निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत? ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोगाकडे तक्रार
Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.
Source link
Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होते. याचे पालन राजकीय पक्ष, नेत्यांना करावे लागते.
Source link
Canada Telsa Blast: टेस्ला कारचा स्फोट होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Source link
Western Railway Mumbai: वांद्रे टर्मिनस येथे रविवारी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. यात 9 जणं गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय जारी केला आहे. प्रवासादरम्यान नेण्यात येणाऱ्या सामानासंदर्भात पश्चिम रेल्वेने एक नवीन आदेश जारी केला आहे. तसंच, रेल्वेने स्थानकात अधिक गर्दी न करण्याचं अवाहनदेखील केले आहे.
रेल्वेच्या डब्यातील गर्दी व वर्दळ रोखण्यासाठी आता नियमापेक्षा अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रश्चिम रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने त्यांच्या प्रत्येक प्रवाशांसाठी प्रवास करताना विशिष्ट प्रमाणात सामान घेऊन जाण्याची परवानगी देते. पण 100x100x70 सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि 75 किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेल्यास प्रवाशांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
रेल्वेतून प्रवास करत असताना मोठ्या बॅगा प्रवाशांकडून नेण्यात येतात. त्यामुळं रेल्वे डब्यांमध्ये व फलाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र आता एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना 5 ते 12 वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनाच्या निम्या वजनाच्या सामानासह प्रवास करण्याची मुभा आहे. तर, अन्य प्रवाशांना रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार 35 ते 70 किलो सामान प्रवासी डब्यातून नेऊ शकतात. यात 10 ते 15 किलोपर्यंत सूट देण्यात येते.
प्रवासी यापुढे स्कुटर, सायकलसारख्या वस्तु रेल्वेतून घेऊन जाऊ शकत नाही. 100x100x70 सेमीपेक्षा मोठ्या आकाराच्या सामानावर वजनामध्ये देण्यात येणारी सूट ग्राह्य धरली जाणार नाही. तसंच, पश्चिम रेल्वेने अवाहन केलं आहे की, स्थानकात प्रवाशांनी गर्दी करु नये. ट्रेनच्या वेळापत्रकानुसारच वेळेत स्थानकात प्रवेश करावा.
विवारी सकाळी सहाच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना ही चेंगराचेंगरी झाली होती. तसंच, रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त विशेष गाडीला उशीर झाला त्यामुळं ती गाडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळं पाठीमागून येणाऱ्या वांद्रे ते गोरखपूरपर्यंत धावणारी अंत्योदय एक्स्प्रेस सुटणार होती. या ट्रेनसाठी बुकिंग किंवा रिझर्व्हेशन लागत नाही. त्यामुळं विशेष ट्रेनला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर या रेल्वे स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री थांबवण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत तिकिटाची विक्री या स्थानकांत करता येणार नाही, असं मध्य रेल्वेने घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांनायातून सूट देण्यात आली आहे
Jagdish Mulik: पुण्यातील वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांनी माघार घेतलीये…मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर मुळीक यांच्या मोबाईलवर फडणवीस यांना फोन करत कार्यकर्त्यांची समजूत काढली.
Source link
Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडात सहभागी झाल्याने पालघरमधून (Palghar) आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती. पण पालघरचे श्रीनिवास वनगा (Srivinas Vanga) यांना मात्र नशिबाने साथ दिलेली नाही. श्रीनिवास वनगा बंडात सहभागी होऊनही उमेदवारी न मिळालेले एकमेव उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या जागी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना संधी देण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “हे आमदार एकनाथ शिंदेमुळे नाही तर उद्धव ठाकरेंमुळे झाले. पण हे महायश सूरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. आम्ही टेबलावर त्यांना नाचताना पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनके शिवसैनिकांना रडू कोसळलं होतं. याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे तांडव करत आहे. आता ही कर्माची फळं असतात, आणि ती अनेकांना भोगावी लागतात. एकनाथ शिंदेंनहाी ही कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल”.
त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत का? असं विचारलं असता या प्रश्नाला अर्थ नाही. पश्चाताप झाला असेल तर घरी बसा असं ते म्हणाले.
“शेतकरी कामगार पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. यासाठी आमच्या शिवसेनेच्या कोट्यातील रायगडमधील किमान दोन जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि आमच्यात काही टोकाचे मतभेद नाहीत. आघाडीत किंवा कोणत्याही युतीत एखाद्या जागेवरुन शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरु असते. म्हणजे त्यावरुन बिनसलं असं नाही. नाना गावंडे यांच्याशी चर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय मिटवला आहे असं त्यांनी सांगतलं. इतर ठिकाणीही आम्ही समन्वयाने भूमिका घेणार आहोत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, “हा त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे. मनसे आणि सदा सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतील पक्ष आहेत. आम्ही वेगळे लढत आहोत असं ते दाखवत आहेतत. त्या दोन पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात चर्चा होईल तेव्हा त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल”.
पुढे ते म्हणाले की, “दादर-माहीम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा जॉर्ड फर्नांडिस निवडणूक लढवत नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात. अनेक नेत्यांची मुंलं निवडणूक लढत आहेत. राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला निवडणूक लढावी लागते. मग माझे वडील, आई, आजोबा कोण आहेत याचा विचार न करत निवडणूक लढायची असते. तुम्ही याचा फार बाऊ करु नका. हे राज्य फार मोठं आहे, आमच्या पक्षातील निर्णय उद्धव ठाकरे घेतील”.
Shivsena Candidate List : शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत 15 नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Source link