by Hansraj Agrawal | Dec 26, 2024 | Trending News
अभ्यासाचा ताण, त्यात आई वडिलांचा प्रचंड दबाव, नीट परीक्षेचे ओझं या सर्वाला कंटाळून अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली होती. मात्र या एका चुकीमुळे मोठी किंमत तिला मोजावी लागली आहे. रस्त्यात भेटेल त्याने मदतीच्या नावे तिच्यावर बलात्कार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणी नीट परीक्षेची तयारी करत होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि यासाठी अभ्यास सुरू होता. मात्र अभ्यासाचं ओझं इतकं की ते तिला सहन होत नव्हतं. त्यातून घरच्यांचाही दबाव यामुळे ती वैतागली होती. यामुळे सगळं सोडून ती निघून गेली. आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आणि पुण्यातुन तिला संभाजीनगरमध्ये आणलं. मात्र त्यानंतर या मुलीने जी आपबीती सांगितली त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. तिचे आई वडील तर ढसाढसा रडायला लागले, एक छोटीशी चूक या मुलीला आयुष्याचा धडा शिकवणारी ठरली. या सर्व काळात तब्बल 4 जणांनी या मुलीवर मदतीच्या बहाण्याने अत्याचार केला होता.
अत्याचाराचा घटनाक्रम
– मुलीने हॉस्टेल सोडलं आणि ती परभणीला गेली. तिथे रेल्वे स्थानकावर तिला आरोपी प्रदीप भेटला. राहण्यासाठी जागा देण्याचं आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला.
– त्यानेच तिला पुसद येथे सोडलं. पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितने पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला
– त्यानंतर ती नाशिकला गेली. तेथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत भेट झाली. त्यानेही तिला जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केले.
– पीडिता नंतर पुण्याला गेली. तिथे टॅक्सीचालक समाधानसोबत भेट झाली. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले
या सगळ्या आरोपींवर आता पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील एक आरोपी हा तिचा चुलत भाऊ असल्याचं सुद्धा कळत आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवा असं आवाहन आता पोलीस करत आहेत.
अभ्यासाचा ताण आणि आई-वडिलांचा रोष यातून या मुलीने घर सोडलं खरं, मात्र नंतर दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्याने या मुलीचा घात झाला. आता या मुलीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तिच्यावर उपचार होतील. मात्र मनावर झालेल्या या जखमा कधीच पुसणाऱ्या नाहीत.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 25, 2024 | Trending News
ED Enquiry : सुप्रीम कोर्टाची ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. ईडीला मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्याची अनुमती नाही असा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 25, 2024 | Trending News
Kalyan Minor Rape And Murder Case: या प्रकरणाबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांनी निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोर्चा काढला.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 24, 2024 | Trending News
सामाजिक न्यायमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच संजय शिरसाट कामाला लागले आहेत. आक्रमकपणा अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या पठडीत तयार झालेले संजय शिरसाट यांचं ते मंत्री झाल्यावर लगेचच आक्रमक रुप पाहायला मिळालं. संभाजीनगरमध्येच त्यांनी समोर असलेल्या सर्वांना चांगलंच धारेवर धरलं. यासाठी नेमकं काय कारण ठरलं, हे जाणून घेऊयात यात
जर्जर झालेल्या इमारती, किचनमध्ये घाणीचं साम्राज्य. खिडक्या, दरवाजे तुटलेली स्वच्छतागृह. ही भयानक अवस्था आहे, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी खात्याची सूत्र हाती घेतल्यानंतर संभाजीनगरच्या वसतिगृहांची पाहणी केली. या पाहणीतलं वास्तव धक्कादायक होतं. वसतिगृह म्हणावा की कोंडवाडा अशी अवस्था होती. वसतिगृहाची इमारत जुनाट झाली होती. अनेक ठिकाणी खिडक्या, दरवाजे गायब होते. वसतिगृहासाठी पाच कर्मचारी मंजूर असताना तीन कर्मचारी गायब होते. ही सगळी अवस्था पाहून संजय शिरसाटांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
गावखेड्यातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय नसल्यानं अशा गलिच्छ ठिकाणी राहावं लागलंय. वसतीगृहातल्या असुविधांबाबत तिथं राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.
संजय शिरसाटांनी वसतिगृहाच्या अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं संजय शिरसाटांनी सांगितलंय.
वसतीगृहातल्या जेवणाची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्या त्यांनी हातात घेऊन पाहिल्या. जनावरांपेक्षाही भयानक अवस्थेत विद्यार्थी राहत असल्याचं त्यांनी कबुल केलं.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची अवस्था वर्षानुवर्ष तशीच आहेत. मंत्री आले गेले, सरकारं आली गेली. विद्यार्थ्यांना सोसाव्या नरकयातना तशाच आहेत. किंबहुना त्यात आणखी वाढ झाली.. आता शिरसाटांनी पाहणी केलीय. हे चित्र किमान त्यांच्या काळात तरी बदलेल अशी अपेक्षा आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 24, 2024 | Trending News
Nagpur Crime News: पुष्पा 2 हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळं चर्चेत आहे. दक्षिणेकडे हा सिनेमा वादातदेखील सापडला होता. मात्र, महाराष्ट्रात चक्क या सिनेमामुळं एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. हत्या आणि अमली पदार्थाच्या प्रकरणात आरोपीला नागपुर पोलिसांनी पुष्पा-2 बघताना अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सिनेमागृहात चित्रपटाचे स्क्रिनींग सुरु असतानाच पोलिसांनी आरोपी विशाल मेश्राम याला अटक केली. पोलिसांची ही कारवाई सुरू असताना प्रेक्षकांमध्येही एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर प्रेक्षकांना अश्वस्त केलं की ते आता चित्रपटाचा आनंद आधीसारखाच घेऊ शकतात.
आरोपी विश्वास मेश्राम असं या आरोपीचे नाव असून तो 10 महिन्यांपासून फरार होता. नागपूर येथील पाचपावली पोलिसानी त्याला पुष्पा 2 चित्रपट पाहताना अटक केली. विशाल हा साथीदारां सोबत पुष्पा -2 चित्रपट पाहण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुद्धा पुष्पा 2 चित्रपट तिकीट खरेदी केली. तो बसलेल्या सीटच्या मागील बाजूस पोलीस बसून राहिले होते.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपी आत सिनेमागृहात असताना बाहेरही पोलिसांचे एक पथक तैनात होते. आतापर्यंतच्या त्याच्या पार्श्वभूमी पाहता तो पोलिसांवर हल्ला करतो, अशी माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळं पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या वाहनाची चित्रपट सुरू असतानाच हवा काढून ठेवली होती. जेणेकरुन तो पुन्हा पोलिसांच्या हातातून निसटू नये.
पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर कारवाई करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 2012 पासून विशाल मेश्राम हा गुन्हेगारी क्षेत्रात वावरत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 27 गुन्हे दाखल आहे. 302, जबरी चोरी, डकेती, तडीपार, मोका, सुद्धा लावण्यात आला आहे. अमली पदार्थ संबंधीदेखील गुन्हे दाखल आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 23, 2024 | Trending News
Rahul Gandhi Parabhani: परभणीतील सोमनाथ सुर्यवंशींच्या कोठडीतल्या मृत्यूनंतर आता राजकारण बरंच तापलंय.राहूल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. आणि सरकारवर आरोपांचा भडीमार केला.गांधींच्या या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली.परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चालंलय? जाणून घेऊया.
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूवरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. गेले 12 दिवस हा विषय राज्यभरात चर्चिला जातोय.शरद पवारांसह अनेक महत्वाच्या नेत्यांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी भेट घेतली.या भेटीनंतर गांधींनी आरएसएस, भाजप सरकार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभार आरोप केलेत.दलित असल्यामुळेच सोमनाथ यांची हत्या केल्याच गांधी म्हणाले.
आम्हाला मदत नको, न्याय हवा.यातील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आपण राहुल गांधींकडे केल्याची माहीती सोमनाथ कुटुंबीयांनी दिलीये.दरम्यान राहुल गांधींचा हा दौरा, राजकीय हेतूने प्रेरित असून नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांसह, मंत्री संजय शिरसाट यांनी केलीये.
परभणीत संविधानाच्या विटंबनेमुळे आंदोलन झालं.पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं.त्यावेळी ताब्यात असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला.त्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले.कारवाईच्या मागणीसाठी फक्त परभणीचं नाही तर राज्यभरात आंदोलनं झाली.विधीमंडळात देखील मुख्यमंत्र्यांनी मदतीसह कारवाईची घोषणा केली.तरीही प्रकरण काही थंड झालं नाही.राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा मुद्दा देशभर गाजण्याचे संकेत मिळू लागलेत.
सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार का?
याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत, लोकांना न्याय मिळत नाही, सरकार करतंय काय असा सवाल उपस्थित केला. तर परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे. हा एक सुनियोजित कट होता, त्याची चौकशी झालीच पाहिजे.जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. परभणी प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनीही सरकारवर ताशेरे ओढले.सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालाय, याचा तपास व्हावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या. राज्यभरात ठिकठिकाणी भीम अनुयायांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारलाय.पोलिसी बळाचा वापर करत मारल्याचा आरोप होतोय.आता राजकीय पक्ष आणि नेतेही पुढे सरसावलेत.त्यामुळे कारवाईचा वेग वाढेल, हिच अपेक्षा.परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड, परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधकांचा सभात्याग केलाय.
Source link