एलिफंटाला गेल्यावर संध्याकाळी सहाच्या आत परत यावचं लागतं? काय आहे यामागचे कारण?
Elephanta Caves : एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
Source link
Elephanta Caves : एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
Source link
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे.
Source link
Nagpur Goa Shaktipeeth Expressway : कोल्हापूरमार्गे कोकणात जायचे असेल तर आंबोली घाटाशिवाय पर्याया नाही. मात्र, भविष्यात कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर ते सिंधूदुर्ग हा चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार आहे. हे शक्य होणार ते नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे (nagpur goa shaktipeeth expressway).
शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग गेम जेंचर ठरणार आहे. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं होते. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासात होणार आहे.
हा सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणेज शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्द जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर , नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर , पट्टणकोडोली, कणेरी , आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे.
या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. या महामार्गातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे आंबोली घाट सेक्शनमध्ये. आंबोली घाटाच्या पश्चिम घाटाखाली 2 बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. हा बोगदा 21.9 किलोमीटर लांब असेल. हा देशातील सर्वात लांब बोगदा ठरु शकतो. हा बोगदा तयार झाल्यावर कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास फक्त 1 तासात होणार आहे. कारण आंबोली घाटमार्गे हा प्रवास तब्बल चार तासांचा आहे.
शक्तीपीठ महामार्गात अडथळे असतील तर पर्याय शोधले जातील. विरोध असलेल्या भागात फ्लायओव्हर किंवा सध्या असलेल्या माहामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडता येईल अनुषंगाने बदल केले जातील असे सांगत लवकरच शक्तीपीठ महामार्गाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे.
Source link
Beed Sarpanch Murder: बीडच्या सरपंच हत्येचे आज विधीमंडळात पडसाद उमटले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात विरोधकांनी प्रश्नांची राळ उठवली.त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, कडक कारवाईचं आश्वासन दिलं. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं. याबद्दल जाणून घेऊया.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.आता आठवडा उलटल्यानंतरही हत्याप्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विधीमंडळात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष यात सहभागी असून यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
दानवेंच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहीती दिली.आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, कुणाशी संबंधित आहे याचा विचार न करता कारवाई होईल.कुणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यभरात याची चर्चा झाली. लोकनियुक्त संरपचांची अशी कशी हत्या होऊ शकते? असं म्हणत लोकप्रतिनिधीसह सर्वसामान्यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले.
सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला भर दुपारी अपहरण करून हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हत्येनंतर बीडसह राज्यभरात पडसाद उमटले. केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. तीन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आले असून इतर आरोपींचा तपास सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात पेटल्याचं पाहायला मिळालं.विधानपरिषदेतही सरकारला थेट प्रश्न विचारत आरोपीच्या राजकीय कनेक्शनवरूनही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कारवाईला वेग येणार का, हे पाहणं महत्त्वाचंय.