धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा; अकोल्यातील घटना

धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा; अकोल्यातील घटना


Akola Crime: अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येतीये.. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र  चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय.. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे.. (Akola Crime) राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. किरकोळकरणातून मारहाण, दिवसाढवळ्या होणारे खून, दहशत वाजवण्याचा प्रयत्न, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अकोल्यात पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला रविवारी रात्री ( 16 मार्च) चोरट्यांनी फोडून काढले. बेदम मारहाण तर केलीच पण त्याचा चेहरा दगडाने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे. या व्यक्तीची सध्या प्रकृती चिंताजनक आहे.

नक्की घडले काय? 

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता… त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढलाय.. काल रात्री(16मार्च )उशिरा अकोला रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली.. सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली.. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले असून रवाना केले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.

मुंबईत दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून

राजधानी मुंबईत नेहमीच गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरून जातं, कधी भाईगिरी, कधी अंमली पदार्थ तर कधी हत्येच्या घटनांनी मुंबई (Mumbai) महाराष्ट्राचं लक्ष वेधते. आता, येथील मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरात 75 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या वयोवृद्धाचा मृतदेह झाडाझुडुपात आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी (Police) गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणी नायगावमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीसह तिच्या 17 वर्षीय मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  

 

अधिक पाहा..



Source link

सेंट्रल बँकेला भीषण आग; बँकेतील पैशासह साहित्य जळून खाक, अमरावतीच्या चांदुर रेल्वे येथील घटना

सेंट्रल बँकेला भीषण आग; बँकेतील पैशासह साहित्य जळून खाक, अमरावतीच्या चांदुर रेल्वे येथील घटना


Amravati Fire Accident : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या परिसरात असलेल्या सेंट्रल बँकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर आग इतकी भीषण होती की यात बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाले असल्याची ही माहिती पुढे आली आहे. बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडलेत. त्यामुळे सुदैवाने यात कुठली जीवित हानी झाली नाही. मात्र या घटणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक

पुढे आलेल्या माहितीनुसार, अचानक लागलेल्या या आगीची घटनेने बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झालंय. तर घटनेची माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र आग विझत नसल्याने धामणगाव आणि तीवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले. बँकेला अचानक आग लागल्याचे दिसताच नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय.

आगीत 14 ते 15 चारचाकी वाहन जळून खाक 

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अब्दुलटोला येथील एका घराला रात्रीच्या सुमारस आग लागल्याने विक्रीकरिता ठेवलेली 14 ते 15 चार चाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच मोहफुल वेचण्यासाठी  शेतकरी मोहफुलाच्या झाडाखाली आग लावून कचरा जाळत असतात. यामुळे वणवा लागून जंगलात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत असतात. 

अशीच एक घटना देवरी तालुक्यातील अब्दुलटोला परिसरात घडली जंगल परिसरात असलेल्या भागांमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावली आणि ही आग पसरत जंगल परिसरात असलेल्या छोटू खान या व्यावसायिकाच्या शेतातील घराला लागली. त्या घरातील परिसरामध्ये चार चाकी वाहन ठेवली होती फक्त बघता ह्या सर्व चर्चा की वाहनांना आग लागली यात सर्व वाहन जळून खाक झाले असून व्यावसायिक छोटू खान यांचा यात मोठ नुकसान झाला आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

तापमानाचा भडका! विदर्भात तीव्र उष्णतेची लाट; पाऱ्याने चाळीशी ओलांडली, हवामानाचा अंदाज काय?

तापमानाचा भडका! विदर्भात तीव्र उष्णतेची लाट; पाऱ्याने चाळीशी ओलांडली, हवामानाचा अंदाज काय?


Maharashtra Weather Update : विदर्भासह राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार(IMD Forecast), विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  तर उद्या म्हणजेच रविवारी (16 मार्च) अकोल्यात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. परिणामी संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

उष्णतेनं शहरं तापली, पाऱ्याने चाळीशी ओलांडली

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सद्या विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्याचा पारा हा 40 डिग्रीच्या पार पोहचला आहे. अशातच आज (15  मार्च) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपुर (41.4) ब्रम्हपुरी (41.2) आणि वर्धा येथ 41 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काळात हेच तापमान सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितलं जातंय. साधारण 35 अंशांच्या पलीकडे तापमान हे मार्च महिन्याच्या शेवटाला विदर्भातील असतं. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेनं शहरं आणखी तापण्याची शक्यता आहे. परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठीचे उपाय 

• तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
• हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
• प्रवासात पाणी सोबत ठेवा.
• मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते.
• उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
• तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
• तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
• पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
• तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
• ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा ‘हायड्रेट’ करण्यास मदत होते.
• जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
• तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
• पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात,  रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; ‘या’ गाड्यांना फटका!

मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; ‘या’ गाड्यांना फटका!


Jalgaon Train-Truck Accident : जळगाव जिल्ह्यातील बोदवडजवळ मुंबई- अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय. या अपघातामुळे (Accident News) रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय. या अपघातामुळे मुंबईवरून(Mumbai) नागपूरकडे (Nagpur) जाणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक संपूर्णतः कोलमडलंय. या अपघातामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या अकोला, मलकापूर आणि इतर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्यायेत. तर या अपघातामुळे एकूण पाच गाड्या इटारसीमार्गे नागपूरला वळवण्यात आल्यायेत. शिवाय इतर दोन गाड्या अनिश्चित काळासाठी विलंबाने धावणार आहेत. तर भुसावळ बडनेरा ही पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. 

अपघातामुळे इटारसीमार्गे नागपूरकडे वळवलेल्या गाड्या 

-मुंबई हावडा शालीमार 18029
पुणे नागपूर हमसफर एक्सप्रेस 22141
कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 11039
-अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस12655
-मुंबई हावडा दुरांतो 12261

अनिश्चित काळासाठी एक विलंबाने धावत असलेल्या गाड्या : 

-अहमदाबाद नागपूर प्रेरणा एक्सप्रेस- 22138
-मुंबई हावडा मेल- 12809

रद्द झालेली गाडी :

भुसावळ बडनेरा मेमो पॅसेंजर 61101

एक्सप्रेसची अशी आहे स्थिती 

पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही सकाळी चार वाजता होती ती वरणगाव येथे थांबून आहे 

साडेचार वाजेची शालीमार एक्सप्रेस ही अजूनही भुसावळ येथे थांबली आहे. 

सहा वाजताची नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस ही तीन तासापासून जळगाव रेल्वे स्थानक येथे थांबली आहे 

सकाळी तीन वाजताची प्रेरणा एक्सप्रेस अजूनही बोदवडच्या जवळ थांबली आहे 

सकाळची चार वाजताची हावडा मेल वरणगाव येथे थांबली आहे 

मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

अनेक एक्सप्रेसचाही खोळंबा, प्रवाशांना मोठा त्रास

बोदवड येथे धान्याचा ट्रक मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये धडकल्यामुळे रेल्वे यंत्रणा ही विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना रेल्वे उशिरा असल्याने त्रासाचा सामना करावा लागत आहे. या अपघातामुळे नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस, सुरत पॅसेंजर, हावडा मेल, पुरी सुपरफास्ट, एक्सप्रेस शालिमार एक्सप्रेस,महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या जवळपास दोन ते तीन तासाने उशिराने असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

प्रयागराज में महाराष्ट्र का मोस्ट वांडेट भाजपा नेता गिरफ्तार:  हिरण-मोर के शिकार का शौकीन, विरोध पर किसान को बैट से पीटा था – Prayagraj (Allahabad) News

प्रयागराज में महाराष्ट्र का मोस्ट वांडेट भाजपा नेता गिरफ्तार: हिरण-मोर के शिकार का शौकीन, विरोध पर किसान को बैट से पीटा था – Prayagraj (Allahabad) News


महाराष्ट्र से फरार भाजपा पदाधिकारी सतीश भोंसले उर्फ खोक्या भाई को प्रयागराज से गिरफ्तार किया गया है। वह महाराष्ट्र के बीड जिले का मोस्ट वांटेड और भाजपा विधायक सुरेश धास का करीबी है।

.

खोक्या हिरन और मोर का शिकार करने का शौकीन है। उसकी सोशल मीडिया पर नोटों के बंडल के साथ, नोट उड़ाते हुए और लोगों को पीटते हुए वीडियो वायरल हैं। उस पर हत्या के प्रयास और अन्य गंभीर मामलों में केस दर्ज हैं।

खुद को डॉन बताने वाला खोक्या प्रयागराज से अयोध्या जाने की फिराक में था। महाराष्ट्र पुलिस ने लोकेशन ट्रेस करने के बाद उसके बारे में प्रयागराज पुलिस को पहले ही सूचना दे दी थी। प्रयागराज पुलिस ने आज उसे एयरपोर्ट के पास रास्ते में ही गिरफ्तार कर लिया।

पुलिस अधिकारी ने बताया-

भोसले के खिलाफ बीड जिले में हत्या के प्रयास के दो मामले और नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटेंस (NDPS) अधिनियम के तहत एक मामला दर्ज है। इसके अलावा, वह वन अधिनियम के तहत भी आरोपी है।

QuoteImage

3 फुटेज देखिए…

चलती गाड़ी में 500-500 के नोटों के बंडल समेटते हुए खोक्या ने VIDEO बनवाया।

चलती गाड़ी में 500-500 के नोटों के बंडल समेटते हुए खोक्या ने VIDEO बनवाया।

खोक्या और उसके सहयोगी ने हवा में नोट उड़ाए।

खोक्या और उसके सहयोगी ने हवा में नोट उड़ाए।

आरोपी ने नोटों की गडि्डयों को मेज फेंकते हुए रील्स बनवाई।

आरोपी ने नोटों की गडि्डयों को मेज फेंकते हुए रील्स बनवाई।

पुलिस ने सतीश के पीछे लगाया था मुखबिर प्रयागराज में ACP धूमनगंज पुष्कर वर्मा ने बताया- महाराष्ट्र पुलिस का आज एक ईमेल आया था। उसमें मोस्टवांटेड सतीश भोंसले उर्फ खोक्या के बारे में सूचना दी गई थी। सूचना मिलते ही एसओजी गंगापार की टीम को अलर्ट कर दिया। टीम ने उसकी घेराबंदी कर महाराष्ट्र पुलिस को अपनी तैयारी की जानकारी दी।

मुखबिर लगातार फोन से सतीश से कर रहे थे बात एसीपी के मुताबिक- प्रयागराज पुलिस से बात होने के बाद महाराष्ट्र पुलिस ने अपने मुखबिर को सतीश के पीछे लगाया। वे सतीश से लगातार फोन पर संपर्क में थे। उन्होंने बहाने से उसे एयरपोर्ट के पास मिलने के लिए बुलाया। यहां पर टीम पहले से ही मौजूद थी। उसके पहुंचते ही प्रयागराज पुलिस ने उसे दबोच लिया। उसे एयरपोर्ट थाने में लाया गया। कागजी कार्रवाई के बाद महाराष्ट्र पुलिस को उसकी गिरफ्तारी की सूचना दी गई।

सूचना मिलते ही महाराष्ट्र पुलिस उसे कस्टडी में लेने के लिए प्रयागराज के लिए रवाना हो गई। प्रयागराज पुलिस सतीश भोंसले को महाराष्ट्र पुलिस को सौंपने से पहले प्रयागराज कोर्ट में पेश करेगी। कोर्ट में पेशी के बाद उसे महाराष्ट्र पुलिस ट्रांजिट डिमांड पर अपने साथ ले जाएगी।

सतीश भोंसले पिता-पुत्र की पिटाई को लेकर सुर्खियों में आया था।

सतीश भोंसले पिता-पुत्र की पिटाई को लेकर सुर्खियों में आया था।

हिरण के शिकार का विरोध करने पर पिता-पुत्र को बैट से पीटा सतीश हिरण और मोर का शिकार करने का शौकीन है। वह 200 से अधिक हिरण का शिकार कर चुका है। बीड के पहाड़ों पर जाल लगाकर वह मोर का शिकार करता है। स्थानीय दिलीप ढकने और उसके बेटे ने रोका तो उसे बेरहमी से पीटा था।

पिटाई का एक वीडियो सामने आया था। जिसमें सतीश और उसके गिरोह के सदस्य दिलीप पर क्रिकेट बैट से हमला करते नजर आ रहे थे। दिलीप का बेटा बचाने दौड़ा तो उस पर कुल्हाड़ी से हमला किया था। इस मामले में भी सतीश और उसके गिरोह पर केस दर्ज है।

हत्या समेत 8 से ज्यादा केस सतीश भोंसले भाजपा की खानाबदोश जनजाति शाखा ‘भटके विमुक्त अघाड़ी’ का पदाधिकारी है। उसके पिता का नाम निराले भोंसले है। वह शिरुर कासर तहसील के जापेडवाड़ी का निवासी है। उसे भाजपा विधायक सुरेश धास का करीबी सहयोगी माना जाता है। महाराष्ट्र में उसके खिलाफ हत्या के प्रयास, अपहरण, रंगदारी समेत आठ से ज्यादा केस हैं।

वन विभाग की छापेमारी में सतीश के घर से कई आपत्तिजनक चीज बरामद हुई थी। सतीश पर वन्यजीवों की हत्या करने और उनके अवशेष अपने घर पर रखने के भी आरोप हैं।

भाजपा विधायक सुरेश धास सरपंच संतोष देशमुख की हत्या को लेकर सुर्खियों में हैं।

भाजपा विधायक सुरेश धास सरपंच संतोष देशमुख की हत्या को लेकर सुर्खियों में हैं।

विपक्ष ने सरपंच हत्याकांड में सुरेश धास को घेरा महाराष्ट्र का बीड जिला इन दिनों लगातार सुर्खियों में है। वजह- सरपंच संतोष देशमुख की हत्या है। स्थानीय विधायक सुरेश धास और एनसीपी नेता धनंजय मुंडे को भाजपा से बाहर करने की मांग उठी थी। हाल ही में मुंडे ने इस्तीफा दिया था, जब उनके करीबी सहयोगी वाल्मिक कराड को देशमुख की हत्या से संबंधित मामले में गिरफ्तार किया गया था।

—————————

पढ़ें ये भी जरूरी खबर…

दूसरी लड़कियों संग वीडियो देख लड़ने लगी तो मार डाला, कानपुर में आरोपी बोला- शादी नहीं करनी थी, कमरे पर बुलाकर गला रेता

शीतल से मेरी इंस्टाग्राम पर दोस्ती हुई थी। मैं उसके घर के पास ही एक अस्पताल में काम करता था। धीरे-धीरे नजदीकी बढ़ गई। मैंने यूं ही उसे फंसाया। शादी करने का कोई इरादा नहीं था, क्योंकि मेरे और भी कई लड़कियों से संबंध थे। मेरे मोबाइल में अन्य लड़कियों के साथ शीतल ने फोटो-वीडियो देखे तो झगड़ने लगी। इसीलिए मैंने उसका मर्डर कर दिया।

यह कबूलनामा है कानपुर के बर्रा में गर्लफ्रेंड की हत्या करने के आरोपी शिवम वर्मा का। आरोपी को पुलिस ने 24 घंटे के भीतर अरेस्ट कर लिया।

तस्वीर सोमवार की है। शव मिलने के बाद खाड़ेपुर नौबस्ता में परिजनों और पुलिस के बीच बहस हुई। पढ़ें पूरी खबर…



Source link

राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, IMDचा अंदाज काय? 

राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, IMDचा अंदाज काय? 


Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. अशातच वैदर्भीय लोकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) आज 11, 12 आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही  भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा(IMD Forecast) दिला आहे. 12 आणि 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिट व्हेवचा इशारा हवामान विभागाने दिला असून संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40 अंश पार जाण्याची शक्यता  

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा 37 डिग्रीच्या पार पोहचला आहे. अशातच आजपासून पुढच्या दोन तीन दिवसात चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40 अंश पार जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर यंदा सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितलं जातंय. साधारण 36 डिग्रीपर्यंत मार्च महिन्यात विदर्भातील तापमान असतो. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेनं शहरं आणखी तापण्याची शक्यता आहे. परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यभरात तापमानाचा भडका! हवामान विभागाचा अंदाज काय? 

दुसरीकडे, राज्याच्या तापमानात ही मोठी वाढ झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील तापमान वाढलं असून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी 37.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, तर ठाण्यात तापमान 38 अंशांवर गेल्याचे बघायला मिळाले. कुलाब्यात देखील तापमानच पारा 36.4 अंश सेल्सिअस होतं. मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. अशातच, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रासोबतच मुंबई महापालिकेकडून बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदूरबारमध्ये 39.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. तर  पुण्यात देखील तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचलंय.  पुण्यात काल (10 मार्च)36.9 अंशांची नोंद करण्यात आली आहे.पुण्यातील कोरेगाव पार्कात सर्वाधिक 39.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. विदर्भातील अकोल्यात तापमान 38.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. तर कोकणात आज (11 मार्च) वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागकडून वर्तविण्यात आला आहे.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp