Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे

Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे


अमरावती : काँग्रेसनेत्या (Congress) आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असं बोंडे म्हणाले. तसंच यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले. 

अनिल बोंडे म्हणाले, इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकुरांची पदवी मिळाली. इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा यांचा डिएनए आहे. काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे.  भाजपचा डीएनए हा भारताचा आहे..

दानधर्म केल्याने “ठाकुर” ही पदवी दिल्याचा भटांचा दावा

यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडें यांना थेट भाटांकडील इतिहास दाखवून  प्रतिउत्तर दिले आहे.1700 साली सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला “ठाकुर” ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भाटांनी  केला आहे. 

 यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर

 यशोमती ठाकूर म्हणाल्या,  सन 1700 मध्ये सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबाना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला “ठाकुर” ही पदवी देण्यात आली आहे. दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केली हा इतिहास आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दंगली झाल्या आहे.खासदार म्हणून 
 त्यांना जे मूळ काम त्यांना करायचे आहेत ते करत नाही. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे.   

भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच

भाजपचा आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत करत असतात. गांधी त्या युगातला असो की या युगातला असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतो.. जी काही विकृती आहे ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यांमध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे असा आमचा अट्टाहास आहे, असे  काही दिवसांपूर्वी यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.                



Source link

Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट,  अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया


Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट,  अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

MNS Activist Jay Malokar Death Case : अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. 

30 जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. 

मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कुटूंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे मालोकार कुटूंबियांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटले आहे. 



Source link

Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर

Jai Malokar MNS Crime Case : मृत्यूआधी जय मालोकरला जबर मारहाण? धक्कादायक माहिती समोर


MNS Activist Jay Malokar Death Case : अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. 

30 जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. 

मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कुटूंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे मालोकार कुटूंबियांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटले आहे. 

 



Source link

Amol Mitkari on Ganpati Visarjan : बैलगाडीतून मिरवणूक काढत मिटकरींनी केले बाप्पाचे विसर्जन

Amol Mitkari on Ganpati Visarjan : बैलगाडीतून मिरवणूक काढत मिटकरींनी केले बाप्पाचे विसर्जन


Amol Mitakri on Ganpati Visarjan : बैलगाडीतून मिरवणूक काढत मिटकरींनी केले बाप्पाचे विसर्जन

Ganesh Visarjan 2024 : घरोघरी, मंडळांत लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आज 10 दिवसांनी गणरायाचं विसर्जन होणार आहे. सनातन धर्मानुसार, अनंत चतुर्दशी (Ganesh Visarjan) तिथीला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आज विश्वकर्मा पूजा देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास धरतात आणि बाप्पाचं विसर्जन करतात. मात्र, गणपतीचं विसर्जन कराता काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठीच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात. 

गणेश विसर्जनाच्या दिवशी काय करु नये?

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना योग्य दिशेची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये गणपतीचं मुख घराच्या दिशेने तर मूर्तीची पाठ घराच्या बाहेर असमं गरजेचं आहे. असं म्हणतात की, गणपतीची मूर्ती घेऊन जाताना जर पाठ घराच्या दिशेने असेल तर दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो.तसेच, घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. 
  • जर, गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही घरी बाप्पासाठी नैवेद्य तयार करत असाल तर नैवेद्यात लसूण किंवा कांद्याचा वापर करु नका. नैवेद्यात सात्विक भोजनच दाखवा. 
  • जर तुम्ही घरीच गणपती विसर्जन करणार असाल तर मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर विसर्जनाचं पाणी आणि मूर्तीच्या मातीला फेकून देऊ नका. विसर्जनाच्या पाण्याला तुम्ही झाडा-झुडुपांत टाकू शकता.तसेच, झाडाचं रोप लावताना तुम्ही मातीचा वापर करु शकता. 
  • गणेश विसर्जनाच्या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. तर, या दिवशी सात्विक भोजनाचं सेवन करावं. अन्यथा देव नाराज होऊ शकतात. 



Source link

राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी

राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी



<div><strong><a title="अमरावती" href="https://marathi.abplive.com/news/https://marathi.abplive.com/news/amravati" data-type="interlinkingkeywords">अमरावती</a>/मुंबई :</strong> राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर अजित पवारांच्या आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे, शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांना समसमान मंत्रि&zwj;पदाची संधी मिळाली. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही इच्छुक उमेदवारांना इतर आश्वासन देत थांबवण्यात आलं होतं. तर, शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल हा विश्वास होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता दिसत नाही. त्याचा पार्श्वभूमीवर ज्या नेत्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. आता, त्यांना महामंडळ देऊन शांत केलं जात आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी (कॅबिनेट मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात आली आहे.&nbsp;</div>
<div>&nbsp;</div>
<div>महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाने शासन आदेश जारी करत अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पदाचा शब्द दिला होता, असे स्वत: अडसूळ यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, आनंदराव अडसूळ यांना आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.&nbsp;&nbsp;</div>
<div>&nbsp;</div>
<div>सामाजिक न्यायाचे तत्व प्रभावीपणे राबविण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती समाजांच्या मागण्यांच्या अनुषंगाने या समाजाच्या सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय वगैरे सद्यस्थितीचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी येथील नमूद शासन निर्णय, सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, 1 मार्च 2005 अन्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता 1 अध्यक्ष व 4 अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे गठन करण्यात आले असून त्यांची नियुक्ती, त्यांचे वेतन आणि भत्ते व त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. उक्त आयोग व शासन यांच्यात कामकाजाबाबत समन्वय साधण्यासाठी प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, <a title="मुंबई" href="https://marathi.abplive.com/news/mumbai" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a> यांची पदसिद्ध सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.&nbsp;येथील नमूद शासन निर्णय, 2 डिसेंबर 2022 अन्वये महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगावरील अध्यक्ष व 2 सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. सबब, सद्य:स्थितीत आयोगावरील अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे, आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगावर अध्यक्ष व 3 सदस्य यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगावर अध्यक्ष व 3 सदस्य पदांवर खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये, अध्यक्षपदी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.&nbsp;</div>
<div>&nbsp;</div>
<div>&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; नाव&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp; पदनाम</div>
<div>1. आनंदराव अडसूळ, माजी खासदार – अध्यक्ष&nbsp;</div>
<div>2. धर्मपाल मेश्राम, नागपुर – उपाध्यक्ष तथा सदस्य सदस्य&nbsp;</div>
<div>3. गोरक्षक लोसाडे, पिंपरी, <a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> – सदस्य</div>
<div>4. श्रीमती वैदेही वाढाण,पालघर – सदस्य&nbsp;</div>
<h2>शिंदे गटाच्या 4 नेत्यांना महामंडळ</h2>
<div>शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना <a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a> राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचं अध्यक्षपद, तर आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे सर्वजण शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामध्ये भाजप वा अजित पवारांच्या एकाही नेत्याला महामंडळपदी संधी मिळाली नसल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.&nbsp;</div>
<h2>हेही वाचा</h2>
<p class="article-pg-title"><a href="https://marathi.abplive.com/photo-gallery/news/kolhapur-kolhapurkar-welcome-to-vande-bharat-with-jubilation-and-a-rush-for-selfies-know-the-timetable-of-kolhpur-pune-vandebharat-1313216">कोल्हापुरी, लय भारी… वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल</a></p>



Source link

आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत आ. कडूंचं मोठं वक्तव्य

आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत आ. कडूंचं मोठं वक्तव्य


मुंबई : आगामी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच दौरे आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्रच आहे. मात्र, राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर येत आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि इतर लहान पक्ष, संघटना, अपक्ष आमदार एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महायुतीमधील अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच, आता आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी देखील या चर्चांना खतपाणी घालण्याचं काम केलंय. आमदारांना सर्वप्रथम निवडून येणं महत्वाचं आहे. त्यामुळे, ते आमदार अजित पवारांची साथ सोडतील, असे भाकीतच बच्चू कडू यांनी केलंय. 

अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती आहे, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. शेवटी आमदाराला मतदारसंघात निवडून यायचं असते, पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. निवडून येणं महत्वाच आहे. त्यामुळे, अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. लोकांना नाही पटलं अजित दादा अशी उडी घेणार म्हणून. कारण, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या विचारधारेमध्ये तफावत आहे, असं मत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या पक्षात नाराज असलेल्या आमदारांना आखणी बळ देण्याचं काम आमदार कडू यांच्या वक्तव्यातून होत असल्याचं दिसून येईल. 

शरद पवारांचे दौरे सुरू

दरम्यान, एकीकडे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरू केला असून महिला भगिनींना आकर्षित करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून सरकारने महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलंय. त्यामुळे, विकासकामे आणि योजनांचा दाखला देत अजित पवार हे आमदारांना आपल्याकडे ठेऊन विधानसभेत उतरवणार आहेत. मात्र, काही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, तर काही आमदारांना तिकीट कापले जाण्याची भीती असल्याने ते पर्याय शोधत आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे पायाला भिंगरी लावल्यागत पळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूर दौरा केल्यानंतर, पुन्हा कोल्हापूर दौऱ्यातही आपली, व पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय गणितं जुळवत ते विविध मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोट बांधत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे येण्यासाठी उमेदवारांची रांग आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारही दादांची साथ सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान, अजित पवारांची साथ सोडण्यावरुन यापूर्वीच अजित पवारांनी, ज्या आमदारांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, असेही म्हटले होते. त्यामुळे, निवडणुकांची घोषणा होताच पुढील महिनाभरात याचे चित्र स्पष्ट होईल असेच दिसते. 

हेही वाचा

Eknath Shinde महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp