Kolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'

Kolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'


Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सु-मोटो याचिकेवर सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून महिलांवरील अत्याचाराची ठराविक प्रकरणेच प्रकाशझोतात येतात असं म्हणत भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टी कोलकात्यामधील महिला डॉक्टरवरील बालत्कार आणि हत्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. विशेष म्हणजे ही टीका करताना महाराष्ट्रामधील विद्यमान मंत्री संजय राठोड यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने खोचक टीका केली आहे.

यंत्रणांना जाग आल्याबद्दल आभार पण…

कोलकात्यामधील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर यंत्रणांना जाग आल्याचा उल्लेख करत ठाकरे गटाने, “केंद्र सरकार, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि चिंता व्यक्त केली याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. हे सर्व प्रकरण पश्चिम बंगालात घडल्याने केंद्राला त्यात इतका रस निर्माण झाला आहे काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी सरकारने या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई केल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

ममता सरकारने केलेल्या कारवाईचं कौतुक

“ममता बॅनर्जी यांच्या सरकारने कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास केला. कोलकाता पोलिसांनी पळून गेलेल्या मुख्य आरोपीस अटक करण्यासाठी खास पथके नेमली. त्यांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. आता त्याला फासावर लटकवून न्याय केला जाईल. याला कायदा आणि सुव्यवस्थेची बूज राखणे म्हणतात, पण आपल्याकडे बलात्कारासारख्या घटनांचेही राजकारण होते,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच, “महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येने फक्त कोलकाताच नव्हे, तर देश हादरला, पण या घटनेचे राजकीय भांडवल ‘भाजप’ करीत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. “ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत,” असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.

संजय राठोड यांचा उल्लेख

महिलांवरील अत्याचारांचा संदर्भ देताना भाजपावर निशाणा साधत ठाकरे गटाने थेट संजय राठोड यांचा उल्लेख केला आहे. “महाराष्ट्रातील एक मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण अतिगंभीर आहे. पीडित पूजा चव्हाणने तर आत्महत्याच केली व त्याबद्दल भाजपच्या महिला मंडळाने त्या वेळी आंदोलने केली होती. आज हे महाशय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात व भाजपचे महिला मंडळ या मंत्र्यांची ओवाळणी करत आहे. याप्रकरणीही ना सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली ना तुमच्या त्या सीबीआयने, पण कोलकात्याच्या घटनेने या सगळ्याच संस्था छाती पिटत आहेत. या ढोंगबाजीस काय म्हणावे?” असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.





Source link

'आम्हाला पोर्शे कार परत हवी,' अग्रवाल कुटुंबाने केला अर्ज, बाल न्याय मंडळ म्हणालं…

'आम्हाला पोर्शे कार परत हवी,' अग्रवाल कुटुंबाने केला अर्ज, बाल न्याय मंडळ म्हणालं…


Pune Porsche Car Acident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी कारने दुचाकीला उडवलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घातल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून अर्ज करण्यात आला आहे. बाल न्याय मंडळात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जावर 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. 28 ऑगस्टला याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टाने पोलिसांना यावर 28 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडा असा आदेश दिला होता. पण अद्याप पोलिसांनी यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. 

जामीन अर्जावर उद्या निकाल

या अपघाताप्रकरणी आरोपी मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे, आपातकालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनोकर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण येरवडा कारागृहात असून जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. 20 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. 

नेमकी घटना काय?

19 मे रोजी. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श या कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी त्याला रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या अपघातावेळी हा अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. परंतु फक्त 15 तासात त्याला जमीन मंजूर करण्यात आला. जामिनसाठी घातलेल्या अटींमध्ये 300 शब्दांचा निबंधही होती. यावरुन अनेकांनी नाराजी जाहीर केली होती. 

मृतकाच्या मित्राने एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतल्यानं ही घटना पहिल्यांदा समोर आली होती. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा अशी दोघा मृत्यू झालेल्या पीडितांची नावं आहेत. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात जॉब करत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलाला मिळालेल्या जामीनावर आश्चर्य व्यक्त केले होते. 

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीने त्यांना सांगितले की तो दारू पितो हे त्याच्या वडिलांना माहिती आहे. पोलिसांकडे आरोपीचे आणखीन काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामध्ये तो शनिवारी उशिरापर्यंत मित्रांसह मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे.  21 मे रोजी पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला दारू पिऊन पोर्श कार चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली. 





Source link

'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं… ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले

'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं… ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले


महाराष्ट्राचे लोकप्रिय नेता आणि माजी गृहमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील आजही आपल्या चांगुलपणामुळे ओळखले जातात. महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता असलेले आर आर पाटील हे तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आर आर पाटील यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सांभाळले आहे. आर आर पाटील यांचे 16 फेब्रुवारी 2015 रोजी कर्करोगाने निधन झाले. पण आता सोशल मीडियावर आर आर पाटील यांचा एक किस्सा व्हायरल होत आहे. 

हा किस्सा आर आर पाटील यांच्यासोबत काम करणारे गणेश जगताप यांनी सांगितला आहे. हा किस्सा एनसीपीएच्या नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सध्ये एका कार्यक्रमात घडलेला आहे. गणेश जगताप यांनी ‘बोल भिडू’ ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. 

काय आहे हा किस्सा 

एनसीपीएला सर्व राज्याच्या पर्यटन विभागाचा मेळावा भरलेला होता. ज्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स होते. एका संध्याकाळी आर आर पाटील स्टॉल्सला भेट देण्यासाठी आले. तेव्हा युपीच्या स्टॉलला प्रचंड गर्दी होती. बाकीच्या कुठल्या स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती. महाराष्ट्राच्याही स्टॉलवर गर्दी नव्हती. 

गणेश यांनी पुढे सांगितले की, त्यावर आबांनी विचारलं, तिकडे एवढी गर्दी का आहे? तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचे ब्रँड ऍम्बॅसिडर अमिताभ बच्चन आहेत आणि ते त्या ठिकाणी आल्यामुळे गर्दी आहे. त्यावर आर आर पाटील यांनी एकच प्रश्न विचारला की, महाराष्ट्राच्या स्टॉलवर आले होते का? त्यावर अधिकाऱ्यांनी नाही म्हटले. युपीचे ब्रँड ऍम्बॅसिडर आहेत म्हणून तिकडेच गेले. 

पुढे आर आर पाटील निघून गेले. गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले की, अमिताभला फोन लाव. मी म्हणालो की, ते अजून तिथेच असतील. तर आर आर पाटील म्हणाले की, लाव तर खरं. त्यांच्या ऑफिसला फोन लावला आणि निरोप दिला, असं गणेश जगताप म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, त्यानंतर अमिताभ यांचा फोन आला. आणि तीन ते चार मिनिटं आर आर पाटील अमिताभ यांना झापत होते. आर आर पाटील म्हणाले की, या राज्याने एवढं सगळं दिलं, लोकप्रियता दिली, पैसे दिले, काम दिलं, एवढा मानसन्मान दिला. इथं राहून तू मोठा झालास आणि तुला एकदाही असं वाटलं नाही की, आमच्या स्टॉलवर यावं, एवढी तुझी नैतिकता घसरली… अशा शब्दात आर आर पाटील यांनी खडेबोल सुनावले. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी वारंवार माफी मागितली. 





Source link

सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस

सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस


Maharashtra Rain Update :  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तर,  महाबळेश्वर खोऱ्यातही तुफना पर्जन्यवृष्टी झाली आहे. राज्यात अनेक जिह्यात धो धो पाऊस पडला. या पावासामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.  

सांगली शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.मुसळधार पडलेल्या पावसामुळे सांगली शहरातले अनेक रस्ते जलमय झाले होते.अचानकपणे धुंवाधार अशा पावसाने हजेरी लावली आणि सुमारे तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन रोड, शिवाजी मंडई, झुलेलाल चौक, सिव्हिल चौक,मारुती चौक, वखार भाग आदी भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारकांची मोठी तारांबळ उडाली,तर पावसामुळे सांगलीकरांची दाणादाण उडाली.

महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस….

महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस पडला.  पोलादपूर पायटा, कापडे गाव परिसराला पावसाने झोडपले. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.  चार दिवसांच्या विश्रांतीनंतर दक्षिण रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडला. 

संध्याकाळच्या सुमारास महाबळेश्वर घाटात तसेच रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील पायटा , कापडे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.दक्षिण रायगडात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने हजेरी लावली. महाड, माणगाव परिसरात पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या.

साता-यात अचानक मुसळधार पावसाची हजेरी

साता-यात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. गेल्या 10 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. उत्तर पुणे जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झालीये. आंबेगाव तालुक्यातील डोंगर माथ्यावर आणि मंचर शहरी भागात धो धो पाऊस बरसलाय… सुमारे एक तासाच्या धो धो पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालंय…

पुण्यात ऐन संध्याकाळी जोरदार पाऊस बरसला. हडपसर, हांडेवाडीमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचलं. तर घरी परतणा-या पुणेकरांना पावसाचा चांगलाच फटका बसला.  अहमदनगरच्या जामखेड परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली… यामुळे शेतामध्ये पाणी साचले असून शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय… साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी या गावांना जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला. तसंच नदीपलीकडे अडकलेल्या काही लोकांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं… 

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे शेतातील उभ्या धान पिकांना मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 93 टक्के एवढा पाऊस झालाय. जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरलेत.  
लातुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळतोय…जळकोटच्या वांजरवाड्यात शेताचा बांध फुटुन पाणी बाहेर येतंय…तर हडोळती – सावरगाव रस्त्यावरील ओढ्यालाही पूर आलाय…पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने बराच वेळ वाहतूक बंद होती.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp