'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या…'

'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या…'



Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे. 
 



Source link

निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या मतदारांना कितपत भावणार?

निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या मतदारांना कितपत भावणार?


Maharashtra Casteism Issue: विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा दिल्यात. भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी ही घोषणा दिलीये हे लपून राहिलेलं नाही. शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय. भाजप निवडणुकीत जातीयवाद करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. भाजप जातीजातीत भांडणं लावत असल्याचा आरोप केलाय. तर भाजपनंही शरद पवारांवर पलटवार केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. तर योगी बटेंगे तो कटेंगे अशी भीती हिंदू मतदारांना दाखवू लागलेत. भाजपच्या या निवडणूक रणनितीवर शरद पवारांनी निशाणा साधलाय. भाजप महाराष्ट्रातली निवडणूक जातीयवादाकडं नेत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. जाती-जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.

एक है तो सेफ है या भाजपच्या घोषणेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही निशाणा साधलाय. मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रातील प्रचारामुळं सामान्यांना असुरक्षित वाटू लागल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय.

महाराष्ट्रातल्या मतदार उत्तरेतील राज्यांतील मतदारांसारखा नाही त्यामुळं बटेंगे तो कटेंगे ची घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असं अजित पवारांना वाटतंय.

शरद पवारांनी केलेला आरोप भाजपनं फेटाळलाय. जातीयवादावर निवडणुका कोण लढवत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला दरेकरांनी लगावलाय.

लोकसभा निवडणुकीत राम मंदिरसारखा मुद्दा महाराष्ट्रातल्या मतदारांना भुरळ पाडू शकला नाही. त्यामुळं एक है तो सेफ है हा मुद्दाही महाराष्ट्रातल्या मतदारांना कितपत भावेल याबाबत शंका व्यक्त केली जातेय.

‘मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर  त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट उपाधी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी ते काढून टाकलं अशी टीका राज ठाकरेंनी केलं. तसंच  आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. “मुस्लिम मौलवी आज फतवे काढत आहेत.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्टत नाही.  2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या अब्रू बाजूला ठेवल्या. एके दिवशी सकाळी सहा वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. अर्धा तास लग्न टिकलं आणि घटस्फोट झाला.  घटस्फोट झाल्या झाल्या उद्धव ठाकरे यांनी बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारत आहे.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं.  किंवा शिवसेना भाजप नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला काही लोकांनी मतदान केलं. पण  भाजप आणि राष्ट्रवादी यांचा शपथविधी आधी होतो. मग त्यातली एक उठते आणि उरलेल्या दोघांबरोबर संसार करायला लागते. जनाची नाही कशाशी लाज नाही,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.





Source link

50 जागांवर लढून तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार हसतच समजावली आकडेमोड

50 जागांवर लढून तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार हसतच समजावली आकडेमोड


Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Getting Less Seats And Becoming CM: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन बरीच चर्चा झाली. असेच काहीसे चित्र महाविकास आघाडीमध्ये दिसून आलं. अनेक जागांवर तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय झाला नव्हता. सारं बेरीज-वजाबाकी करुन प्रत्येक घटक पक्षाच्या वाट्याला कमी अधिक जागा आल्या. यामध्ये महायुतीत सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. त्या खालोखाल मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जागा मिळाल्या आणि सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. त्याचवेळी दुसरीकडे महायुतीमधील मुख्यमंत्री कोण हा प्रश्नही चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉइण्ट’ या कार्यक्रमात 50 जागांवर लढूनही कशाप्रकारे मुख्यमंत्री होणार? या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ‘झी 24 तास’चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दोन उदाहरणं दिली. 

एका पक्षाचं सरकार येईल असं वाटत नाही

युतीच्या सरकारमध्ये काही तडजोड करावी लागते, असं अजित पवारांनी ‘झी 24 तास’च्या मुलाखतीमध्ये सांगितलं. हाच धागा पकडून कमलेश सुतार यांनी, “निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला फार तडजोड करावी लागली का? तुमच्याकडे 40 आमदार आहेत त्यांच्याकडेही 40 आमदार आहेत. तुम्हीच म्हणालात त्या कार्यक्रमात, मी काही बोलत नाही. 40 त्यांच्याकडे ते मुख्यमंत्री झाले. 40 आमदार त्यांचे त्यांना 80 जागा मिळतात. तुम्हाला 50 जागा मिळतात,” असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी हसतच, “ते मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे थोडा फरक पडणार,” असं उत्तर दिलं.

“कार्यकर्त्यांमध्ये यातून काही मेसेज जातो असं वाटतं का?” या प्रश्नावर अजित पवारांनी, “तुमच्या माझ्या महाराष्ट्रात 85 पासून एका पक्षाचं सरकार कधीच आलं नाही. महाराष्ट्राची राजकीय, भौगोलिक परिस्थिती आणि राज्यातील जनतेची विचार करण्याची पद्धत बघता मला नाही वाटत पुढील 20-25 वर्षात एका पक्षाचं सरकार येईल. 2014 ला भाजपाने प्रचंड प्रयत्न केला पण तो यशस्वी नाही झाला,” असं अजित पवार म्हणाले. 

नक्की वाचा >> ‘शाहांना वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून…’; अजित पवारांचं विधान

अजित पवारांनी हसत दिली दोन उदाहरणं

“जागा कमी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज जातो? तुम्ही म्हणाल कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. पण 50 जागांमध्ये अजितदादा कसे मुख्यमंत्री होणार?” असा प्रश्न कमलेश सुतार यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी हसतच, ‘कमलेशजी, एकनाथराव शिंदे किती जागांवर मुख्यमंत्री झाले? देवेगौडाजी किती जागांवर पंतप्रधान झाले?’ मी आपलं तुम्हाला आठवण करुन देतोय,” असं उत्तर दिलं. “तुम्ही असं म्हणताय की 50 जागांवर दादा मुख्यमंत्री होऊ शकतात,” असं हे उत्तर ऐकल्यावर कमलेश सुतार यांनी म्हटलं. त्यावर अजित पवारांनी, “नाही तसं नाही. राज्यामध्ये आधी महायुतीच्या सरकारच्या पावणेदोनशेपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य आहे. त्या निवडून आल्यानंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ,” असं म्हटलं. 





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा



Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय..  ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.



Source link

'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना…'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना…'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले


Sanjay Raut On Raj Thackeray: वरळी मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. तसंच, 48 तासांत राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवणार, असंही ते म्हणाले होते. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तुम्ही अप्रत्यक्षपणे सत्तेतच आहात, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘हा भोंगा आम्ही गेले 20-25 वर्ष ऐकतो आहोत त्यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी शहांबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहात म्हणजे सत्तेसोबतच आहात. तुमच्या हातात सत्ता येईल ना येईल हा पुढचा प्रश्न. पण एखादा पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षात कोणत्याही सत्तेशिवाय अनेक कार्यक्रम राबवले आहेत.’

राज ठाकरे यांनी भाषणात म्हटलं होतं की, सत्ता आल्यानंतर मी पोलिसांना मुंबई साफ करण्यास 48 तास देईन, त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबई कशी साफ करणार? असा सवाल राऊतांनी केला आहे. सगळ्यात आधी मोदी-शहा, अदानींना साफ करा ते परप्रांतिय आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. यांनीच मुंबई नासवली आहे. मुंबई हातातून काढून घेण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. पण दुर्दैवाने राज ठाकरे मोदी-शहांना मदत करत आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे. 

भुजबळ काय म्हणत आहेत किंवा प्रफुल्ल पवार काय म्हणत आहे प्रताप सरनाईक काय म्हणत आहेत भावना गवळी काय म्हणत आहेत त्याला आता काही अर्थ नाही हे सगळे एकनाथ शिंदे सह अजित पवार यांच्यापासून सगळे हे पक्ष सोडून गेले आहेत ते ईडी पासून बचाव करण्यासाठी स्वतःचा कातडी वाचवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपमध्ये जातात प्रफुल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती भाजपमध्ये जातात इतर अनेकांच्या प्रॉपर्टी मोकळ्या झाल्या नसत्या आणि सध्या तरी ई डी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर परत तर राज ठाकरे नाव सांगणार नाही. जर अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर खाकीवाल्यांना ऑर्डर देईन. ते रझा अकादमीचा बदला घेतील, असं राज ठाकरे यांनी वरळीच्या सभेत म्हटलं होतं. 





Source link

पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव…'

पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव…'


पुढील
बातमी

‘मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत’, वरळीत राज ठाकरे कडाडले, म्हणाले ‘आज बाळासाहेब असते तर यांना…’





Source link

YouTube
Instagram
WhatsApp