सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!



 सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात  सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी  अजितदादांना एक मोठी ऑफर दिलीय. कोकाटेंनी अजित दादांना कोणती ऑफर दिलीय त्या ऑफरला अजितदादांनी काय उत्तर दिलंय पाहूयात. 



Source link

मीरा रोड मध्ये थरार! भर रस्त्यात पत्नीची हत्या

मीरा रोड मध्ये थरार! भर रस्त्यात पत्नीची हत्या



भर रस्त्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे. मीरा रोड मध्ये ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे.  मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असलेल्या नया नगर परीसरात ही घटना घडली आहे.  भर रस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे.



Source link

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई, अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का?

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई, अंतर्गत गटबाजीमुळे महाराष्ट्रातही हातचा डाव घालवेल का?



Congress For CM Post: मविआत जागावाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लगीनघाई सुरू आहे.



Source link

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा…'

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा…'


Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातून हळहळ व्यक्त होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत भावूक शब्दांमध्ये त्यांना आदरांजली वाहिली आहे. “रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं,” असं राज यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.  

कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान…

रतन टाटांच्या पाया पडतानाचा फोटो राज यांनी या पोस्टसोबत जोडला आहे. तसेच रतन टाटा राज यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर गेले होते त्यावेळेचेही फोटो राज यांनी शेअर केले आहेत. “रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली,” असं म्हणत राज यांनी रतन टाटांच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. 

सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता…

“स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी ‘नॅनो’ गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच,” असं भावनिक विधान रतन टाटांनी केलं आहे. 

नक्की वाचा >> Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, ‘रतन तू कायम माझ्या..’

…असं कधीच झालं नाही

“माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या ‘बोटॅनिकल उद्याना’साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला,” असं राज यांनी रतन टाटांबरोबर राहिलेल्या त्यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल भाष्य करताना म्हटलं आहे. 

…तेव्हा ते स्वतः नाशिकला आले होते

“बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते,” असं राज ठाकरे म्हणाले. 

नक्की वाचा >> Ratan Tata Death: ‘आपण एवढच करु शकतो की…’, महिंद्रांची हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’

रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे…

“रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की ‘बॉंबे हाऊस’ हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या ‘टॅंगो’ आणि ‘टिटो’ या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

भारताने कदाचित शेवटचा…

“आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक’ गमावला, हे त्याहून मोठं दुःख,” अशा शब्दांमध्ये राज यांनी श्रद्धांतली वाहिली आहे.  

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख…

“छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब,” असं राज यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. 

“रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणथ राज यांनी पोस्टचा शेवट केला आहे.





Source link

विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?

विधानसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरातलं राजकारण कूस बदलणार का?



Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी… नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.



Source link

… तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले

… तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले


Sanjay Raut On Congress: हरियाणात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणातील पराभवाचा महाराष्ट्रात फटका बसू शकतो का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. कोणी स्वतःला मोठा भाऊ छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचे आहे. हरियाणाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. तीन पक्षांची आघाडी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

हरियाणाचा विजय फार मोठा महान व दैदिप्यमान नाही. आमच्या मतांमध्ये विभजन आहे. काँग्रेस पक्षाने या निकालाविरोधात काही तक्रारी केली आहेत. त्यावरही विचार व्हावा. लहान राज्य आहे जातीपातीची काही गणित असतात. काँग्रेसला 36 जागा मिळाल्या बहुमताला 45 जागा लागलात. 9 जागा कमी पडल्या. अर्थात आम्ही निराश झालेलो नाही. काँग्रेस पक्षाला देखील भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यायला हवी. मग इतर पक्षही त्यांच्या राज्यात त्या दृष्टीने भूमिका घेतील, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. 

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याचा विचार करायला हवा. ज्या राज्यात काँग्रेसची बाजू कमजोर असते त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षाने एकत्र घेऊन निवडणुका लढवते. पण जिथे काँग्रेसची हवा आहे त्या ठिकाणी स्थानिक पक्षांना लांब ठेवते. त्यातूनच हरियाणासारखा निकाल येतो. हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता.  कांटे की टक्कर होऊ शकली असती काही पक्षांना त्या ठिकाणी महत्त्व देऊ शकले असते. त्या सर्वांनी चर्चा करून निवडणुकांना सामोरे गेले असते तर निकाल बदलू शकले असते, असं म्हणत राऊतांनी एकप्रकारे काँग्रेसचे कान टोचले आहेत.   

हरियाणाच्या निकालामुळं महाराष्ट्रात आमदार दुरुस्ती करता येईल. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसंदर्भात कुठलीही बार्गेनिंग पॉवर आम्ही करणार नाही. ठाकरे यांनी सांगितले ते शंभर टक्के सत्य आहे जम्मू कश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला चेहरा होता त्यांनी त्यांना मतदान केलं. हरियाणा मध्ये देखील असा चेहरा समोर आला असता तर चित्र वेगळं असतं, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात देखील तसंच आहे. आधी निवडणूका लढायच्या आणि नंतर नेता ठरवायचा हे लोकांच्या पचनी पडत नाही. या राज्याला चेहरा कोणता आहे हे स्पष्ट केले पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp