महाराष्ट्रातील प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 14 जण ठार

महाराष्ट्रातील प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 14 जण ठार



Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. या दुर्घटनेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 
 



Source link

इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?

इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?



Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय



Source link

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना…'

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना…'


Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात, पात, धर्म बाजूला ठेवून यात सहभागी व्हावं. जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय? असा संताप त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमधील आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप केला असून, उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. 

“महाराष्ट्र एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन करोनाविरोधात लढला होता. तशीच वेळ आली आहे. या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व बांधवांना, माता भगिनींना मी आवाहन करत आहे. प्रत्येकाच्या मनात आपण नेमकं कसं जगत आहोत याची खंत आहे. शाळेतही मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली याला अर्थ काय. संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे. राजकारण नव्हे तर माता, भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत ही भावना सर्व राजकीय पक्षांची असली पाहिजे. यानंतर पुढील राजकारण येतं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.   उद्धव ठाकरेंनी यावेळी वृत्तपत्रांमध्ये महिला अत्याचारासंबंधी छापून आलेल्या काही बातम्या वाचून दाखवल्या.  

पुढे ते म्हणाले की, “गेल्या आठवड्यात बंगालमध्ये असंच कृत्य घडलं यानंतर देशभरात निषेध झाला. निर्भयानंतरही देश खडबडून जागा झाला होता. अशीच ही एक घटना आहे. जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा उद्रेक होतो. तो क्षण जवळ येत चालला आहे”. 

‘या बंदमध्ये राजकारण नाही. हा विकृतीचा व्हायरस आहे. कोणीही असं कृत्य करण्याची हिंमत व्हायला नको. जर कोणी केली तर त्याला ताबडतोब कठोर शिक्षा होते ही भीती विकृतांच्या मनात निर्माण कऱण्यासाठी हा बंद करत आहोत. सुरक्षित बहिण ही प्राथमिकता असली पाहिजे. जर बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात. 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात, पात धर्म बाजूला ठेवावे. जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय?”, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

“कडेवरच्या मुलांवर अत्याचार झाल्यानंतर ते घाबरुन शांत बसतात. जर अत्याचार उघड झाल्यावर पोलीस शांत बसणार असतील तर जनचेने करायचं काय? हे परवापासून जे घडत आहे तो जनतेचा उद्रेक आहे. त्याला वाचा फो़डण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद करत आहोत. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरुक आहोत हे दाखवण्यासाठी आहे. सर्वांनी हा बंद पाळला पाहिजे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 

एकनाथ शिंदे यांनी आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप केला आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “निवडणूक डोळ्यामसोर ठेवून राबवलेली ही योजना नव्हती. ठाणे जिल्ह्यात बदलापूर येतं. ही घटना त्यांना मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करत आहेत? काल मुख्यमंत्री कुठे होते. राज्यभर निषेध होताना रत्नागिरीत लाडक्या बहिणीसाठी हात पसरुन राखी बांधून घेत होते. राखीच्या बंधनाला तरी जागा, किती निर्लज्ज व्हायचं. मुख्यमंत्र्यांनी तसं वाटणं स्वाभाविक आहे. कारण ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अकलेचा दिवाळखोपरणाबद्दल मी बोलणार नाही”.





Source link

कोल्हापूरचं 'पोलंड कनेक्शन', मोदींच्या दौऱ्यामुळे इतिहासाला उजाळा

कोल्हापूरचं 'पोलंड कनेक्शन', मोदींच्या दौऱ्यामुळे इतिहासाला उजाळा



दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेघर झालेल्या पोलंडच्या हजारो नागरिकांना कोल्हापूरनं आश्रय दिला. त्याची आठवण म्हणून पोलंडमध्ये उभारण्यात आलेल्या खास स्मृतीस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.. यासाठी मोदी पोलंडमध्ये दाखल झाले आहेत.  



Source link

पोलिसांचीच घरे असुरक्षित; माहिम येथे एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा, चोरीची घटना CCTVत कैद

पोलिसांचीच घरे असुरक्षित; माहिम येथे एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात दरोडा, चोरीची घटना CCTVत कैद


Mumbai Police News: मुंबईतील माहीम पोलीस कॉलनीत एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचं समोर आलं आहे. चोरट्याने थेट पोलिसांच्याच घरात डल्ला टाकण्याचे धाडस केल्याने हा प्रकार सध्या चर्चेत आहे. या घटनेने परिसरातही एकच खळबळ उडाली आहे. तसंच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतदेखील कैद झाली आहे. पोलिसांच्याच घरात दरोडे पडत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडणारा चौर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मध्यरात्री दबक्या पावलाने पोलिस वसाहतीत येत पोलिसांची घरं बंद असल्याची खात्री करुन घरफोडी करण्यात आली आहे. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. पोलिस कॉलनीतच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांच्या घरासहं प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयालादेखील चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केलं गेलं आहे. माहिम पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. 

चोरीची ही घटना 16 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान घडली आहे. यावेळी 13 पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये चोरी झाली आहे. ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कोणीही अधिकारी नव्हते. घर बंद असल्याची खात्री करुनच चोरट्यांनी डाव साधला आहे. पोलिस या परासरातील सीसीटीव्हीची तपासणी करत असून चोरांचा शोध घेतला जात आहे. 

पोलिस जनतेची रक्षा करत असतात अशावेळी पोलिसांची घरेच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची घरे किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उभा राहत आहे. 17 तारखेच्या मध्यरात्रीनंतरची ही घटना आहे. पोलिसांच्या एका सीसीटिव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या चोराचा शोध घेण्यात येत आहे. एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  





Source link

पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी



 Maharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.  



Source link

YouTube
Instagram
WhatsApp