राज्यभरात ‘जिवंत सातबारा’मोहीम; सर्वसामान्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा, नेमकी काय आहे ही मोहिम?

राज्यभरात ‘जिवंत सातबारा’मोहीम; सर्वसामान्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा, नेमकी काय आहे ही मोहिम?


Jivant Satbara Campaign : राज्यातील सातबाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सातबाऱ्यावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिवंत सातबारा मोहीम ‘ राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिले आहेत. ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्यायावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आलीय . 

महाराष्ट्र सरकारने 19 मार्च रोजी राज्यभरात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा एक अध्यादेश जारी केला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी चिखली तालुक्यात यासंदर्भात एक मोहीम राबवली होती. चिखली तालुक्यातील 159 गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. शेत जमिनीच्या मूळ मालकाच्या मृत्यूनंतर वारसा आणि ती मालमत्ता वारसदारांच्या नावे करण्याची प्रक्रिया अनेकदा लांबते.‌ ही प्रक्रिया काहीशी वेळखाऊ सुद्धा आहे.‌ त्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात अनेक अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी चिखली तालुक्यातील 159 गावांमध्ये जीवन चा सातबारा मोहीम यशस्वीपणे राबविली. तहसीलदार संतोष काकडे यांची ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात 1 एप्रिल पासून सुरू होणार मोहीम

सध्या फक्त बुलढाण्यात सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता 1 एप्रिल पासून राज्यभरात राबवली जाणार आहे .या मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार असून त्या ऐवजी आता वारसांची नावे लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेकांना अडचणी येतात .त्यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय . (Jivant Satbara Mohim)

‘सात-बारा’ची आवश्यकता आणि महत्व : 

सात-बारा’, शेती आणि शेतकरी यांचं नातं अगदी घट्ट…तुमच्या शेतीची नोंद, मालकी, शेतीवर मिळणारं कर्ज, हंगामात तुम्ही घेत असलेली पिकं, शेतातील झाडं, विहीर या सर्वांची  इत्यंभूत लेखाजोखा ठेवणारा सरकारी दस्तावेज म्हणजे ‘सात-बारा’…त्यामुळेच या ‘सात-बारा’चं  शेतकऱ्यांच्या लेखी अतिशय महत्व!.. सात-बारा’ हा शेतकऱ्यांच्या शेतीवरील मालकी आणि हक्काची एकप्रकारची सनदच!… हाच ‘सात-बारा’ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा “Property Record” ही समजला जातोय…सात-बारा म्हणजे  शेतीचं क्षेत्र, पिक,सीमा, शेतीचा मालक याबरोबरच पिक-कर्ज यांची माहिती देणारा शासकीय दस्तावेज….हाच सात-बारा कृषी संस्कृती आणि जीवनाचा अविभाज्य घटकही समजला जातोय. मात्र अनेक ठिकाणी भ्रष्ट प्रृत्ती आणि वेळखाऊपणा यातून ‘सात-बारा’ मिळवतांना शेतकऱ्यांची मोठी लुट होतेय…त्यातही शेतीचा मूळ मालक मरण पावल्यानंतर ‘सात-बारा’वर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची प्रक्रिया वेळ, पैसा आणि डोकं खाणारी…यामुळे अनेक ठिकाणी शेतीचा ‘सात-बारा’  मृत व्यक्तींच्याच नावावर आहेय…

असे असतील ‘जिवंत सातबारा मोहीमे’तील टप्पे

-जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 1 ते 5 एप्रिलदरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील. या वाचनादरम्यान न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार .

-6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील .

-स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई – फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील .

-21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी वारसाचे नाव नोंदवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत 

-त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर  निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून मृत व्यक्तीच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सातबारावर येईल असेही सांगण्यात आले आहे .

-या संपूर्ण प्रक्रियेत समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारांची तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

14 वर्षांपुर्वीच अकोल्यात ‘जिवंत सात-बारा मोहिमे’ची ‘मुहूर्तमेढ’ : 

‘जिवंत सातबारा मोहिमेचा ‘चिखली पॅटर्न’ म्हणून राज्यभरात गाजावाजा होत असलेली ही योजना पहिल्यांदाच चिखलीत राबवणत आलेली नाही. 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये अकोल्याचे तत्कालीन तहसीलदार सोहम वायाळ यांनी अकोला तालुक्यात ही योजना यशस्वीपणे राबवली होती.‌ यासाठी त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रमच अकोला तहसील कार्यालयात राबविला होता. तालूक्यात योजना यशस्वी करण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाचे विविध टप्पे आखले होते. त्या आखणीनुसार त्यांनी दोन महिन्यात संपुर्ण तालूक्यातील सात-बारांवरच्या नोंदी अद्ययावत केल्या होत्याय.

असा होता ‘जिवंत सात-बारा मोहिमे”चा ‘वायाळ पॅटर्न’ :

सर्वात आधी सोहम वायाळ यांनी 2011 मध्ये अकोला तालूक्यातील महसुल यंत्रणेतील सर्व घटकांना सात-बारावरील वारसांच्या अद्ययावत नोंदींचे महत्व पटवून दिले. यानुसार गावपातळीवर काम करीत असलेल्या महसुल यंत्रणेतील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना कामाला लावले. नोंदी अद्ययावत करण्याच्या आवाहनासाठी गावोगाव दवंडी देण्यात आल्यात. यातून प्रत्येक गावात नोंदी नसलेल्या शेतकऱ्यांची यादी करण्यात आली. अन या यादीनुसार गावविहाय मेळावे घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. मोहिमेत ज्या शेतीच्या वारसांच्या संदर्भात कोणतेही वाद अथवा संभ्रम नाहीय अशा लोकांना गावातच घरपोच ‘सात-बारा’ देण्यात आला होता…यासाठी तहसिलदार गावा-गावांत प्रशासनातील नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह चावडी वाचनाचे कार्यक्रम घेतले गेले होते….’

अकोला तालुक्यात 11 मंडळं आणि 199 गावं असून यात ‘सात-बारा’ वरील नोंदी वर्षानुवर्षे अध्ययावत होत नाहीय. त्यामुळे बरेचदा मूळ मालक मरण पावल्यानंतरही  अनेक वर्ष ‘सात-बारा’ वर मालक म्हणून मृत व्यक्तीचेच नाव असतेय. याचा त्रास मात्र पुढे त्या व्यक्तीच्या वारसांना सहन करावा लागतोय. संपत्तीविषयक वाद पुढे न्यायालयात गेल्यानंतर तेथेही नातेसंबंधातील गुंतागुंतीमुळे निवाड्यात अडचणी निर्माण होतात. त्यातूनच खटलाही लांबत जातोय. अनेकदा मयत व्यक्तीच्या नावावर भलत्याच व्यक्तीने कर्ज उचलल्याची प्रकरणे समोर येतात. यातूनच ‘जिवंत सात-बारा’ची संकल्पना तत्कालिन तहसीलदार सोहम वायाळ यांनी 2011 मध्ये समोर आणली. अकोला तालुक्यात 1 जुलै 2011 पासून या अभियानाला सुरुवात झाली होती. 15 ऑगस्ट 2011 पर्यंत हे अभियान चालले होते. या मोहिमेत एकूण सहा टप्पे होतेय.

2011 मधील अकोल्यातल्या ‘जिवंत सात-बारा मोहिम कार्यक्रमाचे टप्पे :

1) 1 जुलै ते 10 जुलै 2011 –‘सात-बारा’चे चावडी वाचन.
2) 11 जुलै ते 15 जुलै 2011– मयताच्या वारसांना फेरफारासाठी नोटीस वितरीत
करणे. यासोबतच ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयावर सात दिवसांत जाहीरनामा प्रसिद्ध करणे.
3) 15 जुलै ते 20 जुलै 2011 — तलाठ्याने रजिस्टरवर फेरफार ओढून मंडळ
अधिकाऱ्यांकडे सदर करणे. यातील हरकती मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठविणे.
4) 21 जुलै ते 6 ऑगस्ट 2011 —तलाठी फेरफार रुजू करून वारसाच्या
नोंदी’सात-बारावर’ घेतील. वादग्रस्त प्रकरणांची पडताळणी नायब तहसिलदार
करतील.
5) 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2011- तलाठी, मंडळ अधिकारी तहसीलदारांकडे मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीचा अहवाल सादर करतील.
6) 15 ऑगस्ट 2011- ‘सात-बारा’वर एकाही मृताची नोंद नाहीय, अशी घोषणा होईल.

अकोल्यात यशस्वी ‘वायाळ पॅटर्न’ नंतर  जिल्हा आणि विभागात झाला होता लागू :

या मोहिमेत तेंव्हा अकोला तालुक्यातील 11 मंडळातल्या 199 गावांमधून 2013 मृत व्यक्तींच्या नावे ‘सात-बारांची’ नोंद असल्याचं
स्पष्ट झालं होतं. ‘सात-बारा’वरील या सर्व नोंदी अध्ययावत करण्यात आल्या होत्या. 2011 मध्ये तत्कालीन तहसीलदार सोहम वायाळ यांच्या पुढाकाराने अकोला तालुक्यात या योजनेच्या यशस्वीतेनंतर अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुथ्थूकृष्णन संकरनारायणन ही ‘जिवंत सातबारा’ मोहीम संपूर्ण अकोला जिल्ह्यात लागू केली. त्यानंतर अमरावती विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी हीच योजना अमरावती विभागात ‘आदरांजली योजना’म्हणून लागू केली होती.

विविध संवेदनशील उपक्रमांनी गाजली होती ‘वायाळ’ यांचा अकोला तहसीलदाराचा कार्यकाळ : 

अकोल्याचे तहसीलदार असताना सोहम वायाळ यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक दिशादर्शी आणि प्रेरणादायी प्रकल्पांनी मोहिमा राबविल्या होत्या.‌ त्यात शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून दूर सारण्यासाठी त्यांच्या मुलांना सोबत घेत वायाळ यांनी ‘बाबा!, जहर खाऊ नका’ ही मोहीम अकोला तालुक्यात राबवली होती. या चळवळीतून आत्महत्येचा विचार मनात आलेल्या अनेक शेतकऱ्यांना नवबळ देण्याचे काम वायाळ यांनी केलं होतं. याच वायाळ यांनी “जिवंत सातबारा’ मोहीमही राबवून आपल्यातील संवेदनेचा परिचय अकोलेकरांना दिला होता. 

माय-बाप सरकार आणि प्रशासन समस्या सोडविण्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जाणं हीच ग्रामस्वराज्याची मूळ संकल्पना. मात्र
स्वातंत्राच्या पंचाहत्तरीनंतरही दुर्दैवाने या संकल्पनेनं आपली पुस्तकं आणि चर्चेची चौकट ओलांडलीच नाहीये. ‘जिवंत सात-बारा’ ही मोहीम प्रशासनातील ‘जिवंत’ आणि सकारात्मक विचारांच्या संचिताची देण आहे. त्यामूळे ‘डीजीटल इंडिया’चा नारा देत असतांना 14 वर्षांपूर्वीचाच एक पॅटर्न सरकार आणि व्यवस्थेला पुन्हा राबवावा लागतो हे आपली व्यवस्था आणि सरकारचं एकप्रकाारचं अपयशच म्हणावं लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

Satara Bear attack: मोबाईलवर 5G नेटवर्क शोधत आजोबा जंगलात शिरले, कोअर झोनमध्ये पाय ठेवताच अस्वलाचा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत



Source link

जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी, 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू;  8 जण गंभीर

जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी, 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; 8 जण गंभीर


Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर (Murtijapur) तालुक्यातल्या सिरसो गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये कुटूंबातील जुन्या वादातून राडा झाला आहे. या राड्यातील तूफान हाणामारी झाली असून त्यात एकाचा मृत्यू झालाय. तर यात 8 जण गंभीर जखमी झालेय. हे दोन्ही कुटूंब पारधी समाजातील असून सिरसोमधील पारधी बेड्यावर ही घटना घडलीय. लाठ्या, काठ्या, कुर्हाड आणि दगडांनी दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केलाय. या वादात सुरज भोसले या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. त्याच्या डोक्यात कुर्हाडीचा वार लागल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला आणि जागेवरच मरण पावलाय. 

19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर

यासोबतच त्याचे वडील आणि भाऊसुद्धा गंभीर जखमी झालेयेत. गंभीर जखमींना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेय. तर काही जखमींवर मुर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरूयेत. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. या वादाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा संपूर्ण वाद इतका विकोपाला गेला की थेट हत्येपर्यत पोहोचला. या संपूर्ण प्रकरणात मुर्तीजापुर पोलीस अधिक तपास करतायेत. सध्या सिरसो गावातील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाये.

अकोल्यातील करण चितळे हत्याकांड प्रकरणी 7 जणांना अटक

अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरमध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या करण चितळे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळालीये. काल प्रेम प्रकरणाच्या वादातून करणसह तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला होताय. यात करणचा मृत्यू झालाय. तर दोन गंभीर जखमींवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरूयेत. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहा जणांना अटक केलीये.. यामध्ये 28 वर्षीय मयूर श्रावण मस्के, 24 वर्षीय प्रशिक राजेश जावळे, 28 वर्षीय निखिल सुभाष कांबळे, 20 वर्षीय संगम सोनकांबळे यांच्यासह 3 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आलीये.  तर एका अज्ञात आरोपीचा शोध सुरूये. काल सायंकाळच्या सुमारास चाकूने वार करून करण चितळे याची हत्या करण्यात आली होतीये.. याबाबतचा अधिक तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेय. आपल्या मैत्रिणीकडे का बघतो?, या वादातून करणची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय. पोलीस तपासातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहेय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

कापसाच्या रुईमध्ये अनियमितता करून तब्बल 2 हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा? चौकशीचे दिले आदेश

कापसाच्या रुईमध्ये अनियमितता करून तब्बल 2 हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा? चौकशीचे दिले आदेश


Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर 50 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वर्ष 2024-25च्या हंगामामध्ये कापसामधून निघणाऱ्या रुईमध्ये अनियमितता करून हा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांनी हा आरोप केला आहे.

याप्रकरणी बाजार समितीतील सात जणांविरोधात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणी पणनमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेयेत. दरम्यान, राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये अशाच पद्धतीने किमान 1 हजार कोटींचा घोटाळा या हंगामात झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

काय आहे नेमके सर्व प्रकरण?

राज्यातील बाजार समित्या या आपल्या कृषी अर्थव्यवस्थेतील महत्वाचा कणा आहे. मात्र, याच बाजार समित्यांमध्ये सातत्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. आता समोर आलेल्या लुटीचा गंभीर प्रकार आहे तो कापसाच्या विक्रीतून होत असलेल्या गंभीर लुटीचा. अन यात सहभागी आहेय भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआयमधील काही भ्रष्ट प्रवृत्ती, व्यापारी, अडते, दलाल आणि बाजार समित्यांमधील काही लोक. राज्यातील बाजार समित्यांमधील लुटीच्या हिमनगाचं टोक पहायला मिळालंय. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत. शासन व भारतीय कापूस निगमने किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची जबाबदारी सीसीआयचे केंद्र प्रमुखासह अकोट कृषी बाजार समितीच्या पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व संबंधित जिनिंगधारकांवर दिलीये.

या योजनेची अंमलबजावणी करताना खरेदीदारांनी स्वतःला आर्थिक लाभ मिळवून घेण्यासाठी कापसाच्या प्रत्यक्षात येणारा उताऱ्याची चुकीची नोंद घेत कागदपत्रे तयार करण्यात आली आहे. यातून या हंगामात शेतकरी आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप होतो आहो. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांनी यासंदर्भात पणनमंत्री जयकुमार रावल यांना पत्र लिहिलं आहे.

पत्रात काय आरोप करण्यात आलाय? 

‘भारतीय कापूस महामंडळा’शी जिनिंग धारकांनी केलेल्या करारानुसार ऑक्टोबर 2024 मध्ये 32.35 टक्के, नोव्हेंबरमध्ये 32.70 टक्के, डिसेंबरमध्ये 33.10 टक्के आणि जानेवारी महिन्यात 33.30 टक्के इतक्या कमीत कमी प्रमाणात कापसाच्या रुईचे प्रेसिंग करून ते सीसीआयच्या स्वाधीन करणे आवश्यक होते. करारानुसार निश्चितीपेक्षा कापसामध्ये रुईचे प्रमाण अधिक प्राप्त झाल्यास ते सुद्धा ‘सीसीआय’कडे सुपूर्द करणे बंधनकारक होतेय. मात्र, त्यातच अपरातफर झाल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आलाय.

असा झाला भ्रष्टाचार 

सद्यस्थितीत बाजार भावानुसार एक किलो रुईची किंमत सुमारे 156 रुपये इतकी आहेय. प्रति एक क्विंटल कापसामागे जवळपास साडेतीन किलोपेक्षा अधिक रुईची अफरातफर झालीये. सीसीआयची यावर्षी लाखो क्विंटल कापसाची खरेदी झालीयो. यातून मोठ्या प्रमाणात रुई तयार होत आहेय. त्यातही सुरुवातीला येणारा कापूस अत्यंत चांगल्या दर्जाचा असतो. त्यात रुईचे प्रमाण अधिक राहतेय. खरेदी मात्र 32.35 टक्क्यानेच या काळात केली जातेय. हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा असल्याचा दावा तक्रारदार विनायक सरनाईक यांनी केलाये. या तक्रारीची दखल पणन विभागाने घेतली असून घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश दिलेयेत.

आकडे काय बोलतात? 

एका किंटल कापसामध्ये प्रत्यक्षात असलेले रूईचे प्रमाण – 38 किलो प्रती क्विंटल.

जिनिंग धारकांनी सिसिआय कडे दिलेल्या कापसातील रूईचे प्रमाण -32.5 किलो प्रती क्विंटल.

अफरातफर झालेल्या रूईचे प्रमाण -5.50 किलो प्रती क्विंटल .

एक कीलो रूईची बाजार भावाने किंमत -155 रूपये प्रति किलो .

एका किंटलमागे अफरातफर झालेल्या रूईची किंमत -852 रूपये.

रुईच्या एका गाडीसाठी लागणारा कापूस – 5 किंटल 

एका कापसाच्या गाठी मागे झालेली अफरातफर रूपयात मध्ये -4262 रू. प्रती गाठ

चौहोट्टा बाजार या सेंटरवर 45000 गाठीचे काम झाले आहे .

अकोट या सेटवर  55000 गाठीचे काम झाले आहे.

महाराष्ट्रात जवळपास  46 लाख गाठीचे काम झाले आहे.

रूईच्या प्रमाणामध्ये दाखविण्यात आलेल्या तफावा व्यतिरिक्त वेस्टेज , ट्रॅश, गुणवत्ता ,सुरळीची  विक्री यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात अफरातफर झालेली आहे

महाराष्ट्रात स्तरावर ही अफरातफर जवळपास 2000 कोटी पेक्षा जास्त किंमतीची आहे .

घोटाळ्याची रक्कम 2000 कोटी पेक्षा जास्त! :

राज्यात ‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा’च्या अखत्यारीत 306 बाजार समित्या आहेत. यात सीसीआयच्या केंद्रावरील कापूस खरेदीमध्ये रुईसह इतर बाबी तपासल्या तर घोटाळ्याची व्याप्ती मोठी होऊ शकतेय. संपूर्ण राज्यात केंद्रावर देखील या प्रकारे किमान 2 हजार कोटींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोटसारखाच प्रकार इतर महाराष्ट्रात सुध्दा आहे…तसेच राजुरामध्येसुध्दा आहे. .शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करणे हे बाजार समितीचे काम आहे .सौद्दा पट्टी व काष्टा पट्टी ही बाजार समिती देते.. ते नसतांना सिसिआय ला बिल तयार करता येत नाही..राजुरा येथे बाजार समितीचे कोणतेही दस्तऐवज व व्हेरिफिकेशन नसतांना सिसिआयच्या अधिकाऱ्यांनी बिल तयार केले

तांत्रिक कारणांमुळे सिसिआयची खरेदी 11 फेब्रुवारी 25  ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यत   बंद करण्यात आली होती तशा सुचना सुध्दा सिसिआय ने दिल्या होत्या तरी बंदच्या कालावधीत सिसिआयने शेतकऱ्यांना डावलुन बिले तयार केलेली आहे. शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी करण्याची जबाबदारी ही बाजार समितीवर सोपविण्यात आली होती परंतु बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी केलीच नाही .अनियमीतता उघड झाल्यावर पंधरा मार्च पर्यंत नोंदणी करण्याच्या सुचना काढून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.

हिवरखेड  ,अकोटची दोन के़द्र आणि चौहोट्टा बाजार अशी चार केंद्र जवळ जवळ पंधरा किलोमीटर अंतरावर सुरू जाणिवपुर्वक ठेवण्यात आली आहे .त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना कापुस विक्रीसाठी अडचण तथा बाहेरिल शेतकऱ्याना वाहतुक खर्च सोसावा लागत आहे . भ्रष्टाचार करणे सोयीचे होईल अशा साठी एकाच ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहे .

अकोट बाजार समितीतील हा प्रकार म्हणजे बाजार समित्यांमधील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक असण्याची शक्यता आहे. चौकशीचे आदेश देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळी आणि शृंखलेचा नायनाट करावा हिच माफक अपोक्षा.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

टरबूज पि‍कावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला; बळीराजा आर्थिक संकटात

टरबूज पि‍कावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला; बळीराजा आर्थिक संकटात


Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातला टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाये. यंदा टरबूज आणि खरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिक अक्षरक्ष: वाळून गेलंय. त्यामूळे शेतकऱ्यांचं या हंगामातील टरबूज पिक हातातून निघून गेलंय. काही शेतात टरबूज पिवळं पडल्याने चक्क पपईसारखं दिसू लागलंय. टरबूज पिक पिवळं पडल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेय. परिणामी टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

प्रति हेक्टरी 1 लाख रुपये लागत, लागवड खर्च निघणंही अवघड  

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर, हिंगणी, हिवरखेड, तळेगाव, झरी, सौंदळा, वारखेड आणि कारला गावासह अनेक भागात टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा मोठा प्रादुर्भाव झालाय. यात शेकडो शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. यासाठी शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये खर्च आलाय. परंतू, आता खर्च निघणंही शेतकर्‍यांसमोर कठीण झालंये. त्यामुळे सरकारनं तातडीने नुकसानाचे पंचनामे करून टरबूज पिकाला विमा कवच द्यावे, अशी मागणी तळेगाव येथील युवा शेतकरी तुषार कोरडे या शेतकऱ्याने केलीये. 

अद्याप कोणीही डोकावूनसुद्धा पाहलं नाही, शेतकऱ्यांचा आक्रोश

तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जातेय. या टरबुजाच्या लागवडीतूनही शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. पण, यंदा टरबूज पिकावर अज्ञात रोग आला अन् चक्क हिरवे दिसणारे टरबूज काही दिवसातच पूर्णतः पिवळे पडले. यासाठी शेतकऱ्यांनी किडनाशकांच्या फवारण्या, तसेच खत नियोजन केल खरं, परंतु त्याचा काहीही फायदा होतांना दिसत नाहीये. कृषी विभागाला तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणीही डोकावूनसुद्धा पाहलं नाही. अखेर वैतागून शेतकऱ्यांनी हतबल होत शेतातलं टरबूज जनावरांसमोर खायला टाकलंये. तर काही शेतकऱ्यांनी टरबूज पिक जमिनीतून उखडून रस्त्यावर फेकलेय. 

टॉमेटोचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25  रुपये दर मिळत आहेत.

एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे 90 रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो. या एक कॅरेट टोमॅटोला केवळ 25 रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना 65 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

बेकाबू कार पुलिया से गिरी, दो महिला डॉक्टरों की मौत:  4 लोग घायल, अयोध्या से उज्जैन जा रहे थे; शिवपुरी के लुकवासा बायपास पर हादसा – Shivpuri News

बेकाबू कार पुलिया से गिरी, दो महिला डॉक्टरों की मौत: 4 लोग घायल, अयोध्या से उज्जैन जा रहे थे; शिवपुरी के लुकवासा बायपास पर हादसा – Shivpuri News


अर्टिगा कार बेकाबू होकर पुलिया से नीचे गिर गई।

शिवपुरी जिले में एनएच-46 पर रविवार एक अर्टिगा कार बेकाबू होकर पुलिया से नीचे गिर गई। हादसा लुकवासा बायपास पर सुबह करीब 8 बजे हुआ। हादसे में 2 महिला डॉक्टरों की मौत हो गई, जबकि चार अन्य डॉक्टर घायल हो गए। सभी लोग अयोध्या से उज्जैन जा रहे थे। घायलों को

.

कार चला रहे डॉक्टर अतुल आचार्य ने बताया कि उनकी टीम दस दिन पहले महाराष्ट्र से तीर्थ यात्रा के लिए निकली थी। वे अयोध्या दर्शन के बाद उज्जैन के महाकालेश्वर मंदिर जा रहे थे। रविवार सुबह लुकवासा चौकी के पास उनकी कार अचानक बेकाबू होकर पुलिया से टकराकर नीचे गिर गई।

दोनों शवों को पोस्टमॉर्टम के लिए भिजवाते पुलिसकर्मी।

एक की मौके पर एक की अस्पताल में मौत हादसे की सूचना मिलते ही कोलारस थाना पुलिस मौके पर पहुंची और राहत कार्य शुरू किया। इस दुर्घटना में डॉ. तन्वी आचार्य (50) पत्नी डॉ. अतुल आचार्य की मौके पर ही मौत हो गई। वहीं, डॉ. नीलम पंडित (55) पत्नी डॉ. सुबोध पंडित को गंभीर हालत में जिला अस्पताल ले जाया गया, जहां इलाज के दौरान उन्होंने भी दम तोड़ दिया।

सभी घायलों का जिला अस्पताल में इलाज जारी है।

सभी घायलों का जिला अस्पताल में इलाज जारी है।

सभी कार सवार महाराष्ट्र के रहने वाले कार में मुंबई और आसपास के रहने वाले छह डॉक्टर सवार थे। घायलों में डॉ. उदय जोशी (64) निवासी दादर, डॉ. सुबोध पंडित (62) निवासी बसई महाराष्ट्र, डॉ. अतुल आचार्य (55) निवासी भिवंडी महाराष्ट्र, डॉ. सीमा जोशी (59) घायल हुए हैं। पुलिस हादसे के कारणों की जांच में जुटी है।

ये खबर भी पढ़ें-

शिवपुरी में सड़क हादसे में तीन भाई-बहनों की मौत

शिवपुरी में लोडिंग वाहन ने एक बाइक को टक्कर मार दी। हादसे में बाइक सवार कोर्ट कर्मचारी समेत उसके चचेरे भाई और बहन की मौत हो गई। हादसा करैरा थाना क्षेत्र में नेशनल हाईवे के पुल पर हुआ। लोडिंग वाहन रॉन्ग साइड से आ रहा था। मृतकों की पहचान शिवपुरी न्यायालय में स्टेनोग्राफर अंकित राय (28) और उनके चचेरे भाई-बहन सत्यम राय (20) , वैष्णवी राय (18) के रूप में हुई है। मृतक खोड़ चौकी क्षेत्र के वीरा गांव के रहने वाले थे। पढ़ें पूरी खबर

सीधी में खाई में गिरी बोलेरो, 4 की मौत

हादसा रविवार-सोमवार की देर रात करीब 2 बजे मूड़ा पहाड़ पर हुआ।

हादसा रविवार-सोमवार की देर रात करीब 2 बजे मूड़ा पहाड़ पर हुआ।

सीधी में महाकुंभ जा रही बोलेरो अनियंत्रित होकर गहरी खाई में गिर गई। हादसे में दो लोगों की मौके पर मौत हाे गई। दो ने इलाज के दौरान दम तोड़ा। 4 लोग घायल हुए हैं। सभी को संजय गांधी अस्पताल रीवा भेजा गया है। खाई 30 फीट से ज्यादा गहरी है, लेकिन पत्थर और पेड़ों की वजह से गाड़ी 12 फीट से ज्यादा नीचे नहीं जा पाई। पढ़ें पूरी खबर…



Source link

अकोल्यात सायकलच्या दुकानातून तब्बल 1.15 कोटी रोख जप्त, रक्कम हवालाची असल्याची शक्यता

अकोल्यात सायकलच्या दुकानातून तब्बल 1.15 कोटी रोख जप्त, रक्कम हवालाची असल्याची शक्यता


Akola News : अकोल्यात एका सायकलच्या दुकानातून तब्बल 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीचे दुकानात खदान पोलिसांनी ही कारवाई केलीय. यावेळी त्यांनी 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केलीय. संबंधिताला या रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी नागपूर येथील आयकर विभागाला याबाबत माहिती दिलीये. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ही कारवाई करण्यात आलीय. दीपक घुगे नामक व्यक्तीजवळ पांढर्‍या रंगाच्या दोन कापडी पिशव्या होत्या. त्यामध्ये 500 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल होतेय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करतायेत.

आयुध निर्माणीच्या आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या LTPE सेक्शनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. नव्यानं गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे (५९) यांच्यासह महाप्रबंधक अनुज प्रसाद (५९), महाप्रबंधक ललित कुमार (४९) यांचा समावेश आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर दाखल आहेत गुन्हे. या तिघांच्या समावेशाने आता आयुध निर्मणी स्फोट प्रकरणात हलगर्जीपणा केल्यानं आतापर्यंत सात जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

या प्रकरणात चौकशीअंती आयुध निर्माणीचे एकूण सात अधिकारी दोषी आढळून आले असून पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या लेखी रिपोर्टवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी करीत आहेत.

यापूर्वी यांच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा

१) देवेंद्र रामदास मिना (४९) (सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी)
२) आदिल रशील फारुकी (४६) (ज्युनीअर वर्क मॅनेजर, मेन्टनन्स विभाग)
३) संजय सुरेश धपाडे (४४) (सामान्य प्रशासन विभाग)
४) आनंदराव मधुकरराव फाये (५०) (सेक्शन प्रभारी अधिकारी) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp