अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत

अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत


अमरावती : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महिला पोलीस (Police) हत्या प्रकरणाचे गुढ अखेर पोलीस तपासात उलगडले असून पतीनेच महिला पोलिसाच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आलं आहे. राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयात असलेला आरोपी पती राहुल तायडेनेच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. अमरावतीतील (Amravati) आपल्या दोन मित्राच्या मदतीने पत्नीच्या गळा दाबून पतीनेच महिला पोलिसाची हत्या केली असून आरोपी पतीने एक महिन्यापूर्वी या हत्याकांडाचा कट रचल्याचेही तपासातून उघड झाले आहे. आता, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीला हजर करुन अधिकची पोलीस कोठडी मागून हत्याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येईल. तसेच, शवविच्छदेन अहवालाकडेही पोलिसांचे लक्ष लागले आहे.  

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत काल (1ऑगस्ट ) राहत्या घरीच महिला पोलीस अंमलदाराची हत्या झाली होती. आशा धुळे (तायडे) वय 38 वर्षे असे या मृतक पोलीस अंमलदार महिलेचं नाव आहे. मात्र, ही हत्या नेमकी का? आणि कुठल्या कारणातून झाली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अशातच आज (2 ऑगस्ट) महिला पोलीस अंमलदाराचं शवविच्छेदन केल्यानंतर शविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतर मृत्यूच कारण समोर येईल. मात्र त्यापूर्वी संशयाची सुई पतीकडे वळल्याने पोलिसांनी रात्रीच पतीला अटक केली. त्यानंतर, पोलिसांनी अधिक तपास केला असता पतीनेच मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.

विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. डीसीपी गणेश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनने परिसरासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

आरोपीचे बाहेरच्या महिलेसोबत प्रेमसंबंध

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. आरोपी राहुलचे एका महिलेशी प्रेम प्रकरण होते, त्यातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. 4 ते 5 वर्षापासून आरोपीचे बाहेरील महिलेशी प्रेम प्रकरण होते, यासंदर्भाने पत्नीने अगोदरच पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. विशेष म्हणजे आरोपी आणि मृत पत्नी यांचा प्रेम विवाह झाला होती, अशी देखील माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. 

हेही वाचा

दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?

आणखी वाचा



Source link

महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; महिलेनं कानशिलात लगावली अन्… सीसीटीव्हीत घटना

महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; महिलेनं कानशिलात लगावली अन्… सीसीटीव्हीत घटना


Amravati: अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत प्रशासनाची शिस्तच धाब्यावर बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. येथे महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात कार्यालयातच उघडपणे फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. (Amravati Crime)

अमरावती जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत थेट ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाईल हाणामारीचा थरार पाहायला मिळाला. महिला सरपंच पद्मा मेसकर आणि ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेच्या वादावरून जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता वातावरण तापलं. वाद एवढा पेटला की महिला सरपंचाने थेट सदस्याच्या कानशिलात लगावली. यानंतर सदस्यानेही प्रतिउत्तर दिलं आणि दोघांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की सुरू झाली. या संपूर्ण घटनेचं थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

नेमकं घडलं काय?

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनी एकमेकांवर थेट हात उचलला. कार्यालयातील कामकाज सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली. या हाणामारीचे दृश्य कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येते. 

प्राथमिक माहितीनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेच्या “नमुना आठ अ फेरफार” संदर्भात हा वाद निर्माण झाला होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि काही क्षणांतच तो मारहाणीत बदलला. या हाणामारीत दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून, उपस्थित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं. या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, ग्रामपंचायत कार्यालयातच असे प्रकार घडणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, स्थानिक पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेजही तपासात घेतले आहे.गाव पातळीवरील लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारे वागू लागले, तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार? असा प्रश्न सध्या गावकऱ्यांमधून विचारला जात आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीची प्रतिमा मलीन झाली असून, या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे…

आणखी वाचा



Source link

अशी ही बोगसगिरी… बड्या कंपनीच्या एक्स्पायर सीमेंटचं रिपॅकिंग; दोघांना अटक, 1446 पोती जप्त

अशी ही बोगसगिरी… बड्या कंपनीच्या एक्स्पायर सीमेंटचं रिपॅकिंग; दोघांना अटक, 1446 पोती जप्त


अमरावती : भेसळ किंवा बनावट वस्तूंची विक्री करुन जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. अनेकदा लहान-सहान व्यापाऱ्यांकडून ही फसवेगिरी केली जाते. तसेच, गेल्या काही महिन्यात बोगस खते व बी बियाणांची विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. मात्र, आता चक्क बड्या कंपनीच्या सिमेंटची रिपॅकिंग करुन बोगसगिरी केली जात असल्याचे समोर आलं आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तीन ठिकाणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकत रिपॅकींग केले जाणारे सिमेंट (Cement) ताब्यात घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, दोघांना अटकही करण्यात आलीय.  

अमरावतीमध्ये एका नामांकित कंपनीच्या मुदतबाह्य ‘एक्सपायर’ झालेल्या सिमेंटची त्याच कंपनीच्या बॅगमध्ये रिफिलिंग करुन त्याची राजरोसपणे विक्री करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हानून पडला. अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस पथकाने रोजरोसपणे होत असलेल्या विक्रीच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे. अमरावतीच्या मासोद, काटआमला आणि नवसारी येथील गोडाऊनमधून  निकृष्ट सिमेंटची 1446 पोती जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील सर्वाधिक 900 ते 950 पोती मासोद येथील गोडाऊनमध्ये आढळून आली आहेत. या गोदामात नामांकित अंबुजा आणि अल्ट्राटेक कंपनीचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट रिपॅकींग करत नव्याने विक्रीसाठी तयार केला जात होते, पोलिसांनी गोडाऊमधील मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

पंढरपुरात बोगस रासायनिक खतं जप्त

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात बोगस रासायनिक खत तयार करून शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलिसांसह कारवाई करत विठ्ठल खत कारखान्यावर छापा टाकून तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांचे बनावट खत जप्त केले. यावेळी 700 पोत्यांमध्ये हे खत साठवण्यात आलेले आढळून आले.

हेही वाचा

… तर तुमची अटक होईल, राज ठाकरेंचं भाषणातून सरकारला चॅलेंज; गृहमंत्री फडणवीसाचं थेट प्रत्युत्तर

आणखी वाचा



Source link

अमरावतीत महिला पोलीसाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू; गळ्यावर व्रण, पोलीस पतीला अटक

अमरावतीत महिला पोलीसाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू; गळ्यावर व्रण, पोलीस पतीला अटक


Amravati Crime News : अमरावतीतील महिला पोलीस हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून महिला पोलीस अमलदाराच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती राहुल तायडे याला पोलिसांनी अटक (Crime News) केली आहे. पोलिसांनी रात्रीच पतीला ताब्यात घेतलं असून पती राहुल तायडे हाच आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या प्रकरणी मृतक महिला पोलीस अंमलदाराच्या बहिणीच्या तक्रारीवरून पती राहुल तायडे याची पोलिसांकडून (Crime) चौकशी सध्या सुरू आहे.

गळ्यावर व्रण, पोलीस पतीला अटक, नेमकं प्रकरण काय?

पुढे आलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत काल (1ऑगस्ट ) राहत्या घरीच महिला पोलीस अंमलदाराची हत्या झाली होती. आशा धुळे (तायडे) वय 38 वर्ष असे या मृतक पोलीस अंमलदाराच नाव आहे. मात्र हि हत्या नेमकी का? आणि कुठल्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. अशातच आज (2 ऑगस्ट) महिला पोलीस अंमलदाराचं शवविच्छेदन केल्यानंतर शविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतर मृत्यूच कारन समोर येणार आहे. मात्र त्यापूर्वी संशयाची सुई पतीकडे वळल्याने पोलिसांनी रात्रीच पतीला अटक केली आहे.

विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. डीसीपी गणेश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनने परिसरासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

शेतातून पाईप टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी

शेतातून पाईप टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील ही घटना असून भागडे चुलत बंधूंमध्ये शेतातून पाईप टाकण्यावरून वाद आहे. याबाबत पोलिसात तक्रार देखील देण्यात आली होती आणि त्यानुसार पोलीस हा वाद सोडवण्यासाठी गावात पोहोचले. मात्र पोलिसांसमोरच या दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही पक्षांवर गुन्हा दाखल केलाय.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link

अकोल्यात स्त्री रूग्णालयातील भ्रष्टाचार उघड, जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन अधिकारी निलंबित

अकोल्यात स्त्री रूग्णालयातील भ्रष्टाचार उघड, जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन अधिकारी निलंबित


अकोला : अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदांच्या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया भ्रष्ट मार्गाने पार पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून, तिघांवर विभागीय चौकशीचा बडगा उगारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून अकोला जिल्हा स्त्री रूग्णालय हे चांगल्या कामाममूळे सातत्याने अव्वल असलेले रूग्णालय आहे.

निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता आणि नियमबाह्य निर्णय

सदर प्रक्रिया 2024-25 या आर्थिक वर्षात पार पडली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदं भरायची होती. ही पद बाह्य स्त्रोतांमार्फत त्रयस्थ संस्थांकडून कंत्राटी पद्धतीने भरायची होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. याची निविदा 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

निविदा भरायची शेवटची मुदत 29 जुलै 2024 होती. ही सर्व प्रक्रिया या विभागाच्या ‘जेम पोर्टल’द्वारे पुर्ण करायची होती. यामध्ये एकूण 72 निविदा प्राप्त झाल्या असताना, त्यातील फक्त 4 निविदांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं. विशेष म्हणजे फक्त दोन निविदांनाच अधिकृत मंजुरी देण्यात आली आणि त्या दोघांनाही ठेका देण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेत अपारदर्शकता, पक्षपातीपणा आणि नियमानुसार तांत्रिक परीक्षण न करता निर्णय घेण्यात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यात या तिघांनी लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार श्याम खोडे यांनी केला होता.

विधानसभेत मुद्दा उपस्थित

या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटलेत. वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत “आपल्या मर्जीतील लोकांना ठेका देण्यासाठी प्रक्रिया हाताळली गेली” असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर शासनस्तरावरून तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

चौकशी अहवालात भ्रष्टाचार सिद्ध

नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालात निविदा प्रक्रिया नियमानुसार न राबवणे, निविदा अपात्र ठरवताना कारणांची स्पष्ट नोंद न ठेवणे, आणि निवडक ठेकेदारांना लाभ मिळेल अशा पद्धतीने निर्णय घेणे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्य विभागात खळबळ

एकाच वेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने अकोल्याच्या आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे आरोग्य खात्यातील अन्य प्रक्रिया कितपत पारदर्शक आहेत, याबाबत देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रकरणाचा अधिक तपास सुरू

निलंबनानंतर तिघांवर विभागीय चौकशी होणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास पुढील कठोर कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

मालेगांव ब्लास्ट केस पर सत्तापक्ष-विपक्ष की प्रतिक्रिया:  फडणवीस बोले- आतंकवाद न भगवा था, न है, न रहेगा; दिग्विजय सिंह ने कहा- आतंकवाद का धर्म नहीं होता

मालेगांव ब्लास्ट केस पर सत्तापक्ष-विपक्ष की प्रतिक्रिया: फडणवीस बोले- आतंकवाद न भगवा था, न है, न रहेगा; दिग्विजय सिंह ने कहा- आतंकवाद का धर्म नहीं होता


नई दिल्ली1 दिन पहले

  • कॉपी लिंक

महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में स्पेशल NIA कोर्ट ने गुरुवार को पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा समेत सातों आरोपियों को बरी कर दिया है।

महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में स्पेशल NIA कोर्ट ने पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा समेत सातों आरोपियों को बरी कर दिया है। साल 2008 में महाराष्ट्र के नासिक जिले के मालेगांव में एक बाइक में धमाका हुआ था। इसमें छह लोग मारे गए और 101 घायल हुए थे।

स्पेशल NIA कोर्ट का फैसला गृह मंत्री अमित शाह के राज्यसभा में उस बयान के एक दिन बाद आया है, जिसमें उन्होंने कहा था कि हिंदू कभी आतंकवादी नहीं हो सकता। ब्लास्ट केस में बरी होने के बाद साध्वी प्रज्ञा ने कहा कि पिछले 17 सालों से मेरी जिंदगी बर्बाद हो गई। भगवा का अपमान करने वालों को भगवान सजा देंगे।

महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि आतंकवादी न कभी भगवा था, न है और न कभी होगा। वहीं, कांग्रेस सांसद दिग्विजय सिंह ने कहा कि आतंकवाद को किसी धर्म से नहीं जोड़ना चाहिए। आतंकवाद का कोई धर्म नहीं होता।

कोर्ट के फैसले पर NDA और I.N.D.I.A ब्लॉक के नेताओं की प्रतिक्रिया पढ़िए…

NDA के नेताओं के बयान

1. रविशंकर प्रसाद, भाजपा सांसद- आज का दिन ऐतिहासिक है। कांग्रेस के हिंदू आतंकवाद का षडयंत्र आज धाराशायी हो गया। किसी भी आरोपी के खिलाफ कोई सबूत नहीं था। भाजपा इस फैसले का स्वागत करती है। ये साजिश धाराशायी हुई, इस पर हमें संतोष है और खुशी भी है। सच्चाई बहुत दिन तक झुठलाई नहीं जा सकती। यह वोट बैंक की राजनीति के लिए कांग्रेस की सोची-समझी साजिश थी।

2. हिमंत बिस्वा सरमा, असम CM- केंद्रीय गृह मंत्री ने कल सदन में भी कहा था कि हिंदू आतंकवादी नहीं हो सकते क्योंकि हमारी संस्कृति और हमारी सभ्यता कभी आतंकवाद को बढ़ावा नहीं देती। कांग्रेस के शासन के दौरान, एक विशेष समुदाय को खुश करने के लिए एक शब्दावली गढ़ी गई थी- ‘हिंदू आतंकवाद’। हिंदू और आतंक दो अलग अवधारणाएं हैं। हिंदू कभी आतंक में विश्वास नहीं करते और हिंदू कभी आतंकवादी नहीं हो सकते।

3. बसवराज बोम्मई, भाजपा सांसद- यह सत्य की जीत है। पूरे फैसले ने कांग्रेस की ‘भगवा आतंकवाद’ लाने की साजिश और गंदी राजनीति को उजागर कर दिया है, जबकि ऐसा था ही नहीं। यह उनकी खामियों को छिपाने और इस्लामी आतंकवादी समूहों का समर्थन करने के लिए किया गया था। यह पूरी तरह से उजागर हो गया है। कांग्रेस को देश से माफी मांगनी चाहिए।

I.N.D.I.A ब्लॉक के नेताओं के बयान

1. अखिलेश यादव, समाजवादी पार्टी चीफ- जो बात आप (मीडिया) समझ रहे हो वही मैं समझ रहा हूं। जो आप कहना नहीं चाहते वो मैं नहीं कह रहा। कहीं ऐसा तो नहीं कि खबरें दबाने के लिए खबर आ रही हो?

2. दिग्विजय सिंह, कांग्रेस सांसद- आतंकवाद को किसी भी धर्म से नहीं जोड़ा जाना चाहिए। हिंदू आतंकवाद या इस्लामी आतंकवाद जैसी कोई चीज नहीं है। हर धर्म प्रेम, सद्भाव, सत्य और अहिंसा का प्रतीक है।

3. इमरान प्रतापगढ़ी, कांग्रेस सांसद – कांग्रेस पहले दिन से कह रही है कि धर्म का आतंकवाद से कोई लेना-देना नहीं है। यह शब्द तत्कालीन गृह सचिव आरके सिंह ने गढ़ा था। भाजपा ने उन्हें 10 साल तक मंत्री और सांसद बनाकर अपने साथ बिठाए रखा। यह फैसला है, न्याय नहीं। भाजपा उन्हें आरोपी नहीं मान रही थी।

कोर्ट बोला- बाइक प्रज्ञा की और कर्नल RDX लाए यह दोनों बातें साबित नहीं हुईं महाराष्ट्र के मालेगांव ब्लास्ट केस में पूर्व भाजपा सांसद साध्वी प्रज्ञा ठाकुर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी और सुधाकर धर द्विवेदी आरोपी थे। करीब 17 साल बाद आए फैसले में NIA कोर्ट के जज एके लाहोटी ने कहा कि जांच एजेंसी आरोप साबित नहीं कर पाई है, ऐसे में आरोपियों को संदेह का लाभ मिलना चाहिए।

जज लाहोटी ने कहा कि धमाका हुआ था, लेकिन यह साबित नहीं हुआ कि बम मोटरसाइकिल में रखा था। यह भी साबित नहीं हुआ कि मोटरसाइकिल साध्वी प्रज्ञा के नाम थी और कर्नल प्रसाद पुरोहित ने बम बनाया। कोर्ट के फैसले से जुड़ी की पूरी खबर पढ़ें…

………………………………………..

ये खबर भी पढ़ें…

मोदी राज्यसभा नहीं पहुंचे, खड़गे बोले- ये सदन का अपमान:शाह ने कहा- मैं जवाब दे रहा हूं, उन्हें क्यों बुलाना

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने बुधवार को राज्यसभा में ऑपरेशन सिंदूर पर विशेष चर्चा में करीब डेढ़ घंटे भाषण दिया। उन्होंने शाम 7 बजे सदन में बोलना शुरू किया। विपक्ष ने हंगामा करते हुए PM मोदी को बुलाने की मांग की। इस पर शाह ने कहा- विपक्ष पूछ रहा है कि PM कहा हैं? PM इस वक्त ऑफिस में हैं, उन्हें ज्यादा सुनने का शौक नहीं है। मेरे से निपट रहा है, उन्हें क्यों बुला रहे हो। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link