by Hansraj Agrawal | Sep 18, 2024 | Trending News
Raj Thackeray on One Nation One Election: ‘वन नेशन-वन इलेक्शन’ प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
“एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
“बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल,” अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असंही सुनावलं. ते म्हणाले की, “पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या”.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 17, 2024 | Trending News
गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 17, 2024 | Trending News
Maharashtra Richest Village : महाराष्ट्रात अनेक गावखेडी असून, काही गावं ही त्यांच्या वेगळेपणामुळं चर्चेचा विषय ठरतात. ही गावं अशी आहेत जी त्यांचं वेगळेपण जपत प्रगतीच्या वाटेवर अविरतपणे चालत आहेत. असंच एक कमाल गाव अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या गावात आरोग्य आणि धनधान्याची भरभराट… पण काही वर्षांपूर्वी मात्र हे चित्र असं नव्हतं. सध्या जिथं या गावात हिरवळ पाहायला मिळते तिथं की एकेकाळी रखरखाट होता.
महाराष्ट्रात इतर गावांसाठी आदर्श ठरणारं आणि जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेलं हे गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार. या गावातील नागरिकांनी खऱ्या अर्थानं त्यांचं नशीब पालटलं असं म्हणायला हरकत नाही. 1990 च्या सुमारास इथं जवळपास 90 टक्के कुटुंबांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पिण्याच्या पाण्याचीही या गावात सोय नसताना गावकऱ्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळालेलं यशच या गावाच्या यशाचं गमक ठरलं.
काही दशकांपूर्वी या गावात…
कैक दशकांपूर्वी हिवरे बाजार हे गाव एक आनंदी गाव होतं, अगदी इतर गावं असतात तसं. 1970 हे दशक असं जेव्हा गावाची ख्याती हिंद केसरींचा गाव अशीही होती. पण, परिस्थिती बिघडली आणि 80-90 च्या दशकात या गावानं दुष्काळाचा सामना केला. पिण्यासाठीही पाणी उरलं नाही, नाईलाजानं अनेकांनी गाव सोडलं. वास्तविक गावात 93 विहीरी असूनही पाणीटंचाईचं संकट भीषण होतं. पुढे सुरु झाला जगण्याचा संघर्ष…
1990 मध्ये गावात जॉईंट फॉरेस्ट कमिटी तयार करण्यात आली आणि याअंतर्गत विहिरी खोदण्यापासून वृक्षलागवडीसाठीची श्रमदानाची कामं सुरु करण्यात आली. 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना आली आणि याअंतर्गत गाव वेगानं प्रगती करू लागलं. ज्या पिकांसाठी जास्त पाण्याची खपत होते अशा पिकांवर या समितीनं बंदी आणली. पाहता पाहता गावाती विहिरींची संथ्या 340 वर पोहोचली आणि जलस्तरातही वाढ झाली.
हिवरे बाजार हे राज्यातील सर्वात श्रीमंत गाव असण्याचं कारण म्हणजे इथं 80 हून अधिक कुटुंब कोट्यधीश असून, 50 हून अधिक अशी कुटुंब आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. या गावामध्ये दारिद्य्र रेषेसाठीचे वेगळे मापदंड आहेत. ज्यानुसार जी कुटुंब एका वर्षात 10 हजार रुपये खर्च करण्यात असमर्थ असतात त्यांची गणना या गटात होते.
हिवरे बाजारच्या यशाचं गुपित सांगावं तर, इथं काही सूत्र आत्मसाद केली जाता असं सरपंचांचं म्हणणं.
ही सूत्र खालीलप्रमाणं….
- वृक्षतोड न करणं
- कुटुंब नियोजन
- नशाबंदी
- श्रमदान
- हगणदारी मुक्त गाव
- भूजल पातळी नियोजन
आहे की नाही कमाल या गावाची? मग इथं तुम्ही कधी भेट देताय?
Source link
by Hansraj Agrawal | Sep 16, 2024 | Trending News
Ganesh Visarjan 2024 : दहा दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ आली आहे. अनंत चतुर्थीला दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. गणेश विसर्जनसाठी प्रशासनाने देखील चोख तयारी केली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.
गणेश विसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालीय. शांततेत विसर्जन होण्यासाठी जवळपास 12 हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज झालेत. गणरायाचं विसर्जन सुलभ आणि शांततेत व्हावे यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय. नियंत्रण कक्ष, नैसर्गिक आणि 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत.
पुण्यात 12, 500 पोलिस तैनात
पुण्यात गणेश विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणारेय. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूक जाणारेय…मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची मिरवणूक उद्या दुपारी 4 वाजता निघणार आहे. उमांगमलज रथामधून गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यासाठी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तसंच या रथाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. या रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरुही असेल. तर कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखवण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर तो तोललेला असून, बाजूला 21 छोटे कळस लावण्यात आलेत. तर रथावर 23 नंदींचे चेहरे बसवले आहेत. तसंच रथावर तब्बल 18 क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील. दगडूशेठ गणेशोत्सवाचं यंदा 132वं वर्ष आहे.
नाशिकमध्ये लेजर लाईट आणि डीजेला बंदी
नाशिकमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर बघायला मिळणारे.. मिरवणूकमध्ये लेजर लाईट देखील न लावण्याच्या सूचना गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या आहे.. गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्कश डीजे लावल्यास आणि लेझर लाईट वापरल्यास कडक कारवाईचा इशारा अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. या नियमांचं उल्लंघन केलं तर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 16, 2024 | Trending News
पुढील
बातमी
मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, शिंगणापूर ग्रामपंचायतीचा तुघलकी ठराव
Source link
by Hansraj Agrawal | Sep 15, 2024 | Trending News
कोल्हापुरमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने 7 वाहनांना धडक दिली आहे.
Source link