Anubal, a startup, takes a crack at nuclear fusion

Anubal, a startup, takes a crack at nuclear fusion


Nuclear fusion is generally thought of as a big boys’ game; one does not relate a startup with this holy grail of energy. But Anubal Fusion, a company set up a few months ago, wants to take a crack at it.

In the last half a century, attempts to produce more output energy and input through nuclear fusion have been by trying to fuse atoms of two isotopes of hydrogen, viz., deuterium and tritium. The fusion produces one helium atom and energy. Deuterium and tritium (indeed, any two atoms) don’t easily merge into one without the aid of sun-level temperatures. However, to achieve this, scientists have taken one of the two approaches—magnetic confinement and inertial confinement. The former is the approach taken by the multi-country ITER project in France. As for the latter, the Lawrence Livermore National Lab of the US was in the news last year for achieving a tiny surplus energy. It did by crushing a pellet containing hydrogen with 200 lasers from all around. The drawback with this is, it also produces flying neutrons, which is a problem. 

Anubal Fusion is taking an entirely new approach towards fusion, trying to bombard protons into an isotope of boron (boron-11), to achieve fusion. “This reaction also produces helium and energy but no neutrons, the founder of the startup, Dr Pravin Kini, told Quantum. However, to shoot protons into boron-11 at the required high energy levels, very powerful lasers are needed—a regular particle accelerator won’t do. Fortunately, the Tata Institute of Fundamental Research (TIFR), is installing a 1 peta-watt laser, costing about Rs 1,000 crore. TIFR, as a partner of Anubal, will let the startup use the laser to do experiments. 

TIFR’s PW-scale laser will be ready next year and till then Anubal will do simulations on supercomputers. The startup recently received pre-seed funding from Speciale Invest, a VC firm that invests in DeepTech startups, but within a year, the company expects to raise Rs 1,000 crore, Kini said.





Source link

'…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत…'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला

'…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत…'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला


Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यांवर निशाणा साधतानाच ‘गौतम अदानी हा या निवडणुकीतील ज्वलंत विषय आहे,’ असं म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये,” असं म्हणतानाच राऊतांनी, “महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे,” असं विधान केलं आहे. 

महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही

“मोदी-शहा-फडणवीस व गौतम अदानी हा या निवडणुकीतला ज्वलंत विषय आहे. महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये. मुंबईतील सर्व मोक्याच्या जमिनींचा ताबा अदानी यांना देण्यात आला. मिठागरे, जकात नाके अशा जागांवर अदानी यांनी आताच खुंट्या ठोकल्या. नवी मुंबईत सातारा-पाटण रहिवाशांच्या मेळाव्यात गेलो. तेथील रहिवाशांनी माहिती दिली, ”अदानी आता साताऱ्यातही घुसले.” महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही. अदानी यांचे उद्योग बांगलादेश, पाकिस्तानसह अनेक इस्लामी राष्ट्रांत पसरले व त्यामुळे या लोकांचे ‘हिंदुत्व’ धोक्यात आले नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे

मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर…

“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे सध्या महाराष्ट्रातच तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातला प्रचार संपताच मोदी हे ब्राझीलला रवाना होतील. ब्राझीलमध्ये त्यांच्यासोबत गौतम अदानी असतील काय? कारण मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर अदानी यांच्या कंपनीला त्या त्या देशात मोठे कंत्राट मिळते. महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या बैठका गौतम अदानी यांच्याच घरी झाल्या व स्वत: अदानी त्या बैठकांत हजर असायचे, असा स्फोट आता अजित पवार यांनीच केला. नंतर त्यांनी घूमजाव केले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवत आहे व ठाकरे त्यांना का नको होते? ते उघड झाले,” असं राऊत ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या विशेष सदरात म्हणाले आहेत. 

नक्की वाचा >> बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण…; राऊतांचा हल्लाबोल

…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल

“महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे. मुंबई त्यांना संपूर्णपणे गिळायची आहे व त्याची तयारी पूर्ण झाली आहे. फोर्ट भागात संयुक्त महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक आज आहे. हा मोक्याचा भूखंडही उद्या अदानी ताब्यात घेतील व उद्या त्या स्मारकावर अदानींचा टॉवर उभा राहिलेला दिसेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता लोकांना माहीत नाही. अदानी त्यांच्यापेक्षा मोठे. एका मोकळ्या भूखंडावर अदानीचा टॉवर उभा राहील. पहा, विकास झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे जाहिराती करतील,” असा टोला राऊतांनी लगावला आहे. “मराठी माणसा, हे तुझ्या डोळ्यांदेखत घडू द्यायचे काय? अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा,” असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे. 





Source link

'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण…' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार

'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण…' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार



Maharashtra Assembly Election : काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं. त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय. 



Source link

हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा…

हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा…



Maharashtra Weather News : हिमाचल, काश्मीरमध्ये जलप्रवाह गोठण्यास सुरुवात; आठवड्याच्या शेवटी नेमकं कसं असेल हवामान? पाहा सविस्तर हवामान वृत्त…
 



Source link

शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत

शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत


महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक असणाऱ्या शरद पवारांनी अनेक वर्षं राज्यातील राजकारणावर वर्चस्व गाजवलं आहे. राज्यातील राजकारणाचा मोठा काळ गाजवणाऱ्या शरद पवारांच्या कार्यकाळात अनेक वादही झाले आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांचा राज्याला दीर्घकाळासाठी गंभीर परिणाम भोगावा लागला आहे. कृषी ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक क्षेत्रांवर त्यांचा नकारात्मक परिणाम झाला.

शरद पवारांनी घेतलेल्या अशा 5 निर्णयांबद्दल जाणून घ्या, ज्यांची महाराष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागली.

1) कृषी संकटांची चुकीची हाताळणी: वाढत्या शेतकरी आत्महत्या

शेती हा नेहमीच महाराष्ट्राच्या आणि खासकरुन विदर्भ, मराठवाड्यातील अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे. पण दुर्दैवाने शरद पवारांनी कृषी संकटाचा सामना करताना ठेवलेल्या दृष्टीकोनात प्रभावी हस्तक्षेप नसल्याबद्दल नेहमी टीका झाली आहे. त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना आणि राज्य स्तरावर भूमिका साकारताना आखलेल्या धोरणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळाला नाही. 

एका माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी केंद्र आणि राज्य स्तरावरील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची दीर्घकालीन धोरणं कारणीभूत असल्याचं सांगितलं आहे. तसंच शेतकरी आत्महत्येसाठी पाण्याची उपलब्धता नसणं हा प्रमुख घटक असल्याचा दावाही केला आहे. त्यांच्या मते, काँग्रेस-राष्ट्रवादीचे तत्कालीन सरकार सिंचनाच्या पुरेशा उपाययोजना अंमलात आणण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले.

अपुरं आर्थिक सहाय्य, अकार्यक्षम पीक विमा योजना आणि भरपाई मिळताना होणारी दिरंगाई यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली. शेतीविषयक समस्या चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित आधार आणि संरक्षण मिळालं नाही आणि यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली. 

2) भ्रष्टाचार आणि पक्षपाताचे आरोप

शरद पवारांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप अनेकदा होत होते, ज्यामुळे पारदर्शकता उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असे. यामधील एक महत्त्वाचा वाद महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा होता, ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील व्यक्ती आणि संस्थांना कर्ज दिल्याचा आरोप होता. या घोटाळ्यामुळे कथितपणे फार मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. 

राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्यातील तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी जाहीरपणे शरद पवारांच्या आदेशानुसार हा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. शिवाय, मित्रपक्षांना नफा मिळवून देणारे करार आणि सरकारी पदे बहाल करण्यात आल्याच्या दाव्यांसह हे आरोप आणखी गंभीर झाले.

शरद पवारांच्या कार्यकाळादरम्यान त्यांच्याशी संबंधित जोडलेल्या इतर वादांपैकी एक म्हणजे 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि त्यातील डीबी रियल्टी या त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित रिअल इस्टेट कंपनीची भूमिका. 2G भारतातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी एक आहे. या घोटाळ्यात 2008 मध्ये टेलिकॉम स्पेक्ट्रम परवान्यांचं चुकीच्या पद्धतीने वाटप केल्याचा आरोप होता. तपासात निष्पन्न झालं की, विनोद गोएंका यांची सह-मालकी असणाऱ्या डीबी रिअल्टीने कथितपणे राजकीय संबंधांच्या आधारे स्पेक्ट्रम वाटप धोरणांमध्ये प्रवेश मिळवला होता.

3) पायभूत सुविधांच्या गरजा समजून घेण्यात अपयश, राज्याच्या प्रगतीला स्थगिती

महाराष्ट्र हे देशातील सर्वात आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण राज्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये मुंबई आणि पुणे सारख्या शहरांचा जीडीपी महत्त्वाची भूमिका निभावतो. तथापि, राज्यातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत, विशेषतः ग्रामीण भागात आणि टियर-2 शहरांमध्ये मागे पडला आहे. शरद पवारांच्या कार्यकाळात शहरी भागांवर आणि मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. यामुळे अनेकदा ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष झालं जिथे पायाभूत सुविधा सुधारणं फार गरजेचं होतं.

चांगल्या रस्त्यांचा अभाव, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि या ठिकाणी असणाऱ्या मर्यादित शैक्षणिक संस्थांमुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला खीळ बसली. मुंबई मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या अनेक मोठ्या प्रकल्पांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा विलंब आणि अडथळ्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे महाराष्ट्रातील विकास आणि पायाभूत सुविधांच्या वाढीवर परिणाम झाला. 

4) एकतेवर विभाजनाचे राजकारण

शरद पवारांनी आखलेल्या राजकीय डावपेचांकडे अनेकदा फूट पाडणारे, आपल्या युतीला आणि सत्तास्थापनेची बाजू घेणारी व्यवस्था ज्यांनी एकीपेक्षा राजकीय अस्तित्वाला प्राधान्य देणारं म्हणून पाहिलं गेलं. यातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना करण्याचा त्यांचा निर्णय होता. मात्र यामागे शरद पवारांचा खरा हेतू राज्य किंवा राष्ट्रीय हितसंबंध वाढवण्यापेक्षा वैयक्तिक प्रभाव मजबूत करणं होता असा काही समीक्षकांचा दावा आहे. 

युतींमध्ये आणि पक्षनिष्ठेत होणारे बदल यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे राज्याला एकसंध दृष्टीकोनातून दीर्घकाळ टिकतील अशी विकासाची उद्दिष्टं साध्य करणं कठीण झालं आहे. 

5) योग्य काळजी किंवा देखरेख न करता काँग्रेसला राज्य संसाधने काढून टाकण्यास परवानगी देणं

काँग्रेससह आपल्या युतीदरम्यान शरद पवार राज्य संसाधनांच्या वाटपावर नियंत्रण आणि संतुलन ठेवण्यात अपयशी ठरले हा नेहमीच टीकेचा मुद्दा असतो. अशी अनेक उदाहरणं आहेत जेव्हा युती सरकारच्या अंतर्गत संसाधनांचे वाटप अशा प्रकल्पांकडे वळवले गेलं ज्यामुळे लोकांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय संबंध जपण्यास प्राथमिकता देण्यात आली अशी टीका होते. 

शरद पवारांनी दुर्लक्ष केल्यामुळेच सार्वजनिक पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठीचा निधी सर्वसामान्यांना मर्यादित लाभ असलेल्या प्रकल्पांकडे वळवण्यात आल्याचा आरोप झाला आहे. उदाहरणार्थ, मुंबईच्या बंद पडलेल्या कापड गिरण्यांचा पुनर्विकास करण्यामागे परवडणारी घरं आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून देणं हा हेतू होता. मात्र तिथे खासगी बिल्डर्स आणि उच्चभ्रूंना पसंती दिल्याचा आरोप झाला. यामुळे मूळ गृहनिर्माण आणि विकासाची उद्दिष्टे बाजूला ठेवली गेली असाही आरोप आहे. 

आस्मानी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना भक्कम पाठिंबा देण्याचा अभाव, फुटीरतावादी राजकारण आणि संसाधन व्यवस्थापनातील त्रुटी या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या चुकांमुळे विविध क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती मंदावली आहे.

आज जर राज्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती समजून घ्यायची असेल तर ही आव्हानं ओळखून घेणं गरजेचं आहे. शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या मुद्द्यांवर लक्ष देणं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ते भविष्यातील सुधारणा आणि भाजपच्या युती सरकारसह स्थिरतेकडे पाहत आहे.

 

(This article is part of IndiaDotCom Pvt Lt’s sponsored feature, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link

YouTube
Instagram
WhatsApp