शिंदेच्या शिवसेनेला डावललं जातंय का ? गुलाबराव पाटील यांचं 'ते' विधान चर्चेत

शिंदेच्या शिवसेनेला डावललं जातंय का ? गुलाबराव पाटील यांचं 'ते' विधान चर्चेत


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

महाराष्ट्रात खळबळ! काँग्रेस नेत्याचं दिवसाढवळ्या अपहरण, CCTV त लाईव्ह कैद झालं किडनॅपिंग

महाराष्ट्रात खळबळ! काँग्रेस नेत्याचं दिवसाढवळ्या अपहरण, CCTV त लाईव्ह कैद झालं किडनॅपिंग



Congress Leader Kidnapped: मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या काँग्रेस नेत्याचं अपहरण करण्यात आल्यानंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. 
 



Source link

Miss You वाल्मिक म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना घरचा आहेर, 'एवढीच आठवण येत असेल तर… '

Miss You वाल्मिक म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना घरचा आहेर, 'एवढीच आठवण येत असेल तर… '


NCP MLA Prakash Solanke Remark : सोमवारी परळीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली. ही आठवण जाहीरपणे असल्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे आहे ते सगळ्यांना कळलं. या प्रकरणावर धनंजय मुंडे यांना घरचा आहेर मिळाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आमदार प्रकाश सोळंकी यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्या या विधानावरुन घरचा आहेर दिला आहे. फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्हा आणि खंत दूर करा, असं म्हणत प्रकाश सोळंकी यांनी घरचा आहेर लगावला आहे. 

काय म्हणाले प्रकाश सोळंकी 

आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते त्यावर आता माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांना टोला लगावला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबत हे वक्तव्य केलं असावं तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे त्याबाबतच्या या वक्तव्यावरून आता बीडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

(हे पण वाचा – ‘आपली व्यक्ती आज इथे नाही…’, म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख) 

अंबादास दानवे काय म्हणाले?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मीक कराड जेल मध्ये आहे. याचा अर्थ धनंजय मुंडेने प्रूफ केलं वाल्मीकराड धनंजय मुंडे एकच आहे. धनंजय मुंडे यांच्या सपोर्टमुळे वाल्मीक कराड यांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली होती. वारंवार त्या भागातल्या जनतेने याबाबत तक्रार केली होती. देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या पाठिंबांमुळे सर्व गोष्टी घडल्या आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असं देखील अंबादास दानवे यावेळी म्हणाले. 

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

परळीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज परळी मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी बोलत असताना भाषणाच्या शेवटी म्हटले की आज परळीतील जगमित्र कार्यालय गेल्या नऊ ते सहा महिन्यापासून आजही सर्वसामान्य जनतेसाठी खुल आहे मात्र आज या मंचावर मला एका व्यक्ती नसल्याची जाणीव भासत आहे ती व्यक्ती आज आपल्यात नाही जे काहीअसेल नसेल ते न्यायालय पाहील काय व्हायचे ते होईल मात्र त्या व्यक्तीची आज जाणीव भासत आहे असं धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली.





Source link

सगळ्याचं पक्षांचं भवितव्य दावणीला… धाकधूक वाढली! कोणत्याही क्षणी 'तो' निर्णय; निवडणूक आयोगही सज्ज

सगळ्याचं पक्षांचं भवितव्य दावणीला… धाकधूक वाढली! कोणत्याही क्षणी 'तो' निर्णय; निवडणूक आयोगही सज्ज


Maharashtra Local Body Election Supreme Court Decision: स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात घेतला जाणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) सरसकट 27 टक्के आरक्षण लागू केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ही 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, दोन महानगरपालिका आणि 57 नगरपालिका- नगर पंचायती अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून, आज होणाऱ्या सुनावणीच्या वेळी निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. आधीच कोर्टाने निवडणुका पुढे का ढकलत नाहीत असा सवाल 19 तारखेला झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला विचारलेला. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने सध्या प्रचार सुरु असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांबरोबरच जिल्हापरिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाही अधिक लांबणीवर पडू शकतात. स्थगित करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यास सारं काही अगदी नोटीफिकेशन काढण्यापासून पुन्हा सुरु करावं लागेल. 

Add Zee News as a Preferred Source

खंडपीठाने नापसंती व्यक्त केली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) सरसकट 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन न्यायमूर्ती आणि कालच सरन्यायाधीशपदाची शपथ घेतलेले सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नापसंती व्यक्त केली होती. आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज यावर सुनावणी होणार आहे.

निवडणुकांचे भवितव्य काय?

सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या सुनावण्यांदरम्यान आरक्षणाच्या मर्यादेवरून संतप्त भावना व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर यातून मार्ग कसा काढता येईल, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याचे समजते. आजच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने कोणती भूमिका घ्यायची यावर खल झाला. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांना कदाचित स्थगिती दिली जाऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे आजच्या निकालावर केवळ शिवसेना किंवा भाजपाच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य अवलंबून आहे. कारण निवडणुका पुढे गेल्यास सर्वांना परत नव्याने तयारी आणि नियोजन करावं लागणार आहे.

खंडपीठाने काय विचारलं?

याप्रकरणी राहुल रमेश वाघ आणि किसनराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर ‘आम्ही या मुद्द्यावर विचार करेपर्यंत तुम्ही नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करू शकत नाही?’ असा सवाल खंडपीठाने केला. आरक्षणास विरोध करणाऱ्या पक्षांच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रिया सुरू राहिल्यास ती मागे घेता येणार नाही, असे निदर्शनास आणले.

निवडणूक आयोगाला निर्णयाची प्रतीक्षा

आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही. तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अजून नेमणूक झालेली नाही. याबाबत महसूल विभागाकडून अहवाल अप्राप्त आहे. नियुक्त झालेले निवडणूक निर्णय अधिकारी हजर झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

राजकारण ढवळून निघणार

काही तज्ज्ञांच्या मते या प्रकरणामध्ये सरकारला अपेक्षित असलेल्या निर्णयापेक्षा वेगळा निर्णय लागला तर जाहीर झालेल्या निवडणुकाही रद्द करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. असं झालं तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण पुन्हा ढवळून निघाल्याचं पाहायला मिळेल.

कोणत्या ठिकाणी किती आरक्षण?

आदिवासीबहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण 100 टक्के झाले आहे. पालघरमध्ये 93 टक्के, गडचिरोली 78 टक्के, धुळे 73 टक्के, नाशिक 72 टक्के आरक्षण लागू झाले आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा परिषदांमध्ये 60 ते 70 टक्केदरम्यान आरक्षण लागू झाले आले आहे. नागपूर, ठाणे, वाशीम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या आठ जिल्हा परिषदांमध्ये 51 ते 60 टक्केदरम्यान आरक्षण देण्यात आले आहे.





Source link

'आपली व्यक्ती आज इथे नाही…', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख

'आपली व्यक्ती आज इथे नाही…', म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख


परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होता. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या 10 महिन्यांपासून एक माणूस इथे नाही. जगमित्र कार्यालय तरीही सुरु आहे. नाव न घेता धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण नाव न घेता उल्लेख केला. 

धनंजय मुंडे काय म्हणाले? 

मला माझ्या सहकाऱ्याची आज आठवण येतेय. परळीतले जगमित्र कार्यालय 12 महिने 24 तास सुरू होते आणि आहे. पण तिथे एक व्यक्ती नाही. त्या कार्यालयातून अडल्या नडलेल्यांना गोरगरिबांना आपण मदत करायचो. पण या सगळ्यात एक सहकारी आपल्यात नाही आहे, याची मला जाणीव आहे. कुणाचे काय चुकले, काय नाही हे न्यायदेवता तपासून पाहील, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळीच्या प्रचारसभेत वाल्मिक कराड याची आठवण काढून शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वाल्मिक अण्णा समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला..या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड काही महिन्यांपासून जेलमध्ये आहे. वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचे निकटवर्तीय असलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती.  या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचंही नाव जोडलं गेलं होतं आणि यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राजकारणाच्या मुख्यप्रवाहातून काहीसे बाजुला फेकल्यासारखी धनंजय मुंडेंची अवस्था झाली मात्र एवढं सगळं होऊनही मुंडे अद्यापही धनंजय मुंडे यांना आरोपी वाल्मिक कराडची आठवण येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. 10 महिन्यापासून आपला एक व्यक्ती आपल्यासोबत नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिकची आठवण काढली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी वाल्मिकची आठवण काढली आहे.

धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या काढलेल्या आठवणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलीय. तर अजित पवारांचे आतातरी डोळे उघडावेत आणि धनंजय मुंडेंना पाठिशी घालणं बंद करावं असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

राक्षसी प्रवृत्तीच्या वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केली..अशा व्यक्तीबद्दल कोणतीही भावना असणाऱ्या माणसाला माणूस म्हणता येणार नसल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. अशा नेत्यांना निवडून न देण्याचा आवाहनही दमानिया यांनी परळीच्या जनतेला केलं आहे. 

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हिडिओ जेव्हा समोर आले होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. एवढ्या क्रूरपणे देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या सगळ्याचा मुख्यसुत्रधार वाल्मिक कराड जेलची हवा खातोय. यामुळे टीकेचे धनी ठरलेले आणि मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अद्याप वाल्मिकच्या प्रेमातून बाहेर पडल्याचं दिसत नाही.. त्यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठलीय. वाल्मिकची आठवण काढणाऱ्या धनंजय मुंडेंना धनंजट मुंड़ेंच्या लेकरांचा तो केविलवाणा चेहरा आठवला नसेल का हा प्रश्न निर्माण होतो आहे. 





Source link

खारघर, कळंबोली, तळोजा, घणसोली परिसरात स्वत:च्या आवडीचा फ्लॅट निवडा… सिडकोची 4508 घरांसाठी जबरदस्त लॉटरी योजना

खारघर, कळंबोली, तळोजा, घणसोली परिसरात स्वत:च्या आवडीचा फ्लॅट निवडा… सिडकोची 4508 घरांसाठी जबरदस्त लॉटरी योजना


Navi Mumbai Cidco Lottery 2025 : सिडकोच्या इतिहासात प्रथमच “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” तत्त्वावर 4,508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे.  22 नोव्हेंबर 2025 पासून या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“सिडकोच्या सोयी सुविधांनी सुसज्ज गृहसंकुलांतील 4,508 सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना आहे. यामुळे त्यांना शब्दश: आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मी करतो असं सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले.

सिडकोतर्फे सातत्याने विविध आर्थिक उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजनांद्वारे परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित 4,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण 4,508 सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1,115 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 3,393 सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. 2.50 लाख अनुदान उपलब्ध आहे. 

सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे. 

या योजनेतील सर्व गृहसंकुले ही नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आहेत. या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीच्या अंतरावर असलेल्या या गृहसंकुलांना उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.  ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचा सविस्तर तपशील जसे, सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इ. देखील सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 04.00 वाजेपासून सुरू होणार आहे. दि. 21 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार असल्याने अर्जदारांनी उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp