'अजित पवार खोट्या मिश्या लावून गुप्तहेराप्रमाणे..', 'शिंदे-फडणवीस रात्री बारानंतर..'; राऊतांची 'ऑफर'

'अजित पवार खोट्या मिश्या लावून गुप्तहेराप्रमाणे..', 'शिंदे-फडणवीस रात्री बारानंतर..'; राऊतांची 'ऑफर'


Sanjay Raut On Fadnavis Shinde Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपण वेश बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी सत्तेत सामिल होण्यापूर्वी जवळपास दहा बैठकांसाठी आले होते असा खुलासा केला. या खुलाश्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी नाट्यसृष्टीचं मोठं नुकसान केल्याचा उपहासात्मक टोला लागवला आहे. पत्रकारांंशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही फिरकी घेतली.  

इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप…

अजित पवारांनी वेश बदलून अमित शाहांना भेटायला यायचो असं विधान केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये, “तोंडाला मुखवटे घालून, टोपी घालून भेटायला जायचे. यावरुन यांचं महाराष्ट्रासंदर्भातील कपट किती आधीपासून सुरु होतं, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे,” असं म्हटलं. पुढे बोलताना शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना नाटकामध्ये संधी दिली पाहिजे असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक मोठेमोठे कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, नाना पाटेकर, बालगंधर्व अगदी अलीकडे प्रशांत दामले आपण पाहतो. नाट्यसृष्टीची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे दुर्लक्ष केलं. यांनासुद्धा यापुढे नाटकांमध्ये सहभागी करुन घेत रंगमंच दिला पाहिजे. इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात. इतक्या उत्तम पद्धतीने चेहरे बदलतात. इतक्या उत्तम पद्धतीने राजकारणातील फिरत्या रंगमंचावर काम करतात,” असं राऊत म्हणाले.

या कलाकारांनी मराठी…

“आता पाहा ना अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या पिळदार मिशा लावून दिल्लीत अमित शाहांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईमधल्या दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते. हे लोक बोलत आहे की लोक त्यांना ओळखत नव्हते. म्हणजे किती हुबेहुब मेकअप केला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटांचं मोठं नुकसान केलं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना केली आहे.

नक्की वाचा >> RSS कार्यकर्ता ते राज्यपाल… महाराष्ट्रातील BJP नेत्याला लॉटरी; राजभवनात दिसणार गांधी टोपी

मी कथा लिहून देतो

“आता खोट्या कथा लिहून एकनाथ शिंदे चित्रपट काढत आहेत लोक. मात्र त्यांनी हे जे काही स्वत:वर नाटक रचलं त्यावर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो. मला प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे आतापासून वेश बदलून जात नव्हते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जात होते. हे पृथ्वीराज चव्हाण उत्तमप्रकारे सांगू शकतील,” असं सूचक विधान राऊत यांनी केलं. 





Source link

27 जुलै 2005 रोजी नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवसेना शिंदे गटाचा 'काळा दिवस'

27 जुलै 2005 रोजी नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवसेना शिंदे गटाचा 'काळा दिवस'



शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आज जल्लोषात साजरा झाला… यानिमित्तानं मातोश्रीवर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली… मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शनिवारी चक्क काळा दिवस पाळण्यात आला.. काय कारण? पाहूयात हा रिपोर्ट…



Source link

महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Weather Alert: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. कोकणात पाऊस थोडा ओसरला असला तरी घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं कोल्हापूर-सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं शहरात पुराचे पाणी शिरले आहे. राज्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यासह घाट परिसरात मुसळधार पाऊस बरसू शकतो. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा घाट माथ्यासाठी देण्यात आला आहे. तर, सामान्य स्वरुपाचा पाऊस राज्यातील इतर जिल्ह्यांत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर, साताऱ्याला आजसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईत काय आहे पावसाचा स्थिती?

मुंबईत कालपासून पावसाने उसंत घेतली आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत राहणार आहे. 

या जिल्ह्यांना अलर्ट

रायगड – ऑरेंज
सिंधुदुर्ग – ऑरेंज 
रत्नागिरी – ऑरेंज 
ठाणे – यलो 
मुंबई – यलो 
पुणे – ऑरेंज 
सातारा – ऑरेंज 
चंद्रपूर – ऑरेंज 
गडचिरोली -ऑरेंज 
गोंदीया – ऑरेंज 
नागपूर – यलो 

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे.

पंढरपुरात नदीची पाणी पातळी वाढली

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाने वीर धरणातून सोडलेले पाणी आज मध्यरात्री पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे चंद्रभागा त्याच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याने वेढा टाकलेला आहे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने भाविकांना केलेला आहे.





Source link

पांडुरंगाची कृपा! एसटी महामंडळाने वर्षभराची कमाई फक्त 8 दिवसात केली

पांडुरंगाची कृपा! एसटी महामंडळाने वर्षभराची कमाई फक्त 8 दिवसात केली



 एस टी वर पांडुरंगाची कृपा झाली. आषाढी यात्रेनिमित्त एस टी ने नियोजनपूर्वक केलेल्या फेऱ्या यशस्वी आल्या असून. 28 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे. 
 



Source link

Pune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?

Pune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?


Pune Rain Update : पुण्यात गुरूवारी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRF च्या 3 टीम तैनात करण्यात आल्यायत. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर की नैसर्गिक आपत्ती असली तरी पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील 24 तासात पुण्यामध्ये (Pune Rain Update) उडालेला हाहाकार त्याचच उदाहरण आहे. 

पुण्यात पावसाचा हाहा:कार

एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत याठिकाणी पाणी आहे. पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचावकार्य सुरुय. तर पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांचं बोटीद्वारे बचावकार्य करण्यात आलंय. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय. 

मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुय. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल सुरू आहेत. महानगरपालिकेसमोरील काकासाहेब गाडगीळ पूलावरून पाणी वाहू लागलंय. या पुलावर एक कार अडकलीय. पाणी पुलावरून वाहू लागल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.

बावधन परिसरात एक शोरुम पाण्यात गेलंय. याठिकाणी सामानाचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येतंय. त्याप्रमाणे बावधनमध्ये सर्व्हिस रोडवरही पाणी आहे. पुरामुळे इंद्रायणीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेलेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा पूल 18 वर्षानंतर प्रथमच पाण्याखाली गेलाय. त्यामुळे आळंदीचा पिंपरी-चिंचवड आणि पुण्याशी संपर्क तुटलाय.

राजकारण बाजूला ठेवा, सामान्य माणसाला मदत करा’. मुलं, ज्येष्ठ नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. खडकवासला धरणाच्या वरच्या भागात 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यानं ही परिस्थीती निर्माण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनीच फिल्डवर उतरण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी केलंय.

पुण्यातील लवासामध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेत 2 बंगले गाडले गेलेत. त्या बंगल्यांत 2 जण असल्याची माहिती समोर आलीय. NDRF पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं. प्रत्येक पावसात पुणेकरांना या अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय. शहरातील नदी नाले ओढे यांच्यावर झालेलं अतिक्रमण याला जबाबदार असल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र प्रशासन याकडे  गांभिर्याने पाहणार का? प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

पुण्यातील पावसाला जबाबदार कोण?

महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर प्रशासनाला जाग येते. यावेळी असंच घडलं. खडकवासल्यातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी – अधिक होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं होतं. असं असताना महापालिका आणि महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अक्षरशः सुस्त होता. त्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून काहीच केलं नाही. पोलीस यंत्रणादेखील सज्ज नव्हती असं म्हणावं लागेल.

पुण्यामध्ये 24 तासात सुमारे दीडशे मिलिमीटर पाऊस पडला. लोणावळ्यात चारशे मिलीमीटरच्या आसपास तर तामिनी घाटात पाचशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. मागील कित्येक वर्षात असा पाऊस पडला नव्हता. अपवादात्मक परिस्थितीत अपेक्षेपेक्षा जास्त किंवा हवामान अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्यानंतर आवश्यक खबरदारी घेतली गेली पाहिजे. पुण्यात ती घेतली गेली नाही हे स्पष्ट होतं. 

नदीला पूर आला की डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढया नाल्यांचं पाणी मागेच साचायला सुरुवात होते. त्यातच अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आले आहेत. त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे. त्यातच पुण्यामध्ये ठीक ठिकाणी मेट्रो प्रकल्प तसेच उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून पाण्याचा योग्य मार्गानं निचरा होत नाही. शासन प्रशासन आणि नागरिक सगळेच त्याला जबाबदार आहेत. 





Source link

'76000 कोटी रुपये…'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

'76000 कोटी रुपये…'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर


Nirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केवळ बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांना अधिक निधी देण्यात आला. इतर राज्यांचा आणि खास करुन महाराष्ट्राचा उल्लेखही करण्यात आला नाही असा आरोप विरोधकांनी केला. या आरोपाला राज्यसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिलं आहे. यावेळेस सीतारमण यांनी राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यावर निशाणा साधला. 

काय आरोप करण्यात आले?

महाराष्ट्राचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्याचबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेल्या भरघोस निधीवरुन कठोर शब्दांमध्ये टीका केलेली. “एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा,” असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. “देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे,” असंही वडेट्टीवार म्हणाले होते.

“महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं?” असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अर्थमंत्र्यांनी काय उत्तर दिलं?

प्रत्येक बजेटमध्ये देशातील प्रत्येक राज्याच्या नावाचा उल्लेख करणं शक्य होत नाही, असं निर्मता सीतारमण यांनी म्हटलं आहे. संसदेमध्ये त्यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राचा उल्लेख केला. “उदाहरण घ्यायचं झालं तर जून महिन्यामध्ये मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील वाधवान येथे बंदर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 76 हजार कोटी रुपये निधी देण्यात आला. महाराष्ट्राचं नाव फेब्रुवारीत सादर केलेल्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये आणि काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्येही घेण्यात आलं नाही. त्याचा अर्थ महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं असा होतो का?” असा सवाल निर्मला यांनी राज्यसभेमध्ये बोलताना उपस्थित केला.

मी काँग्रेसला आव्हान देते…

निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणामध्ये पश्चिम बंगालमधील योजनेचाही उल्लेख केला. “भाषणात एखाद्या विशिष्ट राज्याचे नाव नसेल, तर भारत सरकारच्या योजना आणि कार्यक्रम, जागतिक बँक, एडीबी आणि इतर अशा संस्थांकडून आपल्याला मिळणारी मदत या राज्यांमध्ये जात नाही, असा त्याचा अर्थ होतो का? ही मदत नियमितपणे जात असते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचा हा मुद्दाम प्रयत्न आहे की, आपल्या राज्यांना काहीही दिलेले नाही, असा आभास लोकांमध्ये निर्माण करायचा. हा आरोप अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी केलेल्या सर्व अर्थसंकल्पीय भाषणांकडे पाहून मी काँग्रेस पक्षाला आव्हान देते की – त्यांनी देशातील सर्व राज्यांची नावे त्यावेळी घेतली होती का? हे सांगावं,” असंही निर्माला यांनी म्हटलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp