सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा

सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा


विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनेक सवाल उपस्थित करत आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसताहेत. आता विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर आक्षेप घेत मुननंटीवार यांनी सरकारला सवाल केलाय.

पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्यापासून आपल्या सरकारवर वार करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर त्यांनी आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलंय. मराठी अभिजात भाषा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का छापता? असा थेट सवालच त्यांनी विधानसभाध्यक्षांना विचारलाय.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिलं. राज्यात 24 तास वाळूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावरी सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. बुलेट ट्रेनपेक्षा वेगात काम करणारे मंत्रिमहोदय घरकुलांचा प्रश्न आला की पॅसेंजरपेक्षा स्लो का होतात असा सवाल करत मुनगंटीवार यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय. 

वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी दिल्याची घोषणा सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली , वाळू धोरणावर बोलत असताना देखील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी काही लपून राहिली नाही. एवढंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धीवरून देखील टोला लगावला. सीएम बुलेट ट्रेन पद्धतीन काम करतात पण सामान्य लोकांना घरकूल बांधणी करताना स्लो का होतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सभागृहात आज सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानांची जोरदार चर्चा रंगली, सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीवर बोलून मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहे दिल्याचे पाहायला मिळतेय, तसेच त्यांची नाराजी चव्हाट्यावर आल्याचं देखील बोललं जातंय. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू काय म्हणाले पाहुयात  तर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे डोळे उघडलेत आता तरी सरकारने शहाणं व्हवं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर निशाणा साधलाय.





Source link

पुण्यात बाजीराव पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण; राणी मस्तानीच्या वंशजांकडून कार्यक्रमावर बहिष्कार, 'आम्ही DNA चाचणी…'

पुण्यात बाजीराव पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण; राणी मस्तानीच्या वंशजांकडून कार्यक्रमावर बहिष्कार, 'आम्ही DNA चाचणी…'


पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन डी ए येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. दरम्यान मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिलं असून, व्यासपीठावर जागा देणार नसल्याचं आयोजकांनी सांगितले आहे, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान असून, आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत.त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्य बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (1761 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांच्या वतीने सहभाग घेतला. सत्ताविसव्या वर्षी त्यांचे निधन झाले.माझे पणजोबा नवाब अली बहादूर 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत, लढाई लढले”. 

“या सर्व गौरवशाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील दोन दिवसांपूर्वी मला देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असं सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

“माझा याला विरोध नाही,पण या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाह हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहे. आम्ही अशा प्रकारचा आमचा अपमान सहन नाही करू शकत. याद्वारे आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी आहे.आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही डी एन ए चाचणी करायला तयार आहोत. तसेच अशा अपमानामुळे आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.  





Source link

अजित पवारांच्या 27 पट श्रीमंत, 5 वर्षात संपत्ती 575 टक्क्यांनी वाढली; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक

अजित पवारांच्या 27 पट श्रीमंत, 5 वर्षात संपत्ती 575 टक्क्यांनी वाढली; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक


Maharashtra Richest MLA Parag Shah : महाराष्ट्रातील एक श्रीमंत आमदार  भारतातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना टक्कर देतो.  हा श्रीमंत आमदार फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात श्रीमंत आमदार 33830000000 रुपयांचा मालक आहे. हा आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या 27 पट श्रीमंत आहे.  विशेष म्हणजे या आमदाराची संपत्ती पाच वर्षात 575 टक्क्यांनी वाढली आहे. जाणून घेऊय महाराष्ट्रातील हा सर्वात श्रीमंत आमदार आहे तरी कोण?

पराग शहा (Parag Shah) असे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराचे नाव आहे.  पराग शहा हे मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. 2024  विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी सध्याची संपत्ती  3353.06  इतकी असल्याचे नमूद केले आहे.  पाच वर्षात पराग शहा यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण,  2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्र सादर करताना त्यांची संपत्ती 550 कोटी असल्याचे नमूद केले होते. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर 21.39 कोटी रुपये कर्ज आहे.

पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67  कोटींची अचल मालमत्ता आहे.  स्वतःच्या नावावर 2,179  कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136  कोटींची संपत्ती आहे.  पराग शाह हे रिअल इस्टेट बिल्डर आहेत आणि मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवतात. पराग शाह हे शाह हे एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत.
महाराष्ट्रातील इतर श्रीमंत आमदार

मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)

 मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील  मलबार हिलचे आमदार आहेत.  मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे. 

संजय चंद्रकांत जगताप (Sanjay Chandrkant Jagtap) 

संजय चंद्रकांत जगताप हे कॉंग्रेस पक्षाचे पुण्यातील पुरंदर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची  एकूण मालमत्ता 245 कोटी आहे. 

विश्वजीत पतंगराव कदम (Viswajit Patangrao Kadam) 

विश्वजीत पतंगराव कदम हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. पलूस कडेगाव हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची मालमत्ता 216 कोटी रुपये आहे. 

अबू अझीम अस्मी (Abu Azim Asmi) 

अबू अझीम अस्मी हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. मानखुर्द शिवाजीनगर चे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 209 कोटी आहे. 

राजेश संभाजीराव पवार (Rajesh Sabhajirao Pawar) 

राजेश संभाजीराव पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नायगाव, नांदेड हा त्यांचा  मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 191 कोटी आहे.

प्रशांत रामशेठ ठाकूर (Prashant Thakur) 

प्रशांत रामशेठ ठाकूर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.  पनवेल हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 183 कोटी आहे.

समीर दत्तात्रय मेघे (Sameer Meghe) 

समीर दत्तात्रय मेघे हे भारतीय जनता पक्ष मतदारसंघाचे आमदार आहेत.  हिंगणा, नागपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 159 कोटी आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra  Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांकडे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. पत्नी अमृता फडणवीसांच्या नावे 7.9 कोटींची संपत्ती आहे. 

 





Source link

शाळेत शिकवायची अन् 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन लौंगिक…; दादरमधल्या शिक्षिकेचं भयनाक कृत्य, पालक हादरले

शाळेत शिकवायची अन् 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन लौंगिक…; दादरमधल्या शिक्षिकेचं भयनाक कृत्य, पालक हादरले


Mumbai School Crime News: मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शिक्षिकेने मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर तिच्याविरोघात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. 

पालकांनाही बसला धक्का

शिक्षकांना, गुरूंना आपल्याकडे देवासमान दर्जा दिला येतो. मात्र शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका महिला शिक्षिकेने अत्यंत लांछनास्पद कृत्य केलं आहे. पालक आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळेत पाठवतात, शिक्षकांवर त्यांचा फार विश्वास असतो. मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने केलेल्या कृत्यामुळे पालकांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार

याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. ही शिक्षिका गेल्या वर्षभरापासून पीडित अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती असा आरोप करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ही शिक्षिका शहरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या मुलाला नेऊन त्याचं लैंगिक शोषण करत होती. हे प्रकरण समोर आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला असून शाळेत एकच खळबळ माजली आहे. दादर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि फौजदारी संहितेच्या इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्याला ती औषधंही देत होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणत त्याला इतके दिवस गप्प बसण्यास भाग पाडलं. एवढंच नव्हे तर आरोपी शिक्षिका विद्यार्थ्याला नैराश्य दूर करण्यासाठी औषधे देत असल्याचंही समोर आलं आहे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमी झाल्याचं उघड झालं आहे. पीडित विद्यार्थी सर्वांना घाबरुन राहत असे. मानसिक परिस्थिती ठीक नसल्याने तो त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता.

अनेकदा केला लैंगिक अत्याचार

आरोपी शिक्षिकेने अल्पवयीन मुलाबरोबर अनेकदा घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपी शिक्षिका ही शाळेत शिकवायची. शाळेचे तास भरल्यानंतर ती पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेघळ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याचं शोषण करायची. 

परीक्षेनंतर त्याच्या भावनांचा बांध फुटला

अखेर बराच काळ सगळं सहन केल्यानंतर, अखेर त्या विद्यार्थ्याने बारावीची (12वी बोर्ड) परीक्षा दिली आणि त्याने पालकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्या शिक्षिकेने त्याला एका नोकराद्वारे बोलावले आणि नंतर अनेक वेळा त्याचं लैंगिक शोषण कसे केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रमच विद्यार्थ्याने पालकांसमोर कथन केला.

पालकांची पोलिसात धाव

विद्यार्थ्याने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पीडित मुलाचे पालक हादरले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.





Source link

इतरांनाही विचारात घ्या, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला श्रेयवादाचं ग्रहण!

इतरांनाही विचारात घ्या, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला श्रेयवादाचं ग्रहण!


No match is being played.

Jun 29, 2025 | 5/6 Place Play off

Continental Cup, 2025

Jun 29, 2025 | Final

Continental Cup, 2025

Jun 29, 2025 | 3/4 Place Play off

Continental Cup, 2025





Source link

महाराष्ट्र नव्या 'राज'कीय भूकंपाच्या उंबरठ्यावर? राज ठाकरेंमुळे फूट पडण्याचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र नव्या 'राज'कीय भूकंपाच्या उंबरठ्यावर? राज ठाकरेंमुळे फूट पडण्याचे स्पष्ट संकेत


Congress Oppose Raj Thackeray Stand On North Indian: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

काँग्रेसची बैठक अन् गोंधळाची स्थिती…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. पूर्वनियोजित बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सरचिटणीस वेणुगोपाल यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. पक्ष संघटना, आगामी निवडणुकांसाठी आणि त्यासाठी संभाव्य आघाडी यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची औपचारिक भेट घेतली. काँग्रेसचे जुने मुख्यालय 24 अकबर मार्ग येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिल्लीतील नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे सोमवारची ही दिल्लीत झालेली बैठक पूर्वनियोजित होती आणि राहुल गांधींनी बोलावली असल्याचा निरोप नेत्यांना देण्यात आला होता. मात्र श्रेष्ठींच्या अनुपस्थितीत प्रभारी रमेश चेत्रिथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच चर्चा केली. पक्षश्रेष्ठींनीच बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल प्रदेश पातळीवरील नेते नाराज झाल्याचे कळते. प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षच बैठक घेणार असतील तर ती मुंबईतही होऊ शकली असती. दिल्लीत घेण्याची गरज काय होती, असा सवाल एका नेत्याने उपस्थित केला. अन्य एका नेत्याने बैठक कशासाठी बोलावली होती हे कळलेच नाही, अशी टिप्पणी केली.

काँग्रेसचा राज ठाकरेंना विरोध

याच बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेत्रिथला यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे, “राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही. भारत एक आहे,” अशी बोलकी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगळी भूमिका कशी? असा थेट सवाल

यावर मनसेकडून पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. “रमेश चेन्निथला यांना आणि काँग्रेसला आमची भूमिका समजली नाही. आज कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं यांचं आहे. 2009 ला काय भूमिका होती आमची? आजही आमची भूमिका कायम आहे. आमची भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे,” अशी अपेक्षा देशपांडेंनी व्यक्त केली आहे. “कर्नाटकात कन्नड तर आपल्या राज्यात मराठीच आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचा अशा भूमिकेला पाठिंबा नव्हता आता काँग्रेसमध्ये थोडा बदल झाला आहे. दोन बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही. हा मराठी माणसाचा विषय आहे,” असंही देशपांडे आवर्जून म्हणाले.

5 जुलैच्या मेळाव्याची जबाबदारी या व्यक्तीवर…

आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत बोलतील. मेळाव्याचं सविस्तर नियोजन करतील. राजकीय पक्षाचा हा मेळावा नाही मराठी माणसाचा आहे याची काळजी आम्ही घेऊ, असं 5 जुलैच्या मेळाव्याबद्दल बोलताना देशपांडेंनी स्पष्ट केलं.





Source link