भर रस्त्यात महिलेला तिघांकडून बेदम मारहाण, केस धरून  लाथा बुक्क्यांचा मारा, VIDEO व्हायरल

भर रस्त्यात महिलेला तिघांकडून बेदम मारहाण, केस धरून  लाथा बुक्क्यांचा मारा, VIDEO व्हायरल


Amravati Crime: अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शारदा बाभुळकर या महिलेवर तीन पुरुष आणि एका महिलेने मिळून बेदम हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, संबंधितांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amravati Crime News)

नेमकं काय घडलं?

विर्शी गावात जागेच्या वादातून हा वाद निर्माण झाला. याच वादातून शारदा बाभुळकर यांना आरोपींनी रस्त्यावरच पकडून मारहाण केली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला काठीने शारदा यांना मारहाण करत आहे, तर अन्य तीन पुरुषांनी त्यांच्या केसाला धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काही क्षण शारदा यांना हालचालही करता आली नाही.

व्हिडिओ आला समोर, गुन्हा दाखल

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव निर्माण झाला. वलगाव पोलीस स्टेशनने तत्काळ हालचाली सुरू केल्या. शारदा बाभुळकर यांच्या फिर्यादीवरून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कायदेशीर कारवाई सुरू

वलगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिलेला प्राथमिक उपचार देण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे विर्शी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली

नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी (Nanded Police) तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले.

पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. 

आणखी वाचा



Source link

मेळघाटात आश्रम शाळेची भिंत कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघी गंभीर जखमी

मेळघाटात आश्रम शाळेची भिंत कोसळून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघी गंभीर जखमी


Amravati: मेळघाटमधील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत भीषण दुर्घटना घडली असून, भिंत कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या मागणीनंतर अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे. (Amravati News)

ही घटना घडल्यानंतर आदिवासी विभागाने तात्काळ दखल घेतली असून, शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. कथे आणि महिला अधीक्षक एस. पी. रावत यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासणी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथे वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा आहे. या शाळेतील वसतिगृहात पाण्याच्या टाकीची भींत अचानक कोसळली. त्यावेळी काही विद्यार्थिनी तिथे उपस्थित होत्या. भिंत कोसळल्यामुळे चौदा वर्षीय विद्यार्थिनी ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाली आणि उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यात शाळेचे मुख्याध्यापक व महिला अधीक्षक एस. पी. रावत निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी आक्रमक होत जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत चिखलदरा तालुक्याचे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी आणि आदिवासी निरीक्षक यांचा समावेश आहे. समिती लवकरच घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शाळेच्या इमारतीची दुरवस्था, देखभाल दुरुस्तीचा अभाव, आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप विद्यार्थिनीचा जीव गेला, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे मेळघाटातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आदिवासी विकास विभागाने दिले आहे.

अंगणवाडीच्या छताचा भाग कोसळला, सुदैवाने हानी नाही 

नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील जुन्या इमारतीत असेलल्या अंगणवाडीच्या छताचा  काही भाग कोसळला .सुदैवाने यात कोणतीहीहानी झाली नाही . पावसामुळे आंगणवाडीच्या छताचा भाग  कोसळल्यचे सांगण्यात आले … घटनेच्या  वेळी काही लहान मुले अंगणवाडीत उपस्थित होती, मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान सातेगावात जीर्ण झालेल्या इमारतीत आंगणवाडी चालते. त्यामूळे दुर्घटनेची शक्यता आहे . याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या .. मात्र आंगणवाडीसाठी नवीन जागा देण्यात आली नाही .. या घटने नंतर तरी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली .

हेही वाचा

धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील वाशिष्ठी नदीत घेतली उडी; दोघांनी संपवले जीवन

आणखी वाचा



Source link

‘शेवटचा श्वास सापाला वाचवताना घ्यायचाय’,20 हजार सापांना जीवदान देणाऱ्य सर्पमित्राची कहाणी वाचाच

‘शेवटचा श्वास सापाला वाचवताना घ्यायचाय’,20 हजार सापांना जीवदान देणाऱ्य सर्पमित्राची कहाणी वाचाच


Nagpanchami Special: आज नागपंचमी… सापांना पूजण्याचा दिवस! पण हेच साप जर घरात, अंगणात अचानक दिसले, तर बरेच जण थरथर कापतात, घाबरून जातात. काही जण तर अंधश्रद्धेच्या गर्तेत सापाला ठारही मारतात. पण अशा भीतीच्या वातावरणात अकोल्यात एक माणूस गेली 30 वर्षं सापांना वाचवतोय… नि:स्वार्थपणे, न थांबता, न थकता! कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत, अपंगत्व झुगारून… जीव देणाऱ्या सापांना जीवदान देणाऱ्या या सर्पमित्राचं नाव बाळ काळणे.

30 वर्षांची निसर्गसेवा… 20 हजार सापांना जीवनदान

अकोल्यातील गोरक्षण रोड परिसरातील बाळ काळणे हे गेल्या तीन दशकांपासून सर्प आणि वन्य प्राणी वाचवण्याच्या कार्यात कार्यरत आहेत. नाग, घोणस, धामण, अजगर अशा विषारी आणि बिनविषारी सापांचे त्यांनी आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक रेस्क्यू केले आहेत. यात नुसतेच साप नव्हे, तर नीलगाय, सांबर, चितळ, बिबट, कोल्हा, लांडगा अशा अनेक वन्यप्राण्यांना सुद्धा त्यांनी योग्य काळजीपूर्वक पकडून नैसर्गिक अधिवासात परत सोडलं आहे.

“शेवटचा श्वासही साप वाचवत असताना घ्यायचा आहे…”

बाळ काळणे यांच्या शब्दांत एक विलक्षण समर्पण आहे. “हे काम माझ्यासाठी नोकरी नाही, ही माझी निसर्गसेवा आहे. शेवटचा श्वासही साप वाचवत असताना घ्यायचा आहे,” असं ते ठामपणे सांगतात. त्यांचं हे कार्य केवळ सेवा म्हणून नाही, तर एक ध्येय, एक जीवनमार्ग म्हणून त्यांनी स्वीकारलं आहे.

कॅन्सर, अपंगत्व, आणि तरीही थांबले नाहीत…

2018 मध्ये बाळ काळणे यांना जीभ आणि गळ्याचा कॅन्सर झाला. दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या शरीराचं 79 टक्के भाग अपंग झाला. पण त्यांनी हार मानली नाही. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान आणि त्यानंतरही त्यांनी सर्पमित्राची सेवा थांबवलेली नाही. उलट आज ते दुप्पट जोमाने या कामात झोकून देत आहेत. हे सर्व मोबदल्याशिवाय, विनाशुल्क केलेलं आहे.

त्यांच्या पत्नी दीपाली काळणे अभिमानाने सांगतात, “कॅन्सरनंतरही त्यांनी एक क्षणही विश्रांती घेतलेली नाही. त्यांच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो.”

100 हून अधिक पुरस्कार… आणि जागतिक मान्यता

त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना 100 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 2022 मध्ये ‘World’s Greatest Record’ कडून त्यांची जगभरात नोंद झाली. राज्य शासनानेही सलग तीन वेळा त्यांची ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे.

खरा सर्पमित्र… सर्पपूजेचा खरा अर्थ

आज नागपंचमीच्या दिवशी सर्पपूजा होत असताना, प्रत्यक्ष साप वाचवणारा, त्यांना अभय देणारा, आणि निसर्गासोबत नातं टिकवणारा बाळ काळणे यांच्यासारखा सर्पमित्रच या पूजेचा खरा प्रतिनिधी म्हणावा लागेल. त्यांचा संकल्प आहे – “मी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करणार. ‘एबीपी माझा’ या निस्वार्थ निसर्गसेवकाला सलाम करतंय!..बाळ काळणे यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी धडा आहे… ध्येय, चिकाटी आणि संवेदनशीलतेचा!.. ‘नागपंचमी’च्या निमित्ताने अशा निरपेक्ष आणि निस्पृह काम करीत असलेल्या सर्पमित्रांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणेही गरजेचे आहे.

आणखी वाचा



Source link

₹1500 के लिए भैया बने लाडकी बहन:  ऑडिट में खुलासा- 14,298 पुरुषों ने खुद को महिला बताकर महाराष्ट्र सरकार से ₹21.44 करोड़ ठगे

₹1500 के लिए भैया बने लाडकी बहन: ऑडिट में खुलासा- 14,298 पुरुषों ने खुद को महिला बताकर महाराष्ट्र सरकार से ₹21.44 करोड़ ठगे


मुंबई18 घंटे पहले

  • कॉपी लिंक

महिला एवं बाल विकास मंत्रालय की इसी रिपोर्ट के मुताबिक फर्जी रजिस्ट्रेशन के चलते योजना को पहले ही साल में 1640 करोड़ का अनुमानित नुकसान हुआ है।

महाराष्ट्र में आर्थिक रूप से वंचित महिलाओं के लिए बनाई गई लाडकी बहन योजना के तहत 14,000 से ज्यादा पुरुषों ने धोखाधड़ी से पैसे लिए। महिला एवं बाल विकास विभाग के एक ऑडिट में यह खुलासा हुआ है।

14,298 पुरुषों को 21.44 करोड़ रुपए दिए गए, जिन्होंने ऑनलाइन रजिस्ट्रेशन में हेराफेरी की और खुद को महिला बताकर रजिस्टर करा लिया। यह खुलासा योजना शुरू होने के लगभग 10 महीने बाद हुआ।

2024 के महाराष्ट्र विधानसभा चुनाव से कुछ महीने पहले शुरू की गई यह योजना, भाजपा के नेतृत्व वाले और शिवसेना व राकांपा के महायुति गठबंधन के लिए वोटर्स को लुभाने का जरिया थी।

इस योजना के तहत 21 से 65 साल की उम्र की उन महिलाओं को 1500 रुपए हर महीने दिए जाते हैं, जिनके परिवारों की सालाना कमाई 2.5 लाख रुपए से कम है।

स्कैम के खुलासे के बाद डिप्टी CM अजित पवार ने कहा, “लाडकी बहन योजना गरीब महिलाओं की मदद के लिए शुरू की गई थी। हम उन्हें दिया पैसा वसूल करेंगे। अगर वे सहयोग नहीं करते हैं, तो आगे कार्रवाई होगी।”

महिला बाल विकास के ऑडिट की बड़ी बातें…

  • महिला एवं बाल विकास मंत्रालय की इसी रिपोर्ट के मुताबिक फर्जी रजिस्ट्रेशन के कारण योजना को पहले ही साल में 1640 करोड़ का नुकसान हुआ है।
  • सबसे बड़ा दुरुपयोग 7.97 लाख से ज्यादा महिलाओं के एक ही परिवार से तीसरी लाभार्थी के होने से हुआ। योजना में स्पष्ट रूप से प्रति परिवार केवल 2 महिलाओं को लाभ देने की सीमा है। इस नियम के उल्लंघन से सरकारी खजाने को 1196 करोड़ रका नुकसान हुआ।
  • एक और अनियमितता यह है कि 65 साल से ज्यादा उम्र की 2.87 लाख महिलाओं को लाभ मिल रहा है, जबकि एज लिमिट निर्धारित है। इन लाभार्थियों के कारण लगभग 431.7 करोड़ का नुकसान हुआ।
  • इसके अलावा, चार पहिया वाहन रखने वाले परिवारों की 1.62 लाख महिलाएं भी लाभार्थी सूची में शामिल पाई गईं। योजना की शर्तों के अनुसार, ऐसी महिलाएं वित्तीय सहायता की पात्र नहीं हैं।

महिला बाल विकास मंत्री बोलीं- जून 2025 से 26.34 लाख अपात्र निलंबित

महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने कहा, “महिला एवं बाल विकास विभाग ने सभी आवेदनों की पात्रता की पुष्टि के लिए सभी विभागों से जानकारी मांगी थी। उसके मुताबिक लगभग 26.34 लाख लाभार्थी अपात्र होने के बावजूद योजना का लाभ उठा रहे हैं। इस जानकारी के आधार पर जून 2025 से इन 26.34 लाख आवेदकों के लिए लाभ अस्थायी रूप से निलंबित कर दिए गए हैं। योजना के लगभग 2.25 करोड़ पात्र लाभार्थियों को जून 2025 के महीने का पैसा भेजा गया है।”

खबरें और भी हैं…



Source link

अकोल्यातील ‘कप ऑफ कम्फर्ट’मध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; कॅफेच्या स्पेशल केबिनमध्ये गैरप्रकार

अकोल्यातील ‘कप ऑफ कम्फर्ट’मध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; कॅफेच्या स्पेशल केबिनमध्ये गैरप्रकार


अकोला : शहरातील रणपिसे नगर भागात असलेल्या जीएमडी मार्केट समोर असलेल्या ‘कप ऑफ कम्फर्ट’ नावाच्या कॅफेमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवत 29 वर्षीय तरुणाने 33 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अकोल्यातील काही कॅफेमध्ये सुरू असलेल्या ‘स्पेशल केबिन’ सुविधेमधून गैरप्रकार घडत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शुभम गजानन टाले (वय 29, रा. सांगवी मोहाडी, अकोला) याच्याविरोधात BNS कलम 64, 64(2)(m) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियातून ओळख अन् कॅफेमध्ये अत्याचार

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती वारंवार मारहाण करायचा, त्यामुळे ती वेगळी राहू लागली होती. याच दरम्यान शुभम टाले या तरुणाशी तिची सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीतून मैत्री वाढत गेली आणि शुभमने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिला ‘कप ऑफ कम्फर्ट’ कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. मात्र, नंतर शुभमने लग्नास नकार देत तिच्याशी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.

‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली सुरू गैरप्रकार?

अकोल्यातील काही कॅफेमध्ये तरुणाईसाठी ‘प्रायव्हेट केबिन’ची सुविधा दिली जाते. पडदे लावलेल्या या केबिनमध्ये CCTV नसल्याने अनेकदा त्यांचा गैरवापर होत असल्याचे बोलले जाते. अशा केबिनसाठी 2 ते 3 हजार रुपये अतिरिक्त आकारले जातात. या पार्श्वभूमीवर महिलेवर कॅफेमध्ये झालेल्या अत्याचाराने शहरातील अशा व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नितीन देशमुखांनी या आधीच आवाज उठवला होता

अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी यापूर्वी अशा कॅफेंविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी काही ठिकाणी अचानक भेटी देऊन अल्पवयीन मुलामुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड केलं होतं. यानंतर त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, अंमलबजावणीत झालेल्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारांचे प्रमाण थांबलेले नाही, हेच पुन्हा स्पष्ट झालं आहे.

पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

अकोल्यातील अनेक कॅफेमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचे अनेक प्रकार याआधी उघड झाले आहेत. अनेक कॅफेंमध्ये ‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली तरुण-तरुणींना प्रायव्हसी देण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचा गोरखधंदा अकोल्यात सुरू आहे.

शहरातील रणपिसे नगर, जवाहर नगर, न्यू तोष्णीवाल लेआऊट या भागातील अनेक कॅफेंमध्ये असे गैरप्रकार सुरू आहेत. मात्र कॅफे मालकांकडून पोलिसांना हप्ते सुरू असल्याने या प्रकारांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.

यासंदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही, तर अनेक तरुण-तरुण आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अकोल्याचे ‘दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक’ अशी प्रतिमा असलेले अर्चित चांडक यांनीच आता याप्रकरणी लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

या प्रकरणामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तीवर आणि त्यांना ‘व्यवस्था’ पुरवणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. महापालिका, पोलीस आणि इतर यंत्रणा आता याबाबत कोणती पावले उचलतात, याकडे अकोल्याचे लक्ष लागले आहे.

 

आणखी वाचा



Source link

विदर्भात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत; वाचा सर्व अपडेट्स

विदर्भात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत; वाचा सर्व अपडेट्स


Vidarbha Weather Update : राज्यासह विदर्भात देखील आज दमदार पावसाने (Rain) हजेरी लावली असूनहाटेपासून कोसळत असलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आज (26 जुलै) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्या तुफान पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नागपूर वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहे. तर देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4 तर गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील एकूण 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद

गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने अनेक भागातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद ही झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावे व जिथे पूर असेल तेथून आवागमन करू नये, असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

भंडाऱ्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद

दुसरीकडे, भंडाऱ्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळं नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. अशात जिल्हा अंतर्गत मार्गावरील गावांना जोडणाऱ्या आठ गावांच्या मार्गावर पाणी असल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनानं बंद केले आहे. भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीवरून कारधा गावाकडं जाणाऱ्या लहान पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली असून खमारी नाल्यावरून पाणी असल्यानं तो मार्गही बंद झाला आहे. यासोबतचं साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराटी ते चीचगाव, नेहारवानी ते कटनधरा, लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा हे आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.

मेळघाट भागात मुसळधार पाऊस, रस्ते वाहतूक विस्कळीत

अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मुसळधार पावसाने धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळ चाकरडा पाटीयाकडे जाणारा मार्ग दोन तासांपासून बंद आहे. मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा आता विस्कळीत झाली आहे. 24 तास मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, पर्लकोटा नदीचा पूर ओसरले, मात्र 3 मार्ग बंदच

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. सिरोंचा-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंदच असून अहेरी-वटरा आणि कढोली ते उराडी हे दोन मार्गही बंद आहेत. दरम्यान भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने काल तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. आज सकाळी हा मार्ग सुरू झाला आहे. काल गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट होता. तर आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्यरात्री पासून जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू

गोंदियातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरात शिरला पुराचे पाणी

मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झाला असून गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय परिसरामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली असून रुग्णालय समोरील पार्किंग यार्डमध्ये दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. हे पाणी इंजिन पंपच्या माध्यमातून उपसुन काढण्याचे काम रुग्णालय प्रशासनाच्या वतीने केले जात आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link