अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे कारनामे समोर; पोलिसांशी कनेक्शन, आमदारां

अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे कारनामे समोर; पोलिसांशी कनेक्शन, आमदारां


अकोला: अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादार याचे अनेक वादग्रस्त कारनामे ‘एबीपी माझा’च्या हाती लागले आहेत. एमडी ड्रग्स विक्री प्रकरणात अकोल्यातल्या खदान पोलिसांनी काल (बुधवारी,ता-16) दोघांना अटक केली. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक खान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेल्या एमडी ड्रग्सचं वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम इतकं आहे. तिसरा आरोपी गब्बर जमादार हा अद्याप फरार आहे. दरम्यान, अकोल्यातल्या गौरक्षण रस्त्यावरील मातृभूमी प्रेस परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. (Akola Crime news)

आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता

अटकेतील मोहम्मद यासीन हा आरोपी ‘बीएएमएस’च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने गब्बर जमादारचा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट केलं आहे. गब्बरचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतही फोटो असल्याचं समोर आलं आहे. (Akola Crime news)

गब्बर जमादारचे व्हिडिओ ‘माझा’च्या हाती

पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या गब्बर जमादारचे अनेक कारनामे ‘एबीपी माझा’च्या हाती (Akola Crime news) लागलेले आहेत. एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि कायंदे नावाच्या आणखी एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालतानांचा व्हिडिओ ‘माझा’च्या हाती आले आहेत. यासोबतच पोलिसांच्या पथसंचालनात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालतांनाचाही व्हिडिओ समोर आला आहे. वाढदिवसाचा केक कापतांना गब्बरच्या कार्यकर्त्याच्या हाती तलवार असलेले फोटो समोर आलेले आहेत. गब्बरचे पंचगव्हाण परिसरात अनेक अवैध धंदे असल्याची सूत्रांंची माहिती आहे. पोलिसांचा अतिशय जवळचा मित्र असलेल्या गब्बरच्या धंद्यांकडे पोलिसांचं दुर्लक्ष कसं?, दुर्लक्ष झालं असेल तर त्याचा ‘अर्थ’ काय? याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर यामुळे पोलिसांच्या देखील कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पंचगव्हाणमधील गब्बरच्या मालकीच्या ‘ऑरो वॉटर प्लांट’वर पोलिसांची नियमित उठबस असल्याचं समोर आलं आहे. फरार गब्बरला अटक झाली तर ड्रग्ज पेडलरचं मोठं ‘अकोला कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गब्बर हाच अकोला आणि परिसरातील प्रमुख ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा



Source link

अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी उघड! BAMS च्या विद्यार्थ्यासह दोनजण अटकेत, एकजण फरार

अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी उघड! BAMS च्या विद्यार्थ्यासह दोनजण अटकेत, एकजण फरार


अकोला : गौरक्षण रोड परिसरात खदान पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 30 हजार रुपयांचं एमडी ड्रग्स (46.30 ग्रॅम) जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक बीएएमएस दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे, तर या प्रकरणातील फरार आरोपी ‘गब्बर जमादार’ वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या धक्कादायक खुलास्यामुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

घटना नेमकी कशी उघडकीस आली?

खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात दुचाकीवरून दोन जण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावर सापळा रचला.

संशयित दुचाकीस्वारांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांच्या अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडे एमडी ड्रग्सचा साठा आढळून आला. त्याचं एकूण वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम असून, बाजारभावानुसार याची किंमत अंदाजे 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.

अटक झालेल्या आरोपींची पार्श्वभूमी काय आहे?

मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ (वय 23)

मूळ रहिवासी: पंचगव्हाण, ता. तेल्हारा, जि. अकोला

सध्या: फिरदोस कॉलनी, गवळीपुरा, अकोला

शैक्षणिक माहिती: बीएएमएस दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी

मुस्ताक खान हादीक खान (वय 47)

रहिवासी: गफुरवाला प्लॉट, अकोला

हे दोघेही अकोल्यात अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.

फरार आरोपी कोण?

या प्रकरणातील तिसरा संशयित ‘गब्बर जमादार’ हा सध्या फरार आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तो वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. ‘पोलीस मित्र’ म्हणूनही त्याची नियुक्ती होती. अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो आहेत.

या राजकीय आणि पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या ओळखीमुळे तपासाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली?

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार:

पोलीस निरीक्षक मनोज केदारे

उपनिरीक्षक योगेंद्र मोरे

एएसआय दिनकर धुर

अंमलदार संजय वानखडे, रवि काटकर, विजय मुलनकर

शहराच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रावर सावट

या प्रकरणाची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, अटकेत असलेला एक आरोपी वैद्यकीय शिक्षण घेत असलेला युवक आहे. शहरात उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणांमध्ये जर अशा स्वरूपाचे गुन्हे वाढत असतील, तर ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

त्याचप्रमाणे, पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर जर असे गंभीर आरोप लागतात, तर पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहतं.

ड्रग्सविरोधात सामाजिक जागृती हाच उपाय!

या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की, एमडी ड्रग्ससारखे जीवघेणे अमली पदार्थ आता लहान शहरांमध्येही मुळं रोवू लागलेत. याला आळा घालण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही, तर शाळा, महाविद्यालयं, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनीही सक्रिय भूमिका घेणं अत्यावश्यक आहे. या कारवाईने एक साखळी उघड झाली आहे… पण संपूर्ण नेटवर्क शोधून त्याचा बीमोड करणं, ही खरी कसरत आहे.

आणखी वाचा



Source link

राजकारणानंतर आता कृषी क्षेत्रातही गाजणार ‘अकोला पॅटर्न’, सघन कापूस लागवड क्रांतीदेशभर लागू

राजकारणानंतर आता कृषी क्षेत्रातही गाजणार ‘अकोला पॅटर्न’, सघन कापूस लागवड क्रांतीदेशभर लागू


अकोला : कापूस उत्पादनात भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतो आहे.. सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव…. अनेक शेतकरी आता संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा ‘अकोला पॅटर्न’ आकाराला आणत आहेत… 11 जुलैला कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी 2030 पर्यंत 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’ने कापूस लागवड राबवण्याची मोठी घोषणा केली आहे. आता कपाशीचं भविष्य अकोल्याच्या मातीत लिहिलं जात आहे.

भारत हा कापूस उत्पादनात जगातील सर्वात मोठा देश आहे. देशात जवळपास 130-140 लाख हेक्टर क्षेत्रफळावर दरवर्षी कापूस लागवड केली जाते. मात्र या क्षेत्रफळाच्या तुलनेत भारताची उत्पादकता अजूनही अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे.

जागतिक उत्पादकतेचा तुलनात्मक आढावा (2024 आकडेवारीनुसार):

USA: सुमारे 950–1000 किलो/हेक्टर

ब्राझील: सुमारे 1800 किलो/हेक्टर

चीन: 1600 किलो/हेक्टर

भारत: केवळ 450–500 किलो/हेक्टर

या पार्श्वभूमीवर, भारतात उत्पादनवाढीच्या नव्या तंत्रज्ञानांची, पद्धतींची गरज प्रकर्षानं जाणवत होती. आणि यातूनच अकोल्यात सुरू झालेला एक प्रयोग, संपूर्ण देशाच्या शेती धोरणात क्रांती घडवतोय.

‘अकोला पॅटर्न’: अकोल्यातून देशभर…

11 जुलै 2025 रोजी तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत भारताचे केंद्रीय कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी जाहीर केलं की, “2030 पर्यंत भारतात 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’द्वारे कापूस लागवड केली जाणार आहे.”

सघन पद्धत’ म्हणजे काय? :

अकोल्यातील दिलीप ठाकरे या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक कापूस लागवडीला पर्याय म्हणून सघन कापूस लागवड पद्धती विकसित केली. पारंपरिक पद्धतीत एका एकरात सरासरी 6-7 हजार झाडं लावली जातात. पण सघन पद्धतीत 30-40 हजार झाडं एकाच एकरात लावली जातात.

सघन पद्धत:

20cm x 20cm अंतराने झाडं

एकरी 29 ते 40 हजार झाडं

योग्य वाण निवड (उभट वाढ, बुटके, कमी अंतरात बोंडं)

एकरी 15-18 क्विंटल उत्पादन

पारंपरिक पद्धत:

6-7 हजार झाडं एकरी

4-5 क्विंटल सरासरी उत्पादन

पावसावर आधारित, अनिश्चितता

सघन पद्धतीतील मुख्य वैशिष्ट्ये:

20 सेमी x 20 सेमी अंतराने रोपांची लागवड

बुटके, उभट वाढणारे, कमी अंतरात बोंडं येणारे वाण

सिंचन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं तंत्रशुद्ध नियोजन

उत्पादन: एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत

2017 मध्ये दिलीप ठाकरे यांनी एकरी 18 क्विंटल कापसाचं विक्रमी उत्पादन घेतलं होतं!

दिलीप ठाकरे यांचा प्रयोग आता देशभरात :

दिलीप ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र अशा 9 राज्यांमध्ये ‘अकोला पॅटर्न’नं लागवड केली जाते. त्यांच्या यशामुळे त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर करण्यात आली आहे.

वैज्ञानिक बळकटी : पीडीकेव्हीचा पुढाकार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV) या पद्धतीच्या संशोधनात आणि प्रसारात पुढे आलं आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यात 3,000 हेक्टरवर लागवड झाली असून, पुढील हंगामात हे क्षेत्र 50,000 हेक्टरवर नेण्याचं लक्ष्य आहे.

कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणतात, “शास्त्रशुद्ध शेती, योग्य वाण, तंत्रशुद्ध पद्धती आणि शेतकऱ्याचं समर्पण… यावर आधारित सघन लागवड ही देशातील कापूस शेतीचं भविष्य ठरू शकते.”

जागतिक स्तरावर भारताची उत्पादकता अजूनही मागे

जगातील सुमारे 24 टक्के कापूस क्षेत्रफळ भारतात असलं, तरी उत्पादनाच्या बाबतीत आपण चीन, ब्राझीलसारख्या देशांच्या तुलनेत खूपच मागे आहोत. त्याचं मुख्य कारण म्हणजे:

पारंपरिक लागवडीतील कमी झाडं

पावसावर अवलंबून सिंचन

आधुनिक तंत्रज्ञानाची मर्यादित अंमलबजावणी

‘अकोला पॅटर्न’ ही नवी शेती क्रांती!

‘प्रकाश आंबेडकरांच्या अकोला पॅटर्न’ने राजकारणात चर्चा निर्माण केली, तसाच शेतीतल्या ‘अकोला पॅटर्न’ ने देशभरात कापूस उत्पादनाची नवी क्रांती सुरू केली आहे.हा पॅटर्न केवळ उत्पादनच नाही, तर उत्पन्न आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढवतोय. शेतकऱ्याच्या डोळ्यांत नव्या आशेची किरणं दिसतायत… आणि त्या आशेचं नाव आहे – ‘अकोला पॅटर्न’!



Source link

दो पॉलिटिकल पार्टी के ठिकानों पर आयकर रेड:  500 करोड़ का लिया बोगस चंदा, कमिशन काटकर वापस लौटाई रकम – Jaipur News

दो पॉलिटिकल पार्टी के ठिकानों पर आयकर रेड: 500 करोड़ का लिया बोगस चंदा, कमिशन काटकर वापस लौटाई रकम – Jaipur News



देशभर में करीब 150 ठिकानों पर केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) के निर्देश पर आयकर छापे की कार्रवाई की गई। आयकर विभाग के जांच का दायरा बढ़ने पर 2 पॉलिटिकल पार्टी के ठिकानों पर रेड की गई। राजस्थान आयकर विभाग की अन्वेषण शाखा की ओर से दोनों पॉलिटिकल पार

.

दरअसल, आयकर विभाग ने कटौतियों और छूटों के फेक दावों को लेकर देशभर में करीब 150 ठिकानों पर सोमवार 14 जुलाई को छापेमारी की कार्रवाई की शुरुआत की। जांच में आईटीआर तैयार करने वाले और बिचौलियों की ओर से संचालित संगठित गिरोह का पर्दाफाश हुआ है। महाराष्ट्र, तमिलनाडु, दिल्ली, गुजरात, पंजाब और मध्य प्रदेश में तलाशी और जब्ती कार्रवाई में विभिन्न ग्रुपों और संस्थाओं की ओर से धोखाधड़ी करने के सबूत मिले।

बढ़ाया जांच का दायरा, 2 पॉलिटिकल पार्टी मिली राजस्थान आयकर विभाग की अन्वेषण शाखा ने जांच का दायरा बढ़ाया गया। इनकम टैक्स जालसाजी संगठित गिरोह के संपर्क में मध्यप्रदेश की भारतीय सामाजिक पार्टी और महाराष्ट्र की युवा भारत आत्मनिर्भर दल का होना सामने आया। दोनों ही पॉलिटिकल पार्टी के ठिकानों पर आयकर विभाग ने छापेमारी शुरू की। आयकर टीमों ने दोनों पॉलिटिकल पार्टी के महाराष्ट्र, मध्यप्रदेश और राजस्थान में 10 ठिकानों पर रेड की। भारतीय सामाजिक पार्टी का रजिस्टर्ड ऑफिस मध्यप्रदेश के अलीराजपुर और युवा भारत आत्मनिर्भर दल का महाराष्ट्र के औरंगाबाद में हैं। भारतीय सामाजिक पार्टी के बैंक अकाउंट राजस्थान के भीलवाड़ा शहर में मौजूद है।

पिछले 3 साल का मिला ब्योरा आयकर विभाग की जांच में सामने आया है कि दोनों पॉलिटिकल पार्टी चंदे में आए रुपयों को राजनीतिक गतिविधियों में यूज नहीं लेती थी। दोनों ही पार्टियों की ओर से कमिशन पर बोगस चंदा लिया जाता था। आयकर टीमों की कार्रवाई में पिछले 3 साल में दोनों पॉलिटिकल पार्टी के 500 करोड़ रुपए का बोगस चंदा लेने का पता चला है। दोनों ही पार्टियों को काफी चंदा राजस्थान के अनेक लोगों से मिला है। डोनेशन के जरिए मिलने वाले रुपयों में पार्टी की ओर से अपना कमिशन रोककर बोगस चंदा कैश लौटा देते थे।

बोगस डोनेशन वालों पर गिरेगी गाज आयकर विभाग की ओर से चंदे के अलावा फर्जी चिकित्सा खर्च, बच्चों की फर्जी ट्यूशन फीस, मकान किराया आदि की रसीदों को लेकर ली जा रही छूट के फर्जीवाड़े में लिप्त लोगों पर कार्रवाई की जा रही है। इस तंत्र में काफी सीए, कर सलाहकार सहित विभिन्न व्यक्तियों के शामिल होने पर उन्हें कवर किया गया है। आयकर विभाग की अगली कार्रवाई बोगस डोनेशन देने वाले आयकर करदाताओं पर हो सकती है।



Source link

महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणारा अधिकारी निलंबित, नितीन देशमुखांचे आंदोलन मागे

महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणारा अधिकारी निलंबित, नितीन देशमुखांचे आंदोलन मागे


अकोला : बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं ठिय्या आंदोलन अखेर सात तासांनंतर मागे घेण्यात आलं. देशमुख यांच्या आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी डी. बी कपिले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एस.एस. गव्हाणकर यांनी हे आदेश दिलेत.

अधिकाऱ्यांची महिलेकडे शरीरसुखाची मागणी

अकोला येथील नेहरू पार्क चौकातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय कार्यालयात आमदार नितीन देशमुखांची ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मूर्तीजापूर कार्यालयातील उपविभागीय अधिकारी डी. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांनी एका महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात त्यांनी केला.‌

यासंदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही दोन्ही आरोपींवर कारवाई करण्यास प्रशासनानं टाळाटाळ केली होती. त्यामुळे देशमुखांनी शिवसैनिक आणि पिडीत महिलेसह आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप केले. लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असा आरोप देशमुखांनी केला. महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नितीन देशमुखांनी केली होती. मात्र ही लक्षवेधी येऊ न देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी टाळाटाळ केली, ते मॅनेज झाले असा आरोप देखमुखांनी केला.

दोन अधिकाऱ्यांवर आरोप

मूर्तिजापूरच्या जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेकडून शाखा अभियंता राजेंद्र इंगळे आणि उपविभागीय अधिकारी डी. बी कपिले यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप त्या महिलेनेच केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

विधानसभा अध्यक्षच मॅनेज, आमदाराचा आरोप; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध लक्षवेधी मांडू देईना

विधानसभा अध्यक्षच मॅनेज, आमदाराचा आरोप; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध लक्षवेधी मांडू देईना


Nitin Deshmukh अकोला : अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यलयात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचे ठिय्या आंदोलन सुरुये. गेल्या 2 तासापासून आमदार देशमुख यांचं ठिय्या आंदोलन सुरुये. मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डि.बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहे. दरम्यान, या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे.

विधानसभा अध्यक्ष मॅनेज झालेत : आमदार नितीन देशमुख 

दरम्यान, या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती, मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावे, कारण, असे आरोपी असलेले अधिकारीच सांगत असल्याचं स्पष्टपणे देशमुख म्हणालेय. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचं ते म्हणालेय. 

मुर्तीजापुर मतदारसंघाच्या आमदाराचे पाठबळ,  पिडीत महिलेचा आरोप

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केलेत त्या कपिले यांच्यामागे मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप केलाय. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केलाय. 

विधानपरिषदेत आज मध्ये महत्वाचे काय?

1) पंडिता रमाबाई मुक्ती मिशन तालुका दौंड या संस्थेमध्ये गरीब असह्य मुली महिला यांच्या करिता सेवेच्या नावाखाली ख्रिच्छन धर्मामध्ये धर्मांतर केली जात असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधले आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे 

2) राज्यातील गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस, विक्रीस, वाहतुकीस बंदी असून देखील अनधिकृत पणे वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस अली आहे. नुकतीच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 56 हजार किलो गोमांस घेऊन जाणारे दोन कंटेनर जप्त करण्यात आले होते. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दररोज 20 ते 25 टन गोमांस विक्री तेलंगणा येथे होत असल्याची बाब समोर आली आहे. सातत्याने उघडकीस येणाऱ्या या घटना पाहता अशा गुन्हे करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच गो तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कडक कायदा हिवाळी अधिवेशनात करावा अशी मागणी आमदार श्रीकांत भारती यांनी केली आहे. 

3) मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे.पुरुषांसाठी असलेल्या एका सामुदायिक शौचालयाचा वापर 86  पुरुष करत आहे तर स्त्रियांसाठी असलेल्या एका शौचालय हे 81 महिला वापरत आहेत. मुंबईतील ह्या सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे आमदार सुनील शिंदे आणि प्रसाद लाड यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.

4) राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला मागील तीन महिन्यांपासून निधी मिळाला नाही. याकडे नियम 93 अन्वये आमदार अरुण लाड लक्ष वेधतील 

5) मुंबईतील कबुतर खाणे बंद केल्यानंतर कबुतर निवासी इमारतीमध्ये आश्रय घेण्याची शक्यता असल्याने त्यांना विजनवासात सोडण्याबाबत ठोस उपाययोजना हाती घेण्यात बाबत नियम 93 अन्वये आमदार सुनील शिंदे निवेदन करतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link