोड़कर इस शो के हर एपिसोड में जज बदलते रहते हैं। हर एपिसोड में नए कंटेस्टेंट को परफॉर्म करने का मौका मिलता है। कंटेस्टेंट को अपना टैलेंट दिखाने के लिए 90 सेकेंड दिया जाता है।

विवादित एपिसोड में गेस्ट के तौर पर यूट्यूबर आशीष चंचलानी मौजूद थे। ऐसे में आज उनके वकील अपूर्वा भी मुंबई के खार पुलिस स्टेशन अपना पक्ष रखने पहुंचे।

विवादित एपिसोड में गेस्ट के तौर पर यूट्यूबर आशीष चंचलानी मौजूद थे। ऐसे में आज उनके वकील अपूर्वा भी मुंबई के खार पुलिस स्टेशन अपना पक्ष रखने पहुंचे।

भोपाल में हिंदू संगठनों ने किया यूट्यूबर्स का विरोध भोपाल में हिंदू संगठन संस्कृति बचाओ मंच ने यूट्यूबर समय और रणवीर का विरोध किया है। उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि दोनों ​​​​​भोपाल की तरफ आने का सोचे नहीं, क्योंकि कार्यकर्ता उन्हें बख्शेंगे नहीं।

मंच के अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी ने कहा, ‘जिस माता-पिता के चरणों में स्वर्ग होता है और जिस मां में पूरा ब्रह्माण्ड समाया हुआ है, उनके ऊपर जिस तरह से टिप्पणी की गई है, वो बताता है कि ये लोग कितने गंदे हैं और इन पर कड़ी कार्रवाई होनी ही चाहिए।’

बी प्राक ने कैंसिल किया अलाहबादिया का पॉडकास्ट

सिंगर बी प्राक ने पेरेंट्स और महिलाओं पर भद्दे कमेंट मामले के बाद यूट्यूबर रणवीर अलाहबादिया के पॉडकास्ट में जाने से इनकार कर दिया है।

उन्होंने कहा, ‘मैं बीयर बाइसेप्स के पॉडकास्ट में जाने वाला था, लेकिन अब इसे कैंसिल कर दिया है। वजह उनकी गिरी हुई मानसिकता है। समय रैना के शो में कैसे शब्दों का इस्तेमाल किया गया है। यह हमारा इंडियन कल्चर नहीं है। बी प्राक ने यह बातें इंस्टाग्राम पर वीडियो शेयर कर कहीं।’ पूरी खबर पढ़ें…

अलाहबादिया माफी मांग चुके हैं

‘मेरा कमेंट अनुचित था। फनी भी नहीं था। कॉमेडी मेरा जॉनर नहीं है। मैं बस सॉरी कहना चाहता हूं। कई ने पूछा क्या इस तरह से मैं अपने प्लेटफॉर्म का इस्तेमाल करूंगा, जवाब में कहूंगा कि अपने प्लेटफॉर्म का ऐसा यूज बिल्कुल भी नहीं करना चाहता। जो भी हुआ उसके लिए मैं कोई जस्टिफिकेशन नहीं देना चाहूंगा। मैं बस माफी मांगना चाहता हूं। जजमेंट में मुझसे गलती हुई। जो मैंने बोला वो कूल नहीं था। मैंने मेकर्स से कहा है कि वीडियो का असंवेदनशील हिस्सा हटा दिए जाए। इंसानियत के नाते शायद आप मुझे माफ करें।’

फडणवीस बोले- भद्दे तरीके से शो चलाना गलत महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने सोमवार को कहा, ‘मुझे इसकी जानकारी मिली है। हालांकि मैंने उस शो को न देखा और न सुना है। पता चला है कि भद्दे तरीके से शो को चलाया जा रहा है, जो बिल्कुल गलत हैl फ्रीडम ऑफ स्पीच सबके लिए है, लेकिन हमारी फ्रीडम तब खत्म हो जाती है जब हम किसी और की फ्रीडम में एनक्रोच करते हैंl यह ठीक नहीं है l सबकी मर्यादाएं हैं, हमने अश्लीलता के भी नियम तय किए हैंl अगर कोई उनको पार करेगा तो उसके खिलाफ कार्रवाई की जाएगीl’

सीएम फडणवीस ने कहा कि नियमों का पालन नहीं करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी।

सीएम फडणवीस ने कहा कि नियमों का पालन नहीं करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी।

असम CM बोले- गुवाहाटी में FIR कराई असम के सीएम हिमंत बिस्वा सरमा ने भी इस मामले को लेकर राज्य में FIR की जानकारी दी। उन्होंने X पोस्ट में कहा, ‘आज गुवाहाटी पुलिस ने कुछ यूट्यूबर्स और सोशल इन्फ्लुएंसर- आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्व मखीजा, रणवीर अलाहबादिया, समय रैना और अन्य के खिलाफ ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नामक एक शो में अश्लीलता को बढ़ावा देने के आरोप में FIR दर्ज की है। गुवाहाटी क्राइम ब्रांच जांच कर रही है।’

एडवोकेट आशीष बोले- ये क्राइम है केस दर्ज कराने वाले एडवोकेट आशीष ने दैनिक भास्कर से बात की। उन्होंने कहा- शो के वीडियो में महिलाओं को लेकर गलत बातें की गई हैं। इन भद्दे कमेंट के बाद वहां मौजूद लोग भी हंसते दिखे, जिससे यह साफ होता है कि उनकी मंशा महिलाओं के प्रति सम्मानजनक नहीं थी।

इन वीडियो का मकसद सिर्फ पॉपुलैरिटी पाना था। महिलाओं पर अभद्र टिप्पणियां कर, ये लोग ऑनलाइन प्लेटफॉर्म्स के जरिए पैसे कमाना चाहते हैं। यह सीधा-सीधा अपराध है। समाज या किसी भी वर्ग के खिलाफ गलत बयानबाजी करना भी कानूनी तौर पर गलत है। खासकर जब यह कंटेंट छोटे बच्चों तक भी पहुंच सकता है।

हमारा काम शिकायत दर्ज कराना था, अब एक्शन लेना पुलिस और प्रशासन का काम है, देखते हैं वे अपनी जिम्मेदारी कितनी निभाते हैं।

सोशल मीडिया पर रणवीर-समय ट्रोल हुए

——————————————-

इससे जुड़ी ये खबर भी पढ़ें…

समय रैना के ‘इंडियाज गॉट लेटेंट’ पर विवाद: शो की कंटेस्टेंट ने कहा था- अरुणाचल के लोग खाते हैं डॉग मीट, FIR दर्ज

स्टैंड अप कॉमेडियन समय रैना का कॉमेडी शो ‘इंडिया गॉट लेटेंट’ कानूनी पचड़े में फंसते दिख रहा है। शो की एक कंटेस्टेंट के आपत्तिजनक कमेंट को लेकर एफआईआर दर्ज की गई है। ‘इंडिया गॉट लटेंट’ पॉपुलर शो है, जो कि यूट्यूब पर स्ट्रीम होता है। पूरी खबर पढ़ें-

खबरें और भी हैं…



Source link

राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस, आमदार अमोल मिटकरींची वादग्रस्त घोषणा


अकोला : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरची जीभ छाटणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार असल्याची वादग्रस्त घोषणा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी केली. जोपर्यंत राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला शिवप्रेमी माफ करणार नसल्याचं मिटकरी म्हणालेत. अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. 

काय म्हणाले अमोल मिटकरी? 

अमोल मिटकरी म्हणाले की, बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महामानवांच्या विरोधात राहुल सोलापूरकरने वक्तव्य केलं. त्याने चर्चेत राहण्यासाठीच हे वक्तव्य केलं, जाणीवपूर्वक बदनामी केली. राहुल सोलापूरकरने वापरलेले अपशब्द हे देशद्रोहापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जननेते पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा. 

राहुल सोलापूरकर जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच त्याची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली. 

राहुल सोलापूरकरांचा माफीनामा

दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

वेदात सांगितल्याप्रमाणं डॉ.बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच असल्याचं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केलं होतं. शिवरायांनंतर आता  आंबेडकरांच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानं राहुल सोलापूरकर चांगलेच अडचणीत आले आहेत.

राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्याने मारायला हवं असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यात असणाऱ्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर जाहीर केला. यानंतर खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी लावलेला पोलिस बंदोबस्त आजही कायम असल्याचे पाहायला मिळतोय. 

ही बातमी वाचा : 

                                     

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता ‘या’ पदावर अपात्रतेची टां


Bacchu Kadu : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना विरोधकांनी टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरून विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस बजावली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली आहे. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिलाय. याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षाकरीता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना बजावण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

पंधरा दिवसात म्हणणं मांडण्याचे आदेश

दरम्यान, 2017 साली नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. बच्चू कडू यांना पंधरा दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणात आता नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली

Kiran Samant: राजन साळवींचा शिंदे गटात पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला, पण सामंत बंधुंचा विरोध? किरण सामंतांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले…

अधिक पाहा..



Source link