by Hansraj Agrawal | Nov 26, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. EVM विरोधात कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election Eknath Shinde Likely To Resign: राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र नवे मुख्यमंत्री निवडेपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार असल्याचे समजते. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार संभाळणार आहेत. (दिवसभरातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)
विधानसभा होणार बरखास्त
मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी सूत्रांची माहिती आहे. पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नाही तोपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेच जबाबदारी पाहतील असं सांगितलं जात आहे. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कारभार नव्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाईल. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच मंत्रिमंडळही बरखास्त होणार आहे.
दबाव तंत्राचा वापर
मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असं भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपा नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर यांच्यासहीत आशिष शेलार यांचाही समावेश आहे ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस असावेत अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, ‘अशा पद्धतीने माझ्या…’
केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून होणार चर्चा
भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये 132 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने…; फडणवीसांची ‘ती’ भेट कारणीभूत
दरम्यान आज मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होणार असून उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 25, 2024 | Trending News
Rohit Pawar Meet Ajit Pawar : अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यात जवळपास दीड वर्षांत असा खुमासदार संवाद पाहायला मिळाला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी रोहीत पवार कराडच्या प्रितीसंगमावर गेले होते. रोहित पवार तिथून परतत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर आले होते.
यावेळी काका-पुतणे समोरासमोर आल्यावर काय होणार असा प्रश्न तेथील कार्यकर्त्यांच्या मनात होता. अजित पवार यांनी मात्र राजकीय अभिनिवेश बाजूला सारत रोहित पवार यांचा हात हातात घेतला. काकांच्या अधिकारवाणीनं पायापड असं देखील अजित पवार यांनी रोहित पवार यांना सांगितलं. एवढंच नाही तर अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले की, रोहित वाचलास, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं हे तुला माहिती आहे ना म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं.
रोहित पवार काय म्हणाले?
कराडच्या प्रितीसंगमावर रोहित पवार-अजित पवार आमने-सामने आले होते. यावेळी दोघांमध्ये खास गप्पा झाल्या. यावेळी रोहित पवार अजित पवार यांच्या पाया देखील पडले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देत म्हणाले की, वाचलास रोहित, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं तुला माहिती आहे ना असं अजित पवार म्हणाले. त्यावर रोहित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार काकांच्या अधिकारवाणीनं बोलले आहेत. आमचे वैचारिक मतभेद कायम असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांचा घूमजाव
अजित पवार रोहित पवार यांना जे म्हणाले ते सगळ्या जगानं ऐकलं. परंतु, अजित पवार यांनी त्यावर घूमजाव केला. जामखेडच्या सभेबाबत आपण काहीच बोललो नसल्याचं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांत अबोला होता. दोघं कधीही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी बोलले नव्हते. उलट एकमेकांवर टीकेची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. प्रितीसंगमावर मात्र काका-पुतण्यांच्या नात्यामधील ओलावा स्पष्ट जाणवला.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 24, 2024 | Trending News
Kasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 24, 2024 | Trending News
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महायुतीला 234 जागा मिळाल्या असून, भाजपाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी 41 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या. दरम्यान या निकालावर अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पराभवावर बोलताना कंगनाने दानवांचा पराभव झाला आहे अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली. तसंच आपल्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत होतं असंही म्हटलं
“आमच्या पक्षासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते उत्साहित आहोत. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील जनतेचे आम्ही आभारी आहोत,” असं कंगना रणौत म्हणाली आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असं विचारलं असता कंगनाने “पक्ष यासंबंधी निर्णय घेईल असं सांगितलं. आमच्याकडे नेतृत्व करण्यासाठी एकापेक्षा एक लोक आहेत,” असं सांगितलं.
उद्धव ठाकरेंचा इतका वाईट पराभव होईल याची तुम्हाला अपेक्षा होती का? या प्रश्नावर कंगना म्हणाली, “हो मला अपेक्षा होती. इतिहास याचा साक्षीदार आहे आणि माझे अनेक रीलही व्हायरल होत आहेत की आपण देव आणि दानवांना कसं ओळखतो. जे महिलांची अब्रू उतरवतात, ते दैत्य असतात. दुसरीकडे महिलांना 33 टक्के आरक्षण, धान्य, गॅस सिलेंडर दिलं आहे त्यावरुन कोण देव आहे आणि कोण दैत्य हे समजत आहे.त्यामुळे दैत्यांचं तेच झालं जे नेहमी होतं. त्यांचा पराभव झाला.
पुढे ती म्हणाली, “महाभारतात एकच कुटुंब होतं, पण किती फरक होता. सर्व भाऊ होते. जे महिलांचा अपमान करतात. माझं घऱ तोडण्यात आलं. घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत होतं”.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 23, 2024 | Trending News
पुढील
बातमी
महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव
Source link