महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर



Third Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.  



Source link

मोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?

मोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?



Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.



Source link

मविआत मोठा वाद! संजय राऊत तडकाफडकी बैठकीतून निघून गेले; नाना पटोले जागेवर ठाम

मविआत मोठा वाद! संजय राऊत तडकाफडकी बैठकीतून निघून गेले; नाना पटोले जागेवर ठाम


Maharashtra Assembly Election: नाशिक पश्चिम जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) खटके उडल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिम जागेवर सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) दोघेही अडून बसले आहेत. त्यानंतर संजय राऊत तडकाफडकी निघून गेल्याची माहिती मिळत आहे. 

विदर्भातील मतदारसंघांवरुनही तणाव

विदर्भातील काही मतदारसंघातवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव काँग्रेसकडून इच्छुक आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. यवतमाळ शहरावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस दावा करीत आहेत. अकोला पश्चिम हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र, यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा या जागेवर इच्छुक आहेत. कारंजा आणि जळगाव जामोद या जागा काँग्रेसच्या आहेत. मात्र. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केला आहे. दिग्रससाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आपल्या मुलासाठी प्रयत्न करीत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून पवन जैस्वाल यांनी तयारी सुरू केली आहे. या जागांवर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मातोश्रीवर तातडीची बैठक

उद्धव ठाकरेंनी आज तातडीने बैठक बोलावली. दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, असे संकेत खासदार संजय राऊतांनी दिले आहेत.

जागावाटप आणि उमेदवार निवडीसाठी उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावल्याच समजत आहे. या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत,सुभाष देसाई उपस्थित आहेत.. बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे सा-यांचं लक्ष आहे. दरम्यान, काही अंतर्गत आजार आहेत. एक्सरे-एमआरआय काढावे लागतील. ते आज बैठकीत होईल.
आज नक्कीच निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 

“आम्ही अजिबात नाराज नाही, नाराजी कळविण्याचा देखील प्रश्न येत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय घेता येतात. आम्ही कोणाला का नाराजी कळवायची. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो चर्चांना उपस्थित राहतो. आम्हाला भाजपच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. 





Source link

लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं


पुढील
बातमी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेते साथ सोडून चालले, अजित दादांची भिस्त कोणावर?





Source link

पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही…'

पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही…'


Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित करताना, ‘आमचे मुख्यमंत्री समोर बसले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे शरद पवारांनी जाहीर करावं असं मी त्यांना आव्हान देतो,’ असं म्हटलं होतं. यावर महाविकास आघाडीकडून कोणतंही उत्तर आलेलं नसलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या रस्सीखेच फडणवीसांच्या निशाण्यावर होती हे स्पष्ट आहे. मात्र आता महायुतीमध्येही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित झालेला नसल्याचं दिल्लीमधील बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी मध्यरात्रीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रात्री उशीरापर्यंत चालली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले होते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत जागावाटपावर चर्चा झाली.

या बैठकीमध्ये महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळत असून काही जागांचा निर्णय प्रलंबित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच जोरदार प्रचाराची मोहीम सुरू होणार आहे. मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदासंदर्भात मोठा निर्णय तिन्ही घटकपक्षांनी घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्रिपदाबाबात मोठा निर्णय

महायुतीचा मुख्यमंत्री निकालानंतरच ठरणार, असं भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निश्चित केलं आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यावर अद्याप निर्णय झाला नसून यासंदर्भात, ‘महायुतीकडून कोणत्याही नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केला जाणार नाही याची काळजी घेतली जावी,’ असे निर्देश अमित शहा यांच्याकडून तिन्ही नेत्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

महाविकास आघाडीचं 28 जागांवरुन अडलं

महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते. 

दिल्लीत सुटणार मविआचा पेच?

ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत विदर्भातील रामटेक, अमरावतीसह काही जागा काँग्रेससाठी सोडल्या. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भातील काही जागांवर दावा केला जात आहे. दक्षिण नागपूर आणि रामटेक या नागपूर जिल्ह्यातील काही जागांसह विदर्भातील काही जागांवर वाद आहे.  त्या जागा सोडण्यास काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नसल्याने आता हा मुद्दा दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची शक्यता आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp