हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला: माणिकराव कोकाटे

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला: माणिकराव कोकाटे


अमरावती: महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना (Farmers) पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ते शुक्रवारी अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) सुरु केली होती. मात्र, काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला. पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे, त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. पीक विमा योजनेबाबत चांगले-वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लुटमार करतात. सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही. पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे. पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल, असे  माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

पीक विमा योजनेत अशाप्रकारचे गैरप्रकार झाले आहेत की, बाकीच्या राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले, त्यातून असं वाटतंय की पीक विमा खूपच चांगली योजना आहे की काय. पण प्रत्यक्ष चौकशी केल्यावर आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज नामंजूर केलेत. सरकार त्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही. पण अशा पद्धतीने लोक अर्ज भरतात, कुठेतरी एजन्सी केंद्रावाले हे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरु आहे, त्याच्यावर कारवाई करण्यास सांगितलं आहे. पण याच्यात सुधारणे करणे आवश्यक आहे. 

पीक विम्यातील 4 लाख अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे आकृती बंद करून नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल. कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी एक सिरीजमध्ये नंबर देणार आहे. कृषी मंत्र्यापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हा परमनंट नंबर असेल, असे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी म्हटले.

पीक विमा प्रीमिअमची रक्कम वाढणार

वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयांत पिक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता असून पीक विमा योजना एक रुपयांत देण्याऐवजी 100 रुपयांत देण्याचा निर्णय होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयांतच पीक विमा ठेवण्याच्या निर्णय कायम करण्याची शक्यता आहे. पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण  1.71 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यापैकी 85 टक्के खातेदार शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.

आणखी वाचा

पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त ‘या’ शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!

अधिक पाहा..



Source link

भरधाव वाहन काळ बनून आलं अन्…, ट्रकच्या धडकेत माजी आमदार तुकाराम बिरकडांचा मृत्यू, VIDEO व्हाय

भरधाव वाहन काळ बनून आलं अन्…, ट्रकच्या धडकेत माजी आमदार तुकाराम बिरकडांचा मृत्यू, VIDEO व्हाय


अकोला –  अकोल्यातील मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिरकड (Tukaram Birkad) यांचं काल अपघाती निधन झालं. काल (गुरुवारी, ता-14) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. तुकाराम बिरकड (Tukaram Birkad) यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात तुकाराम बिरकड (Tukaram Birkad)  यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात मालवाहू टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी स्थानिक खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करत होते. तेव्हा या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातबरोबर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

कसा घडला अपघात?

अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे 800 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिरकड हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट लिहून तुकाराम बिरकड यांच्या निधनानंतर पोस्ट लिहली आहे. ‘विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो’.

‘माजी आमदार तुकाराम बिरकड हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं नेतृत्व होतं. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानंच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे’.

अधिक पाहा..





Source link

15 दिन से लापता महाराष्ट्र का जवान बैतूल में मिला:  बोला- मेरा ट्रेन से अपहरण हुआ; 48 घंटे में तीन बार बदले बयान, पुलिस उलझी – Betul News

15 दिन से लापता महाराष्ट्र का जवान बैतूल में मिला: बोला- मेरा ट्रेन से अपहरण हुआ; 48 घंटे में तीन बार बदले बयान, पुलिस उलझी – Betul News


गौड़ गुड्डू मुकेश को परिजन महाराष्ट्र के गोंदिया स्थित घर ले गए हैं।

31 जनवरी को विदिशा और भोपाल के बीच लापता हुआ जवान गौड़ गुड्डू मुकेश 12 फरवरी को बैतूल के चिचोली में मिला। उसने बताया- किसी ने मेरा ट्रेन से अपहरण किया था। मैं 12 दिन तक बेहोश रहा। आंख खुली तो कुछ लोग मुझे बोलेरो में कहीं ले जा रहे थे। मैं गाड़ी से कूद

.

गौड़ गुड्डू मुकेश (26) सेना की लद्दाख यूनिट में गनर है। वह छुट्‌टियां मनाने अपने घर महाराष्ट्र के गोंदिया आया था। 31 जनवरी को यूनिट के लिए लौटते वक्त ट्रेन से लापता हो गया था।

उधर, पुलिस का कहना है कि जवान की मानसिक स्थिति ठीक नहीं है। घायल होने की वजह से उसे चिचोली प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में भर्ती कराया गया था। वह बार-बार बयान बदल रहा था। हम हर एंगल से जांच कर रहे हैं।

बीएमओ राजेश अतुलकर ने बताया कि मुकेश की शारीरिक हालत अब ठीक है। उसके सीनियर अफसर और पिता उसे अपने साथ भंडारा ले गए हैं।

प्रत्यक्षदर्शी बोले- भागते हुए चाय की दुकान पर पहुंचा मुकेश को अस्पताल पहुंचाने वाले पूर्व जनपद सदस्य डोमा सिंह ने कहा- हम बुधवार रात करीब 8 बजे आलमपुर में एक दुकान पर चाय पी रहे थे। इसी दौरान युवक भागते हुए वहां पहुंचा। दो लोग उसके पीछे दौड़ रहे थे। युवक ने खुद काे आर्मी का जवान बताया। मौके से 500 मीटर दूर एक बोलेरो खड़ी थी।

जवान घबराया हुआ था। उसके शरीर पर ब्लेड से काटने के निशान थे। उसे घबराहट हो रही थी। हम उसे निजी वाहन से सीएचसी, चिचोली ले गए।

मुकेश ने कहा कि उसका किसी ने अपहरण कर लिया था। वह 12 दिन तक बेहोश रहा।

पुलिस को दिए तीन अलग-अलग बयान…

पहले कहा- सीधे 12 तारीख को होश आया पुलिस के मुताबिक, मुकेश ने पहले बयान में कहा- मैं इंडियन आर्मी में जॉब करता हूं। लद्दाख में मेरी यूनिट है। 31 जनवरी को 11 बजे गोंदिया स्थित अपने घर से यूनिट जाने के लिए निकला था। रिजर्वेशन कन्फर्म नहीं था। इसीलिए भंडारा से गोंडवाना एक्सप्रेस में जीआरपी वाले से बात कर बी-4 कोच की एक सीट पर लेट गया।

घर वालों से फोन पर भोपाल तक बात हुई। विदिशा से बीना के बीच मैं टॉयलेट गया। इस दाैरान बाजू से एक आदमी निकला। पता नहीं कैसे मैं बेहोश हो गया। फिर 12 तारीख को ही होश आया।

फिर कहा- होश आया तो हाथ पैर बंधे थे दूसरे बयान में मुकेश ने बताया- 31 जनवरी को मैं अपने घर से ड्यूटी पर जाने के लिए निकला। गोंडवाना एक्सप्रेस में बैठा। रात 8-9 बजे के बीच भोपाल से विदिशा स्टेशन के बीच वॉशरूम के लिए जाने लगा। इसी बीच मेरे सिर पर पीछे से किसी ने डंडा मारा। इसके बाद मुझे कुछ होश नहीं रहा।

जब होश आया तो मेरे हाथ पैर बंधे थे। आंख पर पट्टी थी। इसके बाद मुझे 12 तारीख को बोलेरो में कहीं ले जाया जा रहा था। गाड़ी स्लो हुई तो मैंने कूदकर भागने की कोशिश की। मैं एक जगह गिर पड़ा। जहां कुछ लोग इकट्ठा थे। उन लोगों ने मेरा बचाव किया। मुझे हॉस्पिटल लेकर आए। मेरे परिजन से पता चला कि मेरा सामान दिल्ली में जमा है।

तीसरा बयान- चोट कैसे आई, नहीं पता पुलिस के मुताबिक, तीसरे बयान में मुकेश बोला- मैं किस वाहन से यहां आया, मुझे नहीं पता। वह चोट के बारे में भी नहीं बता सका। उसने कहा कि यह कांच, चाइना मेड चाकू या ब्लेड की चोट हो सकती है।

मुकेश बैतूल में चिचोली के स्वास्थ्य केंद्र में भर्ती रहा था।

मुकेश बैतूल में चिचोली के स्वास्थ्य केंद्र में भर्ती रहा था।

पुलिस बोली- मानसिक स्थिति ठीक नहीं चिचोली थाने के एएसआई मुजफ्फर हुसैन ने बताया- मुकेश 31 जनवरी को भंडारा से ट्रेन के जरिए दिल्ली के लिए रवाना हुआ था। 1 फरवरी को वहां नहीं पहुंचा तो परिजन ने भंडारा में उसकी गुमशुदगी दर्ज करवाई थी।

मानसिक स्थिति ठीक नहीं होने से मुकेश अलग-अलग कहानी बता रहा है। उसके तीन-चार बार बयान दर्ज किए गए। उसका पीछा कितने और कौन लोग कर रहे थे, इसके बारे में भी जानकारी नहीं दे पा रहा है। अब तक इस मामले में कोई क्लू नहीं मिला है।

भंडारा पुलिस भी कर चुकी पूछताछ चिचोली पुलिस ने भंडारा में डिस्ट्रिक्ट कमांडर किरण गोस्वामी को जानकारी दी। गुरुवार को भंडारा से मुकेश के पिता मुखबिर सिंह के साथ पुलिस चिचोली पहुंची और जवान से पूछताछ की।

बैतूल एसपी निश्चल एन झारिया ने बताया- कॉल डिटेल से जानकारी मिली है कि जब मुकेश ट्रेन में यात्रा कर रहा था, तब बीना तक उसकी फोन पर परिजन से बात होती रही। इसके बाद वह कहां रहा, इसकी जांच कर रहे हैं।

भंडारा पुलिस मुकेश को अपने साथ ले गई है।

भंडारा पुलिस मुकेश को अपने साथ ले गई है।

ये खबर भी पढ़ें…

ग्वालियर से किडनैप बच्चा 14 घंटे बाद मिला

ग्वालियर से गुरुवार सुबह करीब 8 बजे किडनैप हुआ शक्कर कारोबारी का 6 साल का बेटा शिवाय 14 घंटे बाद रात करीब 10 बजे मिला। बदमाश उसे मुरैना में बंशीपुर के कांजी बसई गांव में ईंट भट्‌टे के पास छोड़कर भाग गए थे। शिवाय यहां एक जगह पर खड़ा रो रहा था। वहां से गुजरे एक ई-रिक्शा वाले ने उसे पहचान लिया कि वह ग्वालियर से किडनैप हुआ है। पढे़ं पूरी खबर…



Source link

तहसीलदार राहुल पाटील यांचे निलंबन;  खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 

तहसीलदार राहुल पाटील यांचे निलंबन; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 


अमरावती: अमरावतीच्या (Amravati News) मोर्शीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. तर या संदर्भात भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.  

खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राहुल पाटील विरुद्ध जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. यात आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाज, गौण खनिजाच्या कामात अनियमितता केल्याची पाटील यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरुन राहुल पाटील यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय तहसीलदार राहुल पाटील यांची आता विभागीय चौकशीही होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अमरावतीच्या मोर्शीचे तहसिलदार राहूल पाटील आपल्या पदावर कार्यरत असताना निवडणूक विषयक कामकाज करताना, नैसर्गीक आपत्ती, गौणखनिज उत्खनन-वाहतूक व शासनाच्या प्राधान्य क्रमातील विषयात अक्षम्य दिरंगाई केल्याचं राज्यपाल यांच्या आदेशात म्हटले आहे. तसेच कार्यालयीन शिस्त पाळत नसल्याचे, तसेच बेजबाबदार कारभारामुळे महसूल विभागाची व शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने राहुल पाटील यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने राहूल पाटील यांना निलंबित करणे आवश्यक असल्याचे ही त्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आदेश अंमलात असेपर्यंत राहूल पाटील यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. तसेच  निलंबनाच्या कालावधीत तहसिलदार राहूल पाटील यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल. शिवाय निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील. असेही या शासन आदेशात म्हटले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

राज्यातील उर्दू शाळांमध्ये चार ते पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार, प्यारे खान यांचा आरोप

राज्यातील उर्दू शाळांमध्ये चार ते पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार, प्यारे खान यांचा आरोप


अकोला : राज्य सरकारकडून अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. दरम्यान, प्यारे खान यांनी केलेल्या आरोपानंतर अकोला पोलिसांनी उर्दू शाळेचा संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत असल्याचाही गंभीर आरोप प्यारे खान यांनी केला. पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. उर्दू शाळेत होत असलेल्या या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

संस्थाचालकाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या अकोला दौऱ्यानंतर अकोला पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं. पातुर येथील काँग्रेस नेते आणि संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन सय्यद इस्माईल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 75, 308 (2) आणि 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद कमरोद्दिन अध्यक्ष असलेल्या पातूरच्या किल्ला भाग प्राथमिक शाळेतील शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संस्थाचालक सय्यद कमरोद्दिन याने शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार आहे. 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळेला भेट दिली. खान यांच्या भेटीत शाळेतील अनेक महिला शिक्षकांनी कमरोद्दिन याच्या अत्याचाराचा पाढा वाचला. महिला शिक्षिकांचा मानसिक शारीरिक आणि लैंगिक छळ करण्याच्या अनेक तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी  कारवाई करत गुन्हा दाखल केला. 

कमरोद्दीन याच्या संस्थेच्या जिल्ह्यात एकूण 22 उर्दू शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कमरोद्दीन शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांवर विविध अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

प्यारे खान यांचा आरोप काय? 

– राज्यातील सरकारचे अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार.
– या शाळांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून वर्षाकाठी चार ते पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार होत आहे.
– राज्यातील अनेक उर्दू शाळांमध्ये लैंगिक छळासारख्या गंभीर बाबी होत आहेत.
– पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधला हा भ्रष्टाचार उघड करणार.
– निवडणूक काळात याच भ्रष्टाचारातला पैसा काँग्रेसच्या प्रचारात वापरण्यात आला.
– या भ्रष्टाचारात सहभागी कुणालाही सरकार पाठीशी घालणार नाही.
– राज्यात बटेंगे तो कटेंगे, व्होट जिहादसारख्या मुद्दांपेक्षा इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत.‌ अशी भूमिका मांडणाऱ्यांची तक्रार करू.
– नितेश राणेंच्या विषयावर आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. 
– मुस्लिमांविरुद्ध भूमिका सरकारची नाही आणि ते‌ कुणीही सहन करणार नाही.

 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

मुलाचा सिबिल स्कोअर कमी आल्यानं अकोल्यात लग्नं मोडल्याचं प्रकरण, समोर आलं खरं कारण, ‘ABP माझा’च

मुलाचा सिबिल स्कोअर कमी आल्यानं अकोल्यात लग्नं मोडल्याचं प्रकरण, समोर आलं खरं कारण, ‘ABP माझा’च


Akola: ‘सिबिल’ खराब असल्यामुळे अनेकांचं घराचं स्वप्नं तुटल्याचं तुम्ही अनेकांनी पाहिलं आणि ऐकलं असेल. मात्र, ‘सिबिल’मुळे लग्न तुटल्याची एक बातमी सध्या समाज माध्यमांवर अक्षरशः धुमाकूळ घालतेय.‌अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण? खरंच ‘सिबिल’मुळे एका तरुणाचं लग्न तुटलं आहे का? पाहूयात, ‘एबीपी माझा’चा रियालिटी चेक. (Akola)

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरच्या एका बातमीचा सध्या सर्वच प्रकारच्या सोशल माध्यमांवर धुमाकूळ सुरू आहेय. ही बातमी आहे ‘सिबिल’मुळे लग्न तुटल्याची खरंच ही बातमी सत्य आहे का? नेमकं काय घडलं मुर्तीजापुरमध्ये? याचा आढावा ‘माझा’ने घेतला. यात मुर्तिजापूरमध्ये एक नव्हे तर दोन तरुणांचा विवाह ‘सिबील’ कमी असल्याने मोडल्याचं समोर आलंय. मात्र, दोन्ही कुटूंब समोर यायला तयार नाहीये. स्थानिकांनी सिबिल खराब असल्यानं लग्न तुटल्याची घटना खरी असल्याचं सांगितलंय. (Cibil Score)

“हो, घटना खरी आहे!” स्थानिकांचा दावा

‘ABP माझा’ने स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांशी तसेच  दोन्ही तरुणांच्या घरच्यांशी याप्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी  संवाद साधला. यावेळी वकील राधिका काळे यांनी अशा घटनांचा उल्लेख केला. तसेच, नागरिक विष्णू लोडम आणि माधव पाटील यांनीही ही घटना खरी असल्याचे सांगितले.मात्र, समाजात बदनामी होईल, या भीतीने दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर काहीही बोलायला नकार दिलाय. मात्र, मूर्तीजापुरकर ही घटना झाल्याचं सत्य असल्याचं सांगतायेत.

विवाह इच्छुक तरुणांसाठी धोक्याची घंटा?

मुर्तीजापुरची घटना ही विवाह इच्छुक तरुणांसाठी धोक्याची घंटा असल्याचे समाजात काम करणाऱ्या लोकांना वाटतंय. आतापर्यंत घराच्या किंवा गाडीच्या कर्जासाठी ‘सिबिल’ महत्त्वाचा मानला जायचा. मात्र, आता विवाह जुळवतानासुद्धा ‘सिबिल स्कोअर’ तपासला जातोय का? हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. विवाह जुळवताना आता “घर आहे का?”, “नोकरी आहे का?” यासोबत “सिबिल स्कोअर चांगला आहे का?” हेही पाहिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे “लग्न करायचं असेल तर आधी सिबिल सुधरवा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे!

सध्या अनेक सामाजिक समस्यांमुळे अनेक तरुणांची लग्न होत नाहीयेत. घराच्या स्वप्नाच्या मार्गात अडसर बनत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला ‘सिबिल’ आता विवाह इच्छुक तरुणांच्याही मानगुटीवर बसतो की काय?, अशी परिस्थिती यामुळे निर्माण झालीये. त्यामुळे “लग्न करायचं असेल तर सिबिल सुधरव”, असं म्हणण्याची वेळ आता आलीये.

हेही पहा:

हेही वाचा:

स्क्वॉड आला रे… इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp