'दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार,' मतदानाला 2 दिवस शिल्लक असतानाच अमित ठाकरेंचा जाहीर इशारा

'दुबार मतदार दिसला तर तिथेच फोडणार,' मतदानाला 2 दिवस शिल्लक असतानाच अमित ठाकरेंचा जाहीर इशारा


Amit Thackeray Warning to Double Voters: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी महापालिकात निवडणुकीत दुबार मतदार करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. दुबार मतदार दिसला तर फोडणारच असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे प्रत्येक सभेतून दुबार मतदारांना थोबडवण्याचा इशारा देत असताना, आता अमित ठाकरेही तीच भाषा बोलताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकांपासूनच महाविकास आघाडीचे नेते दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि मनसे त्यांना फटके लगावणार असल्याचं सांगत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

“दुबार मतदारांना तिथल्या तिथे फोडणार असं अमित ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ते म्हणाले की, “दुबार मतदारांना आम्ही तिथल्या तिथे फोडणार. अनधिकृतपणे तुमच्यासोबत रांगेत उभं राहून मतदान करणार. मग तुमच्या आमच्या मतदानाचा हक्क कुठे गेला? आपल्या मतदानाची काय किंमत राहिली?,” अशी विचारणा अमित ठाकरेंनी केली आहे. 

“जर बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्यालाच सांगणार असतील की, हा माणूस आपल्यावर राज्य करणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही 40 लाख मतदार घुसवलेत. विकास केल्यानंतरही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून. हे छान चालू आहे तुमचं,” अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

राज ठाकरेंचंही सावध राहण्याचं आवाहन

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेत भाषण करताना दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच आवाहन केलं होतं. माझं सगळ्यांना सांगणं आहे की, बेसावध राहू नका. ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे बीएलए सकाळी सहा वाजता मला मतदान केंद्रावर हवे आहेत. या सगळ्यांनी दुबार मतदारांबाबत सतर्क राहावे. अजिबात बेसावध राहू नका. एखादा दुबार मतदार तिकडे आला तर, सकाळी सात वाजता त्याला फोडून काढा, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. ठाण्यातील सभेतही त्यांनी भाषणाच्या शेवटी दुबार मतदान करायला आले तर तिथेच थोबडवा असं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. 

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, आम्ही मतदान केंद्रावरील आमच्या बीएलओंना दुबार मतदारासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मतदार यादीत लाल रंगाचे निशाण असलेला मतदार आला की, बाहेर ‘गोंद्या आला रे आला’, असा मेसेज द्या. दुबार मतदार दोन पायांवर चालत येईल, पण परत जाताना स्ट्रेचरवरुन जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.





Source link

'गौतम अदानींनी बंदुकीचा धाक दाखवत…', राज ठाकरेंचा आतापर्यंतचा खळबळजनक दावा, विमानतळावरील 'तो' व्हिडीओच दाखवला

'गौतम अदानींनी बंदुकीचा धाक दाखवत…', राज ठाकरेंचा आतापर्यंतचा खळबळजनक दावा, विमानतळावरील 'तो' व्हिडीओच दाखवला


Raj Thackeray Allegations on Gautam Adani: नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ठाण्यातील शिवशक्तीच्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानी मागील 10 वर्षात कसे मोठे झाले याचा पाढाच वाचला. 

Add Zee News as a Preferred Source

‘अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही’

“मी काल जे दाखवलं ते इतकं भयनाक भीषण आहे. ज्या वेळी या महाराष्ट्रात, मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती वैगैरे पाहणार नाही. अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही. मी इतका अडाणी नाही. ते काल दाखवलं त्याचं गांभीर्य समजून घ्या. हा माणूस कधी सिमेंटमध्ये नव्हता, आता दोन नंबरचा व्यापारी आहे. आज सगळी विमानतळं आहेत. हे जे डाव रचत आहेत त्याविरोधात इथळ्या गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. पण हे मुद्दामून गोष्टी करत आहेत. आता सहा ते आठ विमानतळं त्यांना दिली आहेत. नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली तर व्यापार ठप्प, वीज निर्माण करणारा गौतम अदानी गेला तर सगळे अंधारात. मग तक्रार कोणाकडे करायची?,” असा प्रश्न त्यांनी विचारला. 

 

‘भवितव्य अदानी ठरवणार’

“महिन्याभरापूर्वी इंडिगोच्या विमानाचा स्ट्राइक झाला. हवाई वाहतुकीमधील 65 टक्के हवाई वाहतूक इंडिगोकडे दिली आहे. त्यांनी स्ट्राइक केला, कारणं दिली नाही. अख्खा देश ठप्प झाला. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करु शकते. अदानींच्या हातात सिमेंट, वीज, विमानतळं, पोर्ट्स आहेत. उद्या जर हे भाव वाढवू लागले तर घरांच्या किमती वाढणार. तुमचं भवितव्य अदानी ठरवणार. ह एक माणूस या देशात फक्त 2014-2025 मध्ये 10 वर्षात मोठा होतो. इतका मोठा, श्रीमंत, उद्योग उभारलेला दुसरा माणूस नाही. टाटा, बिर्ला यांना 50, 100 वर्ष लागली,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

‘बाकीचे उद्योगपती मेले का?’

“मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवत कशाप्रकारे मतदान होत आहे दाखवलं. वाढवणला विमानतळ होत आहे. सांताक्रूझ विमानतळ नवी मुंबईला नेणार आणि नंतर विकायला काढणार. आता अदानीकडे आहे. या देशात उद्योगपती मोठे व्हावेत पण एक नाही तर सगळे. या देशात उद्योग, पैसा आला पाहिजे. रोजगार निर्माण होतो, त्यांची घऱं उभी राहतात. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. पण एकावरच मेहरबानी का हे विचारणारा आहे. बाकीचे उद्योगपती मेले का? मग या माणसाला पुढे करायचं आणि वेगळे डाव आखायचे. महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा भुगोल पाहा. वाढवणच्या पुढे लगेच गुजरात लागतं. ही आपली मराठी शहरं, याचा मराठी ठसा यांना पुसायचा आहे,” असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 

‘जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे’

“भाषावर प्रांतरचचना झाली तेव्हा प्रत्येत भाषेचं एक राज्य निर्माण झालं. 107 हुतात्म्यांच्या लढ्यानंतर मुंबई मिळाली. मुंबईत महाराष्ट्राची असतानाही ओरबाडत होते. प्रत्येक राज्याची एक भाषा, स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला नख लावत आहात. नवरात्रीच गरबा खेळला जातो. आपलेही लोक जातात. चांगली गोष्ट आहे. पण तो आनंदाचा, सणाचा विषय आहे. पण मुंबई विमानतळावर जेव्हा गौतम अदानीने ताब्यात घेतलं, तुम्हाला काय सांगायच होतं त्यातून ही कृती केली. मुंबई विमानतळावर गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची आहे. गणपतीमध्ये ढोल लेझीम वाजवले का? जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे. ही मुंबई, ठाणे मराठी माणसाचं आहे. कपाट दुरुस्त करायला याचं आणि बाकोवर नजर टाकायची हे चालणार नाही,” असं त्यांनी खडसावलं. 

‘एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे?’

“घोडबंदरला एक हजार एक जमीन उद्योजकाला विकत आहेत. गणेश नाईकांना होऊ देणार नाही संगितलं ही आनंदाची बाब आहे. एकनाथ शिंदेंना हे करायचं आहे. त्यांच्या ओळखीतलाच आहे. जी दिसले ती जमीन घ्यायची आहे. वरुन पाठवणार आणि या उद्योगपतीला द्या सांगणार. ताडोबाची जमीन खाणींना दिली. उद्योगपती आला आणि सह्या द्यायला सांगितलं. जिथे गौतम अदानी पाहणार ती जमीन देत आहेत. एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे? ही सर्व शहरं गुजरातला मिळवायची आहेत. ठाणे, पालघर हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही. भौगोलिकदृष्ट्या काय सुरु आहे. त्यामुळे ते करत आहेत. आपण या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे,” असं आवाहन त्यांनी केलं. 





Source link

6871 सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार? भोवणार निवडणुकीसंदर्भातील 'तो' गोंधळ? आदेश जारी

6871 सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार? भोवणार निवडणुकीसंदर्भातील 'तो' गोंधळ? आदेश जारी


Mhaharashtra Local Body Election 2026: निवडणुकीसंदर्भातील तयारीमध्ये टाळाटाळ केल्याप्रकरणी आणि बेजबाबदार वागणुकीप्रकरणी तब्बल 6 हजारांहून अधिक कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्तव्ये पार पाडण्यास गैरहजर राहिलेल्या एकूण 6 हजार 871 अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजार 350 अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, तर वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अथवा नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यामध्ये हजर न राहणाऱ्या 4 हजार 521 जणांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचारी म्हणून नियुक्ती करुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात 12 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून कारवाई करण्यात येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

अनेकदा इशारा

अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध आजपासून पोलीस कारवाई केली जाणार आहे. अगदी नोकरी जाण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर येणार नाही. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार हा कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते. जे अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांना 10 जानेवारीला अंतिम संधी देण्यात आली होती. 11 जानेवारीपासून निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला होता. त्यानुसार आजपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेले कर्मचारी कुठे काम करतात?

महापालिकेकडून ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बँक, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपनी, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड या शासकीय/निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद, दंडात्मक कारवाई तसेच विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

निवडणूक आदेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभराव यांनी दिली. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर विविध शासकीय-निमशासकीय आस्थापना तसेच खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल शाळेत नियुक्तीचे आदेश बजावण्यासाठी गेले असता मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणी रेन्बो इंटरनॅशनल शाळा आणि मुख्याध्यापिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

राज ठाकरे यांनी जाहीर सभेत दाखवला खळबळजनक व्हिडिओ; अदानींच्या उद्योगांची महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धडकी भरवणारी प्रगती

राज ठाकरे यांनी जाहीर सभेत दाखवला खळबळजनक व्हिडिओ; अदानींच्या उद्योगांची महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धडकी भरवणारी प्रगती


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

पुण्यातील गुन्हेगारांच्या TOP 10 टोळ्या! सर्वात मोठ्या टोळीचे नाव जाणून शॉक व्हाल! 60 गुन्हेगार निवडणुकीच्या रिंगणात

पुण्यातील गुन्हेगारांच्या TOP 10 टोळ्या! सर्वात मोठ्या टोळीचे नाव जाणून शॉक व्हाल! 60 गुन्हेगार निवडणुकीच्या रिंगणात


चंद्रकातं फुंदे, पुणे, प्रतिनिधी

Add Zee News as a Preferred Source

TOP 10 Gangs of Criminals in Pune : पुणे महापालिकेची निवडणुक सध्या चर्तेत आहे ती गुन्हेगारांमुळे. पुण्यात निवडणूक लढवत असलेल्यांपैकी 60 जणांवर विविध गुन्हे दाखल असून त्यापैकी 20 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 महिला या आंदेकर टोळीतील असून त्या दोघीही तुरूंगातून निवडणूक लढवताहेत तर तर गुंड गजा मारणेची पत्नी ही देखील रिंगणात हे याशिवाय बापू नायर हा तर रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे…हे चौघेही राष्ट्रवादी चे उमेदवार आहेत तर भाजपने रोहिदास चोरगे या गुन्हेगाराच्या पत्नीला तिकिट दिले.

पुणे महापालिका निवडणुकीत काही गुन्हेगार नगरसेवक म्हणून निवडून आले तरी पोलिसांच्या लेखी ते गुन्हेगारच असतील त्यांच्यावरील कारवाईत कोणताही फरक पडणार नाही, असा सज्जड दमच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे मनपा निवडणुकीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची यादी शासनाला पाठवली असून पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर आहे असंही पोलीस आयुक्त म्हणालेत.

दरम्यान, बाणेर परिसरात पैसे वाटप सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेताहेत, असंही पोलीस आयुक्तांनी झी 24 तासशी बोलताना स्पष्ट केले .पुणेकरांनी निर्धोक होऊन मतदान करावं, असंही आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या TOP 10 टोळ्या

1. बंडू आंदेकर टोळी, नानापेठ, 52 सदस्य, 1970 पासून active 
बंडू आंदेकर आत्ताच नातवाच्याच खूनाच्या आरोपात जेलमध्ये गेलाय

2. निलेश घायवळ गँग, कोथरूड, 40 सदस्य
घायवळ गँग 2004 पासून active, म्होऱ्हक्या निलेश घायवळ सध्या जेलबाहेर हे)

3. गजानन मारणे गँग, शास्रीनगर, कोथरूड, 75 सदस्य 
2001 पासून Active असून खंडणीप्रकरणी पुन्हा जेलमधे…

4. गणेश मारणे गँग, वारजे & कर्वेनगर, 38 सदस्य
2005 पासून active असून शरद मोहोळ खून प्रकरणी गणेश मारणे पुन्हा जेलमध्ये….

5. शरद मोहोळ टोळी, मुळशी, सुतारदरा, 28 सदस्य, 2015 पासून active, पण शरद मोहोळचा 5/1/2024 रोजी खून…

6. बंटी पवार गँग, 26 सदस्य, 2015पासून सिंहगड रोड परिसरात active, बंटी पवार सध्या जेलमधे…

7. बाबा बोडखे गँग, पुणे, सदस्य 56, बाबा बोडके गँग ऑन रेकॉर्ड निष्क्रिय…बाबा बोडकेची राजकारणात येण्यासाठी धडपड सुरूच…

8. उमेश चव्हाण उर्फ घिसाडी, 2011पासून रविवार पेठ, 11 सदस्य, म्होरक्या उमेश घिसाडी सध्या जेलबाहेर…

9. बापू नायर गँग, 45 सदस्य, 2001 पासून बिबवेवाडीत active, म्होरक्या सध्या जेलबाहेर 

10. अन्वर नया(मयत), कोंढवा भागात 2009 पासून अँक्टिव्ह होता, सदस्य 10 active 

11. खडा वसीम उर्फ रफिक शेख 2007 पासून कोंढवा भागात 11 सदस्यांस





Source link

महाराष्ट्रातील रहस्यमय मंदिर! मूर्तीवरुन हात फिरवल्यावर…, 5000 वर्षांपूर्वीची…; गूढ आजही कायम

महाराष्ट्रातील रहस्यमय मंदिर! मूर्तीवरुन हात फिरवल्यावर…, 5000 वर्षांपूर्वीची…; गूढ आजही कायम


Maharashtra Tourist Places Mysterious Temple: महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. याचबरोबर अनेक अशीही ठिकाणं आहेत जी लोकांना ठाऊक नाहीत. महाराष्ट्रातही अशी अनेक मंदिरं आणि गावं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना कल्पनाही नाही. मात्र या गावांमध्ये काही रहस्य दडलेली आहेत. ही रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत. असेच एक रहस्यमय आणि रंजक मंदिर महाराष्ट्रात आहे. या मंदिरामधील मुर्तींवर हात फिरवला किंवा टीचकी मारली तर त्यातून सप्तसूर बाहेर पडतात. नाही आम्ही गमंत नाही करत आहोत खरंच महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे. हे मंदिर कुठे आणि त्याचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात…

Add Zee News as a Preferred Source

कुठे आहे हे मंदिर?

ज्या मंदिराबद्दल आपण बोलतोय ते सोलापूरमध्ये आहे. जिल्ह्यातील वेलापूर येथे अगदीच दुर्लक्षित असलेलं हे मंदिर आहे अर्धनारीनटेश्वराचं! या मंदिरामधील मुर्तींसंदर्भात एक चमत्कारिक अनुभव घेता येतो. मंदिरातील बहुतांश मूर्ती या पुरातत्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात ठेवल्यात. याच संग्रहालयातील काही मुर्तींवर हात फिरवला किंवा टीचकी वाजवली तर त्यातून सप्तसूर निघतात. मात्र हे का होतं याचं कारण संशोधकांना अद्यापही सापडलेलं नाही. हे रहस्य आजही कायम आहे.

कसं आहे हे मंदिर?

खरं तर या ठिकाणी ऐतिहासिक वीरगळांचं संग्रहालय आहे. युद्धात धारातिर्थी पडलेल्या विरांच्या युद्धाचे प्रसंग या संग्रहालयातील वीरगळांवर कोरलेले दिसतात. या संग्रहालयातील वीरगळांची संख्या दिडशेहून अधिक आहे. येथील मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीच महादेवाची पिंड असून येथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्यांनी नटवलेले अर्धनारीनटेश्वर आहेत. हेमाडपंथी पद्धतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील इटालियन हिल सिटी: मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच आहे हे सुंदर ठिकाण; कसं जाल? कुठे राहाल?

वीरगळ म्हणजे काय?

वीरगळ हा शब्द दोन मूळ शब्दांपासून तयार झालेला आहे. ‘वीर’ म्हणजे शूर आणि ‘गळ’ म्हणजे दगड. त्यामुळे वीरगळचा अर्थ शूरवीरासाठी उभारण्यात आलेला दगड असा होतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वीरगळ परंपरेचा उगम कर्नाटकात झाला. त्यानंतर ती महाराष्ट्रात पसरली. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य यांसारख्या राजघराण्यांच्या काळात वीरगळाचा प्रसार झाला. वीरगळ हे साधारणपणे तीन ते साडेतीन फूट उंचीचे दगड असतात. या दगडांवर योद्ध्याचे शौर्य, युद्ध, मृत्यू आणि देवलोकात जाण्याची प्रक्रिया कोरलेली असते. वर चंद्र आणि सूर्यही कोरलेले असतात. म्हणजेच चंद्र-सूर्य असेपर्यंत या वीराची क्रांती कायम राहील असं त्यातून सुचवण्याचा हेतू असतो. हे  वीरगळ जुन्या गावांमध्ये, मंदिरांच्या परिसरात, पाराजवळ किंवा शेतात आढळतात. अनेकदा अशा  वीरगळांवरील कोरीव काम हे देवाच्या मूर्ती समजून त्यांना शेंदूर लावून त्यांची पूजा केली जाते.

मंदिरावरील शिलालेखात काय?

1271 ते 1310 या काळात यादव राजा रामचंद्र याचे शिलालेख या मंदिराच्या भिंतीवर पाहायला मिळतात. मंदिरासमोरच पाण्याचं एक मोठं कुंड असून त्यात 12 महिने पाणी असतं. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो. 

कधी असते यात्रा?

चैत्र पौर्णिमेला ग्रामदेवता असलेल्या श्री अर्धनारीनटेश्वराची यात्रा भरते. शुद्ध पंचमीला हळद, अष्टमीला लग्न आणि पौर्णिमेला वरात असते. वद्य अष्टमीला मुख्य सोहळा असं दरवर्षी येथे आयोजित केलं जातं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp