वैमानिकाची प्रतिभा की विज्ञानाचा चमत्कार… विमान नेमकं उडतं तरी कसं? चक्रावून टाकणारं उत्तर!

वैमानिकाची प्रतिभा की विज्ञानाचा चमत्कार… विमान नेमकं उडतं तरी कसं? चक्रावून टाकणारं उत्तर!


Airplane fly Secret: लहानपणी आकाशात उडणारे विमान पाहून मनात प्रश्न येतो की इतके जड विमान हवेत कसे टिकते? ती जादू नाही तर हवेची ताकद, पंखांची रचना आणि विज्ञानाचे नियम यामुळे शक्य होते. हवेच्या सहाय्याने इतकी मोठी यंत्रणा नेमकी कशाप्रकारे आकाशात विहार करते? हे समजून घेतल्यावर आश्चर्य वाटेल 

Add Zee News as a Preferred Source

हवेचे रहस्य काय? 

हवा हलकी नसते, ती लहान कणांपासून बनलेली असते ज्यांचे वजन असते. हे कण सतत फिरतात आणि हवेत दाब निर्माण करतात. जेव्हा हवा वाहते तेव्हा ती ढकलते किंवा ओढते. याच शक्तीमुळे पतंग उडते, फुगा वर जातो आणि पक्षी आकाशात तरंगतात. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायॉक्साइडसारख्या वायूंचे मिश्रण असते. उडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हवेची गरज असते, कारण तिच्याशिवाय उचल किंवा संतुलन मिळत नाही.

उड्डाणाची सुरुवात

हवेला वजन असते हे 1640 मध्ये शास्त्रज्ञ एव्हेंजेलिस्टा टॉरिसेलीने सिद्ध केले. त्यांनी पाऱ्यावर प्रयोग करून दाखवले की हवा दाब देते. या शोधामुळे उड्डाणाच्या विचारात प्रगती झाली. नंतर फ्रान्सेस्को लानाने हवेच्या वजनावर आधारित एक यंत्राची कल्पना केली. त्यांनी रिकाम्या गोलाकार रचनेचे डिझाइन तयार केले ज्यातून हवा काढली जाते, जेणेकरून ते हलके होऊन वर उडेल. हे डिझाइन प्रत्यक्षात आले नाही पण हवेचे आणि वजनाचे संतुलन उड्डाणाचे आधार आहे हे स्पष्ट झाले.

गरम हवा आणि पंखांची जादू

गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते कारण ती पसरते. यामुळे गरम हवेने भरलेला फुगा वर उडतो आणि थंड झाल्यावर खाली येतो. विमानात हे तत्त्व पंखांद्वारे कार्य करते. विमानाचे पंख असे बनवले जातात की त्यांच्या वरून हवा वेगाने जाते आणि खालून हळू. वेगवान हवेचा दाब कमी असतो, तर खालचा दाब जास्त. या दाबाच्या फरकामुळे उचल शक्ती निर्माण होते, जी विमानाला हवेत उचलते.

न्यूटनचा नियम कसा लागू होतो? 

सर आयझॅक न्यूटनच्या गतीच्या तीन नियमांमुळे विमान उडण्याचे समजते. पहिला नियम सांगतो की वस्तूला ढकलल्याशिवाय ती हलत नाही. दुसरा म्हणतो की जास्त शक्तीने जास्त गती मिळते. तिसरा म्हणजे प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. उड्डाणात चार मुख्य शक्ती असतात: उचल (वर उचलते), वजन (खाली ओढते), ढकल (पुढे नेते) आणि प्रतिरोध (मागे रोखते). या चौघांचे संतुलन सुरक्षित उड्डाण घडवते.

पायलटचे नियंत्रण कसे राहते?

विमान उडवणे फक्त इंजिन चालवणे नाही. पायलट विविध नियंत्रकांद्वारे ते हाताळतो. पंखांवरील एलेरॉन फिरवण्यासाठी असतात, ज्यामुळे विमान डावे-उजवे झुकते. शेपटीवरील एलिव्हेटर उंची नियंत्रित करतात, म्हणजे वर किंवा खाली. रडर दिशा बदलण्यासाठी असते. थ्रॉटल इंजिनची ताकद वाढवते किंवा कमी करते. जेव्हा हे तीन – उंची, फिरवणे आणि दिशा – एकत्र काम करतात, तेव्हा विमान योग्य मार्गावर आणि उंचीवर उडते.

ध्वनी अवरोध आणि वेगाचे प्रकार

ध्वनी हवेच्या कणांपासून तयार होतो आणि समुद्र सपाटीवर त्याचा वेग सुमारे 760 मैल प्रति तास असतो. जेव्हा विमान हा वेग गाठतो, तेव्हा हवेच्या लहरी पुढे जमा होऊन धक्का निर्माण करतात. हा धक्का तोडताना मोठा आवाज होतो, ज्याला सोनिक बूम म्हणतात. याला ध्वनी अवरोध तोडणे म्हणतात. उड्डाणाचे वेग वेगळे असतात: सामान्य धीमे उड्डाण, सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक. वेग वाढला की तंत्रज्ञान आणि साहित्य अधिक मजबूत आणि हलके होतात.





Source link

महाराष्ट्रातील कोणत्याही अत्यंत महागड्या शाळेत मिळेल मोफत प्रवेश;RTE साठी कोण करु शकतो अर्ज? A टू Z माहिती!

महाराष्ट्रातील कोणत्याही अत्यंत महागड्या शाळेत मिळेल मोफत प्रवेश;RTE साठी कोण करु शकतो अर्ज? A टू Z माहिती!


RTE Admission: शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई 2009 मध्ये लागू झाला. याअंतर्ग 6 ते 14 वर्षांच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि वंचित गटातील मुलांसाठी 25% जागा राखीव ठेवण्याची सक्ती आहे. सरकार थेट विद्यार्थ्यांची शालेय फी भरते. ज्यामुळे पालकांना कोणताही खर्च येत नाही, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

शिक्षणात समानता 

दरवर्षी नर्सरी, एलकेजी किंवा पहिली वर्गासाठी प्रवेश होतात. यामुळे गरीब आणि अल्पसंख्याक समुदायातील लाखो मुलांना चांगल्या खासगी शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळते. या कायद्यामुळे शिक्षणातील समानता वाढून मुलांचे भविष्य उज्ज्वल होते. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील दुर्बल घटकांना याचा मोठा लाभ होतो. याब 

प्रवेशासाठी पात्रता निकष

आरटीई अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुलं आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील असावीत, यासाठी राज्य सरकारने पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट ठरवून दिलेली असते.अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि अल्पसंख्याक गटातील मुले आरटीईसाठी पात्र असतात. अनाथ मुले, अपंग मुले, एचआयव्ही प्रभावित मुले आणि एकल पालकांच्या मुलांनाही आटीई अंतर्गत संधी मिळते. मुलाचे वय राज्याच्या नियमांनुसार नर्सरी किंवा पहिल्या वर्गासाठी योग्य असावे. एकाच श्रेणीत अनेक अर्ज असल्यास लॉटरीद्वारे निवड होते. हे निकष सरकारने ठरवलेले असतात आणि ते पूर्ण करणाऱ्यांनाच लाभ मिळतो.

मुलांसाठी प्राधान्यक्रम

सर्व अर्जदारांना समान संधी नसते; काहींना प्राधान्य दिले जाते. अनाथ आणि निराधार मुलांना पहिले प्राधान्य मिळते. अपंग मुले, एससी-एसटी समुदायातील मुले, विधवा किंवा एकल मातांच्या मुलांना पुढे प्राधान्य असते. शाळेच्या जवळ राहणाऱ्या मुलांनाही प्राधान्य मिळू शकते. जागा कमी असल्यास प्राधान्यक्रमानुसार निवड होते आणि उरलेल्यांसाठी लॉटरी काढली जाते. यामुळे सर्वाधिक गरजू मुलांना प्रथम संधी मिळते आणि न्यायपूर्ण वाटप होते.

प्रवेश प्रक्रिया 

आरटीई प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन राज्य सरकारच्या पोर्टलवर होतात. पालक वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरावा. मुलाची आणि पालकांची माहिती देतात, उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करतात. जवळच्या खासगी शाळा प्राधान्यक्रमाने निवडतात. अर्ज तपासल्यानंतर लॉटरीद्वारे शाळा मिळते. निवड झाल्यास शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा असतो. शाळेतूनही फॉर्म घेऊन अर्ज करता येतो. 

आवश्यक कागदपत्रे

आरटीई अर्ज करताना विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), निवास प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि फोटो ही कागदपत्रे असावीत. ही प्रक्रिया सोपी असून 2026 च्या सत्रासाठी लागू आहे.





Source link

'तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच, निधी फक्त सेना-भाजपलाच; चुकून ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर…', नितेश राणेंचे वादग्रस्त विधान!

'तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच, निधी फक्त सेना-भाजपलाच; चुकून ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर…', नितेश राणेंचे वादग्रस्त विधान!


Nitesh Rane: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जर आम्ही जिंकून दिले, तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसल्याचे नितेश राणेंनी म्हटले. दरम्यान त्यांनी निधी वाटपावरुन एक वादग्रस्त विधान केलंय. याबद्दल जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

महायुतीचे सगळे उमेदवार ठासून येणार 

या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार जर आम्ही जिंकून दिले, तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसला आहे.​म्हणूनच ठाकरे सेनेचे नेते सोडा, त्यांना उमेदवार पण साधे हक्काचे मिळत नाहीयेत, असे नितेश राणे म्हणाले. त्यांना एवढ्या वर्षांनी जनतेने सत्ता देऊन पाहिली. 2014 पासून ते 2024 पर्यंत ठाकरे सेनेकडेच ही सगळी सत्ता होती, खासदार होते, आमदार होते. काय केलं आमच्या जिल्ह्यासाठी? कुठला विकास आणला? किती मुलांना रोजगार दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या गोष्टी आता जनतेला कळून चुकल असल्यामुळे, जो काही विजयाचा झंझावात राणे साहेबांच्या नेतृत्वात सुरू झालेला आहे. महायुतीचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.

एआर रहेमानवर टीका 

​एआर रहेमान कपिल शर्मा शोमध्ये बोलावल्यावरुन नितेश राणेंनी टीका केलीय.  असंच कोणी पाकिस्तानच्या विरोधात, कराचीच्या विरोधात, बांगलादेशच्या विरोधात कोणी वक्तव्य केलं असतं तर त्या त्या इस्लामिक राष्ट्राने त्यांना जिवंत तरी ठेवलं असतं का? की कापून बाहेर फेकलं असतं? ​मग आम्ही अशा लोकांना आपण ‘कपिल शर्मा’ सारख्या शोला का बोलवतोय? जे देशविरोधी वक्तव्य करतात, भूमिका घेतात. म्हणून अशा पद्धतीने आमच्या देशाचा अपमान करणारे, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या लोकांना कुठल्याच व्यासपीठावर बोलवू नये, बहिष्कार टाकला पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या देशाच्या विरोधात, हिंदू समाजाच्या, हिंदू राष्ट्राच्या विरोधात कोणीही चुकीचं बोलण्याची हिम्मत करणार नाही, एवढी भीती निर्माण केली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. 

ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्गात जोरदार धक्का

ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढवली होती .एकेकाळी नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर आरोप करत राणेंची साथ सोडली होती. आज सर्व मतभेद विसरून सतीश सावंत यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती घेतलाय. 

पालकमंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

विकासाचा निधी मीच देणार कारण तिजोरीच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्या ताब्यात आहेत, असे विधान भाजप मंत्री नितेश राणेंनी केलंय. निधी कमळ आणि धनुष्यबाणालाच मिळणार, असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी पण परत मागे घेणार. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या,असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित खळा बैठकीत नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळाले.





Source link

'अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?', NCP नेत्याला वेगळीच शंका, विचारले 5 प्रश्न, म्हणतो 'सहावी व्यक्ती…'

'अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?', NCP नेत्याला वेगळीच शंका, विचारले 5 प्रश्न, म्हणतो 'सहावी व्यक्ती…'


Amol Mitkari 5 Questions over Ajit Pawar Plane Crash in Baramati: अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याने एकीकडे हळहळ व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनाने अमोल मिटकरींना प्रचंड मोठा धक्का बसला असून ते अक्षरश: कोलमडले आहेत. यादरम्यान त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न विचारत त्यांची उत्तरं मागितली आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? अशी विचारणा करत अमोल मिटकरी यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.  एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???  एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असेही प्रश्न त्यांनी विचारले आहेत. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारत आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असंही त्यांनी अखेरीस स्पष्ट केलं आहे. 

अमोल मिटकरींची पोस्ट जशीच्या तशी

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.

‘Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली?’

यानंतर त्यांनी अजून एक पोस्ट शेअऱ केली असून त्यात लिहिलं आहे की, “उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, CRM व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली—याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय?”

जय पवार खासदार होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्याबाबत भाजपा अनुकूल नाही. मात्र जय पवार यांच्या नावावर सहमती आहे. त्यामुळे जय पवार यांना राज्यसभा खासदार केलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुंबईत पक्ष कार्यालयात पार्थ पवार दाखल झाले आहेत

प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पियुष गोयल यांचा दावा

यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा भाजपा नेते पियुष गोयल यांनी केला आहे. 





Source link

विलीनीकरणाचा मुद्दा अजित पवारांसोबतच विलीन झाला; राष्ट्रवादीच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

विलीनीकरणाचा मुद्दा अजित पवारांसोबतच विलीन झाला; राष्ट्रवादीच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य



महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. 



Source link

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली


Big responsibility on Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे सत्ताकेंद्र कुणाकडे जाणार, कोणती महत्त्वाची खाती कुणाला मिळणार, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांकडे असलेली प्रभावी पदे आणि महत्त्वाची खाती पुढे कोण सांभाळणार, यावर चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. काही काळापासून राजकीय पडद्याआड गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बंद दाराआड चर्चेनंतर अवघ्या 24 तासांत मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चेला जोर आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? 

दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास संमती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासूत्रे पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. पक्षात फूट पडू नये आणि संघटना एकसंध राहावी यासाठी नेतृत्व पवार कुटुंबातच असावे, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

अर्थ खाते कोणाकडे जाणार?

अजित पवारांकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कोणाकडे सोपवायची, यावर सध्या राजकीय पातळीवर मोठी रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावं, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेने राजकीय चर्चांना अधिक उधाण आणले आहे.

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढे मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे याना पुन्हा संधी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरताना मुंडेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

मुंडेंचा राजीनामा कशामुळे झाला होता?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली होती. राजकीय दबाव वाढल्यानंतरत्यांनी राजीनामा दिलाही परंतु  प्रकृतीचे कारण पुढे करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता मात्र राजकीय परिस्थिती बदलताना दिसत असून, त्यांच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती.

पार्थ पवारांनाही संधी?

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरही चर्चा रंगली आहे. या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे येत असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबाभोवती पुन्हा एकदा सत्ताकेंद्र तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp