'मी आमदार झालो तर तुमची लग्नं लावून देईन'; पवारांच्या उमेदवाराचं आश्वासन! म्हणाला, 'इथे एकही…'

'मी आमदार झालो तर तुमची लग्नं लावून देईन'; पवारांच्या उमेदवाराचं आश्वासन! म्हणाला, 'इथे एकही…'


Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये अनेक लग्नाळू मुलं अविवाहित असल्याच्या बातम्या यापूर्वी तुम्ही अनेकदा वाचल्या आणि पाहिल्या असतील. अनेकदा ग्रामीण भागात रोजगार नसल्यानेही मुलांची लग्न होत नसल्याची, त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. लग्न होत नसल्याने वैतागलेल्या अशा लग्नाळू अविवाहित तरुणांकडून बऱ्याचदा  विवाहासंदर्भात केल्या जाणाऱ्या मागण्या चर्चेत असतात. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. यासाठी कारण ठरलं आहे परळी मतदारसंघातील एका उमेदवाराने केलेलं विधान!

प्रचाराचा शुभारंभ करतानाच आश्वासन

परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात करतानाच दिलेलं एक आश्वासन चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी एक अजब आश्वासन दिले आहे. परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत देशमुख यांनी आपल्या जाहीर भाषणात, “उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करुन देऊ,” असे विधान केले. सध्या देशमुख यांच्या या विधानाची जोरदार चर्चा आता जिल्ह्यात होत आहेय

नेमकं काय म्हणाले देशमुख?

राजेसाहेब देशमुख यांनी मुलांचं लग्न लावून देण्यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडली. “परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून (लग्नाचं स्थळ) येत असताना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुमचा कुठून येणार? इथे एकही उद्योगधंदा उभा केला नाही. त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो. जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करुन देईन. सगळ्या पोरांना कामधंदा देऊ,” असं देशमुख म्हणाले. “अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुणांची लग्नं करायची आहेत. त्यामुळे ‘आगे बढो’ म्हणल्याशिवाय पर्याय नाही,” राजेसाहेब देशमुखांनी म्हटलं असून त्यांच्या या अजब आश्वासनाची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

नक्की वाचा >> ‘बोलणारा आणि हसणारे दोघेही…’, सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

इथे लढत कशी?

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तसेच मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या ठिकाणी काय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार या मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी काय खेळी करणार आणि त्याला मुंडे भाऊ-बहीण कसं उत्तर देणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.





Source link

महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे

महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे



Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.  



Source link

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा


पुढील
बातमी

शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण





Source link

लाडकी बहीण योजना बंद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'डिसेंबरमध्ये…'

लाडकी बहीण योजना बंद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'डिसेंबरमध्ये…'


Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या (Laadki Bahin) योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहे असं म्हटलं आहे. तसंच  सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले असल्याची टीका केली. कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचारसभेत ते बोलत होते.  लाडक्या। बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं? अशी विचारणाही त्यांनी केली. 

“ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. लाडक्या बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं?,” अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले…

 

राजेंद्र पाटील यांच्या शेट्टीने समोरच्या विरोधकांची शिट्टी गुल झाली आहे असा टोला यावेळी त्यांनी राजू शेट्टींना लगावला. “काँग्रेस म्हणत आहे की आमचं सरकार सत्तेत आलं की आम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा मी जेलमध्ये जायला तयार आहे”.

लाडक्या बहीण योजनेत खोडा घालत आहेत, त्यांना कोल्हापूरी जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ती महिला सक्षमीकरणासाठी आहे, महिला सुखी तर देश सुखी, लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असंही एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला.  शेतकरी आपला माय बाप आहे. तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे असंही त्यांनी सांगितलं. 

डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार?

कुर्ल्यातील आपल्या पहिल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी 20 नोव्हेंबरला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार अशी घोषणाही केली होती. “आम्ही लोकांमधे जाऊन काम करणारे लोक आहोत. घरी बसून फेसबुक लाईव्ह नव्हे तर फेस टु फेस काम करणारे आहोत. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 देऊन थांबणार नाही. हे पैसे आम्ही वाढवणार आहोत. आता आचारसंहिता  लागली आहे. विरोधकांना वाटलं की नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्या आधारे सरकारविरोधात बोंब मारण्यची संधी मिळेल. पण आम्हाला विरोधी चालाख आहेत याची माहिती होती. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. यामुळे त्यांची बोलती बंद झाली,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 





Source link

EXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले…

EXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले…


Manoj Jarange on Election: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. दरम्यान ‘झी 24 तास’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपण ना माघार घेतली आहे, ना यु-टर्न असा दावा केला. 

“ना मी माघार घेतली आहे, ना मी यु-टर्न घेतला आहे. मी मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तो अडचणीत येता कामा नये. त्याला वेठीस धरलं जाऊ नये. प्रामाणिक मनाने समाज पाठीशी उभा आहे. त्यांना संकाटत न आणता जास्तीत जास्त फायदा देण्याची जबाबदारी होती. निर्णायक भूमिका घेत ती पार पाडली,” असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. 
 
“विधानसभेत शेतकऱ्यांचे, गोर-गरीब मुस्लीम, मराठा, दलितांचे प्रश्ना मांडायला हवे असं वाटत होतं. ती इच्छा लपवून ठेवण्याचं कारण नाही. आपले 5-10 निवडून आले म्हणून लगेच आरक्षण मिळणार अशी बाब नव्हती. तरीही आरक्षणासाठी संघर्ष करावा लागलाच असता. मराठा समाज अडचणीत येऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी

 

मराठा समाज नेमका कसा अडचणीत आला असता? असं विचारलं असता ते म्हणाले की, “एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही आणि जिंकूही शिकत नाही. मग उगाच उभे करायचे आणि पडले तर समाजाला खाली मानून बघावं लागेल. कोणी टोमणे मारेल. टोचणे देईल, शब्दाचे घाव हे मला सहन होणार नाही. मराठ्यांबद्दल द्वेष असणारे सहा कोटी होते 5 निवडणू नाही आणू शकले असं म्हणतील. त्यामुळे समाजाच्या हिताचा निर्णय घेतला”.

पुढे त्यांनी सांगितलं की, “ही जाणीव मला आधीही झाली होती. यासाठी मेहनत घेत सर्वांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. पण वेळेअभावी अनके गोष्टी झाल्या नाहीत. समाज भरडेल असं मला वाटलं”. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उभा राहताही पाडू शकतो. आम्हाला संपवणारे हे कोण हे 7-8 तारखेपर्यंत सांगणार असंही त्यांनी जाहीर केलं. 

सत्ताधारी टार्गेट आहेत का? असं विचारलं असता, काही विघ्नसंतोषी लोकांचं ऐकून त्यांनीच खेळ केला असा आरोप त्यांनी केला. गोरगरीबाच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम केलं, त्यांना याची फळं चाखावी लागतील. सरकारचं ऐकून माकडासारखी उत्तरं देतात, स्वत:च्या लायकीचा पत्ता नाही. आम्ही त्यांच्या तोंडावर थुकतही नाही, तरी थुका चाटणारे म्हणतात असा संताप त्यांनी व्यक्त केला. 





Source link

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी


Maharashtra Assembly Election: मतदान तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून, इतर नेतेही आता वादळी सभांना सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. यादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीकडे बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान होतं. ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यातच आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. यादरम्यान अर्ज कोणी माघार घेतले आहेत त्यांची नावं जाणून घ्या. 

उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतले?

1) अंधेरी पश्चिम येथून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशोक जाधव यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे. माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अशोक जाधव यांना दिलासा मिळाला आहे. 

2) औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत.

3) पालघर विधानसभेतील बंडखोरी मोडीत काढण्यात देखील महायुतीला यश आलं आहे. भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमित घोडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पालघर विधानसभेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करून अमित घोडा मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. 

4) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. बीड विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळेस निवडून आलेले जयदत्त  क्षीरसागर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  जय दत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.

 माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन पुतणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीकडून  राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून पुतणे योगेश क्षीरसागर,  तर दुसरे पुतणे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट संदीप क्षीरसागर आहेत.  

5) तुळजापूरमधील काँग्रेसचे बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुळजापूर मधून उमेदवारी न मिळाले बंडाचा झेंडा फडकत मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईनंतर मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतली. काँग्रेसचे धीरज पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचे राणा जगजीत सिंह पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यातील लढत निश्चित आहे.

6) शिवसेनेने देवळाली मतदारसंघात दिलेला एबी फॉर्म मागे घेतला. देवळाली मतदारसंघातील उमेदवार राज्यश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राजश्री अहिराव कालपासून नॉट रिचेबल होत्या.  

शिवसेनेने आदेश देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पक्षांतर्गत बैठक होऊन निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी रद्द करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या. देवळालीप्रमाणे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही धनराज महाले यांचीही अधिकृत उमेदवारी पक्षाकडून रद्द करण्यात आली. 

7) तुमसर येथून मधुकर कुकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला 

8) अकोला पश्चिम मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झिशान हुसैन यांनी माघार घेतली. झिशान हुसैन यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचित मध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीने झिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती. झिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अझर हुसैन यांचे सुपुत्र आहेत.

9) रायगड – अलिबागमधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

10) सांगली – मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर सी आर सांगलीकर,मोहन व्हनखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब व्हनमोरे या तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

11) नाशिकमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अपक्ष बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनी आपला उमेदवारी घेतली मागे घेतला. 

12) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची माघार, माधुरीमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. 

13) दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे धनराज महाले यांनी घेतली आपली उमेदवारी मागे, वेळेवर एबी फॉर्म घेऊन नरहरी शिरवळ यांना दिले होते आव्हान

14) नाशिक पश्चिममधून कामगार नेते माकपचे डॉ. डी. एल कराड यांची माघार. संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतली माघार.

15) चोपडा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंडखोर उमेदवार माजी आमदार जगदीश वळवी यांची माघार 

मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता असून शरद पवारांसोबत पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याने मी माघार घेत असल्याची जगदीश वळवी यांची माहिती

16) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजप श्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉ. होळी नरमले, डॉ. होळी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा मार्ग झाला सुकर

17) भाजपाचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी घेतली माघार.

भाजपाने उमेदवारी दिली नाही,,म्हणून शिवाजी डोंगरे यांनी दाखल केली होती उमेदवारी.

18) नाशिक मध्यचे उमेदवार अजित पवार गटाचे बंडखोर शहराध्यक्ष अपक्ष रंजन ठाकरे यांनी घेतली माघार

19) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे रणजीत पाटील  यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शेवटची पाच मिनिटं बाकी असताना फॉर्म मागे घेतला. शरद पवार यांच्या शिष्टाईला यश. शरद पवार यांनी रंजीत पाटील यांना फोन केला होता. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp