कन्फर्म तिकिट 100 टक्के मिळणार; न्यू इअरसाठी कोकण, गोव्यात जायला 64 स्पेशल ट्रेन

कन्फर्म तिकिट 100 टक्के मिळणार; न्यू इअरसाठी कोकण, गोव्यात जायला 64 स्पेशल ट्रेन


Christmas special trains in india:  नाताळ आणि नवीन वर्षांत तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान आखत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. नाताळ व नव वर्षापर्यंत सुट्ट्यांचा काळ असतो. या सुट्ट्यांमध्ये अनेक जण फिरायला जाण्याचा प्लान करतात. पण अशावेळी ट्रेनचे तिकिट कन्फर्म मिळेलच की नाही, याची शक्यता नसते. ट्रेनमध्ये कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी खूप जुगाड करावे लागतात. या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेने प्रवाशांसाठी 64 स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. 

नाताळ स्पेशल ट्रेनची संपूर्ण लिस्ट 

1) सीएसएमटी ते करमाळा-सीएसएमटी दैनिक विशेषः 34 फेऱ्या

01151 विशेष दिनांक 20.12.2024 ते 5.01.2025 पर्यंत दररोज मध्यरात्री 12.20 वाजता मुंबई सीएसएमटीवरुन निघणार आहे तर त्याच दिवशी 13.30 वाजता करमाळाला पोहोचणार आहे. (17 फेऱ्या)

ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्निगिरी, कणकवली, कुडाळ, थिविम येथे थांबा आहे. एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकुलित प्रथम श्रेणीसह वातानुकुलित-2 टायर, तीन वातानुकुलित-2 टायर, 11 वातानुकुलित-3 टायर, 2 स्लीपर श्रेणी, 2 सामान्य द्वितीय श्रेणी

2. एलटीटी-कोचुवेली-एलटीटी साप्ताहिक सेवा-8 फेऱ्या

01463 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19.12.2024 ते 09.01.2025 पर्यंत दर गुरुवारी 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 22.45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल. (4 फेऱ्या)

01464 स्पेशल कोचुवेली येथून 21.12.2024 ते 11.01.2025 पर्यंत दर शनिवारी 16.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 00.45 वाजता पोहोचेल. (4 फेऱ्या)

ही ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्निगिरी, कणकवली, कुडाळ, थिविम,करमाली, मडगाव जंक्शन, कारवार,गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकल, मुकांबिका रोड, बेंदूर, कुंदापुरा, उडुपी, सूरतकल, थोकूर, मंगलुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कारा, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबेल. यात 2 वातानुकूलित – 2 टियर, सहा वातानुकूलित – 3 टियर, 9 स्लीपर क्लास, 3 जनरल सेकंड क्लास, एक जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन बसवण्यात आली आहे.

3) पुणे-करमाळी-पुणे साप्ताहिक विशेष (6 फेऱ्या)

01407 विशेष गाडी 25.12.2024 ते 08.1.2025 पर्यंत दर बुधवारी पुण्याहून 05.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.25 वाजता करमाळी येथे पोहोचेल. (३ फेऱ्या)

01408 विशेष गाडी 25.12.2024 ते 08.1.2025 पर्यंत दर बुधवारी करमाळी येथून 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता पुण्याला पोहोचेल. (३ फेऱ्या)

ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम येथे थांबेल. यामध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकूलित 2 टियर, 2 वातानुकूलित 3 टियर, 5 स्लीपर क्लास, 6 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आहेत.

4 ट्रेन क्रमांक  09412/09411 अहमदाबाद-थिविम स्पेशल (द्वि-साप्ताहिक) (16 फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 09412 अहमदाबाद – थिविम स्पेशल अहमदाबादहून दर रविवारी आणि बुधवारी १४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता थिविमला पोहोचेल. ही ट्रेन 8 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 पर्यंत धावणार आहे.

ट्रेन क्रमांक 09411 थिविम-अहमदाबाद स्पेशल थिविम येथून दर सोमवार आणि गुरुवारी 11.40 वाजता सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी 08.45 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 9 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत धावणार आहे.

ही गाडी दोन्ही दिशांना आनंद, वडोदरा, भरूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर थांबेल.  या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.





Source link

शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?

शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?



Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपात भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ खातं स्वत:कडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 



Source link

कोण म्हणत, मराठी माणसाला बिझनेस जमत नाही? 2600 रुपयांच्या उद्योगाची उलाढाल आज ₹550000000 वर

कोण म्हणत, मराठी माणसाला बिझनेस जमत नाही? 2600 रुपयांच्या उद्योगाची उलाढाल आज ₹550000000 वर


Success Story Of Marathi Brand: दरवर्षी साधारण दिवाळी होऊन गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते नव्या कॅलेंडरचे म्हणजेच दिनदर्शिकेचे. त्यातही आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे जणू समीकरणच झालं आहे. मराठी माणूस उद्योग धंदा करु शकत नाही हा भ्रम मोडू काढणाऱ्या काही सर्वात यशस्वी कंपन्यांमध्येही कालनिर्णयचा आवर्जून उल्लेख केला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ हे तीन शब्द कधी ना कधी, कुठे ना कुठे ऐकायला मिळतातच. भारतीय संस्कृतीशी जोडणारा एक प्रमुख धागा म्हणून आजच्या टेक्नोलॉजिकच्या जगात अगदी अॅपच्या माध्यमातून मोबाईलवरील स्क्रीनपर्यंत पोहोचलेल्या कालनिर्णयचा प्रवास थक्क करणारा आहे. चला याचबद्दल जाणून घेऊयात…

कधी आणि कशी झाली सुरुवात?

कालनिर्णयची स्थापना 1976 साली ज्योतिषाचार्य जयंत साळगावकर यांनी केली. अवघ्या 2600 रुपयांच्या भांडवलावर त्यांनी हा उद्योग सुरु केला. आज आपण आवर्जून कालनिर्णय घेत असलो तरी तो काळ असा होता की त्यावेळेस मोफत मिळणारं पंचांग अशा नव्या फॉरमॅटमध्ये विकण्याची कल्पनाच मोठी धाडसी होती. मात्र साळगावकरांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी केवळ पंचांग आणि कालगणनेसाठीचं माध्यम न ठेवता ते अधिक रंजक करण्यासाठी त्यामध्ये अनेक नवे प्रयोग केले.

युएसपी ठरलं मागचं पान

साळगावकरांनी कालनिर्णयमध्ये प्रत्येक महिन्याच्या मागील पान हे विशेष लेखांसाठी वापरण्याचा अनोखा प्रयोग केला आणि तो सुपर हीट ठरला. आरोग्य, सौंदर्य, स्वादिष्ट, भविष्य, ग्रहाणाविषयीची माहिती, संगोपन, किचन टीप्स यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश साळगावकरांनी या मागच्या पानावर केला. या मागच्या पानाचीही लोक आतुरतेने वाट पाहू लागले. त्यामुळे अर्थातच कालनिर्णयवरील जबाबदारी वाढली आणि ते सुद्धा अधिक सकस कंटेट देऊ लागले. 

एकूण किती प्रती विकल्या जातात? किती भाषांमध्ये होतं प्रकाशित?

आजच्या घडीला कालनिर्णय हे सर्वाधिक खपाचं प्रकाशन आहे. दरवर्षी कालनिर्णयच्या दिड कोटींहून अधिक प्रती विकल्या जातात. कालनिर्णय हे मराठी, इंग्रजी, हिंदीसहीत एकूण 9 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काळाची पावलं ओळखत कालनिर्णयने वेबसाईट, अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन जनरेशनमध्येही आपली ओळख कायम ठेवली आहे. 2600 रुपयांपासून सुरु झालेल्या या कंपनीची आजची वार्षिक उलाढाल ही 55 कोटी रुपयांहून अधिकची आहे. 

कालनिर्णयनंतर 40 ब्रॅण्ड आले पण…

ऑडीट ब्युरो ऑफ सर्क्युलेशननुसार कालनिर्णय हे जगातील सर्वात जास्त विकले जाणारे प्रकाशन आहे. कालनिर्णयनंतर भारतामध्ये एक दोन नव्हते तर तब्बल 40 ब्रॅण्डने दिनदर्शिका सुरु केल्या. मात्र यापैकी कोणत्याही दिनदर्शिकेला कालनिर्णय इतकं यश मिळवता आलेलं नाही. यावरुनच साळगावकर कुटुंबाचं या श्रेत्रातील काम आणि मत्तेदारी अधोरेखित होते. कालनिर्णयच्या माध्यमातून एक मराठमोळा ब्रॅण्ड आज जगभरात पोहचल्याचं पाहायला मिळत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.





Source link

महाराष्ट्रातील पहिलीच योजना; जिल्हा परिषदेच्या तलावात महिला करणार मासेमारी

महाराष्ट्रातील पहिलीच योजना; जिल्हा परिषदेच्या तलावात महिला करणार मासेमारी



सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 30 पाझर तलावात बचत गटातील महिला करणार मत्स्यशेती. 



Source link

गोंदिया शिवशाही बस अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चालकानेच…

गोंदिया शिवशाही बस अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चालकानेच…



Shivshahi Bus Accident: गोंदिया येथे झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 जण ठार झाले आहेत. गोंदियातील अपघाताची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल परिवहन आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे. 



Source link

'आधी लेक, नातवाचा राजीनामा घ्या', गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज

'आधी लेक, नातवाचा राजीनामा घ्या', गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज


संपू्र्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या मारकडवाडीकडे लागून राहिले आहे. अशातच मारकडवाडीतून शरद पवार यांच्या EVMबाबतच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी आता उत्तर दिल आहे. EVM मध्ये घोळ करता येत नाही त्यामुळे शरद पवार यांचा विरोध असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तुमच्या EVM ला विरोध असेल तर आधी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा राजीनामा घ्यावा असं थेट आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी मारकवाडीतील सभेतून शरद पवार यांना केला आहे.  

त्यावर आम्ही राजीनामा देयाला तयार आहे. तुम्हाला एका मतदार संघाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेयची आहे. माझी झाली तर आम्ही देखील राजीनामा देऊ. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी अडचण नाही. लोकसभेला EVM मिशन व्यवस्थित होत्या पण विधानसभेत त्यामध्ये फेरफार करण्यात आली म्हणून आम्ही राजीनामा देतोय असं म्हणत गोपीचंड पडळकर यांच्या आरोपांना उत्तम जानकर यांनी उत्तर दिलं आहे. 

गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख

100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आलाय. यांचे डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही असे भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

तर EVMमध्ये  घोटाळा करता येत नाही. म्हणून विरोधक विरोध करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. 

मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येवढचं नाही तर त्यांनी गावात बैलगाडीतून एन्ट्री केली. तसेच विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी  आसूडही ओढलेत. त्यामुळे पुढील काही दिवस मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अधीक तीव्र होत जाणार यात शंका नाही. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp