by Hansraj Agrawal | Aug 30, 2024 | Trending News
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : कोकणातील मालवण भागामध्ये असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आणि येकच खळबळ माजली. पुताळ कोसळण्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशाचं लक्ष वेधणाऱ्या राजकोट किल्ल्याकडे नेतेमंडळींचे पाय वळले आणि त्यातूनच टोकाचा संघर्षही डोकं वर काढताना दिसला.
संघर्ष विकोपाला गेला असतानाच ही ठिणगी अद्याप धुमसत असल्याची स्थिती कायम आहे. त्यातच आता राजकीय आरोप प्रत्योरापंना सुरुवात झाली असून, सत्ताधाऱ्यांनी आता याच ठिकाणी शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठीच्या कामाला वेग दिला आहे. राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याविषयीची महत्त्वाची माहिती दर दिवशी समोर येत असतानाच आता निलेश राणे यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट करत ठाकरे पक्षाच्या एका आमदाराचं नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले आणि नव्या राजकीय वादानं डोकं वर काढलं.
निलेश राणेंनी पोस्टमध्ये म्हटलं…
‘आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो???
जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.’
वैभव नाईक यांचं नाव घेत निलेश राणे यांनी केलेली ही पोस्ट पाहता आता यावर ठाकरे पक्ष आणि खुद्द नाईक काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आपली पोलीस आणि गृखात्याकडून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया नाईकांनी दिली होती. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत दडपशाहीचं राजकारण सुरूच राहील असं सांगताना त्यांनी पुतळा उभारणी आणि अनावरण सोहळ्यादरम्यानच्या काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप केले होते.
दरम्यान एकिकडे राजकीय हेवेदावे सुरू असतानाच दुसरीकडे सदर प्रकरणी कारवाईला वेग आला असून, शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असणाऱ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही अटकेची कारवाई केली.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 29, 2024 | Trending News
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव एका कार्यक्रमात चांगलेच चिडलेले पाहायला मिळालं. चिपळूणमध्ये 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा पारा चढला. भास्कर जाधव या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचले होते. मात्र पालकमंत्री उदय सामंत आणि शासकीय अधिकाऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे भास्कर जाधव चांगलेच चिडले आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर शासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं. तुमच्या नोकऱ्या नाही घालवल्या तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार अशी धमकीच त्यांनी दिली.
संतापलेल्या भास्कर जाधवांनी शासकीय कर्मचाऱ्यांना सुनावताना म्हटलं की, “काय प्रांत, काय चाललाय तुमचा कारभार? ही पद्दत आहे का? झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला दीड दीड तास उशिरा येता. राष्ट्राचा काही अभिमान आहे की नाही? तुमचा सरकारी कार्यक्रम आहे की पक्षाचा कार्यक्रम आहे?. तुमची जबाबदारी आहे की नाही? दाखवतोच तुम्हाला माझी ताकद काय आहे ती, अधिकाऱ्यांना घरी नाही पाठवलं तर माझं नाव भास्कर जाधव नाही”.
यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत आम्ही तुमची वाट पाहत बसलोय आणि तुम्ही कार्यक्रम सुरु करता असं म्हटलं. त्यावर उदय सामंत यांनी कार्यक्रम अजून सुरु केला नसल्याचं म्हटलं. दरम्यान कार्यक्रमातील भाषणात उदय सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली.
भास्कर जाधवांचा इशारा
“प्रत्येकवेळी 12, 18 किंवा 24 तासाची नोटीस मिळते आणि कार्यक्रमाला हजर राहायचं. पालकमंत्री महोदय किमान काही कार्यक्रम अपवाद करा. आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. अधिकाऱ्यांवर चिडण्याचं कारणही तेच आहे. ते बिचारे रात्री येतात आणि साहेब आता कार्यक्रम आला अशी गयावया करतात. पण मी जिल्हाधिकाऱ्यांना अधिवेशनात खेचणार. संविधानाने आम्हालाही काही अधिकार दिले आहेत. हक्कभंग प्रस्ताव मला मांडावा लागेल,” असा इशारा भास्कर जाधव यांनी भाषणात दिला.
दरम्यान उदय सामंत यांनी पालकमंत्री नात्याने दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, “मी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारतो. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून मी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण जर 5 दिवसांपूर्वी जर कार्यक्रम आला आहे, तर तेव्हाच लोकप्रतिनिधींना सांगणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांकडून भविष्यात याबाबत सुधारणा झाली पाहिजे ही माझी सूचना आहे”.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 28, 2024 | Trending News
गुंड गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 28, 2024 | Trending News
Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 27, 2024 | Trending News
Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचे चित्र आहेत..
Source link
by Hansraj Agrawal | Aug 27, 2024 | Trending News
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केलं आहे. वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची आणि महायुती सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे असं विचारण्यात आलं असता दीपक केसरकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे. त्याच पद्धतीने ते घेतलं पाहिजे. कदाचित वाईटातून काही चांगल घडायचं असेल म्हणूनही हा अपघात झाला असेल. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्यानुसार पुढील कारवाईही केली जाईल”.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं ‘ते’ जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते ‘समुद्रात महाराजांचा…’
“नौदलाने उभारलेला पुतळा अपघातग्रस्त झाला याचं दुःख आहे. अरबी समुद्रातील पुतळा उभारणीचं काम काही तांत्रिक गोष्टींमुळे थांबलं, त्यामुळे इथे हा पुतळा उभारला गेला. नौदलाला विश्वासात घेऊन पुन्हा या ठिकाणी स्मारक उभारलं गेलं तर ते चांगलं असेल. याबाबत मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. या ठिकाणी आता 100 फुटी पुतळा असावा,” असंही केसरकर म्हणाले आहेत.
आता 100 फुटी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जशा व्यवस्था आहेत तशी येथेही झाल्यास चांगलं होईल. बोलणारे काम करत नाहीत आणि काम करणारे बोलत नाहीत. 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलावता येईल. तो राष्ट्राचा सन्मान असेल असंही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, “स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर हा पुतळा पुन्हा महाराष्ट्र शासन उभा करू शकतो. भव्य असं स्मारक उभारताना परिसराचा विकास करू. हा अपघात आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल. संपूर्ण परिसराचा विकास करणे आणि पुतळा उभा करणे ही खरी आदरांजली असेल”.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो. हा पुतळा नौदलाकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नौदलाने तयार केलं होतं,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू”.
Source link