Chembur Fire: होरपळून 7 जणांनी प्राण गमावलेली आग 'त्या' दिव्यामुळं? प्रत्यक्षदर्शी म्हणाला, '5 वाजता…'

Chembur Fire: होरपळून 7 जणांनी प्राण गमावलेली आग 'त्या' दिव्यामुळं? प्रत्यक्षदर्शी म्हणाला, '5 वाजता…'


Chembur News Today: मुंबईतील चेंबूर येथे एका घराला आग लागून त्यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. चेंबूरयेथील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली आहे. गुप्ता कुटुंबीय झोपेत असतानाच ही आगीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर येत आहे. चेंबूर येथील आग ही पेटता दिवा खाली पडल्याने लागल्याचं समोर येत आहे. 

चेंबूर येथील सिद्धार्थनगर परिसरात एक दुमजली घर असून या घरातील तळमजल्यावर आगीचा भडका उडाला. पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घरात दिवा ठेवला होता तो दिवा खाली पडला. पेटता दिवा खाली पडल्याने आगी पकडली गेली. पाहता पाहता आग पसरत गेली. सुरुवातीला घरातील सदस्य छेदाराम गुप्ता हे झोपेतून जागे झाले. त्यांनी आग लागल्याचे पाहताच आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग जास्तच पसरत गेली होती. त्यांनी घरातील सर्व सदस्यांना उठवले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण मजला वेढला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या छेदाराम गुप्ता यांनी दिली आहे. 

छेदाराम गुप्ता यांनी बाहेर येऊन लोकांची मदत मिळवण्याचा प्रय़त्न केला. स्थानिकांनी घरातून बाहेर येऊन अग्निशमन दलाला याची माहिती दिली. या आगीच्या विळख्यातून छेदाराम गुप्ता आणि परिवारातील एक सदस्य बचावला आहे. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. 

चेंबूर आगीत स्थानिक युवकांची मदत

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे एका घराला आग लागली यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिक युवक आणि अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच, स्थानिक युवकांनी वेळीच या ठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं आजूबाजूला असलेल्या इतर घरांनाही आग लागली नाही. तर स्थानिक युवकांनीच घरांमध्ये मृत पावलेल्या सदस्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढले. सकाळी ही आग लागली होती तेव्हा घरामध्ये एकूण नऊ सदस्य होते त्यातले दोन सदस्य खाली झोपले होते. ते बाहेर पडले परंतू इतर सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जिथे आग लागली ते घर  ग्राउंड प्लस दोन मजले होते. या घरामध्ये गुप्ता परिवार राहत होता ग्राउंड फ्लोअरला दोन जण झोपलेले होते तर वरती पाच जण झोपले असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाला याची माहिती मिळतात अग्निशामकदल घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु आगअधिक भडकत गेली. खालच्या मजल्यावर किराणा दुकान असल्यामुळे त्यामध्ये काही ज्वलनशील सामान सुद्धा होतं. त्यामुळे ही आग भडकतच गेली अग्निशामक दलाने मागच्या बाजूला घराचं छत तोडून जपत मृतदेह बाहेर काढले. 





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे… रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे… रोहित पवार यांचा खळबळजनक दावा



Maharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.



Source link

Big News: काल मंत्रालयात उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण

Big News: काल मंत्रालयात उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण



Pesa Recruitment: अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे. 



Source link

50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर… शरद पवारांनी सांगितला जबरदस्त फॉर्म्युला

50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर… शरद पवारांनी सांगितला जबरदस्त फॉर्म्युला



महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी सर्वात मोठा मुद्दा तापतोय तो आरक्षणाचा… राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं विधान केलंय. आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवारांनी फॉर्म्युलाच सांगितलाय.. आता शरद पवारांचा हा नेमका फॉर्म्युला काय आणि आरक्षणासाठी आंदोलन करणा-यांना हा फॉर्म्युला मान्य आहे का.



Source link

₹700000000000 खर्च.. महाराष्ट्र सरकारच्या मोफत योजनांवर बंदी घालण्याची मागणी; कोर्ट म्हणालं..

₹700000000000 खर्च.. महाराष्ट्र सरकारच्या मोफत योजनांवर बंदी घालण्याची मागणी; कोर्ट म्हणालं..


Bombay High Court Nagpur Bench Ladki Bahini Yojana: लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसहीत मोफत योजनांचा विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘बळीराजा योजना’ यासारख्या मोफत सवलत योजना बंद करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निर्देश देण्यात आले असून आता यावर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे काय उत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

या योजना बंद करण्याची मागणी

अनिल वडपल्लीवार यांनी केलेल्या याचिकेवर 23 ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागितले आहे. राज्याची वित्तीय परिस्थिती बिकट असताना मोफत योजना राबविल्या जात आहे. तर्कहीन योजनांमुळे आरोग्य शिक्षणासारख्या मुलभूत समस्यासाठी निधी कमी पडत आहे, असा दावा वडपल्लीवार यांनी केला आहे. राज्यावर साडेसात कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे, असं असताना लाडकी बहीण, बळीराजा योजना यासारख्या मोफत सवलत योजना राबवत आहेत. त्यामुळेच या योजना बंद करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

70 हजार कोटी खर्च

‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत’, ‘अन्नपूर्णा योजना’, ‘शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना’, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, ‘अहिल्यादेवी स्टार्टअप योजने’सह सर्व योजनांवर दरवर्षी 70 हजार कोटी खर्च होणार असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

याचिकेमध्ये नवी महिती

याच प्रकरणामध्ये मागील सुनावणीत फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदीसह आवश्यक माहिती रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर नवीन माहितीचा समावेश करत याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी न्यायालयाने मंजूर केल्याने सुधारित याचिकेवर हे उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विरोधकांकडून सातत्याने टीका

विरोधकांकडूनही लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी मतांसाठी मोफत योजनांचं राजकारण करत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्यातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांच्या मतांवर डोळा ठेऊन राबवली जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर अनेक योजनांची घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेमधील तीन हफ्ते अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र या मोफत योजनांचा राज्याच्या तिजोरीवर भार पडत असून अनेक योजनांचा पैसा या मोफत योजनांसाठी वळवण्यात आल्याचा विरोधकांचाही आरोप आहे. 





Source link

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक


Maharashtra Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Swatantrya Veer Savarkar) कौतुक केलंय. आपल्या राजकीय आणि सामाजिक अनुभवांच्या आठवणींवर आधारीत ‘फाईव्ह इन डिकेड्स पॉलिटिक्स’ हे आत्मचरित्र सुशीलकुमार शिंदेंनी लिहिलंय. त्यात राजकारणातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय.. याच पुस्तकार सुशीलकुमार शिंदेंनी सावरकरांवर स्तुतीसुमनांची उधळण केली आहे.

काय लिहिलंय पुस्तकात?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माझ्या मनात उच्च कोटीचा आदर आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर असल्यानेच 1983 ला नागपुरात सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलो. सावरकर यांच्याबद्दल माझी काही स्पष्ट मते आहेत. मी स्वत: मागासवर्गीय समाजातून येत असल्याने सावरकर यांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी केलेले प्रयत्न मला चांगले माहिती आहेत. ते प्रयत्न माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत.

सावरकरांबद्दल बोलताना या मुद्द्याकडे लक्ष न देता हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो? सावरकरांबद्दल बोलताना त्यांच्या विज्ञानवादी विचारावर आपण का बोलत नाही? दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकरांनी आयुष्यभर काम केले. सावरकरांबद्दल संकुचित विचार हे काँग्रेस समोरचे आव्हान आहे. काँग्रेस पक्षात जवळपास 50 वर्षे काम केल्यानंतर मला असे वाटते की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे’ असं सुशीलकुमार शिंदेंनी या पुस्तकात म्हटलंय.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी सतत सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा केलाय. काँग्रेसची सावरकरांबद्दल विरोधाची स्पष्ट भूमिका असताना सुशीलकुमार शिंदेंनी स्तुतीसुमनं उधळल्याने काँग्रेस पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे.

सावरकर आणि वाद

– अंदमान-निकोबारला असताना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याकडून सावरकरांची नेमप्लेट हटवण्याचे निर्देश

– बाळासाहेब ठाकरेंकडून मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन

– माफीवीर तसंच पेन्शनवीर म्हणत राहुल गांधींची सावरकरांवर वारंवार टीका

– 26 मार्च 2023 च्या मालेगावच्या उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींना सुनावलं होतं

– काँग्रेस-शिवसेना आघाडीनंतर सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी झालेली पाहायला मिळाली होती.

सावरकरांवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये नेहमीच संघर्ष राहिलाय. भाजप आणि काँग्रेसमध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरुन टोकाचं राजकारण रंगतं. आताही निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात पुन्हा सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद पेटताना दिसणार आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक केल्याने काँग्रेसची कोंडी झाल्याचं दिसतंय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp