'विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्याच्या' विधानावरुन गदारोळ असतानाच ओवेसींची अमित देशमुखांवर सणसणीत टीका, 'मोठ्या बापाचा…'

'विलासरावांच्या आठवणी पुसून टाकण्याच्या' विधानावरुन गदारोळ असतानाच ओवेसींची अमित देशमुखांवर सणसणीत टीका, 'मोठ्या बापाचा…'


Asaduddin Owaisi targets Amit Deshmukh: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमित देशमुखांनी वारशावरुन अमित देशमुखांवर निशाणा साधला आहे. मी वारसा नाही, काम सांगतो म्हणत ओवेसींनी अमित देशमुखांना जाहीर आव्हानच दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“मीदेखील मोठ्या बापाचा मुलगा आहे, माझे वडील सहा वेळा आमदार होते. पण मी त्यांचा वारसा सांगत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे जनतेसमोर मांडतो,” असा हल्लाबोल एमआयएमचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्यावर केला आहे.

“लातूर शहरातील मूलभूत समस्या आजही जैसे थे असल्याने, केवळ वारसा सांगून राजकारण करण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. मोठमोठ्या राजांचे महाल ओसाड पडले, मग तुम्ही कोणता वारसा सांगता?,” असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे. 

रवींद्र चव्हाणांनी काय म्हटलं आहे?

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच तापू लागला आहे. प्रचाराच्या धामधुमीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील असं वक्तव्य चव्हाण यांनी केल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

वादानंतर व्यक्त केली दिलगिरी

मी विलासरावांवर टीका टिप्पणी केली नाही. ते मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. विलासरावांवर लक्ष्य केंद्रीत करुन काँग्रेस तिथं मत मागत आहे, म्हणून आम्ही मोदींचे काम पाहा म्हटले. तरीसुद्धा त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. राजकीय दृष्टीने पाहू नका असं नंतर त्यांनी म्हटलं .

देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, “रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, स्पष्टीकरण ही दिले आहे. विलासराव यांच्याबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे, त्यांच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत. कुणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही त्यांनी  केलं आहे”.

जयंत पाटलांकडून वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला. स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

जयंत पाटील म्हटले की, कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा गांधींचीही हत्या केली गेली पण गांधींचा विचार आजही जिवंत आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान पुसले जाऊ शकत नाही.





Source link

काही तासांचा गारठा, पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा; महाराष्ट्रात 24 तासांत हवामानात असंख्य बदल! उत्तरेकडे 7 दिवस…

काही तासांचा गारठा, पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा; महाराष्ट्रात 24 तासांत हवामानात असंख्य बदल! उत्तरेकडे 7 दिवस…


Maharashtra Weather News : तापमानाचा आकडा प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 6 अंशांवर पोहोचलेला असतानाच आता मात्र याच तापमानात वाढ होत असून महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आणि रात्री अतिशय उशिरा जाणवणारा गारठा वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी सूर्य डोक्यावर येताच कमाल तापमानाचा सरासरी आकडा 30 अंशांच्या घरात पोहोचत आहे. तर, काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं पावसाची हजेरी असण्याची शक्यता वाढवून जात आहे. ज्यामुळं पुढच्या 24 तासांमध्ये हवामानात हे अतिशय अनपेक्षित, बदल दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

का निर्माण झाली आहे हवामानाची ही स्थिती? 

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका सातत्यानं वाढत आहे, तर दक्षिणेकडे मात्र पावसासाठी पूरक स्थिती असल्यानं त्याचे थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानात दिसत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये हवामान विभागानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम प्रामुख्यानं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर होईल असं सांगण्यात येत आहे. तर, राज्यात घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये दाट धुक्याची चादर विरळ होण्यासाठी तुलनेनं अधिक वेळ घेईल, ज्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होताना दिसणार आहे. 

विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, अमरावती, गोंदिया तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव इथं पुढील दोन दिवसांत 2 ते 3 अंशांची तापमान घट अपेक्षित असून, दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये मात्र पावसाची हजेरी दिसून येईल. लक्षद्वीपर आणि मालदीवमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या कृतीस कारणीभूत असेल. 

एकाएकी कुठून आला पावसाचा इशारा? 

चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळं अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम कोकण, सिंधुदुर्गापासून सांगलीपर्यंत होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं इथं वातावरण ढगाळ असेल, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ढगांचा लपंडाव पाहायला मिळेल. 

हिमालय क्षेत्रात वाढणार हिमवर्षाव… 

पश्चिमी हिमालय क्षेत्रांमध्ये बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. जम्मूपासून शिमल्यापर्यंत आणि पंजाबसह हरियाणा, राजस्थानच्या काही भागांर्यंत दाट धुकं पाहायला मिळेल. पर्वतीय भागांमध्ये दरम्यानच्या काळात हिमवर्षाव वाढणार असून, पुढील 7 दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय घट होऊ शकते. पाऊस आणि हिमवर्षावामुळं या भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. 





Source link

ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून बीडच्या रीलस्टारचा मृत्यू; पत्नी Facebook लाईव्ह करत असतानाच डोळ्यांमोर गेला जीव

ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून बीडच्या रीलस्टारचा मृत्यू; पत्नी Facebook लाईव्ह करत असतानाच डोळ्यांमोर गेला जीव


Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

…Read More





Source link

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 43 KM लांब वाहनांच्या रांगा; भयानक ट्राफिक जाममध्ये हजारो वाहने अडकली

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 43 KM लांब वाहनांच्या रांगा; भयानक ट्राफिक जाममध्ये हजारो वाहने अडकली



मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कोंडी पहायला मिळाली. 43 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 



Source link

राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनात दाखल; असं वाटतंय की मी… राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनात दाखल; असं वाटतंय की मी… राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर,मनपाच्या शिक्षण विभागाचा विचित्र निर्णय

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर,मनपाच्या शिक्षण विभागाचा विचित्र निर्णय


Stray Dogs: अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी शिक्षकांना मुख्य जबाबदार (नोडल अधिकारी) नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार, प्रत्येक शाळेत एका शिक्षकाचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या फलकावर लावावे, असे सांगण्यात आले आहे. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे दिल्याचे सांगितले जात आहे, पण त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Add Zee News as a Preferred Source

निर्णयामुळे खळबळ

हा आदेश समोर आल्यानंतर अमरावतीसह आसपासच्या भागात सर्वत्र चर्चा आणि संताप व्यक्त होतोय. शिक्षकांना शिकवण्याऐवजी कुत्र्यांची काळजी घेण्याची जबाबदारी देणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. या निर्णयाला शिक्षक संघटना, पालक आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे, कारण यामुळे शिक्षकांचे मुख्य काम म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे, दुय्यम होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बच्चू कडूंचा आक्रमक पावित्रा

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना फटकारले आहे. हा आदेश लगेच रद्द करावा, अन्यथा शिक्षणमंत्र्यांच्या घरी भटकी कुत्री सोडून देऊ, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे हा विषय अधिकच चिघळला असून, सरकारवर दबाव वाढला आहे.

यशोमती ठाकूरांकडून टीका 

काँग्रेस नेत्यांनी यशोमती ठाकूर यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे. पूर्णवेळ शिक्षकांना कुत्र्यांची देखरेख करण्यास सांगणे आणि विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडणे, हेच सरकारचे शिक्षण धोरण आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिक्षकांचा वेळ आणि ऊर्जा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरली जावी, कुत्र्यांच्या व्यवस्थेसाठी नव्हे, असे त्यांचे मत आहे.

प्रहार आणि काँग्रेसकडूनही विरोध

प्रहार जनशक्ती पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. त्यांनी सरकारला आव्हान दिले असून, हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांच्या या एकजुटीमुळे अमरावतीत राजकीय वातावरण तापले आहे आणि सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे.

राजकारण तापले

या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती शहरात राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलने आणि इशारे दिले आहेत. शिक्षक आणि पालकांच्या रोषामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, हा वादग्रस्त आदेश लवकरच मागे घेतला जाईल, अशी चर्चा आहे. आता सर्वांच्या नजरा या निर्णयाच्या भवितव्याकडे लागल्या आहेत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp