घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा, म्हाडाने डोमेसाईल प्रमाणपत्राबाबत घेतला मोठा निर्णय

घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा, म्हाडाने डोमेसाईल प्रमाणपत्राबाबत घेतला मोठा निर्णय


Mhada Mumbai Lottery: मुंबईत एक तरी हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरांच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना मुंबईत परवडेलच असं नसतं. मुंबईकरांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असते. अलीकडेच म्हाडाने मुंबईत 2030 घरांची लॉटरी काढली आहे. त्याचबरोबर म्हाडाने आणखी एक दिलासा दिला आहे. म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खूशखबर आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, घराचा ताबा घेण्यापूर्वी संबंधित अर्जदाराला नवीन डोमेसाईल सादर करणे बंधनकारक असणार आहे.

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना सध्या १ जानेवारी २०१८ नंतर जारी केलेले आणि बारकोड असलेले डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बारकोड असल्यामुळे सिस्टममधून या डोमेसाईल प्रमाणपत्राची पडताळणी करणे म्हाडाला सोपे जाते. 

अनेक जणांकडे २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र असून आपल्याला त्या डोमेसाईलच्या आधारावर म्हाडाच्या  घरांसाठी अर्ज भरता येईल अशा भ्रमात ते अर्जदार राहतात. ऐनवेळी अर्ज भरताना मात्र त्यांची गोची होते. नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळीदेखील अनेकांनी जुने डोमेसाईल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जावे, अशी मागणी म्हाडाकडे केली होती.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदार आता जुने डोमेसाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून याची अंमलबजावणी होईल. संबंधित अर्जदार विजेता झाल्यानंतर त्याला ठरावीक दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीत त्याला बारकोड असलेले नवीन डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

दरम्यान, मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ घरांचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.   येत्या ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.





Source link

सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळ

सिद्धिविनायक मंदिरांच्या प्रसादात उंदीर? Viral Video मुळं खळबळ



Siddhivinayak Temple: मुंबईतल्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात प्रसादाच्या लाडू मध्ये उंदरांच्या पिल्लांच्या सुळसुळाट असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आला आहे.



Source link

अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!

अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!


पुढील
बातमी

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘पोलिसांनी…’





Source link

'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेऊन ठेवले; ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची…'

'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेऊन ठेवले; ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची…'


Loan On Maharashtra Pending Bills By State Government: “आर्थिक शिस्तीचे पालन करणारे राज्य ही महाराष्ट्राची ओळख मिटवून टाकण्याचा विडाच राज्यातील मिंध्यांच्या सरकारने उचललेला दिसतो आहे. केवळ विडाच उचलला असे नव्हे तर राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन आर्थिक शिस्तीचे राज्य ही ओळख पुसून टाकण्यात मिंध्यांची राजवट दुर्दैवाने यशस्वी झाली आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारवर निशाणा साधला आहे. “ऋण काढून सण साजरे करण्याच्या अनिष्ट वृत्तीमुळे राज्याची आर्थिक शिस्त संपूर्णपणे कोलमडली व सरकार पुरते कंगाल झाले. आता तर परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, विकासकामांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे छदामही उरला नाही,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’

“तिजोरीत खडखडाट झाल्याने राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या विकासकामांची तब्बल 36 हजार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. सरकार दिवाळखोरीत निघाल्याचाच हा पुरावा आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्ज या सरकारने 8 लाख कोटींवर नेऊन ठेवले. सरकारच्या उत्पन्नातील बहुतांश रक्कम या कर्जाचे व्याज फेडण्यात जात असल्याने तिजोरीत काही शिल्लकच उरत नाही, अशी अवस्था आहे. तरीही  राज्याची आर्थिक घडी उद्ध्वस्त झाल्याचे हे वास्तव लपवून मिंध्यांचे सरकार निवडणुकीच्या तेंडावर रोज नवनव्या फुकटछाप घोषणांचा पाऊस पाडत सुटले आहे. ‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ अशी या सरकारची दुर्गती झाली आहे,” अशी टीका ‘सामना’मधून करण्यात आली आहे.

शिंद्यांच्या विद्यमान खोकेशाहीत…

“सरकार व मंत्रालयाचे उंबरठे झिजवून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते व कंत्राटदारांनी विकासकामांची कंत्राटे मिळवली, पण कामे पूर्ण झाल्यानंतरही या कामांची हजारो कोटींची बिले सरकारने थप्पीला लावून ठेवली आहेत. बिलांच्या थकबाकीने हवालदिल वगैरे झाल्याने अभियंते, कंत्राटदार सरकारविरुद्ध शड्डू ठोकण्याच्या विचारात असल्याची बातमी आहे. सरकारच्या तिजोरीत खडपूही शिल्लक नाही. त्यामुळे कंत्राटदारांना या कामांची बिले मिळतील तरी कशी? राज्याच्या सर्व भागांत पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे कशी जोरात सुरू आहेत, असे ढोल सरकारने मोठ्या थाटात बडवून घेतले; पण या कामांसाठी खर्च झालेले पैसे देण्यासाठी मात्र सरकारकडे फंड उपलब्ध नाही. विभागांसाठी मंजूर झालेला व उपलब्ध असलेला निधी किंवा कुठल्याही आर्थिक बाबींचा आगापिछा न पाहता सरकारच्या पाठीराख्यांना खूश करण्यासाठी होलसेलात कामे काढण्यात आली. वरील सर्व विभागांमध्ये भरमसाट निविदा काढून मर्जीतील लोकप्रतिनिधींना वा लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळण्यासाठी खिरापत वाटावी अशा पद्धतीने कामांचे वाटप करण्यात आले. तथापि, आता कामे पूर्ण झाल्यावर मात्र निधीअभावी सरकारने ही बिले अडकवून ठेवली आहेत. त्यामुळे राज्यातील कंत्राटदार महासंघाने सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या कामांमध्ये सरसकट सर्वच कंत्राटदारांना सहानुभूती दाखवावी अशीही परिस्थिती नाही. कारण मिंध्यांच्या विद्यमान खोकेशाहीत विकासकामांची अंदाजपत्रके कशी फुगवली गेली हे काही आता लपून राहिलेले नाही,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..

‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची…

“केवळ या विकासकामांचीच बिले या सरकारने थकवली असे नव्हे. गतवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची खास बैठक घेऊन मराठवाड्यासाठी 46 हजार कोटींच्या वेगवेगळ्या कामांच्या घोषणा मिंधे सरकारने केल्या होत्या, मात्र या 46 हजार कोटींपैकी 46 पैसेही सरकार गेल्या वर्षभरात खर्च करू शकले नाही. सरकारच्या तिजोरीची ही अशी दुरवस्था या अलिबाबा सरकारने करून ठेवली आहे. चौफेर लुटमार हेच त्याचे कारण आहे. 8 लाख कोटींचे कर्ज व तिजोरीची कंगाल अवस्था झाली असतानाही ‘लाडकी बहीण’ व ‘लाडका भाऊ’ यासारख्या योजना राबवून ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची अखेरची धडपड मिंधे मंडळ करीत असले तरी त्यांना त्यात यश येणार नाही,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

नव्या सरकारला पहिले काम…

“आर्थिक शिस्तीच्या बाबतीत दाखवलेल्या अकलेच्या दिवाळखोरीमुळेच मिंध्यांचे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे. तिजोरीतील खडखडाटाने राज्यातील विविध विकासकामांची तब्बल 36 हजार कोटींची बिले थकली आहेत. महाराष्ट्राची सत्ता जशी ओरबाडून मिळवली त्याच पद्धतीने राज्याची तिजोरी ओरबाडण्याचे कामही अनेक हातांनी सुरू आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर होईलच; तेव्हा नव्या सरकारला पहिले काम या लुटालुटीच्या ऑडिटचेच करावे लागेल,” असं म्हणत लेखाचा शेवट करणार आहे.





Source link

पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?

पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?



Nashik Crime News: नाशिक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp