by Hansraj Agrawal | Jul 1, 2025 | Trending News
Congress Oppose Raj Thackeray Stand On North Indian: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेसची बैठक अन् गोंधळाची स्थिती…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. पूर्वनियोजित बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सरचिटणीस वेणुगोपाल यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. पक्ष संघटना, आगामी निवडणुकांसाठी आणि त्यासाठी संभाव्य आघाडी यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची औपचारिक भेट घेतली. काँग्रेसचे जुने मुख्यालय 24 अकबर मार्ग येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिल्लीतील नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे सोमवारची ही दिल्लीत झालेली बैठक पूर्वनियोजित होती आणि राहुल गांधींनी बोलावली असल्याचा निरोप नेत्यांना देण्यात आला होता. मात्र श्रेष्ठींच्या अनुपस्थितीत प्रभारी रमेश चेत्रिथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच चर्चा केली. पक्षश्रेष्ठींनीच बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल प्रदेश पातळीवरील नेते नाराज झाल्याचे कळते. प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षच बैठक घेणार असतील तर ती मुंबईतही होऊ शकली असती. दिल्लीत घेण्याची गरज काय होती, असा सवाल एका नेत्याने उपस्थित केला. अन्य एका नेत्याने बैठक कशासाठी बोलावली होती हे कळलेच नाही, अशी टिप्पणी केली.
काँग्रेसचा राज ठाकरेंना विरोध
याच बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेत्रिथला यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे, “राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही. भारत एक आहे,” अशी बोलकी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगळी भूमिका कशी? असा थेट सवाल
यावर मनसेकडून पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. “रमेश चेन्निथला यांना आणि काँग्रेसला आमची भूमिका समजली नाही. आज कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं यांचं आहे. 2009 ला काय भूमिका होती आमची? आजही आमची भूमिका कायम आहे. आमची भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे,” अशी अपेक्षा देशपांडेंनी व्यक्त केली आहे. “कर्नाटकात कन्नड तर आपल्या राज्यात मराठीच आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचा अशा भूमिकेला पाठिंबा नव्हता आता काँग्रेसमध्ये थोडा बदल झाला आहे. दोन बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही. हा मराठी माणसाचा विषय आहे,” असंही देशपांडे आवर्जून म्हणाले.
5 जुलैच्या मेळाव्याची जबाबदारी या व्यक्तीवर…
आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत बोलतील. मेळाव्याचं सविस्तर नियोजन करतील. राजकीय पक्षाचा हा मेळावा नाही मराठी माणसाचा आहे याची काळजी आम्ही घेऊ, असं 5 जुलैच्या मेळाव्याबद्दल बोलताना देशपांडेंनी स्पष्ट केलं.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 30, 2025 | Trending News
हिंदी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेना UBT पक्ष आणि मनसे आक्रमक; GR रद्द करण्यात आल्याची टीका
Source link
by Hansraj Agrawal | Jun 30, 2025 | Trending News
Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, तर कुठे चक्क लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. अधूनमधून दाटून येणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांमुळं पावसाची एखादी जोरदार सरसुद्धा हजेरी लावून जात आहे. राज्याच्या काही भागांमध्येसुद्धा हेच चित्र पाहाय़ला मिळत असलं तरीही घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
हवामान विभागानं प्राथमिक निरीक्षणाआधारे वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणाह राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत आणि त्या अशाच बरसत राहतील. ज्या कारणानं रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे आणि घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, तिथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर पाच दिवस मुसळधार
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर मान्सूनने देशाच्या इतर राज्यांतही जोरदार आगेकूच सुरू ठेवली असून, रविवारी संपूर्ण देश व्यापला. दरम्यान, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. कोकणाला या जोरदार पावसाचा तडाखा बसेल असं सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
देशभरात मान्सून सक्रिय
ठरलेल्या मुहूर्ताआधीच मान्सूचं आगमन झालं आणि पाहता पाहता या मोसमी वाऱ्यांनी सबंध देश व्यापला. सर्वसाधारणपणे 8 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. देशात सक्रिय होण्यातही मान्सूनने नवा विक्रम रचला. देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण पाहायला मिळत असून, सध्या या पावसानं उत्तर भारतामध्ये हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 29, 2025 | Trending News
Maharashtra Police Transfers: महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एकाचवेळी 51 भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आणि 81 राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामाला बळकटी देणे आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी करणे यासाठी गृह खात्यात हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
बदल्यांच्या या क्रमात, पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची पुण्यातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट १ च्या कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (डीसीपी) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी (वाहतूक) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देण्यात आली आहे.
या बदल्यांद्वारे, राज्य सरकारने केवळ मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने कडक पावले उचलली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात आणखी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. यामुळे राज्यभर पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2025 | Trending News
Sanjay Raut on Raj Thackeray – Uddhav Thackeray : राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेची साथ सोडली आणि नवीन पक्षाची स्थापना केली. राजकीय मतभेदामुळे काका बाळासाहेब ठाकरे आणि भाऊ उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आज 2025 मध्ये हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठी माणसासाठी एकत्र येणार आहे. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी दोन्ही भाऊ अनेक वर्षांनंतर एकाच विषयासाठी सरकारविरोधात उभे राहणार आहेत. पण या दोन भावांचं मनोमिलन कसं झालं. या दोघा भावांमध्ये संवाद आहे का? याचं नेमकं कारण खासदार संजय राऊत यांनी झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीत सांगितलं आहे.
परद्यामागे एक पटकथा कोण लिहितंय?
या मुलाखात संजय राऊत म्हणाले की, पटकथा लिहिली जातेय म्हणून तर उद्याचा मोर्चा एकत्र होतोय ना. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील लोकांची ही इच्छा आहे. महाराष्ट्रात जसंजसं आक्रमण दिल्ली आणि गुजरातचे वाढत आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रात हल्ले होत आहेत. तेव्हा लोकांच्या मनात एकच भावना आहे की, मराठी माणसांमध्ये फूट पडल्यामुळे आमच्यावर आक्रमण होतं आहे. यासाठी मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. जी बाळासाहेबांची अभेद संघटना होती मराठी माणसांची ती निर्माण व्हायला पाहिजे. ही लोक भावना आहे. मग लोक भावनेमध्ये काय मुद्दा असतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राच्या दुश्मनाशी लढता येणार नाही. हे ठाकरे ब्रँड आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे. बाकी कोणी एकत्र नाही आले तरी चालेल. लोकांची भावना काय आहे की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे. आम्ही असं ठरवले म्हणजे उद्धव ठाकरे यांनी असं ठरवलं की, वारंवार आपल्या बाबतीत हा प्रश्न विचारला जातो, शिवसेना मनसेला सोबत घ्यायला तयार नाही. आणि म्हणून एकत्रिकरण होत नाही आहे. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या एका मुलाखतीतून ऐक्याची साद घातली. सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्र संकटात आहे. लचके तोडले जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून.
ब्रँड ठाकरे म्हणजे नेमकं काय?
पुढे ते म्हणाले की, अशात उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब पुढल्या 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे यांच्या जी साद होती त्याला प्रतिसाद दिला. की आम्ही तयार आहोत. आपल्यामध्ये काही मतभेद असतील, काही इतर विषय असतील ते संपवून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी मी हात पुढे करायला तयार आहे. याचा एक चांगला परिणाम झाला. जशी वीज चमकावी अशी महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झाली मराठी लोकांमध्ये. लोकाही म्हणाले हे छान आहे, हे व्हायलाच पाहिजे. त्यानंतर अशा अनेक घडामोडी प्रक्रिया होतात. जसा आता हा विषय आहे, मराठी भाषेवर जी लादली जाते आहे हिंदी भाषा त्यानिमित्ताने दोन पक्ष आपल्या आपल्या भूमिका मांडत असताना दोघांनी आपली कार्यक्रम ठरवले. पण हा विषय इतका गंभीर आहे की, लोकांना आवडणार नाही. काल आम्ही निर्णय घेतला, 7 जुलैला मोर्चा काढण्याचा कृती समितीसोबत. तेव्हा मी बाहेर आलो मातोश्रीच्या तेवढात राज ठाकरेंचा फोन वाजला. आम्ही जुने मित्र आहोत. तेव्हा राज ठाकरे म्हणाली की, संजय बघा मी आताच पाहिलं शिवसेना 7 जुलैला मोर्चा काढणार आहे. आम्ही 6 जुलैला मोर्चा काढणार आहोत. दोघांचे विषय एकच आहे. थोडं बरं दिसणार नाही, एकाच विषयावर दोन मराठी माणसांचा विचार करणारा संघटना वेगवेगळे मोर्चे काढत आहेत. हे चित्र थोड वेगळे दिसेल. त्यावर मी म्हणालो हो, हे चित्र नक्कीच वेगळं दिसेल. मग काय करायला पाहिजे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की आपण एकत्र मोर्चा काढला पाहिजे. मी लगेचच गाडीतून उतरलो आणि मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मी म्हटलं की राज असं म्हणतोय आणि मला त्याची भूमिका योग्य वाटतेय. उद्धव ठाकरे यांनी क्षणाचाही विचार न करता योग्य आहे. आपल्या माहिती नाही, त्यांनी मोर्चा जाहीर केला ते. एकाच वेळी दोन पत्रकार परिषद झाल्यात. अशात आपण काय करायला पाहिजे. तेव्हा मी म्हणालो, आपल्या मनात मराठी माणसासाठी कोणताही किंतूपंरतू नाही. आपण याला सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे.
…म्हणून मोर्चाची तारीख बदलण्यात आली!
आणि फक्त मुद्दा एवढाच आहे की, आपला मोर्चा 7 जुलैला सोमवारी आहे आणि त्यांचा 6 जुलैला आहे. आपण सुद्धा 6 तारखेचा विचार करत होतो, रविवार म्हणून…पण 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला मुंबई असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल हा विठ्ठल भक्तीमध्ये दिंड्या पताका देव्हळ्यात जाणं. पूजा अर्चा करणं. त्यामध्ये लोकं अडकलेले असतील. आपला जो विचार आहे, संघर्ष लोकांपर्यंत जाणार नाही. म्हणून आपण 7 तारखेला ठेवला आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. दिवस बदलता येतोय का पाहा. आमची ही स्पष्ट भूमिका आहे, मी परत बाहेर येत राज ठाकरेशी बोललो.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलत आहेत का?
संजय राऊत म्हणाले की, एक लक्षात घ्या ते दोन भाऊ आहेत. लहानपणापासून ते एकत्र राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे असतील, माँ साहेब असतील श्रीकांतजी असतील हे एकत्र कुटुंबच होतं आणि आहे. त्याच्यात तो ओलावा तर आहे. राजकारणात थोडेफार मतभेद झालेत. त्या दोघांनी एकमेकांशी एकत्र चर्चा केली की नाही, हे मी का सांगू? पण हो त्यांच्यामध्ये संवाद नक्कीच आहे. बघा ना संवाद नसता तर उद्याच पाऊल उद्धव ठाकरेंनी टाकलंच नसतं. संवाद आहे, मनातील किल्मिष दूर झाली आहे आणि आपल्याला एकत्र येयचं ही मानसिकता आहे, ही संवाद असल्याशिवाय होत नाही. आणि हा संवाद असायलाच पाहिजे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2025 | Trending News
Pune News Today: दिव्य शक्ती असल्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाच्या विरोधात पुण्यातील बावधन येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात भोंदूबाबाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचा बनाव करत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. आरोपीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलमध्ये एक अॅप डाउनलोड करायला सांगितले होते. या अॅपच्या माध्यमातून त्याने त्याच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच वेश्यागमनास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.
इतकंच नव्हे तर, फिर्यादीला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा, लैंगिक शोषणास प्रवृत्त करणे इत्यादी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, बाबाने या सगळ्याच्या मोबदल्यात, मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फार्यादीकडून 15 हजार रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच फिर्यादीने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.
Source link