नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग तुटलं; गाडीचे डब्बे निसटले, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Train Accident : नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग तुटलं; गाडीचे डब्बे निसटले, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Source link
Train Accident : नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग तुटलं; गाडीचे डब्बे निसटले, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Source link
Chandrashekhar Bawankule : 2047 मध्ये भारताला जगाची गरज पडणार नाही तर जगाला भारताची गरज पडणार असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. कंसरुपी मायावी कॉंग्रेस पार्टीला वरुड मोर्शीत भुईसपाट करायचं असल्याचे बावनकुळे म्हणाले. आजचा पक्ष प्रवेश अमरावती जिल्ह्यातील काँगेसला धक्का देणारा आहे. उत्तर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक नेत्यांनी काँगेस सोडल्याचे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला.
वरुड – मोर्शी मतदार संघात हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मोदींच्या विकासाला कीड लावण्यासाठी काँगेस काम करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. वरुड-मोर्शी मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे महसूल मंत्री तथा अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यावेळी बावनकुळे बोलत होते.
विक्रम ठाकरे हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. आज अखेर विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळं काँग्रेसला विदर्भात पुन्हा मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशावेळी भाषण करताना अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेससारखं काम भाजपामध्ये नाही, भाजपचा माजी पदाधिकारी असला तरी त्याला काम दिलं जातं. सन्मान देखील दिला जातो असे अनिल बोंडे म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांना जोरदार धक्के बसत आहेत. या पक्षातील अनेक नेते पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्य म्हणजे भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसला भाजपने धक्का दिल्यानंतर आता अमरावती जिल्ह्यात देखील भाजपने काँग्रेसला धक्का दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Akola: एबीपी माझा’ने नुकतीच अकोला जिल्ह्यातील एका ध्येयवोड्या शिक्षकाची बातमी जगासमोर आणली होती. संतोष पाचपोर असं या शिक्षकाचं नाव आहेत. ते अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. द्विशिक्षकी असलेली आपली शाळा त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शिक्षण अन उपक्रमामधून सर्वार्थाने सुंदर केली.
संतोष पाचपोर हे जिल्ह्यातील नामवंत बॉडी बिल्डरही आहेत. ‘माझा’च्या बातमीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी शाळेला भेट देत स्थानिक विकास निधीतून शाळेसाठी 10 लाखांची घोषणा केलीय. यासोबतच ते त्यांच्या आमदार निधीतून शाळेला दोन संगणकही भेट देणाार आहेत. मिटकरींच्या भेटीवेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत त्यांचं कौतूक केलं. शाळेला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे.
या शाळेत जगण्यातला सारं समृद्धपण विद्यार्थ्यांना मिळतंय. अन हे सारं तन्मयतेनं शिकविणारे असतात त्यांचे दोन शिक्षक… संतोष पाचपोर अन समाधान जावळे ‘गुरूजी’… त्यांच्या कामाची माझाने दखल घेतली अन शाळा राज्यभरात गाजलीय. गावकरी, शिक्षक, विद्यार्थी आणि आमदार अमोल मिटकरींनी एक चांगली शाळा समाजासमोर आणल्याने एबीपी माझाचे आभार मानले आहेत.
माझा’च्या बातमीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी शाळेला भेट देत स्थानिक विकास निधीतून शाळेसाठी 10 लाखांची घोषणा केलीय. यासोबतच ते त्यांच्या आमदार निधीतून शाळेला दोन संगणकही भेट देणाार आहेत. मिटकरींच्या भेटीवेळी आमदार मिटकरींनी थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना फोन लावत शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आमदार मिटकरींच्या फोनवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत त्यांचं कौतूक केलं. शाळेला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे. यावेळी आमदार मिटकरींनी विद्यार्थ्यांना आपल्याकडून शैक्षणिक साहित्यही भेट दिलं.
शिक्षक म्हटलं की आठवतं शिस्त, ज्ञान आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारा मार्गदर्शक. पण जर तोच शिक्षक शारीरिक फिटनेसमध्येही झपाटलेला असेल, तर? अकोल्यातील संतोष पाचपोर हे नाव आज शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर फिटनेस आणि प्रेरणादायी कार्यासाठीही चर्चेचा विषय ठरत आहेत . अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील पाचपोर सर यांनी ‘गुरुजी’ ही ओळख ‘रोल मॉडेल’च्या उंचीवर नेली आहे.
संतोष पाचपोर सर यांचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो. 5 वाजता ते जिममध्ये व्यायामासाठी पोहोचतात. वजन प्रशिक्षण, पुशअप्स, सूर्यनमस्कार, कार्डिओ — कोणतीही कसर ठेवत नाहीत. त्यांच्या ट्रेनर करण रणपिसे यांच्या मते, “गुरुजींमधील सातत्य, मेहनत आणि सकारात्मकता कोणालाही प्रेरणा देईल.”
संतोष पाचपोर. सहायक शिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंबी खुर्द, तालुका, बार्शीटाकळी, जिल्हा, अकोला. निंबी गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजाराच्या घरात. तर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत 21 विद्यार्थी. मात्र, हेच 21 विद्यार्थी या शाळेवरील शिक्षक संतोष पाचपोर अन समाधान जावळे यांचं संपुर्ण भावविश्व बनलेयेत. त्यातूनच, ही शाळा खऱ्या अर्थाने ‘मस्ती की पाठशाला’ बनली आहे. कारण, या शाळेत अनुभवातून दिलं जाणारं आनंदी शिक्षण आहेय. येथील विद्यार्थ्यांना खर्व, अब्जांशी नातं सांगणारी 27 अंकी संख्या अगदी लिलया वाचता येते. मराठी, इंग्रजी वाचता लिहिता येतं. छान कविताही म्हणता येतात. पाढे येतात. तर शाळेच्या मैदानावर विविध खेळांची धमाल असतेय. शाळेत झाडांना मोठं होत पाहण्याचा आनंद, शाळेतील परसबागेतल्या भाजीपाल्यातून शिजलेला शालेय पोषण आहारातील जेवणाचा आनंद. हे जगण्यातला सारं समृद्धपण या शाळेत विद्यार्थ्यांना मिळतंय. अन हे सारं तन्मयतेनं शिकविणारे असतात त्यांचे दोन शिक्षक. संतोष पाचपोर अन समाधान जावळे ‘गुरूजी’….
2018 मध्ये जेव्हा संतोष पाचपोर आणि समाधान जावळे या दोन शिक्षकांनी या शाळेची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा शाळेचं रूप ओसाड माळरानासारखं होतं. पण त्यांनी हार मानली नाही. स्वखर्चातून 5 लाख रुपये, आणि गावकऱ्यांकडून 1 लाखांची लोकवर्गणी गोळा करून त्यांनी परिसर फुलवला. त्यातच शासनाचाही 1 लाखांचा निधी मिळाला. अन शाळेचं रूपडं पालटलं. आज ही शाळा ‘मस्ती की पाठशाळा’ म्हणून ओळखली जाते. इथे पाढे, कविता, विज्ञान प्रयोग, इंग्रजी वाचनाबरोबरच सण, सृजनशील उपक्रम, परसबाग आणि खेळांची रेलचेल असते. कधीकाळी ओसाड असलेली शाळा आज विद्यार्थी, झाडं, फुलं, पक्षी, फळं अन पालेभाज्या किलबिलाट अन हिरवाईनं पार बदलून गेली आहे.
या छोट्या गावातील विद्यार्थ्यांनी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा गाजवल्या. त्यांचे प्रातिनिधिक शिक्षणप्रयोग सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाळेत शिक्षणासोबतच अनुभव आणि सण-उत्सव आणि खेळांना सारखंच महत्व दिलं जातं. त्यामुळेच शाळेत रंगपंचमी, दहिहांडी यासोबतच शनिवारी रनिंगचाआनंदही विद्यार्थी घेतात.. परसबागेतील केळीची चव त्यांना सुखावते. चांद्रयान प्रक्षेपणावेळी शाळेत शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना दाखविलेल्या प्रातिकृतिक यान प्रक्षेपण व्हिडीओला युट्यूबवर 25 कोटी लोकांनी पाहिल्यांनं ही शाळा अन दोन्ही शिक्षक देशभरात चर्चेत आले होते.
आज संतोष पाचपोर यांचं व्यक्तिमत्व हे शिक्षकांपुरतंच मर्यादित नाही. ते तरुण बॉडी बिल्डर्ससाठीही आयडॉल झाले आहेत. शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे केवळ शरीर घडवणं नाही, तर मनही मजबूत करणं — हे त्यांचं जीवन शिकवून जातं.
संतोष पाचपोर यांचा प्रवास हा केवळ शाळा आणि जिमपुरता मर्यादित नाही. त्यांनी एक समाज घडवण्याची चळवळ सुरू केली आहे. त्यांनी एक उदाहरण ठेवले आहे की एक शिक्षक, जर ठरवलं तर तो समाजाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार होऊ शकतो.
सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजतायेत, हे दुर्दैवी वास्तव आहेय. मात्र या अंधारल्या वाटेवरही काही हसरे दुवे शोधणारे शिक्षक आजही एखाद्याा दीपस्तंभासारखं काम करतायेत. ‘बॉडी बिल्डर’ संतोष पाचपोर गुरुजी यांचं कार्य म्हणूनच कोणत्याही शब्दांच्या पलीकडचा ठरतं. ‘बॉडी बिल्डिंग’ ते विद्यार्थी घडविणाऱ्या ‘नेशन बिल्डिंग’ या संतोष पाचपोर गुरुजींच्या जगावेगळ्या ‘पॅशन’ला एबीपी माझाचा सलाम आणि शुभेच्छा!…..शिस्त, श्रद्धा आणि सेवाभाव यांच्या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला हा ‘गुरुजी’ ‘बॉडी बिल्डर’ असतानाही खरा ‘नेशन बिल्डर’ ठरतो, यात शंका नाही…. ‘एबीपी माझा’चं समाजातील अशा सकारात्मक बदलांना ताकदीने पुढे आणण्याचं आणि उभं करण्याचं आपलं व्रत यापुढेही निरंतर असंच सुरू राहणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
आणखी वाचा
Dattatray Bharne अकोला : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे अकोला येथे आगमन झालंय. यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचे वारकरी बांधवांनी भव्य स्वागत केले. हा त्यांचा दोन दिवसांचा शासकीय दौरा असणार आहे. या दौ-यात ते विविध ठिकाणी भेटीगाठी देणार आहेत. मात्र घरात पंढरीची वारी असलेले शेतकरी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वारकरी बांधवांकडून करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने ते भावूक झाल्याचे बघायला मिळाले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तसेच दिवसभर उद्धघाटने, पाहणी, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक असा त्यांचा भरगच्च दौरा आहे. तसेच भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या हस्ते वाशिम कार्यालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. अशी माहिती पुढे आली आहे.
वारकरी संप्रदायातर्फे केलेल्या आगळेवेगळ्या स्वागताने कृषी मंत्री भारावून गेले. आता “शेतकऱ्यांचे पांडुरंग तुम्हीच आहात” स्वागत करतानाचे वारकरी बांधवांनी काढलेले उच्चार मंत्री दत्तात्रय भरणे भारावून गेले. भल्या पहाटे टाळ-मृदंग आणि अखंड “ज्ञानोबा माऊली, तुकाराम”च्या गजरात मिळालेलं हे स्नेहाचं व भक्तीभावाचं ऊबदार आलिंगन आयुष्यभर स्मरणात राहील असे ते म्हणाले. घरात पंढरीची वारी असलेला मी सुद्धा एक शेतकरी असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
याप्रसंगी ते म्हणाले, “विदर्भातील शेतकरी वर्गाच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहीन. योगायोगाने मी विदर्भातील वाशिमसारख्या कृषि समृद्ध जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने विदर्भाकडे येथून पुढील काळात माझे विशेष लक्ष राहील. विदर्भातील शेतकरी मेहनती व कष्टाळू आहे. त्यामुळे शेतक-यांचे कष्ट व शासनाची मदत यातून विदर्भ नक्कीच सुजलाम सुफलाम होईल अशी मला खात्री आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी हिंगणी बुद्रुक येथील श्री संत गुलाब बाबा संस्थानास ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम दातकर यांनी त्यांचे विशेष स्वागत केले. यावेळी आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान दोन जणांकडून ही जबर मारहाण झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीचे मूळं कारण समोर आलं नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून गावी जात होते, वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. त्याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादादरम्यान सरपंच फुके यांना 2 व्यक्तींनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एका सरपंचाला पेट्रोलपंपावर बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके यांना दोन व्यक्तींनी मारहाण केली असून, हा प्रकार पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच फुके दैनंदिन कामे आटपून गावी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी मूर्तिजापूर येथील बुब पेट्रोलपंपावर थांबले. त्यावेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून त्यांचा दोन व्यक्तींशी वाद झाला. यावेळी दोघांनी मिळून सरपंच फुके यांना बेदम मारहाण केली.
या घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेनंतर सरपंच फुके यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
आणखी वाचा
Akola : अकोला शहरालगतच्या खडकी बुद्रुक येथील सर्वे नंबर 29/2 मधील आरक्षित जमिनीवर TDR (Transferrable Development Rights) वाटप करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर गंभीर वादंग निर्माण झालं आहे. महापालिकेची टीडीआर वाटपाची भूमिका फक्त खासगी विकासक आणि बिल्डरला फायदा देण्यासाठी आहे का? असा प्रश्न आता अकोलेकर विचारत आहेत. अकोल्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी महापालिकेवर भूमाफियांना फायदा करुन देण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत या निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला आहे.
अकोल्यातील खडकी बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक 29/2 मधील जमीन प्रकरणात मोठ्या गैरव्यहावराची शक्यता असल्याचे समोर आले आहे. सदर जागेसंदर्भात मनपाने जाहीर टीडीआर सूचना प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेकडे हरकतीही दाखल केल्या आहेत. यामध्ये प्रस्तावित टीडीआर व आरक्षणाच्या नावाखाली भूमाफीयांना फायदा करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून योजनाबद्ध कट रचल्याचा गंभीर आरोप महापालिका प्रशासनावर होतो आहे. महापालिकेच्या प्रस्तावित ई बससाठी चार्जिंग स्टेशनच्या बाजूला असलेली एका खाजगी विकासकाची जागा महापालिका प्रशासनाने घेतली आहे. या बदल्यात महापालिका या खाजगी विकासकाला शहरातील पॉश एरियामध्ये जवळपास 1.80 टक्के म्हणजे जवळपास दुप्पट वाढीव टीडीआर देणार आहे. खासगी विकासाच्या या जागेची तेथील बाजारभावानुसार सध्याची किंमत दीड ते दोन कोटी दरम्यान असल्याची शक्यता आहे. मात्र महापालिकडून मिळणाऱ्या वाढीव टीडीआर नुसार या विकासाकाला शहरातील जागा विक्रीतून जवळपास 17 ते 18 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक 328 आणि 371 कलम 26 अंतर्गत समाविष्ट करून प्रसिद्धी देण्यात आली होती. मात्र, या दोन्हीही भूखंडाबदल्यात महापालिका देत असलेल्या टीडीआर बदल्यात महापालिकेच्या भूमिकेवर अकोल्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील खाजगी बिल्डर आणि विकासकांना फायदा देण्यासाठी महापालिकेकडून जाणीवपूर्वक असा निर्णय घेण्यात आला आहे का? असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे. मालोकार यांच्या मते या जागेची नियोजन प्राधिकरणाला प्रत्यक्षात आवश्यकता नव्हती. ठराविक लोकांना फायदा व्हावा म्हणून हेतुपुरस्सर आरक्षणाखाली आणण्यात आले आहे. विकास आराखड्यात बदल करताना मोठ्या आर्थिक देवाणघेवाणी झाल्या आहेत. जागा प्रत्यक्षात फ्लड झोन आणि नदीपात्रात येते, तरीही तिला आरक्षण देऊन TDR वाटपाचा मार्ग मोकळा करण्यात येतो आहे.
आरक्षण क्र. 328 : चार्जिंग बस स्टेशन प्रस्तावित.
आरक्षण क्र. 371 : खेळाचे मैदान.
दोन्हीही स्थळे नदीपात्रात असल्याचे मालोकार यांनी स्पष्ट केले आहे, आणि या आरक्षणामागे ‘ठराविक लोकांचा फायदा’ हा एकमेव हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कमी किंमतीच्या जमिनी आणि भूखंड विकासाच्या नावाखाली महापालिकेने खासगी विकासकांकडून ताब्यात घ्यायचे. त्याबद्दल संबंधितांना महापालिकेने शहरातील मुख्य ठिकाणी वाढीव टीडीआर द्यायचा आणि त्यातून कोट्यावधी रुपये कमवायचे अशी एक ‘मोड्स ऑपरेंडी’ सध्या शहरात अनेक ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा आहे. हा सर्व व्यवहार करताना संबंधित बिल्डर हे काही भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचं ईप्सित साध्य करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.अकोल्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणात सरकार आणि जनतेला ओरबाडणारे हे लोक कोण आहेत?, याची चर्चा आता अकोलेकरांमध्ये रंगू लागली आहे.
शहरातील टीडीआर वाटपा संदर्भात महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आरोप होत आहेत. मात्र, यासंदर्भात संशयाच्या घेऱ्यात आलेल्या महापालिकेकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण यावर देण्यात आलेलं नाही. यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. टीडीआर प्रकरणावरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली महापालिका आणि त्यावरचं महापालिका प्रशासनाचे मौन हे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे.
यासंदर्भात विजय मालोकार यांनी शासनाकडे आरक्षण रद्द करण्याची आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे हे प्रकरण अधिक गाजण्याची शक्यता असून, महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात शहराला चुना लावू पाहणाऱ्या प्रवृत्तींना राज्यातील माहिती सरकार च्या लावणार का असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा