दोघांच्या भांडणात तिसऱ्याने कायमचा गमावला डोळा! प्लॅटफॉर्मवरील CCTV मधील Video पाहाच

दोघांच्या भांडणात तिसऱ्याने कायमचा गमावला डोळा! प्लॅटफॉर्मवरील CCTV मधील Video पाहाच


Bandra Railway Station CCTV Footage: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील भांडणातून काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक असाच प्रकार घडला असून या वेळेस एका प्रवाशाला आपला डोळा गमवावा लागला आहे. किरकोळ वादावरुन एका निरपराध व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी 2026) रात्री सुमारे 11 वाजता वाद्रे स्टेशनवर एका 28 वर्षीय तरुणाला दगड लागून डाव्या डोळ्याची दृष्टी गमावली आहे.

Add Zee News as a Preferred Source

त्या डोळ्याने परत कधीच पाहता येणार नाही

डॉक्टरांनी या प्रवाशाच्या डोळ्यावर जबर मार लागला असून त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी परत येणार नाही. पीडित व्यक्तीचं नाव निशांत रत्नकुमार खत्री असून हा 28 वर्षीय तरुण दादर (पश्चिम) येथील सेनापती बापट मार्गाजवळ मनीष मार्केट येथील रहिवासी आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए पूर्ण केलेला निशांत साकिनाका येथील एका खासगी कंपनीच्या अकाउंट्स विभागात काम करतो. 

दोघांच्या भांडणात कारण नसताना गमावला डोळा

पीडित निशांत रत्नकुमार खत्री सागर टेक प्लाझा येथील ऑफिसमधून काम आटोपून अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनने बुधवारी रात्री परत येत होता. ट्रेनच्या डब्यात तिसऱ्या सीटवर बसलेल्या निशांतसमोर ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये भांडण सुरू झाले. एकाने दुसऱ्याला मारण्याची धमकी दिली. वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ट्रेन थांबली तेव्हा एका प्रवाशाने रुळावर उतरून दगड उचलला आणि दुसऱ्यावर फेकला, पण तो ट्रेनला लागला. नंतर त्याने दुसरा दगड उचलून डब्यात फेकला, जो लक्ष्य चुकून निशांत यांच्या डाव्या डोळ्याला लागला. निशांत यांनी सांगितले की, डोळ्यातून रक्त येत असतानाही कोणीही मदत केली नाही. ते रक्त येत असतानाही ट्रेन चालू असतानाच उडी मारून प्लॅटफॉर्मवर उतरले आणि स्टेशन मास्टरच्या ऑफिसपर्यंत रक्त ओघळत चालत गेले. तेथे 45 मिनिटे वाट पाहावी लागली. नंतर भाभा हॉस्पिटलमध्ये निशांतवर उपचार करण्यात आले.

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा

घटनेनंतर स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण होते. रेल्वे पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यात दिसलेल्या इसमाबाबत गुप्त बातमीदारांना माहिती दिली असता सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम हा दादर येथे दिसत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण टीमने सापळा लावून त्यास दादर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचाकड़े अधिक विचापूस व चौकशी करून त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव योगेंद्र वंशराज बौध्द असं असल्याचं सांगितलं आरोपी 26 वर्षांचा आहे. आरोपी हा सध्या मुंबईत मजुरी करत असून पालघरमध्ये वास्तव्यास असला तरी मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा आहे. 

मालाडमधील हत्येनंतर पुन्हा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.





Source link

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुनील तटकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले 'पक्षाच्या बैठकीत…'

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुनील तटकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले 'पक्षाच्या बैठकीत…'


Sunil Tatkare To The Point Interview: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचं उत्तर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आलेलं नाही. प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: त्यांच्या नावाची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्रिपदानंतर या पदावरही विराजमान होत सूत्रं हाती घेतील अशी चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट विथ कमलेश सुतार’ मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पक्षाचं पुढे काय होणार? असं विचारलं असता सुनील तटकरेंनी सांगितलं की, “पक्ष संघटन मजबूत करणं, दादांनी जो विचार दिला त्याला पुरक काम करणं,  वहिनींच्या नेत्त्वात सरकारमध्ये आहोत, त्यामुळे सरकारच्या अनेक वेगळ्या योजना पक्ष संघटना, विधानसभा, विधानपरिषदेतून जनतेपर्यंत पोहोचवणं याला गती द्यायची आहे. दादा नाहीत ही कल्पना आम्हाला कोणाला पचत नाही. पण वहिनींनी धीर दाखवला त्यासोबत राहून पुढील काम करणं कर्तव्य असून त्यादृष्टीने पुढील वाटचाल करु”. 

पक्षाचं नेतृत्व कोणाचं असेल यावर त्यांनी उत्तर दिलं की, “यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या प्रयत्न झाला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत स्पष्ट केलं की, ना त्यांचं नाव चर्चेत होतं, ना त्या स्पर्धेत होतो. मीदेखील वारंवार स्पष्ट केलं आहे की, कार्यकर्ते, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे ती बाब होईल”.

“विधीमंडळ नेता निवडीपर्यंतही मला प्रश्न विचारले गेले. बैठकीची प्रक्रिया झाल्यावर मी सांगितलं. पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्या, घटकांच्या, विधीमंडळ सदस्यांच्या, कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन पुढील वाटचाल करणार आहोत. पक्षाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,” असं सांगत त्यांनी सुनेत्रा पवार अध्यक्ष होतील की नाही यावर उत्तर दिलं. आमदारांची असेल तीच माझी भावना आहे. योग्य वेळी एकमताने निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. 

पार्थ पवार आणि जय पवार यांची काय भूमिका असेल? यावर ते म्हणाले, “ते दोघे तरुण आहेत. दादांचा विचार घेत ते त्यांच्या प्रतीने काम करत आहेत. अशावेळी पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना सोबत देऊन पक्ष उभारणीसाठी एकत्र काम करु. ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होईल तेव्हा त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल”.

“मला राज्यात यावं असं वाटलं नाही. दादा नाहीत हा मोठा आघात आहे. पण इथे एक चांगली फळी दादांनी आणि आम्ही निर्माण केली आहे. त्यामुळे केंद्रात लोकसभा सदस्य काम करण्यातच मला रस आहे. राज्य पातळीवर संघटन ज्याची जबाबदारी दादांनी विश्वासाने माझ्यावर सोपवली होती, ती विश्वासाने पार पाडणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जे लक्ष द्यावं लागणार आहे ते देईन. राज्याच्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे. सत्तेच्या राजकारणात येण्याची माझी अपेक्षा नाही. आम्ही आणि दादांनी कष्टाने उभं केलं आहे ते पुढे चालू ठेवणं ही प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडेन,” असं तटकरेंनी म्हटलं. 

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू. आमदारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडू. जर गरज असेल तेव्हा संवाद साधू असं त्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिली असल्याने योग्य वेळी चर्चा होईल आणि पक्षाची भूमिका व्यासपीठावर मांडू. ज्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्यासोबत चर्चा करु असं सांगत त्यांनी अर्थखात्यावर भाष्य करु. 





Source link

थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने 'बरोबरच जाऊ', पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम

थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने 'बरोबरच जाऊ', पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम


Ajit Pawar Death In Plane Crash This Leader Was Suppose To Travel With Deputy CM: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ लॅण्डींगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांसोबतच या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन वैमानिक आणि फ्लाइट अटेडंट आणि अजित पवारांच्या खासगी अंगरक्षाचा समावेश आहे. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. असं असतानाच आता अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात राज्यातील आणखीन एक मोठा नेता असता अशी माहिती समोर आली आहे. सुदैवाने वेळेत न पोहचल्याने या नेत्याला या विमानात बसता आलं नाही आणि त्याचा जीव वाचला. ही माहिती या नेत्यानेच दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तो बडा नेता कोण?

28 तारखेला सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईमधील कलीना विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या अजित पवारांच्या विमानामध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही प्रवास करणार होते. मात्र त्यांना वेळेत पोहचता आलं नाही आणि विमान सुटलं. हेच विमान अर्ध्या तासाने म्हणजेच 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर टेबल टॉप धावपट्टीजवळच्या खड्ड्यात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि मदतीसाठी धावलेल्या स्थानिक गावकऱ्यांनाही काही करता आलं नाही. यामध्ये अजित पवारांसहीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. मात्र या विमानातून आपणही प्रवास करणार होतो अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.  नेमकं नियोजन काय होतं याबद्दल जानकर यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे.

कसं होतं प्रवासाचं नियोजन?

“अजितदादांचा मला 24, 25 आणि 26 ला सतत फोन येत होता. साताऱ्यात दादांची राष्ट्रवादी, पवारांची राष्ट्रवादी आणि माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाची युती झालेली आहे. आपण साताऱ्याच्या सभेला बरोबरच जाऊ असं दादा मला म्हणाले होते. बारामतीला मला तुमच्या एका नगरसेवकाची मदत लागणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करायला तयार आहोत असं दादा म्हणाले. महाराष्ट्र नशीब खराब की काय म्हणायचं की काय कळेना. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील आणि आता अजित पवारांच्या जाण्याने भारताचं नुकसान झालं आहे. आमदार, मंत्री, खासदार होणं सोपं असतं. नेता बनणं अवघड असतं. राज्याचा आणि देशाचा विकास करणार हा माणूस होता. आमची चांगली मैत्री होती. ते मला कायम सल्ला द्यायचे,” असं जानकरांनी प्रवासाचं नियोजन कसं होतं याबद्दल अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं.

…म्हणून पकडलं नाही विमान

जानकरांना तुमचं विमान कसं सुटलं? याबद्दल विचारलं असता त्यांनी, “मला बेळगाववरुन यायला 3 वाजले पहाटेचे, त्यामुळे मी झोपलो होतो,” असं उत्तर दिलं. म्हणजेच झोप लागल्याने वेळेत विमान न पकडू शकल्याने जानकर या विमान अपघातातून बचावले असं त्यांनीच स्पष्ट केलं आहे.  





Source link

मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द, ऐनवेळी…

मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द, ऐनवेळी…


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

कधीही हरवेल वाट! धुक्यानं गाठली धोका पातळी; उकाडाही वाढतोय, पुढचे 24 तास दक्षतेचे

कधीही हरवेल वाट! धुक्यानं गाठली धोका पातळी; उकाडाही वाढतोय, पुढचे 24 तास दक्षतेचे


Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्यापही थंडीचं वातावरण कायम असतानाच मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये मात्र वाऱ्यांची दिशा बदलली असल्यानं याचा परिणाम हवामान बदलांमध्ये दिसत आहे. परिणामी महाराष्ट्रात गारठा कमी होण्यात सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामानात वाढ होत असल्याचं चित्र आहे. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानातही चढ- उतार होण्यास सुरुवात झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

राज्यासह मुंबई शहरात कसं असेल हवामान? (Mumbai Weather)

मागील 24 तासांमध्ये राज्यात धुळ्यात किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून इथं आकडा 10.5 अंश सेल्सिअवर स्थिरावला होता. तर, सर्वाधिक तापमानाची नोंद कोकणातील रत्नागिरी इथं करण्यात आली. जिथं पारा 34 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. ही स्थिती पाहता ढगाळ वातावरणामुळं राज्यात दमट हवामान आणि तापमानातील चढ- उतारांमध्ये पुढच्या 24 तासांमध्येही सातत्य पाहायला मिळणार आहे. 

हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानवाढील सुरुवात झाली असून, थंडी हळुहळू महाराष्ट्राची वेस ओलांडताना दिसत आहे. पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहणार असून मुंबई शहर, उपनगरांमध्ये तापमानाच 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि रायगडसह कोकणातील काही भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाचीसुद्धा हजेरी असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे. 

थंडी, पाऊस नव्हे, तर देशात धुक्याचा यलो अलर्ट!

केंद्रीय हवामान विभागानं देशाच्या बहुतांश भागांमध्ये धुक्याची चादर आणि त्याचा दृश्यमानतेवर होणारा थेट परिणाम पाहता यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, महाराष्ट्रातील घाट क्षेत्रावरही दाट धुक्याची चादर कायम असल्यानं पहाटे आणि रात्री उशिरा वाट या धुक्यात हरवताना दिसेल. राजस्थान, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्हे, पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून अगदी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये दिवस माथ्यावर येऊनही धुकं मागे हटणार नसल्यानं दृश्यमानता प्रभावित होताना दिसेल. 

तिथं जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका तुलनेनं कमी होण्यास सुरुवात झाली असून, थंडी बऱ्याच प्रमाणात कमी नसली तरीही हाडं गोठवणाऱ्या स्थितीपासून या भागाला किमान दिलासा मिळत आहे हे खरं. मैदानी भागांमध्ये मात्र गारठा कायम असून, पश्चिमी झंझावाताचा परिणाम पुढील 24 तासांमध्ये इथं कशा प्रकारात पाहायला मिळते यावर हवामान विभागाचंही लक्ष असेल. 





Source link

'तुम घाटी लोग नही सुधरोगे…', मुंबईत मराठी तरुणाला बिल्डरकडून मारहाण, मनसेने दिला इशारा, 'BJP मुळे बेडकांची डराव…'

'तुम घाटी लोग नही सुधरोगे…', मुंबईत मराठी तरुणाला बिल्डरकडून मारहाण, मनसेने दिला इशारा, 'BJP मुळे बेडकांची डराव…'


Marathi Employee assaulted in Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे. याचं कारण एका मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली असून, घाटी म्हणून हिणवण्यात आलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी ही मारहाण केली आहे. ‘तुम घाटी लोग नही सुधरोगे’ अशा शब्दांत मराठी तरुणाला शिवीगाळ केल्याचा दावा आहे. यानंतर मनसेने रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच असा जाहीर इशारा दिला आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकी घटना काय?

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या मराठी तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. तुम घाटी लोग नही सुधरोगे म्हणत सुशील रहेजा यांनी मारहाण केली. तक्रारदार तरुण सुशील रहेजा यांच्या चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. क्षुल्लक कारणावरुन सुशील रहेजाने या तरुणाला मारहाण केली. 

मारहाण का केली?

कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजा यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर तक्रारदार तरुणाने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. रहेजा यांच्याविरोधात कलम 115 बीएनएस 2023 सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मनसेने दिला इशारा

मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेवर संताप व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच असा इशाराही दिला आहे. 

“तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत…मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा कडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ…भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची …केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे…आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डर कडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत …!!! बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच,” असं त्यांनी म्हटलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp