by Hansraj Agrawal | Oct 18, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरु झालं आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग सुरु आहे. शरद पवारांच्या पक्षामध्येही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र दिसत आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यामध्येही मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येथील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आता थेट शरद पवारांच्या पक्षातून हा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरेंना आव्हान देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
थेट अदिती तटकरेंना आव्हान
मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या या नेत्याकडे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. ज्या नेत्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाला रायगडमध्ये अदिती तटकरेंविरुद्ध लढण्यासाठी दमदार संधी मिळाल्याचं मानलं जातंय त्याचं नाव आहे, ज्ञानदेव पवार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्ष सोडला आहे. खरं तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी शिंदेंची शिवसेना सोडली असली तरी आता ते शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन थेट अदिती तटकरेंना आव्हान देणार आहेत.
शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने रायगडच्या स्थानिक राजकारणात भूकंप झाला होता. ज्ञानदेव पवार यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता नगराध्यक्षपदाचा राजीनामा रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर ज्ञानदेव पवार लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून होती. अखेर यावर आता शिक्कामोर्बत झालं आहे. ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते आणि ते स्थानिकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर पवारांनंतर नगराध्यक्ष कोण हा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या पक्षासमोर असतानाच आता ज्ञानेश्वर पवारांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण निर्माण केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी ज्ञानदेव पवार यांनी उपोषण केलं होतं. त्यामुळे ते माणगावमध्ये प्रचंड चर्चेत आलेले.
महायुतीला दिला घरचा आहेर
मुंबई-गोवा महामार्गासाठी उपोषण करुन आंदोलन करणाऱ्या ज्ञानदेव पवार यांनी महामार्गाचं रखडलेलं काम तातडीने करण्याची मागणी केलेली. आपल्या आंदोलनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. ज्ञानेश्वर पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी महायुतीला आणि त्यांच्या नेत्यांना घरचा आहेर दिला होता. त्यानंतर ज्ञानदेव पवार यांनी थेट नाराजीनाम्याचं रुपांतर राजीनामा करत सर्वांना धक्का दिलेला.
या स्थानिक नेत्याचा प्रभाव राहणार कारण…
ज्ञानदेव पवार हे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. श्रीवर्धन मतदारसंघात 60% मतदार हा कुणबी समाजाचा आहे. आता ज्ञानेश्वर पवारांना महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक राजकारणात अटीतटीची लढाई होईल असं मानलं जात आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 17, 2024 | Trending News
Baba Siddiqui Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे. सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने बाबा सिद्दिकींची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
झिशान सिद्दिकी यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
“माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण, बचाव करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटलं आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. त्यांचा मृत्यू नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा,” असं झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सलमानच्या घरी नेमकी काय स्थिती?
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने कुटुंब सध्या चिंतेत असल्याचं सांगितलं आहे. तसंच सलमान खान आपले चित्रपट पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचंही सांगितलं. तो म्हणाला की “आम्ही सध्या ठीक आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही एकदम बरे आहोत, कारण कुटुंबात बरंच काही घडत आहे. नक्कीच प्रत्येकजण चिंतेत आहे. मी माझा चित्रपट बंदा सिंग चौधरीचं प्रमोशन करण्यास कटिबद्ध आहे. 25 ऑक्टोबरला माझा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट वेळेत रिलीज होईल याची मी काळजी घेत आहे. अनेक गोष्टी घडत असताना मला जे करणं भाग आहे ते करावं लागेल”.
‘यार तेरा गँगस्टर…’, बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्याने ठेवली होती Instagram पोस्ट, म्हणतो , ‘सभ्य बाप…’
सलमान खानच्या सुरक्षेबाबात बोलताना त्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेसाठी मेहनत घेत असल्याची माहिती दिली. “आम्ही अतिशय व्यवस्थित आहोत असं मी म्हणणार नाही. पण जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही खात्री करुन घेत आहोत की, सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण गोष्टी ज्याप्रकारे ठरल्या आहेत तशाच व्हाव्यात आणि सलमानची सुरक्षा व्हावी. प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम देत आहे. आम्ही गोष्टी अशाच प्रकारे राहतीत हे पाहत आहोत,” अशी माहिती अरबाज खानने दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 16, 2024 | Trending News
लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 16, 2024 | Trending News
पुढील
बातमी
Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त ‘या’ भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा
Source link
by Hansraj Agrawal | Oct 15, 2024 | Trending News
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 15, 2024 | Trending News
Ratan Tata and Shantanu Naidu: भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे टाटांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका नावाची चर्चा होत आहे ती म्हणजे टाटांचा बेस्ट फ्रेंड शांतून नायडूची. टाटांच्या निधनानंतर शांतनूने एक भावून पोस्टदेखील केली होती. पण तुम्हाला माहितीये का शांतून नायडू हा अस्खलित मराठी बोलतो.
कोण आहे शांतनू नायडू?
शांतनू नायडू हा टाटांच्या जवळच्या व्यक्तीपैकी एक होता. रतन टाटांपेक्षा 55 वर्षांनी लहान असलेला शांतनू त्यांचा मित्र व सहकारी म्हणून त्याने काम केले आहे. दोघांची ओळख 2014 साली झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. शांतून हा टाटा कंपनीत काम तर करतोच. त्याचे स्वतःचे दोन स्टार्टअपदेखील आहेत. तसंच, तो लेखकदेखील आहे. त्याने I Came Upon A Lighthouse हे पुस्तक लिहले आहे. त्याने यात टाटांच्या मैत्रीबद्दल लिहलं आहे.
तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण शांतनू हा पुणेकर आहे. शांतनूचा जन्म 1993 मध्ये पुण्यातील तेलुगू कुटुंबात झाला आहे. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलं आहे.
गुडफेलोचा संस्थापक
शांतनू हा गुडफेलो नावाच्या स्टार्टअपचा संस्थापक आहे. गुडफेलो हा एक स्टार्टअप असून या माध्यमातून वृद्धांना युवकांसोबत जोडण्यात येते. या अॅपचा मुख्य उद्देश हा आहे की, वृद्ध नागरिकांना त्यांच्या रोजच्या कामात मदत व्हावी. जसं की, किराणा सामान खरेदी करणे, औषधांची व्यवस्था करणे, डॉक्टरांकडे नेणे याप्रकारेच वृद्धांची मदत करणे.
गुडफेलोचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. या व्हिडिओवरुन अनेकदा शांतनू त्यांच्या स्टार्टअपविषयी माहिती देत असतो. तो बऱ्याचदा मराठीतूनही बोलताना दिसत आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा यांच्या अत्यंसंस्कारादरम्यानचा हा व्हिडिओ असून शांतून पोलिसांसोबत मराठीत संवाद साधताना दिसत आहे.
रतन टाटांच्या निधनानंतर शांतनूची पोस्ट
अखेर मला आता थोडासा शांत वेळ मिळाला आहे. मी आता त्यांना हसताना पाहू शकत नाही किंवा मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत नाही, ही गोष्ट मी स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शांतनूने म्हटलं आहे.
Source link